name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): शेती
शेती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नारोळ्या ते केळदोडी: आनंदपूरच्या गावरान आंब्यांच्या रसाळ आठवणी | Memories of Gavran Mangoes


नारोळ्या ते केळदोडी: माझ्या गावच्या रसाळ आठवणी
Memories of Gavran Mangoes

"Anandpur Gavran Amba Memories"

    माझं गाव आनंदपूर! तसं तर गाव खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध असेल, पण माझ्यासाठी आनंदपूरची ओळख म्हणजे तिथले नामांकित आंबे. आमच्या गावात पूर्वी 'लांघी' नावाचा एक भाग होता, जिथे दाट आमराई असायची. त्या काळच्या आंब्यांची चव आणि रूप खरोखरच 'एक से एक बढकर' असे. आजच्या चकचकीत बाजारात मिळणाऱ्या आंब्यांपेक्षा त्यांची सर कशालाच येणार नाही.

| आमची आगळीवेगळी 'आंबा-नामावली'

  आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात आनंदपूरचे आणि शेजारच्या चुडापूरचे आंबे घेण्यासाठी लांबून व्यापारी येत असत. तेव्हा आंब्याला फक्त 'आंबा' म्हणून ओळखलं जायचं नाही, तर त्यांच्या आकारानुसार आणि गुणानुसार त्यांना विशिष्ट नावे होतीः

  नारोळ्या, घोट्या, सुपाऱ्या, केळदोडी, झावळ्या, लोणच्या, खारोट्या, दोडी यातल्या 'नारोळ्या'चे नाव तर तो नारळासारखा दिसायचा म्हणून पडले होते. ही नामावली खूप मोठी आहे, जी आजच्या पिढीला ऐकून नवल वाटेल.

"Anandpur Gavran Amba Memories"

| बालपण आणि आंब्याचा घमघमाट

  लहानपणीच्या आठवणींमध्ये आंब्याचा वास आजही ताजा आहे. घरातल्या खोलीत आंब्याच्या अडीचा जो घमघमाट यायचा, तोच भूक चाळवायला पुरेसा असे. झाडावरून उतरवलेले सर्व आंबे एकत्र असायचे. एखादा आंबा चाखून पाहिला आणि तो थोडा आंबट लागला की तो लगेच टोपलीत जायचा. मग सुरू व्हायची शोधयात्रा 'मधाळ आणि गोड आंबा कोणत्या टापूत मिळेल?' हे शोधण्यातलं सुख काही वेगळंच होतं.

एक ऐतिहासिक आठवणः

   जेव्हा आमच्या गावचे डी. जी. पाटील (ज्यांनी नाशिकमध्ये डीजीपी नगर वसवले आणि जे 'बागलाणची वाघीण' म्हणून ओळखले जात) जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी संपूर्ण गावाला पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण दिले होते. विशेष म्हणजे, त्यासाठी वापरलेले सर्व आंबे आमच्या गावचेच अस्सल गावरान आंबे होते. त्यांची ती मधुर चव आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतेय.

शाक, पेम आणि अस्सल गावरान चव

  नैसर्गिक पद्धतीने झाडावर पिकलेल्या आंब्याला आम्ही 'शाक' म्हणायचो. हा शाक खाण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडला आहे. आंबे पिकवण्यासाठी ते पाचटात घालून ठेवले जायचे. कधी कधी आम्ही मित्रमंडळी आंब्याचे 'पेम' लपवून ठेवायचो आणि चार-पाच दिवसांनी ते आंबे पिकल्यावर चोरून खायचो.

"Anandpur Gavran Amba Memories"

"तुम्ही गावरान आंबे पहिले, आम्ही आता हायब्रीड कलमी बघतो..."

 नुकतंच आखाजीच्या (अक्षय्यतृतीया) निमित्ताने आंबे आणले होते. रस करण्यासाठी मिक्सरमध्ये तीन वेळा फिरवावे लागले, तेव्हा कुठे तो तयार झाला. आमच्या पिढीने गावठी आंब्याचा जो नैसर्गिक रस चाखलाय, त्याची चव या हायब्रीड आंब्यांना कधीच येणार नाही. हेच आंबे एकेकाळी सातासमुद्रापारही गेले होते, याचा सार्थ अभिमान वाटतो.

एक खंत आणि साद...

    आज मन खंतावते जेव्हा लांघीची ती दाट आमराई विरळ होताना पाहतो. अनेक नामांकित आंबे आता नामशेष झाले आहेत. आपला हा वारसा आपण जपला पाहिजे. फळांच्या राजाने माझ्या मनावर जे गारूड केलंय, तेच प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं. आजही माझं मन त्या आंब्याच्या डहाळीवर बसून बालपणाच्या आठवणीत रमतंय.

   तुमच्याकडे आनंदपूरच्या किंवा तुमच्या गावच्या आंब्यांच्या काही आठवणी असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!

"Anandpur Gavran Amba Memories"
आनंदपूर गावातील चारूदत्तराजे यांची उस्फुर्त प्रतिक्रिया 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

गारपीट : बळीराजाच्या स्वप्नांवर कोसळलेले संकट (Hailstorm | Garpit)

🌨️

 गारपीट (Hailstorm

| Garpit) : बळीराजाच्या स्वप्नांवर कोसळलेले संकट

निसर्गाचा कोप आणि शेतकऱ्यांची वेदना


Garpit


    शेती हा निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. पाऊस, ऊन, वारा या नैसर्गिक घटकांवरच शेतकऱ्यांचे जीवन उभे आहे. पण जेव्हा निसर्गच अचानक रौद्ररूप धारण करतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका बसतो तो बळीराजाला.

गारपीट (Hailstorm / Garpit) ही अशीच एक आपत्ती आहे जी काही क्षणांत शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे कष्ट उद्ध्वस्त करते.


🌾 गारपिटीचे भीषण परिणाम

  • उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
  • कांदा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांचे पूर्ण नुकसान
  • भाजीपाला आणि फळबागांचा नाश
  • आर्थिक तोटा आणि कर्जबाजारीपणा
  • शेतकऱ्यांच्या मानसिक तणावात वाढ

गारपीट म्हणजे फक्त बर्फाचे गोळे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा आहे.


💔 शेतकऱ्यांच्या वेदनेतून उमटलेले शब्द

माझी  ही कविता शेतकऱ्यांच्या मनातील वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते 👇

गारपीट
Hailstorm

© दीपक केदू अहिरे, नाशिक

Garpit

असी कसी देवा, 
गारपीट तू केली, 
उन्हाळ्यात पाडतो पाऊस, 
हातची पिके वाया गेली... 

महागामोलाचे कांदा बियाणे, 
लावले ते शेतात, 
गारपीट पाडून तू, 
सडवले आता पोंग्यात... 

सारा जीव लावून 
आम्ही शेतमाल पिकवतो, 
गारपीट पाडून 
तोंडचा घास हिसकावून नेतो... 

रात्री, दिवसा आणि पहाटे 
आम्हीच का तुला सलतो, 
अवकाळी गारपीट कसी चुकवावी 
याच काळजीत सदा आम्ही असतो...

लाखमोलाचे पीक, 
तू करतो बेभरवश्याचे, 
दोन पैसे येतील गाठी, 
कसे निघावे उत्पादन खर्चाचे... 

मातीमोल असतो भाव, 
बियाणे, रोपातही भेसळ, 
त्यात तुझी अवकाळी, 
किती सोसावी आम्ही कळ...

Garpit

🌱 गारपिटीमागील कारणे

  • हवामानातील अचानक बदल
  • वातावरणातील अस्थिरता
  • ढगांतील तापमानातील तफावत
  • हवामान बदलाचा वाढता प्रभाव

आजच्या काळात गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे, ही शेतीसाठी गंभीर बाब आहे.


⚠️ उपाययोजना

  • पिक विमा (Crop Insurance) घेणे
  • हवामान अंदाजावर लक्ष ठेवणे
  • फळबागांवर संरक्षक जाळी (Net) वापरणे
  • नुकसान झाल्यास तात्काळ पंचनामा करणे
  • शासनाच्या मदतीसाठी अर्ज करणे

🌼 निष्कर्ष

    गारपीट ही शेतकऱ्यांसाठी केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर मोठा आघात आहे.

तरीही, बळीराजा प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभा राहतो, नव्या आशेने पेरणी करतो आणि जीवनाची गुढी पुन्हा उभारतो. 🌱

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

दोन महिलांचा ध्यास, शेती आणि द्राक्ष निर्यातीचा यशस्वी प्रवास! (Two women's passion, a successful journey of farming and grape export)

दोन महिलांचा ध्यास, शेती आणि द्राक्ष निर्यातीचा यशस्वी प्रवास!
Two women's passion, a successful journey of farming and grape export

Don mahilancha dhyas, sheti aani draksh niryaticha yashsvi pravas

   आजच्या काळात शहरात सरकारी नोकरी करणाऱ्या पतींसोबत सुखाचं आयुष्य सहज मिळू शकतं. पण मनीषा दीपक जाधव आणि सविता बबन जाधव या दोन महिलांनी वेगळा मार्ग निवडला. शेतीची माती आणि परिश्रमावर विश्वास ठेवत त्यांनी द्राक्ष शेतीसह द्राक्ष निर्यातीचं स्वप्न साकार केलं.


   मनीषा आणि सविता – दोघींना प्रत्येकी दोन मुले आहेत. मनीषांचे पती एस.टी. महामंडळात तर सवितांचे पती एम.एस.इ.बी.मध्ये कार्यरत आहेत. कुटुंबातील तिसरे दीर प्राध्यापक असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. म्हणजे घरातील सर्व पुरुष सरकारी नोकरीत होते. तरीही शेतीची जबाबदारी या दोन महिलांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.


     २०१८ साली त्यांनी द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२२ मध्ये मनीषांच्या पतींना मुंबई येथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली, तेव्हा परिस्थिती कठीण होती. द्राक्षबाग नव्यानेच उभी राहत होती आणि अनुभवही कमी होता. अशा वेळी मनीषांनी ठाम शब्दांत सांगितले – "तुम्ही निर्धास्त नोकरीला जा, शेती कोणीच खोदून नेणार नाही, जबाबदारी आम्ही सांभाळू."


    यानंतर दोघींनी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू केला. मजूर न मिळाल्यास स्वतः शेतात काम केलं. तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं, चुका करून शिकल्या आणि दिवसेंदिवस पारंगत होत गेल्या. मेहनतीच्या जोरावर बाग फुलत गेली. २०२० पासून त्यांनी सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात सुरू केली आणि सभासदत्वही घेतलं.


   त्यांच्या परिश्रमाचे फळ लवकरच दिसू लागले.

२०२२ मध्ये २५.२३ टनातून १८.१६ लाख रुपये उत्पन्न.

२०२३ मध्ये २९.४४ टनातून २२.९६ लाख रुपये.

२०२४ मध्ये १५.५० टनातून १३.४८ लाख रुपये.

२०२५ मध्ये २०.३८ टनातून १६.७० लाख रुपये.


    विशेष म्हणजे २०२२-२३ साली विक्रमी एकरी १२ टन उत्पादन घेऊन १०० टक्के द्राक्ष निर्यात करण्याचा मानही मिळवला. सध्या त्यांच्या ७ एकर शेतीत २.५ एकर थॉम्पसन, १.५ एकर क्रिमसन आणि उर्वरित क्षेत्रात फ्लॉवर आहे.


   आज त्यांची द्राक्षबाग पाहण्यासाठी तालुक्यातील लोक येतात आणि मार्गदर्शन घेतात. लोक विचारतात – "सर्व पुरुष नोकरीला आहेत, मग एवढी मेहनत कशाला?" तेव्हा या ‘लेडी जय-वीरू’ हसून उत्तर देतात – "कष्टाला पर्याय नाही."


     जाधव कुटुंबाची खरी ताकद म्हणजे त्यांचं एकत्र राहणं. पतींनी महिलांवर विश्वास दाखवला, त्यांना मुभा दिली, आणि महिलांनी कष्ट, जिद्द व कल्पकतेने शेतीतून आर्थिक बळकटी निर्माण केली.


       आज मनीषा आणि सविता या फक्त शेतकरी नाहीत, तर निर्यातदार महिलांचा प्रेरणादायी चेहरा आहेत. त्यांनी सिद्ध केलं की, शहरातील आरामशीर आयुष्य सोडून संघर्षाचा मार्ग निवडला तर शेतीही लाखोंचं उत्पन्न देऊ शकते.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

पाऊस मला आठवण करून देतो (The rain reminds me)

पाऊस मला आठवण करून देतो
The rain reminds me


The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे शेतीची,

उन्ह्याळयात हाेते मशागत 

लगबग ती पेरणीची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देतोआंतरमशागतीची,

वेळेवर निंदणी करून 

आशा उत्पन्न वाढवण्याची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे खताची,

शिफारशीनुसार खते देवून 

वाट पाहतो उत्पादनाची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे कापणीची,

वेळेवर काढणी करून
वेळ साधावी साठवणुकीची


©दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...