name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

अन्नप्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगाराची संधी : मिरची व सिमला मिरची प्रक्रिया | Self-Employment Opportunity from Food Processing Industry – Chilli & Capsicum Processing

🌾 अन्नप्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगाराची संधी
Annaprakriya Udyogatun Swayamrojgarachi Sandhi

Annaprakriya udyogatun swayamrojgarachi sandhi

    भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नाही. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग पुढे येत आहे. फळे व भाज्यांवर प्रक्रिया करून विविध टिकाऊ व मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात, ज्यांना देश-विदेशात मोठी मागणी आहे.

    कांद्यापासून पेस्ट, पावडर, तेल; टोमॅटो व फळांपासून जॅम, जेली, केचप, टूटी-फ्रुटी, लोणचे, मार्मालेड, केक, चॉकलेट यांसारखी उत्पादने तयार करून स्वयंरोजगार व रोजगारनिर्मिती शक्य होते. शासनाची धोरणेही अन्नप्रक्रिया उद्योगाला पूरक आहेत.


🌶️ मिरची प्रक्रिया (Chilli Processing)

    मिरची ही नाशवंत भाजी असून साठवणीत २० ते ४०% नुकसान होते. प्रक्रिया करून टिकाऊ उपपदार्थ तयार केल्यास हे नुकसान टाळता येते व निर्यातीतून परकीय चलन मिळते.

1️⃣ ओलियोरेझीन निर्मिती

    मिरची पावडरपासून योग्य विलायक (असेटोन, इथेनॉल, EDC) वापरून ओलियोरेझीन तयार केले जाते. हळद, आले, मिरी यांच्यापासूनही ओलियोरेझीन बनवता येते. अत्यंत तिखट मिरचीपासून अधिक दर्जेदार ओलियोरेझीन मिळते.

2️⃣ वाळलेल्या लाल मिरचीपासून चिली सॉस

  • सॉस प्रकार १ : भाजलेल्या व उकडलेल्या मिरच्यांची पेस्ट

  • सॉस प्रकार २ : पीठ, तेल, मिरची पावडर व मसाल्यांसह

  • सॉस प्रकार ३ : उकडलेल्या मिरच्यांच्या गरापासून तयार पेस्ट

3️⃣ ताज्या लाल मिरचीचा चिली सॉस

    ताज्या मिरच्यांपासून मीठ, लसूण, कांदा, लोणी/तूप वापरून तयार होणारा सॉस बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीयोग्य आहे.

4️⃣ ताज्या हिरव्या मिरचीचा चिली सॉस

    हिरवी मिरची, टोमॅटो व मीठ वापरून तयार होणारा हा सॉस ४–५ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये टिकतो.

5️⃣ मिरचीचे लोणचे

  • व्हिनेगर लोणचे

  • तेलाचे लोणचे

  • मिठाचे लोणचे

भारतात प्रामुख्याने मोहरी/तिळाचे तेल वापरून लोणची तयार केली जातात, जी दीर्घकाळ टिकतात.

6️⃣ मिरची सांडगे

भरलेल्या मिरच्यांपासून उन्हात वाळवून तयार केलेले सांडगे हे घरगुती तसेच व्यावसायिक उत्पादन म्हणून लोकप्रिय आहेत.


🫑 सिमला मिरची प्रक्रिया (Capsicum Processing)


Annaprakriya udyogatun swayamrojgarachi sandhi

    सिमला मिरची (ढोबळी मिरची) ला बाजारात मोठी मागणी आहे. हिरवी, लाल, पिवळी व जांभळी सिमला मिरची प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त आहे.

1️⃣ पीठ पेरून भाजी

2️⃣ मसाला पेरून भाजी

3️⃣ रस भाजी

4️⃣ सिमला मिरची भरून भाजी

ही उत्पादने रेडी-टू-ईट / रेडी-टू-कूक स्वरूपात विक्रीस मोठी संधी देतात.


💼 स्वयंरोजगार व उत्पन्नाची संधी

मिरची व सिमला मिरची प्रक्रिया उद्योगातून

  • उत्पादन खर्च कमी

  • मूल्यवर्धन जास्त

  • स्थानिक व निर्यात बाजार उपलब्ध

  • युवक व शेतकऱ्यांसाठी रोजगारनिर्मिती

अशी शाश्वत व फायदेशीर व्यवसाय संधी निर्माण होते.


✍️ © दीपक केदू अहिरे
📍 नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे ! (Karmaveer and industrial hero should be made from village to village)

उद्योजकीय समाज काळाची गरज !
The need of entrepreneurial society
गावोगावी कर्मवीर व उद्योगवीर घडवायला हवे !
Karmaveer and industrial hero should be made from village to village

Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

देश असो वा राज्य खेडे हे त्यांची छोटी आवृत्ती असते. व्यक्ती-व्यक्तीच्या माध्यमातून राष्ट्र घडते, या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे व असावे हा चिंतनाचा विषय आहे. पण आज ग्रामीण भागातील परिस्थिती ही निश्चितच चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी देशातील प्रत्येकाने 'जबाबदार' होण्याची तसेच देशाच्या युवा पिढीवर उद्योजकीय संस्कार रुजविण्याची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील विदारक व चिंताजनक परिस्थितीविषयी भाष्य करणारा हा लेख/ब्लॉग...


      उद्योजकच्या दिवाळी अंकासाठी सगळे हटके विषय असल्याचे कळले आणि मीही 'कृषी या एकाच विषयाशी मोट बांधून वर्षभर लिखाण करत असतो. मग हटके विषयावर कधी लिहिणार म्हणून हा लेख उद्योजक दिवाळी अंकासाठी लिहीत आहे. ग्रामीण सुधारणेतून उद्योजकता कशी वाढीस लागेल याविषयी मी माझ्यापरीचे असलेले स्वैर निरीक्षण आपल्यासमोर मांडत आहे. यात कुणालाही स्थल कालपरत्वे कोणी दुखावले आहे असे वाटत असेल तर प्रथमतः मी माफी मागतो. परंतु चांगले होण्यासाठी जशी आपण कडू औषधे घेतो तशी ही लेखरुपी गोळी काम करेल असे वाटते.

     

   ग्रामीण उद्योजकतेला भाऊबंदकीचा शाप आहे असे अनेकांना वाटते ते मलाही खरे वाटत आहे. भाऊबंदकी म्हणजे काय? यात तुमचे सगेसोयरे येत नाही यात तुम्ही ज्या ठिकाणचे, गावाचे आहात तेथील तुमचा भाऊ, काका, चुलते ही भाऊबंदकी येते. यात ग्रामीण भागातील प्रवृत्ती वर्षानुवर्षे तशीच जपली जाते की अमुक एक चांगला व्यवसाय करत आहे तर त्याच्या डोक्यात वेगळंच खूळ घालून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार वर्षानुवर्षे आपण पाहत आहोत. या बाबीकडे आपण डोळेझाक न करता उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याच वेळी दिली पाहिजे म्हणजे आपला रोखठोक स्वभाव त्यांच्या लक्षात येईल. उद्योजकता जोपासणे ही काही विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही की ती त्यांनी जोपासली पाहिजे. हा वर्षानुवर्षे आपण संस्कार जोपासत आलो आहोत. ही भावना भीतीदायक असल्यामुळे आपण उद्योगात 'पडलो' असे म्हणतो. उद्योगात शिरलो असे म्हणत नाही. शालेय वर्गापासून आपले आणि श्रमाचे वावडे आहे असे मला वाटते. 

    

   मला आठवते मला शालेय जीवनात शारीरिक श्रमाचा आठवड्यातून एक तास दिलेला असायचा पण या तासात कोणीही शारीरिक श्रम करत नव्हते. फक्त टोलवाटोलव करून वेळ निभावणे हेच करायचे. यामुळे लहानपणापासून आपण श्रम आले की टाळाटाळ करण्याची बीजे त्यावेळच्या संस्कारात होती हे आपण विसरतो आहे. याबाबतीत थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आठवते ते म्हणजे 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली शिक्षणाची मीमांसा मुळीच स्वावलंबनावर, उद्योजकतेवर आधारित होती. पण आपण सोयीस्कररीत्या या गोष्टीला बगल देत आहोत असे वाटते. अहो जरा खेड्यातील माणसांकडे पैसे आले तर ते कोणती गाडी मार्केटमध्ये नवीन आहे? चैनीची वस्तू की जी गावात कुणाकडेही नाही अशा वस्तू घेण्याची महमिका त्यांच्या मनात असते. परंतु खेड्यात अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहे त्यामुळे ग्रामीण उद्योजकता वाढीस लागेल असे तो काहीच प्रयत्न करत नाही, फक्त मला बाजीराव म्हणा, मी या गावचा सरपंच, माझं ऐका असा तोरा मिरवणाऱ्या मंडळीकडून काय उद्योजकता वाढीस लागेल! मला तर वाटतं परीसरातल्या यशस्वी उद्योजकांची आपण कधी मुलाखत ऐकली आहे का? कि तो कसा यशस्वी झाला आहे. याविषयी आपण कधी प्रबोधन केले आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही असे येईल. ज्या समाजात उद्योजकांच्या मनातले भाव जर जाणून घेतले नाही तर आपली मुले उद्योजक कशी होतील आणि समाजात उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्मिती कशी होईल. 


      मी तर म्हणतो प्रत्येक गावातील यशस्वी पुरुषाने समाजहितार्थ गावातल्या युवा पिढीसाठी, मुलांसाठी अशी प्रेरक व्याख्याने उपलब्ध करून दिली तर लहान मुलांची नक्कीच मानसिकता बदलेल. समाज बदलायचा असेल तर सुरूवात आपल्यापासून करावी असे मला मनोमन वाटते. परंतु यात कुणाला काही मार्केटिंगचा स्वार्थीपणा दिसत असेल तर ते साफ चुकीचं आहे. उद्योजकता वाढीस लावण्यासाठी काय फक्त एमसीईडी किंवा अन्य संस्थांनी ठेका घेतला आहे का? समाजाची भूमिका कुणी का लक्षात घेत नाही. आज बघितले तर समाजातल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुणी पुढाकार घेत आहे का? मुद्दामहून कुणी उद्योजकता शिबिर भरवीत आहे का? उद्योग व्यवसायविषयक मार्गदर्शनाचा फार्स काही संस्था करतात ते खरोखरीच समाजात उद्योजकता पसरविण्यासाठी काही प्रयत्न करतात का? याची कुणीही दखल घेत नाही त्यामुळे होते काय की समाजात दुसऱ्याच अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवापिढीला जर आपण काम देऊ शकलो नाही तर त्यांची डोकी कशा प्रकारे चालतात हे आपण पाहतो आहे. समाजात दिवसेंदिवस गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे हे याचेच द्योतक आहे.

    

       थोर समाजसुधारकांनी समाजाला विचारांचा आणि कृतीचा खजिना ठेवला आहे. त्यांचा या समाजपरिवर्तनातील मथितार्थ समजून घ्या. नुसतीच त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी करून काहीच साध्य होणार नाही. केवळ त्यांची आठवण करून समाज विकासाची, उद्योजकतेची फळे मिळणार नाहीत तर समाजातील घातक रुढी, अंधश्रद्धा आणि बुवाबाजी आजही संपलेली नाही. याउलट अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेने आपणाला काय बघायला मिळाले. अजूनही समाजात विघातक प्रवृत्ती दबा धरून बसल्या आहेत. आज नव्या विचारांच्या बुरख्याखाली समाजाची प्रचंड फसवणूक चालू आहे. नवे बुवा आज निर्माण होत आहे. आपली टिमकी वाजवून समाजाचे सेवक म्हणणारे साधुसंत आज काय करत आहे हे पाहणे गरजेचे ठरते. 


        शब्दाचे गारुडी गावोगावी फिरत असून लोकांना झुलविण्याचे,  नवनवे तंत्र आत्मसात करून हे लोक समाजाला अशा प्रकारे फसवत आहे की, तळागाळातला समाज नाडला जातो. हे नवे डोंबारी तीच जुनी पुंगी वाजवून हा खेळ चोहीकडे करताना दिसून येत असल्यामुळे उद्योजकतेला खीळ बसली आहे असे मला वाटते. म्हणूनच समाज परिवर्तनाची दिशा, विकास आणि जबाबदारी जास्त डोळसपणे सांभाळली पाहिजे. समाज परिवर्तनाला व उद्योजकतेला खीळ घालणाऱ्या गोष्टी आपण मनःपूर्वक तपासून पाहिल्या पाहिजेत. वेळीच असल्या नकली स्कीम्स तपासून पाहिल्या पाहिजेत. जीवन आणि श्रमाची सांगड घालणारे शिक्षण दिले पाहिजे. जो श्रम करतो त्याला प्रतिष्ठा दिलीच गेली पाहिजे. एका गाजलेल्या जुन्या चित्रपटामध्ये एक गीत "दिल को देखो, चेहरा न देखो, चेहरे ने लाखो को लुटा, दिल सच्चा और चेहरा झुठा" या गीताच्या ओळी खऱ्या अर्थाने समाजातील मानवी स्वभावाचे व चेहऱ्याचे वर्णन चपखलपणे करतात.


Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have


    आजपर्यंत समाज सुधारणेत अनेक थोर महात्म्यांचे योगदान लाभले आहे. अनेक उद्योजकांचेही योगदान आहे. परंतु या प्रत्येक विचारांचा केंद्रबिंदू मानवतेची शिकवण आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारीच ठरली. आधुनिक जीवनाचा पाया काळानुसार बदलत गेला आहे. फॅशन करणारा, लेटेस्ट गाडी वापरणारा आज मॉडर्न समजला जातो. चांगल्या गोष्टी सोडून वाईट संस्काराचे भूत आपल्या मानगुटीवर बसवले जाते. या भुलभुलय्यात आपण इतके अडकत जातो की आपणाला कळत नाही की आपण काय करत आहोत. अनेक जण यापायी लयास गेलेले आपण पाहिले आहे. 

    

       माझ्या माहितीतील एक अशी व्यक्ती आहे की, ज्यांच्याजवळ सर्व सुखसोयीची साधने आहेत तरी ती व्यक्ती आज सायकल वापरते. मी सहज त्यांना प्रश्न विचारला की, "साहेबराव, आज तुमच्याजवळ सर्व असून सायकल का? जग मॉडर्न होत आहे. तुम्ही अजून सायकल वापरतात." हे म्हणाले, "जग जरी मॉडर्न होत चालले तरी आपण मनाचा आणि शरीराचा कधी विचार करतो का? त्याला काय पाहिजे. याचा विचार न करता आपण बाह्य गोष्टी दाखवून मोठेपणा का मिरवायचा? मी दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी सायकल वापरतो, पायी फिरतो माझ्या फळबागेत काम करतो. श्रम केल्याने मला आजार होत नाहीत हे काय कमी आहे काय? देवाने एवढं सगळं देऊनही मी असमाधानी राहतो आणि हा स्वार्थी विचार माणसात बळावत असल्यामुळे मी सायकल वापरतो. माझ्या मुलांनाही वापरायला उद्युक्त करतो. परंतु मी सायकलवर गेल्यावर गावातील लोक मला हसतात, पैसा येऊन पैसा खर्च करत नाही असं म्हणतात, पण मी पैसा नाही शरीर कमावत आहे हे ते विसरून जातात. त्याचे हे बोल एकून समाज कोणत्या थराला जात आहे." या उदाहरणाचा उद्योजकीकरणाचा फार जवळचा संबंध आहे. 


        श्रमाला मोलच राहिलं नाही. छोट्या गोष्टी असतात पण त्याचा समाजात फार मोठ्या अर्थाने संबंध असतो हे जाणून घ्यायला आज कोणाकडेही वेळ नाही आणि फालतू गोष्टी चर्वितचर्वण करत असतात. आपला वेळ अमूल्य आहे हे आज खेडेगावातल्या कोणत्याही कट्टयावर नजर टाका ते फक्त दुसऱ्यांची उणीदुणी, लफडी यावर चर्चा करण्यातच बराचसा वेळ देतात. त्यामुळे आपला विकास कधी होत नाही. विकासाच्या गप्पाच सोडा पण राजकारणात १०० टक्के वाहून गेलेली खेडी पाहून उद्योजकीकरणाचा आदर्श ठेवण्यात आपण कमी पडत चाललो आहे हे लक्षात येते.

      

  मला मान्य आहे की, आज आपण संपूर्ण रामायाणासारखे राहू, वागू शकत नाही; ज्ञानेश्वरांना पचवू शकत नाही; महात्मा गांधींना संपूर्ण पेलू शकत नाही; महात्मा फुले, आगरकर, टिळक, डॉ. आंबेडकर, बाबा आमटे यांना जुन्या विचारांचे म्हणून सोडून देऊ पण त्या त्या काळात काय गरज होती ही त्या महापुरुषांनी ओळखली. म्हणूनच कालचे बदलते संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. त्यावेळी त्यांना ती गोष्ट आवश्यक वाटत होती म्हणून त्यांनी केली. आज आपल्याला सुधारण्यासाठी काय हवंय हे लक्षात घेतले पाहिजे. सृष्टी नवनवे पांघरुण घेत असते. परिस्थिती नित्य नवीन होत असते. जुने टाकणे हा सृष्टीचा वसा मानवाने लक्षात घेता पाहिजे. परंतु आजकाल सोयीस्कररीत्या या गोष्टींचा अर्थ शोधला जातो. त्यामुळे या नव्या परिवर्तनात जास्त स्वैराचार बोकाळला आहे. 


          पैशाच्या जोरावर मदमस्त झालेला समाज सामान्यांवर अत्याचार करत आहे. आज हिंसात्मक भाषा, कृतीच जास्त वाढलेली दिसून येते. आज समाजामध्ये एक-दुसऱ्याला बनवण्याचे प्रकार जे वेगवेगळ्या संदर्भात झालेले आहे त्या विषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. समाज या सर्व बाबी जाणतो, ओळखतो पण त्याच्या हाती काही नसल्यामुळे हतबल आहे. यादृष्टीने युवा पिढीकडूनच अपेक्षा आहे, त्यांनी पुढे येवून उद्योजकता, कर्तृत्व या जोरावर स्वतःला सिद्ध करून या बेगडी जगाला बदलण्यासाठी झटायला हवे तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाने उद्योजकता रुजण्यास सुरूवात होईल. सर्वत्र असे चालले असं नाही तर आजही समाजात अशा काही चांगल्या संस्था, व्यक्ती आहेत की ते आपल्या परीने अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला नवी दिशा दाखवत आहेत. पण त्यांच्या चांगल्या गोष्टी समाजापुढे येत नाही. 


        आज अशा परिवर्तनाची गरज आहे की, मानवी जीवन सुखी व्हावे. उद्योजकता वाढीस लागावी. माणुसकीचा शोध घेण्यात यावा. संस्कारशील मन घडवण्यात यावे. शालेय जीवनापासून श्रम महत्त्व बिंबवले पाहिजे. तेव्हाच स्वावलंबी जीवन होण्यास आपण मदत कर शकू असे मला मनोमन वाटत राहते. येथे व्यक्तीचा मोठेपणा श्रेष्ठ नसून सामाजिक श्रेष्ठता व राष्ट्रीय ऐक्य मोठे दिसले पाहिजे. म्हणून नवीन परिवर्तन हे संपूर्ण मानवजातीच्या हिताला बरोबर घेणारे असावे आज गाडगेबाबासारखे समाजवादी संताची गरज भासत आहे. गाडगे महाराजांना पडलेले प्रश्न म्हणजे खरंच दगडात देव आहे का? माणस दारु का पितात? सावकार सर्वांना कर्जात का बुडवतो? माणसे अज्ञानी, अंधश्रद्धाळू का? त्यांना पडलेले हे प्रश्न आज सुटलेले आहेत का? तर त्याचे उत्तर नाहीच येईल. कारण आजही शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन आणि चंगळवादी झाली आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याविषयी आज समाज किती संवेदनशील आहे याचा विचार केल्यास समाजाची संवेदना हरवत असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

Gavogavi karmveer v udyogvir ghadvayala have

       हे सर्व चित्र बदलण्यासाठी त्या काळी गाडगेबाबा अहोरात्र झटले. समाजाची, मनाची खऱ्या अर्थाने नस पकडली. बाबांनी आपल्या कीर्तनातून रामाचा वनवास सांगितला नाही. ते अहिल्येचा उद्धार, पांडवाच्या वनवास कथेत रमले नाही तर त्यांना फक्त दिसत होता समाजातील लाखो दरिद्री नारायणांचा वनवास. हा वनवास संपून किमान अन्न, वस्त्र आणि निवारा मिळावा म्हणून बाबांचे कीर्तनातून रात्रंदिवस भ्रमंती चालू होती. त्यांनी श्रद्धा निर्माण केली परंतु अंधश्रद्धा होऊ दिली नाही. देव दगडात नाही तर कामात आहे, घामात आहे.

      

       माणसांनी 'एकमेकां साह्य करू' सुपंथाचा मार्ग धरला तर आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या समाज सुधारणेतून उद्योजकताच वाढीस लागेल यात माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

व्यवसाय/उद्योगासाठी उद्योगनीती – उद्योजकतेसाठी मार्गदर्शक कविता | Industrial Policy for Business & Entrepreneurship

व्यवसाय/उद्योगासाठी उद्योगनीती – उद्योजकतेसाठी मार्गदर्शक कविता | Industrial Policy for Business & Entrepreneurship


Vyavasay udyogasathi udyogniti

    उद्योग हा केवळ नफा कमावण्याचा मार्ग नसून, तो समाजाच्या आर्थिक प्रगतीला दिशा देणारा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. कोणताही व्यवसाय दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत उभा राहण्यासाठी योग्य उद्योगनीती आवश्यक असते.

उद्योगनीती म्हणजे —
व्यवसायाचा मार्ग, उद्दिष्टे, साधनसंपत्ती आणि निर्णय प्रक्रियेचे स्पष्ट नियोजन. यात गुंतवणूक, उत्पादन, बाजारपेठ, तंत्रज्ञान, मानवसंसाधन आणि जोखीम व्यवस्थापनाचा समावेश होतो. योग्य उद्योगनीतीमुळे व्यवसायाचे ध्येय अधिक स्पष्ट होते, अडचणींवर योग्य वेळी उपाय सापडतात आणि वाढीसाठी नवीन दारे उघडतात.

आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत उद्योगनीती ही फक्त मोठ्या उद्योगांसाठी नव्हे, तर लघु उद्योग, गृह-उद्योग आणि स्टार्टअप्ससाठीदेखील समान महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानातील बदल, डिजिटल मार्केटिंग, स्पर्धा आणि ग्राहकांची बदलती गरज लक्षात घेऊन तयार केलेली नीती व्यवसायाला अधिक मजबूत बनवते.

माझी कविता या विषयावर असणे हे विशेष आहे —
कारण कविता प्रेरणा देते, आणि प्रेरणा हीच व्यवसायाची खरी ऊर्जा असते.

    तहान लागल्यानंतर विहीर खोदून काम उपयोग? ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजेच भविष्यातील आपल्या गरजा ओळखून त्यासाठी योग्य तजवीज करणे आवश्यक आहे. उद्योग-व्यवसाय उभारणीपासून तो यशोशिखरावर नेण्यासाठी करावयाच्या आवश्यक सर्व बाबींची मार्मिक पद्धतीने मांडणी सदर कवितेत केली आहे. चला तर मग जाऊया या कवितेच्या गावा... 


व्यवसाय-उद्योगात असावा माथा । 
नुसता नसावा नीतीचा काथा ।।

व्यवसाय-उद्योगात करावे वाचन। 
मनात होते त्यामुळे 'उद्योजकीय' सिंचन ।।

व्यवसाय-उद्योगात आचरावी कुटिल नीती । 
त्याने घडेल स्वउद्योगाची दिवसेंदिवस प्रगती ।।

व्यवसाय-उद्योगात आणा सर्वसमावेशी बुध्दिमत्ता । 
तेव्हाच चौफेर येईल तुमची उद्योगात सत्ता ।।


Vyavasay udyogasathi udyogniti

व्यवसाय-उद्योगात नका धरू कुणाला वेठीस । 
तेव्हाच पैसे खुळखुळतील तुमच्या गाठीस ।।


व्यवसाय-उद्योगात जपा उद्योजकतेची मूल्ये । 
त्यानेच साम्राज्य होईल खुले ।।


व्यवसाय उद्योगात जुने विचार द्या टाकून ।
करावा स्वीकार आदबीने वाकून।।


व्यवसाय उद्योगात करावा नफ्याचा विचार । 
पण नफ्यासाठी करू नका भ्रष्ट आचार ।।


व्यवसाय-उद्योगात द्या चांगली सेवा । 
सेवा घेऊन ग्राहकांचा काढू नका मेवा ।।


व्यवसाय-उद्योगात ठेवा रागावर नियंत्रण । 
उ‌द्घाटनानिमित्त पाठवा सर्वांना सस्नेह निमंत्रण ।।

व्यवसाय-उद्योगात नसावा उर्मटपणा । 
त्यासाठी सिंधी-मारवाडींचे गुण आचरणात आणा ।।

व्यवसाय-उद्योग करावा दूरदृष्टीने । 
कामगारांची काळजी घ्या नेकीने ।।

व्यवसाय-उद्योगात करा सर्व धर्माचा आदर । 
यानेच आपले नांव जाईल दूरवर ।।


व्यवसाय-उद्योगच करा, करू नका चाकरी । 
का लोटतात दूर आपल्या हक्काची भाकरी ।।

व्यवसाय उद्योगात करावे बाजारपेठ मंथन । 
हर एक ग्राहकाचे करावे स्वमनन ।।

व्यवसाय-उद्योगात आचरावी सकारात्मकता । 
हीच तरी तुमची खरी पात्रता ।।

व्यवसाय-उद्योगात करावी अपार मेहनत । 
असू द्यावी चांगल्या विचारांची दानत ।।

व्यवसाय उद्योगात करावा स्पर्धकांचा विचार । 
त्यासाठी करावा निकोप स्पर्धेचा आचार ।।


व्यवसाय-उद्योगात ठेवू नका पर्याय । 
तेव्हाच होईल मुंबईचे शांघाय ।।

व्यवसाय उद्योगात ठेवा अंतरंगी चिकाटी । 
तेव्हाच फोडू शकाल स्वउद्योगाची लाठी ।।

व्यवसाय-उद्योगात ग्राहकांवर व्हा एकाग्र । 
तेव्हाच उद्योग तुमचा बहरेल समग्र ।।


व्यवसाय-उद्योगात करा आर्थिक संचय । 
पैशांबरोबर करा समाजसेवेचा समुच्चय ।।


व्यवसाय-उद्योगात असावी ज्वलंत इच्छाशक्ती । 
त्यासाठी करावी लागते स्वकर्तृत्वावर भक्ती ।।


Vyavasay udyogasathi udyogniti


व्यवसाय-उद्योगात मिळवावे लागते झगडून यश । 
परंतु त्यासाठी आधी पचवावे लागते अपयश ।।

व्यवसाय उद्योगात असावे संभाषण चतुर । 
त्यासाठी करू नका ग्राहकापुढे कुरबूर ।।


व्यवसाय-उद्योगात नसावा भाऊबंदकीचा शाप । 
आटोकाट भरावे आपल्या कर्तृत्वाचे माप ।।

व्यवसाय-उद्योगात झगडावे परिस्थितीशी । 
तीच तुमची पंढरी आणि काशी।।

व्यवसाय उद्योगात गाठा सर्वोच्च शिखर । 
वेळप्रसंगी घाला नीतिमत्तेवर नांगर ।।

व्यवसाय-उद्योगात असू द्यावे प्रसंगावधान । 
तुमच्या उद्योगाचे तुम्हीच व्हावे राजा नि प्रधान ।। 

व्यवसाय-उद्योगात असू द्यावे स्मित हास्य । 
तरच तुम्ही जिंकू शकतात ग्राहकाचे कास्य ।।

व्यवसाय-उद्योगात करा दैवावर मात । 
जुन्या विचारांची वेळोवेळी टाकावी कात ।।

व्यवसाय उद्योगात करू नका वेळेचा विचार । 
कधी पसरू नका हात, होऊ नका लाचार ।।


व्यवसाय-उद्योग करता म्हणून वाटू देऊ नका कमीपणा ।  

सोडू नका तुमच्या मनाचा सरळपणा ।।


व्यवसाय-उद्योगात वेळप्रसंगी घ्यावे कठोर निर्णय । 
पण कामाची बिघडू देऊ नका लय ।।

व्यवसाय उद्योगात चांगली माणसं सतत जोडा । 
तेव्हाच नीट चालेल आपल्या उद्योगाचा गाडा ।।

व्यवसाय उद्योगात स्वभाव ठेवा मनमिळावू । 
प्रसंगी उद्योग कर्तृत्वाचेच गाणी गाऊ ।।

व्यवसाय उद्योगात केव्हाही पडते अघटित । 
तेव्हाच अनुभव मिळतो अनेक पटीत ।।

व्यवसाय उद्योगात प्रत्येक असतो असमाधानी । 
हिच खरी ओळख असते उद्योजकाच्या मनी ।।

व्यवसाय उद्योगात असतात अमर्याद संधी । 
या लाटेवर आरुढ होतो उद्योजकाचा नंदी ।।

व्यवसाय उद्योगात स्वतःच करा स्वमूल्यमापन । 
कशाला हवे दुसऱ्या कुणाचे ज्ञापन ।।

व्यवसाय उद्योगात हस्तगत करावे व्यवहार ज्ञान । 
त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही मान ।।

व्यवसाय उद्योगात होत असते चारित्र्याचे मुल्यमापन । तेव्हाच ग्राहक ठरवतो तुमचे 'शहाणपण' ।।

व्यवसाय-उद्योगात करावे मनाचे व्यवस्थापन । 
तेव्हाच सुधारेल आपले 'अर्थकारण' ।।

व्यवसाय-उद्योगात द्या इतरांना प्रेरणा । 
त्यानेही मिळेल आपल्या उद्योगाला चालना ।।

महाराष्ट्रात आहे भौगोलिक संपत्तीचे सडे । 
म्हणूनच आपण आहोत औद्योगिकीकरणात पुढे ।।

व्यवसाय उद्योगासाठी मी खूप काही सांगितलं । 
माफ करा मला जेवढं कराल तेवढं चांगलं ।।

व्यवसाय-उद्योग करणाऱ्यांवर मी करतो प्रेम । 
जेवढं जमेल तेवढे करा माझेच मला सप्रेम ।।

व्यवसाय-उद्योजकांना जावो दिवस आनंदाचा । 
घेतो रजा आता सोशल मीडियाच्या वाचकांचा ।। 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम | YCMOU Agri Business Management Course

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा
कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम 
Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University

krushi vyavasaya vyavasthapan abhyaskram

 मुक्त विद्यापीठातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सन २००१ पासून सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, कृषी व्यवस्थापन संकल्पना आणि महत्त्व, वित्त व्यवस्थापन, कृषी विपणन, शेतीमालाची विक्री व्यवस्था, शेती उत्पादनाची निर्यात इ.चा समावेश आहे. तसेच मालाचा दर्जा, फळे, भाजीपाला व फुलांची तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यात, कृषी व्यवसाय विश्लेषण साधने आदी घटकांविषयी सविस्तर माहिती असल्यामुळे हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.

        जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार भारतीय बाजारपेठ जगासाठी नुकतीच खुली करण्यात आली. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असलेल्या भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अमर्याद वरदान लाभलेल्या भारताने कृषी क्षेत्रात आश्चर्यजनक प्रगती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मागासलेल्या या देशाने स्वातंत्र्यानंतर आधुनिक शेतीचा अवलंब करीत हरितक्रांती घडवली. यामध्ये शेतक-यांसह कृषी विद्यापीठे, मुक्त विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था, कृषिशास्त्र यांचाही बहुमोल वाटा आहे. 
    मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार एक अब्ज लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरविण्याचे प्रचंड आव्हान कृषी क्षेत्रासमोर आहे. तसेच जागतिक स्पर्धेचाही विचार करावा लागणार आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ उठवून अन्नधान्य, फळे, फुले, भाज्या, वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, तेलबिया आदींच्या निर्यातीला प्रचंड वाव आहे. तसेच उद्योगधंद्यासाठी लागणारा प्रचंड कच्चा माल पुरविण्याचे कामही कृषी क्षेत्राला करावे लागते. त्यामुळे या क्षेत्राकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच अत्याधुनिक, शास्त्रीय, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासकम या व्यवसायातील संबंधितांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
    अविकसीत देशात हजारो वर्ष शेतीव्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जात होता; परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर शेतीक्षेत्राचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण होत आहे. विविध प्रकारच्या नवनवीन शेतीआदाने नवीन तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. 

krushi vyavasaya vyavasthapan Abhyaskram

    उदाहरण द्यायचे झाले तर संकरीत बी-बियाणे, रासायनिक कीटकनाशके, औषधे आपल्या शेतावर वापरल्यास त्यापासून अधिक उत्पादन होईल? त्याच्या विक्रीस जादा खर्च किती येईल? ही नवी आदाने वापरल्यामुळे विशिष्ठ आकाराच्या शेतीपासून निव्वळ नफा किती मिळेल? इत्यादी प्रश्नांची चर्चा करणे, उत्पादन खर्च व त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटू लागले. साहजिकच यातून शेतीचे व्यवस्थापन या विषयाकडे अधिकाधिक लक्ष वेधले जाऊ लागले व त्यातून शेतीचे व्यवस्थापन हे नवे शास्त्र उदयास आले.

     
 या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांकडे शिक्षणाबरोबरच काही अन्य पात्रता असाव्यात. शेतीउद्योग मनुष्यबळावर आधारीत आहे. यातील बहुतेक काम करणाऱ्या व्यक्ती अकुशल, निरक्षर असल्याने त्यांच्याशी जुळवून काम करून घेण्यात कौशल्य लागते. उन्हातान्हात काम करण्याचा कष्टप्रद व्यवसाय असल्याने उत्तम आरोग्य हवे. शेती पूर्णपणे निसर्गांवर आधारीत असल्याने हवामानाचे सखोल ज्ञान गरजेचे आहे. 

  टोळधाड, झाडांवर अचानक उद्भवणारे रोग, किड़ी, अळ्या इत्यादींमुळे लक्षावधी मनुष्यबळाची आणि पैशाची नासाडी होण्याची शक्यता गृहीत धरून अनपेक्षित संकटाला सामोरे जाण्याची तयारी कायम ठेवावी लागते. अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शास्त्रीय दृष्टी आवश्यक ठरते. तयार मालाला चांगला भाव मिळविण्याच्या दृष्टीने बाजारपेठेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. हे ज्ञान डोळसपणे घेता यावे, त्याकडे पाहण्याची दृष्टी मिळावी म्हणून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम आज महत्त्वाचा ठरला आहे.
 
  शेतीच्या व्यवस्थापनात विशिष्ट शेतावर कोणते पीक घेणे योग्य होईल, त्याचे प्रमाण काय असावे, कोणते आदान किती प्रमाणात वापरावे, विक्रीव्यवस्था, मुख्य पिकाबरोबर इतर जोडधंदे इत्यादी विश्लेषण करून घ्यावे लागतात. हे निर्णय कृतीत आणणे म्हणजे कृषी व्यवस्थापन होय. 

   आधुनिक काळामध्ये शेती ही केवळ एक जीवनपद्धती न राहता तो एक व्यवसाय आहे. जीवनपद्धतीमध्ये केवळ पोटापुरते हा मुख्य उद्देश असतो तर व्यवसायामध्ये उत्पादन कार्यदक्ष करून जास्तीत जास्त नफा मिळविणे हा मुख्य हेतू असतो. उत्पादन कार्यदक्ष आणि फायदेशीर करण्यासाठी शेती उत्पादनामध्ये नवीन तंत्रे आणि निविष्ठांचा वाढता वापर होत आहे. तसेच जागतिक मुक्त व्यापारामुळे निरनिराळ्या देशातील बाजारभाव, मागणी, पुरवठा इत्यादी माहितीसाठी कृषी व्यवस्थापनात माहिती-तंत्रज्ञानाचे सुद्धा महत्त्व आहेच.
       
 शहरी भागात मोठ्या प्रमाणावर झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण त्याचबरोबर खेड्यातून शहराकडे येणारा लोकांचा लोंढा थांबविण्यासाठी ग्रामीण भागातच लोकांना रोजगार पुरविणे, शेतीशिवाय कुटीर व लघुउद्योग यांचा विकास करणे, ग्रामीण भागातच उद्योगांच्या विकासाला चालना देणे, त्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन देणे इत्यादी उपाय सुचविण्यात येतात आणि शेतीच्या विकासास योग्य स्थान, प्राधान्य दिले तर शेती उत्पादन वाढून वाढीव उत्पादन कुटिरोद्योगांच्या उत्पादन व विकासासाठी वापरता येईल. 

  एकूणच ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येईल व त्याचबरोबर शहरी भागातही निर्माण होत असलेल्या गंभीर समस्या कमी करता येतील. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रमुख असलेला शेतीव्यवसाय व त्याचे व्यवस्थापन चांगले होण्यासाठी हा अभ्यासक्रम चालना देतो. 

 मुक्त विद्यापीठाची कार्यप्रणाली इतर विद्यापीठापेक्षा बंदिस्त नसल्यामुळे या अभ्यासक्रमाला तळागाळातील शिक्षित युवा शेतकरी प्रवेश घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी संयोजक, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी विज्ञान विद्याशाखा, य.च.म. मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.

© दीपक केदू अहिरे
नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

तरसाळीचे अनिरुद्ध पाटील यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान (Aniruddha Patil of Tarsali awarded National Gopal Ratna Award)


तरसाळीचे अनिरुद्ध पाटील यांना 
राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान
Aniruddha Patil of Tarsali awarded 
National Gopal Ratna Award


Annirudha patil yanna rashtriya gopalratna puraskar pradan

 बागलाण तालुक्यातील तरसाळी  येथील अनिरुद्ध पाटील यांना नुकताच राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग आणि राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 


राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार

  केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे महाराष्ट्राला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

  हा पुरस्कार सोहळा जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ए.पी.शिंदे सभागृहात घेण्यात आला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला. 


पाच लाख रुपयांचा पुरस्कार 

Annirudha patil yanna rashtriya gopalratna puraskar pradan

   पुरस्कार प्राप्त श्री. पाटील हे अभियंता असून त्यांनी  काही काळ नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन त्यांनी सारजा डेअरी फार्म सुरू केला. 

  सध्या त्यांच्याकडे १३० देशी गीर गायी आहेत. या गायींपासून दररोज २०० लिटर दूध मिळते. गायींचे संगोपन, दुग्धव्यवसाय, देशी गोवंशाची वाढ व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानिक शेतकऱ्यांना पशुधनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम ते करतात. 


विशेष कार्याची दखल

 गायीपासून दुध, गोमूत्र, गायीच्या शेणापासून गोवऱ्या, देशी गायीचे तूप, सेंद्रिय खत आदींचे उत्पादनही करतात. या विशेष कार्याची दखल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे आहे.


महाराष्ट्राला चार पुरस्कार 

 महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला चार पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांनी स्वीकारला.  या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे. 

 उत्कृष्ट पशुचिकित्सकाचा पश्चिम विभागाचा पुरस्कार कऱ्हाड तालुक्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांना प्रदान करण्यात आला. पश्चिम विभागाचा दुसरा पुरस्कार पंढरपूर येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांना देण्यात आला.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...