name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

भोवाडा: महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि ग्रामोत्सव ​/ Bhovada: The Folk Culture and Village Festival of Maharashtra

भोवाडा 

Bhovada: The Folk Culture and Village Festival of Maharashtra

       आपला भारत देश हा खेड्यापाड्यात वसलेला आहे. ग्रामीण परिसर हा भारताचा आत्मा आहे. या ग्रामीण परिसरात राहणाऱ्या लोकांच्या काही रुढी आहेत, काही परंपरा आहेत. हे ग्रामीण लोक या रूढीपरंपरांना अभिमानास्पदरीत्या चिकटून बसलेले आहेत. सालाबादप्रमाणे गावात वर्षातून एकदा यात्रा भरणे हा रूढी परंपरेचाच एक भाग आहे आणि एकदा गावाची यात्रा म्हटली की, लोकांच्या उत्साहाला उधाण येत असते. गावची यात्रा दहा-बारा दिवस पुढे असते तेवढ्यात गावात काय कार्यक्रम करायचे ते गावातील प्रतिष्ठित लोक ठरवीत असतात अशा रीतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखल्यानंतर हे लोक संपूर्ण गावातून वर्गणी (देणगी) जमा करतात. त्या वर्गणीतून काही करमणुकीचे कार्यक्रम ठेवत असतात. या कार्यक्रमांमध्ये भोवाडा किंवा तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.

Bhovada


भोवाड्याचा कार्यक्रम

       होळीच्या अगोदर ज्या गावात यात्रा भरते तेथे शक्यतो तमाशाचा कार्यक्रम असतो. मात्र होळीनंतर म्हणजे अक्षय्यतृतीयेच्या वेळेला जर यात्रा येत असेल तर तिथे भोवाड्याचा कार्यक्रम होतो. कारण भोवाडा तयार करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. व उन्हाळ्यात लोकांना शेतीची कामे फारशी नसतात त्यामुळे ते मनोरंजनासाठी भोवड्याचा कार्यक्रम करीत असतात. भोवाड्याचा कार्यक्रम हा मुख्यतः तीन दिवसात विभागलेला असतो. 
     भोवाड्यात रावणाचे पात्र बरेच मोठे असल्याने रावणाचे पहिला रावण, दुसरा रावण व तिसरा रावण असे विभाजन केलेले असते. हा भोवाडा आदिवासी भागात मात्र वेगळ्या पद्धतीने होतो. तेथे पाच दिवसांचा भोवाडा असतो. आणि तो भोवाडा हा देवीचा असतो. मात्र आपल्या ग्रामीण भागात जो भोवाडा होतो त्यातून मुख्यतः रामायणच दाखवीले जाते.  या भोवाड्यातून मुख्यतः दोन हेतू साध्य केले जातात. त्यातला पहिला म्हणजे यात्रेच्या निमित्ताने लोकांची करमणूक करणे आणि दुसरा म्हणजे या भोवाड्यातून लोकांना रामायणाची कल्पना करून देणे. कारण पूर्वी सुशिक्षितांचे प्रमाण कमी होते त्यामुळे ग्रंथ वाचणे आणि लिहिणे अत्यंत कठीण होते. आणि त्याचबरोबर या लोकांच्या मागे शेतीची कामे असल्यामुळे त्यांना वाचण्यास वेळ नसे. त्यामुळे भोवाड्याच्या ह्या तीन दिवसात लोकांची करमणूकही केली जात असे आणि यातून लोकांना रामायण कसे घडले? राम कोण होता? कसा होता? रावण कोण, कसा होता? इत्यादी गोष्टींचे आकलन होत असे.

भोवाड्याचे विभाजन  

    आपल्या ग्रामीण भागातल्या ह्या भोवाड्याचे विभाजन तीन दिवसात केलेले असल्यामुळे ह्या भोवाड्याची सुरुवात पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून, नारळ फोडून केली जाते. सुरुवात झाल्यानंतर त्या दिवशी विविध प्राण्यांची सोंगे बाहेर येत असतात. या सोंग्यांमध्ये अस्वल, हरीण, माकड इत्यादी प्राण्यांचे मुखवटे तयार करून तशा प्रकारची वेशभूषा केलेली असते. मुखवटे कागदाचा लगदा करून त्यात डिंक टाकून तयार केलेली असतात. ज्या व्यक्तीने हे सोंग घेतलेले असते त्या व्यक्तीला ते वैयक्तिक खर्चाने करावे लागते किंवा भाड्याने आणावे लागते. पहिला दिवस हा सुरुवातीचा असल्यामुळे त्या दिवशी थोडीच सोंगे बाहेर येतात. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा रात्री १२ ते १२.३०पर्यंत चालत असतो.

रात्रभर चालणारा सीतास्वयंवर 

        दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम हा करमणुकीच्या दृष्टीने मजेदार व आकलनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असतो. ह्या कार्यक्रमाला एक विशिष्ट असा ग्रामीण शब्द आहे. तो म्हणजे ' सीता सैवर' (सीतास्वयंवर) या दिवशी संपूर्ण रात्रभर कार्यक्रम चालतो. सुरुवातीला राम,लक्ष्मण व सीता ही पात्रे येतात.  पात्राच्या संभाषणासाठी विशिष्ट अशी जागा ठेवलेली असते. या विशिष्ट जागेतच ही पात्रे फिरत असतात. व संभाषण चालू असते. राम-लक्ष्मण व सीता हे एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतानाच चित्रविचित्र रूप घेतलेले आग्यावेताळाचे पात्र येते. ते बेसुमार किंचाळात नाचत असते. त्याच्या हातात पेटती मशाल असते. त्यानंतर शबरीचे पात्र येते. 

       शबरीचे व रामाचे संभाषण चालत असतानाच मारीच राक्षस सुंदर अशा हरणाच्या वेषात येतो. व त्याला मारण्यास राम- लक्ष्मण बाजूला जाताच बैराग्याच्या  वेषातील पहिला रावण हा सीतेला पळवून नेतो. त्यावेळेला सीतेचे किंचाळणे अतिशय हृदयभेदक असते. सीता व बैराग्याच्या वेषातील रावण ही पात्रे निघून गेल्यानंतर राम-लक्ष्मणाचे अतिशय शोकपूर्ण संभाषण होते. त्याचवेळेला त्यांना गरुड पक्षाचे सोंग भेटते. त्यानंतर मारुतीचे सोंग येते. मारुतीची राम-लक्ष्मणाशी भेट होते. मारुती सीता शोधासाठी निघून जातो. त्यानंतर वाली, सुग्रीव ही पात्रे येतात. त्यानंतर वेगवेगळी राक्षसपात्रे बाहेर येतात आणि त्यानंतर पहिला रावण बाहेर येतो. त्याचे संभाषण होते व शेवटी त्याच दिवशी सीतेचा शोध लागतो. अशारीतीने संपूर्ण रात्रभर अतिशय मनोरंजनात्मक असा कार्यक्रम होतो.

भोवाड्याचा शेवट

       त्यानंतरचा तिसरा दिवस हा भोवाड्याचा शेवटचा दिवस असतो. हा दिवस सर्वात रोमांचकारी दिवस असतो. ह्या दिवशी दुसरा रावण व तिसरा रावण हे एकत्र पात्र एका ताटीला दहा मुखवटे लावून ते हातात घेऊन नाचत असतात. रावणाच्या संभाषणाची एक विशिष्ट जागा असते. तिला ग्रामीण शब्द कचेरी असा आहे. रावण या कचेरीवर चढल्यावर त्याच्या पायांचा होणारा आवाज व तोंडातून निघणारा आवाज यामुळे एक भारदस्तपणा येतो. जो राक्षस म्हणून शोभू शकेल त्याच्याबरोबर सुरुवातीला विभीषणाचे संभाषण होते. याला थोडक्यात 'विभीषण शिष्टाई' असे म्हणतात. विभीषणाच्या संभाषणातून रावणाने आत्तापर्यंत काय केले व त्याचे फळ त्याला काय मिळाले याचे रसपूर्ण वर्णन यात व्यक्त होते. त्यासाठी श्लोककाराने घातलेले संभाषण असे..
रावणा रावणा तू राज्य गंभीर केले l
सीतेसारखे रत्न तू चोरून नेले ll
सीतेसारखे रत्न तुला पचेना 
चौदा चौकडी राज्य तुला मिळेना ll
यातून रावणाचे चारित्र्य लोकांना कळते. हे संभाषण झाल्यानंतर रावणाबरोबर अंगतचे संभाषण चालते. याला 'अंगत शिष्टाई' असा शब्द आहे.
रावणा रावणा तू राज्य गंभीर केले l
सीतेसारखे रत्न तू चोरून नेले ll
सीतेसारखे रत्न तुला पचेना 
चौदा चौकडी राज्य तुला मिळेना ll
यातून रावणाचे चारित्र्य लोकांना कळते. हे संभाषण झाल्यानंतर रावणाबरोबर अंगतचे संभाषण चालते. याला 'अंगत शिष्टाई' असा शब्द आहे.

रावणाचा वध

        अशा पद्धतीने 'अंगत शिष्टाई' पर्यंत सर्व इतर राक्षसांचा संहार झालेला असतो. आणि शेवटी फक्त रावण शिल्लक राहतो. तो कचेरीवरून खाली उतरतो. सुरुवातीला ताटी घेऊन तुफान नाचतो. त्याच्याबरोबर इतर सोंगे नाचतात. त्यात वानरसेना भरपूर असते आणि पहिल्या व दुसऱ्या दिवशी जी पात्रे बाहेर आलेली असतात त्यातून जी मेलेली असतात ती पात्रे सोडून सर्वच पात्रे बाहेर येतात. त्यावेळेला ही पात्रे भरपूर नाचतात. नाचता - नाचता ते भांडण खऱ्या अर्थाने रावणाविरुद्ध इतर सर्वच पात्रांचे असते. सुरुवातीला रावण सर्वच पात्रांना पुरून उरतो. हा संघर्ष बराच वेळ चालतो आणि नंतर रामाकडून रावणाचा वध होतो आणि ह्या भोवाड्याची सांगता होते.

       अशा पद्धतीने पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून सुरू झालेला हा भोवाडा तीन दिवस लोकांचे मनोरंजन करून तिसऱ्या दिवशी पहाटे रावणाचा वध झाल्यानंतर संपतो. ह्या भोवाड्यामुळे गावातील सर्व लोक एकत्र येतात. मोठ्या आनंदोत्सवात हा भोवाड्याचा कार्यक्रम होतो. भोवाडा संपल्यानंतर त्याच दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो व गावातील लोकांची यात्रा संपते.

भोवाडा

खेड्यापाड्यात वसलेला देश माझा
करमणुकीसाठी होतो भोवाडा,
तीन दिवसात विभागलेला कार्यक्रम
पाहण्यासाठी जमतो अख्खा गावगाडा....

पूर्वी करमणुकीसाठी नव्हते काही साधन
भोवड्यातून सादर व्हायचे रामायणाला,
शेतकरी समाज शेतीत रममाण
भोवाड्याच्या निमित्ताने यायचा जागरणाला....

विविध प्राण्याची सोंगे भोवड्यात असतात
दुसऱ्या दिवशी असते सीता स्वयंवर,
हुबेहूब चितारले जाते रामायणातील पात्र
राक्षस संहाराने उठते येथे आनंदी लहर....

सुरुवातीला रावण उरतो पात्रांना उरून
संघर्ष हा बराच वेळ चालतो,
रामाकडून होतो रामाचा वध
तेव्हा भोवाड्याचा आनंदोत्सव संपतो...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************



मना गावनी जत्रा (अहिराणी कविता)My Village Fair (Ahirani poem)

मना गावनी जत्रा  
(अहिराणी कविता)

My Village Fair (Ahirani poem)

My Village Fair


मना गावनी जत्रा
घुमाडतस काठी,
देवमाऊलीसले निवतनं
म्हसोबा ह्रास सदा पाठी...


मना गावनी जत्रा
तमाशा रंगस रातले,
चावदस व्हस् साजरा
मांसाहार ह्रास दुपारले...


मना गावनी जत्रा
कधी दुकान जिलेबीनं,
सर्वा गावना गोतावळा
कसे व्हस एकमेकले भेटणं...


मना गावनी जत्रा
अखंड परंपरा से इथली,
आख्खं गाव फोडस नारळ
मज्जा ह्रास आठे कितली...


© दीपक केदू अहिरे, 

आनंदपुर







श्वास पुन्हा थांबला (Breathing stopped again)

पुन्हा श्वास थांबला
Breathing stopped again

Shwas punha thambala

     ही कविता ज्या भावनेतून लिहिली आहे ती म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातील सतत चालणाऱ्या संकटांची खरी कहाणी. आजच्या काळात शेतकरी ज्या संकटांतून जात आहे, त्याचे हृदय पिळवटून टाकणारे वास्तव या ओळींतून समोर येते. ढगफुटी, अतिवृष्टी, पुर यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाहून जाते, आणि शेतकरी पुन्हा एकदा उभा ठाकतो कर्ज, निराशा आणि उपासमारीच्या टोकावर...

शेतकऱ्याची मेहनत आणि आशा

    शेतकरी दिवसरात्र कष्ट करून, उन्हातान्हात उभा राहून आपल्या पिकाला पाणी घालतो, खत देतो, कीडरोगावर औषधं करतो. त्याच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न असतं – पीक तयार झाल्यावर घरात सुख-समाधान येईल, लेकरांना शिक्षण मिळेल, दिवाळी साजरी होईल. पण जेव्हा हाता तोंडाशी आलेल्या पिकावर निसर्ग कोपतो, तेव्हा त्याची सगळी स्वप्ने एका क्षणात चुरमडून जातात.

ढगफुटीचे संकट

  गेल्या काही वर्षांत हवामानाचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. अचानक ढगफुटी होते, दोन-तीन तासांत एवढा पाऊस पडतो की शेतात उभे असलेले पिके पाण्याखाली जाते. मका, सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतात उभा असलेला शेतकरी आपल्या डोळ्यांसमोर पिके वाहून जाताना पाहतो. त्याच्या तोंडून नि:शब्दपणे फक्त एक हुंदका निघतो – "माझा श्वास थांबला…"

Shwas punha thambala

स्वप्नांची राख रांगोळी

  शेतकरी दिवाळीसाठी, लेकरांच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी किती योजना आखतो. पण जेव्हा पिके वाहून जातात तेव्हा त्या स्वप्नांची राख होते. दिवाळीत फटाके, पणत्यांऐवजी त्याच्या अंगणात काळोख पसरतो."स्वप्नांची झाली राख रांगोळी…" या ओळीतून त्या हतबलतेचे वर्णन दिसते.

मायबाप सरकारची अपेक्षा

  प्रत्येक वेळेस संकट आल्यावर शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची आस लागते. पण मदत वेळेवर मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता असते. नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात, कर्जमाफीचे आश्वासन दिले जाते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात फारसे काही पडत नाही. त्याला वाटतं – मेघराजा रुसला, सरकारने पाठ फिरवली, आता जगायचं कसं?

श्वास अडकलेले जीवन

    ही कविता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या थांबलेल्या श्वासाची कहाणी आहे. कधी पाणी नसल्याने दुष्काळ, कधी जास्त पावसाने पुर, तर कधी कीडरोगाने नुकसान.
प्रत्येक वेळी तो पुन्हा उभा राहतो, आशा ठेवतो, पीक पेरतो.पण प्रत्येकवेळी कुठेतरी त्याचा श्वास अडकतो. हे अडकलेले श्वास म्हणजे अपूर्ण स्वप्ने, न उलगडलेला आनंद आणि न संपणारी संघर्षयात्रा...

Shwas punha thambala

निष्कर्ष

     शेतकऱ्याचा हा संघर्ष केवळ त्याचा वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. कारण शेतीवरच आपले पोट अवलंबून आहे. जर शेतकरी संकटात असेल तर आपणही सुखात राहू शकत नाही. म्हणून या कवितेतून आलेला संदेश असा आहे की शेतकऱ्याचे दुःख फक्त शब्दांत न राहता प्रत्यक्ष कृतीतून कमी झाले पाहिजे. वेळेवर नुकसानभरपाई, हवामान बदलाला अनुरूप तंत्रज्ञान, आणि शेतकऱ्याला भावनिक व आर्थिक आधार गरजेचा आहे.

    ही परिस्थिती जिवंतपणे मांडणाऱ्या माझ्या कवितेतून शेतकऱ्याच्या छातीतला हुंदका स्पष्टपणे ऐकू येतो. एकंदरीत या कवितेत  शेतकरी आयुष्याचे कडवे सत्य आणि निसर्गाशी सुरू असलेली न संपणारी झुंज उलगडली जाते.

Shwas punha thambala

पुन्हा श्वास थांबला
Breathing stopped again


हाता तोंडाशी येणारे पीक
ढगफुटी झाली गावाला,
ऐकून शेतकरी राजाचा निरोप
पुन्हा माझा श्वास थांबला...

पोटच्या पोरावानी जपतो
शेतकरीदादा आपल्या पिकाला,
ओल्या दुष्काळाने भरला नाला
ऐकून माझा श्वास थांबला...

पीक कापून करणार होतो दिवाळी
पावसात सारे पीक वाहून गेले,
स्वप्नांची झाली राख रांगोळी
कवितेतून दुःख आता मांडले...

मायबाप सरकारबरोबर मेघराजा रुसला
काढणीला आलेल्या पिकात धुव्वाधार कोसळला,
नुकताच कापणीला आलेला मका पुरात वाहून
श्वास माझा मधल्या मध्ये अडकला...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कोंबडीपालन (Poultry Farming) माहिती मराठीत | नफा देणारा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी

🐔 कोंबडीपालन (Poultry Farming): शेतकरी आणि बेरोजगारांसाठी नफा देणारा जोडधंदा

kombadipalan

    आजच्या काळात शेतीसोबत जोडधंदा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार पाहता केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरते. अशा परिस्थितीत कोंबडीपालन (Poultry Farming) हा कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न देणारा, सातत्याने चालणारा आणि शाश्वत व्यवसाय ठरतो.

    कोंबडीपालन हा ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांसाठी रोजगार निर्मितीचा उत्तम मार्ग आहे. शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार तरुण, लघुउद्योजक यांच्यासाठी हा व्यवसाय आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो.


🔹 कोंबडीपालन म्हणजे काय?

    अंडी आणि मांस उत्पादनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्या पाळण्याच्या व्यवसायाला कोंबडीपालन किंवा कुक्कुटपालन असे म्हणतात. भारतामध्ये हा व्यवसाय झपाट्याने वाढत असून देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.


🔹 कोंबडीपालनाचे प्रकार

1️⃣ देशी कोंबडीपालन

  • कमी खर्चात करता येते

  • रोगप्रतिकारक शक्ती जास्त

  • अंडी व मांसाला चांगला दर

  • परसातील पालनासाठी योग्य

2️⃣ ब्रॉयलर कुक्कुटपालन

  • 35–45 दिवसांत तयार

  • मांस उत्पादनासाठी

  • जलद नफा देणारा प्रकार

  • करार शेतीसाठी उपयुक्त

3️⃣ लेयर कोंबडीपालन

  • अंडी उत्पादनासाठी

  • 72 आठवडे अंडी देतात

  • नियमित उत्पन्नाचा स्रोत


🔹 कोंबडीपालनाचे फायदे

✔️ कमी गुंतवणुकीत जास्त नफा
✔️ वर्षभर चालणारा व्यवसाय
✔️ बाजारात कायम मागणी
✔️ शेतमालाला पूरक जोडधंदा
✔️ महिला व तरुणांसाठी रोजगार
✔️ कोंबडी खतामुळे शेती उत्पादन वाढ


🔹 कोंबडीपालनासाठी लागणारी जागा व सुविधा

  • स्वच्छ व हवेशीर शेड

  • उन्हापासून व पावसापासून संरक्षण

  • योग्य वायुवीजन

  • स्वच्छ पिण्याचे पाणी

  • तापमान नियंत्रणाची व्यवस्था


🔹 कुक्कुटखाद्य (Feed) व्यवस्थापन

कोंबडीपालनात खाद्याचा खर्च सर्वाधिक असतो. योग्य आहार दिल्यास उत्पादन वाढते.

खाद्यात समाविष्ट असावे:

  • मका

  • सोयाबीन पेंड

  • गहू

  • मिनरल मिक्स

  • जीवनसत्त्वे

स्वच्छ व थंड पाणी नेहमी उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


🔹 उष्माघात व रोगांपासून संरक्षण

  • उन्हाळ्यात पाण्यात बर्फ घालणे

  • शेडमध्ये पंखे व पडदे

  • वेळोवेळी लसीकरण

  • स्वच्छता राखणे

यामुळे मृत्यूदर कमी होतो आणि नफा वाढतो.


🔹 कोंबडी खताचे महत्त्व

कोंबडी खत हे अत्यंत दर्जेदार सेंद्रिय खत आहे.

✔️ नायट्रोजन, फॉस्फरस भरपूर
✔️ मातीची सुपीकता वाढवते
✔️ भाजीपाला, फळबागेसाठी उत्तम
✔️ अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत


🔹 कोंबडीपालनासाठी प्रशिक्षण व अनुदान

  • प्रत्येक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशिक्षण

  • शासनाच्या विविध योजना

  • बँक कर्ज व अनुदान सुविधा

  • स्वयंरोजगार योजना

योग्य प्रशिक्षण घेतल्यास तोटा टाळता येतो.


🔹 कोंबडीपालनातील बाजारपेठ

  • स्थानिक बाजार

  • हॉटेल व ढाबे

  • अंडी व्यापारी

  • पोल्ट्री कंपन्या

  • थेट ग्राहक विक्री

आज पोल्ट्री कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे.


🔹 कोंबडीपालन : भविष्याची संधी

आरोग्याबाबत वाढती जागरूकता, प्रथिनयुक्त आहाराची मागणी आणि लोकसंख्येची वाढ पाहता कोंबडीपालन उद्योगाचा विकासदर येत्या दशकात आणखी वाढणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे.


🔚 निष्कर्ष

    कोंबडीपालन हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा उद्योग आहे. योग्य नियोजन, शास्त्रोक्त पद्धत आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास कोंबडीपालनातून अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. तुम्हीही आजच या व्यवसायाचा विचार करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारू शकता.


✍️  कविता 

कोंबडीपालन (poultry farming)


शेतकरी दादा तुम्ही करा कोंबडीपालन,
चालू राहिल तुमचे सदोदित चलन...

बेरोजगारांसाठी ही नामी संधी,
सोडू नका अनुदानाची सुवर्णसंधी...

करा तुम्ही कराराने ब्रॉयलर कुक्कुटपालन,
याने होईल सर्व घराचे पालन-पोषण...

जात लक्षात असू द्या सातपुडा देशी,
लावाल नुसत्या पैशांच्या राशी...

परसातील लक्ष्मी म्हणजे राधाराणी,
खिशात तुमच्या खुळखुळतील नाणी...

असू द्यावी लक्षात गिरीराज वनराज,
त्याने चढेल तुमच्या कुक्कुटपालनाला साज...

परसातील कोंबडीपालन आहे सहज आणि स्वस्त,
याने होतील विनाशकारी अळ्या फस्त...

देशी,ब्रॉयलर कोंबडीपालन आहे फायदेशीर,
या जोडधंद्याद्वारे मारा संसाराचा तीर...

कुक्कुटपालनात आहे विविध कंपन्याचे योगदान,
त्यांच्यामुळे आहे या उद्योगाची जान आणि शान...

अंड्यांसाठी करा तुम्ही कुक्कुटपालन,
यामुळे मिळेल जगा प्रथिनयुक्त अन्नसधन...

मांसासाठीही करा तुम्ही हा उद्योग,
याने चढेल तुमच्या प्रगतीचा वेग...

उष्माघातापासून करा कोंबड्यांचे संरक्षण,
त्यांच्या पाण्यात टाका बर्फ विरघळून...

कुक्कुटपालनासाठी घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण,
प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात आहे हे शिक्षण...

कुक्कुटखाद्यासाठी वापरा सोयाबीन, मका,
स्वच्छ पाणी देण्यासाठी अंग चोरू नका...

कोंबडीखतात आहे दर्जेदार गुण,
याने वाजेल दर्जेदार शेतीउत्पन्नाची धून...

कुक्कुटपालनातून अनेक झाले लखपती,
लावा गावागावात ह्या धंद्याच्या वाती...

होतो आहे आता पोल्ट्री कंपन्याचा विस्तार,
तुम्हीही करा आता या धंद्याचा विचार...

या दशकात वाढेल कुक्कुटउद्योगाने विकासदर,
म्हणून दिपू सांगतो कुक्कुटपालनाचा रस्ता धर...


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

हर घर तिरंगा मोहिम ( Har Ghar Tiranga mission)

हर घर तिरंगा मोहिम 
 Har Ghar Tiranga

Har Ghar Tiranga mission



स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 

सर्वत्र साजरा करू या,

तिरंगा देशाचा अभिमान, 

सन्मान मनात बाळगूया...
 

हर घर तिरंगा मोहीम, 

देते आम्हाला प्रेरणा,

राष्ट्रध्वज आमच्यासाठी, 

धैर्य व त्यागाची धारणा...


अमृत महोत्सवाची सुरुवात

साबरमती आश्रमापासून,

दोन वर्ष होईल साजरा, 

वाजवावी देशभक्तीची धून...


विकासाच्या उत्तुंग पातळीवर, 

आपला देश पोहोचला,

योगदान देणाऱ्यांना स्मरून, 

सन्मान द्यावा राष्ट्रध्वजाला...


© दीपक केदू अहिरे, नाशिक


चौकोनी संप्रेरके (Quadrilateral hormones)

चौकोनी संप्रेरके
Quadrilateral hormones


Choukoni samprarake

आपला आनंद वाढवण्यासाठी 
संप्रेरके असतात खूप महत्त्वाची, 
एन्डोरफिन्स,डोपामाईन,सेरोटोनीन
ऑक्सिटोसीन ही असतात गरजेची...

दररोजचा व्यायाम करून 
एन्डोरफिन्स मिळवा आपण, 
खेळ खेळण्याची सवय लावून 
करा दररोज विनोदी वाचन... 

छोट्या मोठ्या गोष्टींसाठी 
करावे कामाचे तोंडभरून कौतुक, 
शरीरात होते डोपामाईन तयार
पसरते सर्वत्र आनंदाची वाहतूक... 

इतरांचा आनंद व फायद्यासाठी 
करावी नियमित रचनात्मक कृती, 
तेव्हा तयार होते सेरोटोनीन
जेव्हा पुरवतात उपयुक्त माहिती... 

आपलेपणाने साधा जवळीक 
जवळच्या व्यक्तीला द्या आलिंगन, 
मैत्रभावनेने ठेवा खांद्यावर हात 
तेव्हा तयार होते ऑक्सिटोसीन...

अशाप्रकारे रहा तुम्ही आनंदी 
दूर होतील तुमच्या अडचणी, 
आत्मविश्वासाने सामोरे जाल 
संप्ररके तयार करा ही चौकोनी...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


काही पानटा (kahi paanta)

काही पानटा 
Kahi paanta

(अहिराणी भाषानी कविता)
Ahirani language poem

Kahi paanta

काही पानटा भराना, 

ह्यातंस वहिना,

काही पानटा  वाढाना,

ह्यातंस जेवाना... 

काही पानटा  रंगाडना,

ह्यातंस पान खावाना,

काही पानटा  जाळाना,

ह्यातंस पालापाचोळाना... 

काही पानटा  जपाना,

ह्यातंस पिंपळना,

काही पानटा  कुटाना,

ह्यातंस पुदिनाना... 

काही पानटा  लुटाना, 

ह्यातंस आपटाना, 

काही पानटा  खुडाना,

ह्यातंस चहाना... 

काही पानटा  सजाडाना,

ह्यातंस आंबाना,

काही पानटा माळाना,

ह्यातंस केवडाना... 

काही पानटा  जोडाना,

ह्यातंस पुरवणीना, 

काही पानटा  लपाडाना,

ह्यातंस प्रगतीपुस्तकना... 

काही पानटा  सोडाना,

ह्यातंस दुखना, 

काही पानटा  उघाडाना, ह्यातंस सुखना... 


© दीपक केदू अहिरे, नाशिक