name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन | Toyota Kirloskar Motor Introduces New Camry Hybrid Electric Vehicle

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन
Toyota Kirloskar Motor has introduced the new 'Camry' hybrid electric vehicle


Camrey hybrid vechicle

नाशिक : टोयोटा किर्लोस्कर मोटरने नुकतेच "सेडान टू द कोअर" म्हणून डिझाइन केलेले पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन सादर केले. 

  पर्यावरणाला अनुकूल असलेले हे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन शक्तिशाली कार्यक्षमतेसह उत्कृष्ट शैली, सुरक्षिततेचे अविष्कार प्रदान करून आजच्या समकालीन ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक लक्झरी पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन असल्याचे वासन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजिंदर बेदी यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. 

  यावेळी जनरल मॅनेजर श्रीकांत नायक, यूज्ड कार्सचे विभागप्रमुख हृषिकेश सोनवणे, सेल्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर  रमणदीप कलसी, फायनान्स मॅनेजर योगेश भोसले, सेल्स मॅनेजर मयूर लोहारकर, रवींद्र बैरागी, ग्राहक हर्ष पटेल हे उपस्थित होते. 

  कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाचे विविध वैशिष्ट्य मनमीत सिंग सलुजा यांनी सांगितले. टोयोटाच्या पाचव्या पिढीतील हायब्रिड तंत्रज्ञानाद्वारे समर्पित असलेल्या कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात उच्च-क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी असून जी सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, मजबूत कामगिरी आणि शाश्वत गतिशीलता दोन्ही प्रदान करते. 

  अपग्रेडेड डायनॅमिक फोर्स इंजिन, नवीनतम टोयोटा सेफ्टी सेन्स ३.०, ९ एसआरएस एअरबॅग्ज दिल्या असून सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित, चिंतामुक्त प्रवासासाठी प्रगत सुरक्षा आणि सोयीचे संयोजन केले जाते. 

 "एनर्जेटिक ब्युटी” या संकल्पनेखाली डिझाइन केलेले हे वाहन असून एक बोल्ड न्यू लूक प्रदर्शित करते. रीडिझाइन केलेल्या फ्रंट बंपर आणि एक्सप्रेसिव्ह उंच आणि रुंद लोअर ग्रिलसह कमांडिंग रोड प्रेझेन्स तयार करते. 

 डेटा कम्युनिकेशनसह अत्याधुनिक टेलिमॅटिक्ससह सुसज्ज मॉड्यूल (डीसीएम), रिमोट एसी पॅकेज आणि १२.३-इंच मल्टीमीडियासह  मनोरंजन आणि अॅप्स यात आहे. मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एमआयडी) एक पूर्ण ग्राफिक मीटर जो स्पष्ट ग्राफिक्स आणि उत्कृष्ट डिस्प्ले गुणवत्ता प्रदान करतो.

  ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात डायनॅमिक फोर्स इंजिन असून स्पोर्ट, इको, सामान्य ड्रायव्हिंग मोडमध्ये ट्रान्समिशन उपलब्ध आहे. 

   मॅन्युअल ड्रायव्हिंगसाठी १०-स्पीड सिक्वेंशियल शिफ्ट मोड आहेत. आरामदायी प्रवासासाठी ऑप्टिमाइली ट्यून केलेले मॅकफर्सन स्ट्रट सस्पेंशन (एफआर) आणि मल्टी-लिंक प्रकार (आरआर) उपलब्ध आहे. 

  या वाहनाच्या डायनॅमिक डिझाइन आणि स्टाइलने बॉडी साइड आणि रीअर डिझाइनसह लो नोज आक्रमक स्पोर्टी लूक दिसतो. एलईडीने सुसज्ज सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट (DRL)सिस्टम, अत्याधुनिक बंपर आणि ग्रिलसह स्टायलिश हुड आणि फेंडर, ऑटोमॅटिक रिट्रॅक्टेबल, टर्न सिग्नल, ऑटोरिव्हर्स टिल्टसह बाहेरील रीअर-व्ह्यू मिरर (ORVM) एकसंध ड्रायव्हिंग अनुभवासाठी नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स स्पोर्टीनेस वाढवतात

  सॉफ्ट अपहोल्स्ट्रीने सजवलेले प्रशस्त केबिन, सीट, इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पिवळा तपकिरी सॉफ्ट लेदर अपहोल्स्ट्री, ऑर्नामेंट इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पियानो ब्लॅक फ्रंट कन्सोल बॉक्स, ऑटो अप/डाउन आणि जॅम प्रोटेक्शनसह पॉवर विंडो, गिटार-आकाराचे ऑडिओ गार्निश, 3-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, नॅनोईटीएम एक्स आयन जनरेटर, इंटीरियर इल्युमिनेशन पॅकेज/एंट्री सिस्टम, फेड-आउट स्मार्ट रूम लॅम्प + डोअर,आत हँडल व  ४ फूटवेल दिवे ही कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाची अंतर्गत वैशिष्ट्ये आहेत. 
  नवीन मॉडेलच्या लाँचिंगबद्दल बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मसाकाझू योशिमुरा म्हणाले कि, ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलचे लाँचिंग हे टोयोटाच्या जागतिक पर्यावरणीय आव्हान २०५० च्या अनुषंगाने अधिक चांगले, शाश्वत गतिशीलता पर्याय विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
  भारतासाठी आमची उत्पादन रणनीती कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा ध्येय साध्य करण्याच्या  राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे. ऑल-न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलची ग्रीन मोबिलिटी ऑफर म्हणून ओळख होईल भविष्यातील कार्बन-मुक्त, आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी आमचे योगदान आणखी मजबूत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनाच्या हायब्रीड बॅटरीवर ८ वर्षांची किंवा १,६०,००० किमी, जे आधी येईल त्याची वॉरंटी मिळते. कारची टेस्ट ड्राईव्ह टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे.     ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनासाठी बुकिंग सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी वासन टोयोटा, वासन नगर, कै. श्री कुंदनलाल वासन मार्ग, मुंबई-आग्रा रोड, नाशिक मोबा. नं- ८८८८८ ४७१९, या शो रूमला   भेट द्या किंवा www.toyotabharat.com वर ऑनलाइन बुकिंग करावी.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau)

राजमाता जिजाऊ 
Rajmata jijau

Rajmata


समयसूचकता,संघटन कौशल्य 
अनेक गुणांची झळाळी, 
राजमाता जिजाऊंच्या 
व्यक्तिमत्त्वाला लाभली... 

स्वराज्य स्थापनेच्या ध्येयापासून 
नाही विचलित झाल्या, 
माणूस हाच कर्ता 
कृषी क्षेत्रात बदल केला... 

जिजाऊंच्या जीवनात 
हतबल करणारी परिस्थिती, 
दृढ निश्चयाने घेतले निर्णय 
सारासार निर्णय घेण्याची गती... 

जिजाऊंनी माणसाला व 
समाजाला आकार दिला, 
उच्चतत्त्व आणि नीतीमूल्य 
सातत्याने संघर्ष केला... 

जिजाऊंनी स्वराज्यामध्ये 
पुरुष व महिलांना दिला सन्मान, 
सामाजिक न्यायाची बाजू 
समतेला दिला सर्वोच्च मान... 

जिजाऊंनी सर्व क्षेत्रात 
घेतला कृतीशील सहभाग,
तात्विक मूल्यांची पायाभरणी 
काढला प्रगतीचा माग... 

जिजाऊंनी शिवरायांना दिला 
सल्ला बुद्धीपूर्वक कृतीचा, 
आधुनिक समाजाला प्रेरणा 
सकल जनवादी जीवनदृष्टीचा... 

आजचे प्रश्न सोडवण्यासाठी 
अभ्यासा जिजाऊंचे प्रशासन, 
त्यांच्या समग्र विचारांनी 
जीवनी मिळते मार्गदर्शन...

राजमाता Rajmata

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram : 
*******************************************
YouTube :

*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************


शेकोटी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक (Principal Laxman Mahadik presided over Shekoti Kavi Sammelan)

 

शेकोटी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक

Principal Laxman Mahadik presided over Shekoti Kavi Sammelan

Shekoti

  गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित आशिया खंडातील सलग ४८ तास चालणाऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती प्रा. संदीप जगताप, रवींद्र मालुंजकर, संजय आहेर, विजयकुमार मिठे, प्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी दिली
  
 नाशिक येथील भावबंधन मंगल कार्यालय येथे १० आणि ११ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार तर स्वागताध्यक्षपदी मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली असून, दरम्यान रात्री शेकोटी कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची निवड करण्यात आली.   
 
 कुणब्याच्या कविता, गावकुसाच्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह असून धुक्यातले धुके, दिवस हे त्यांचे ललित लेखन आहे. कुणब्याची कुंडली हा त्यांचा कवितासंग्रह आहे.  स्तंभलेखन, आकाशवाणी नाशिक केंद्रावरून व्याख्यान, श्रुतिका लेखन, विविध नियतकालिकातून साहित्य लेखन त्यांनी केले आहे. 
  
   विविध विद्यापीठांच्या बी.ए., बी.कॉम, एम.ए अभ्यासक्रमात त्यांच्या कवितासंग्रहाचा समावेश आहे.
    
   महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता दहावी आंतरभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश असून, भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने गोवा येथे महाराष्ट्र राज्यातून मराठी भाषेचे साहित्यविषयक प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांची निवड करण्यात आली होती. 
    
   अजिंठा येथे झालेल्या राष्ट्र निती काव्य महोत्सवातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. कुणब्याची कविता काव्यसंग्रहाची राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.  
   
  नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन समितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. सर्वोदय साहित्य संमेलनाच्या परिसंवादात त्यांचा मोठा सहभाग होता. 
  
 मराठी सेवा संघाच्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. नाशिक जिल्हा परिवर्तन साहित्य संमेलन २०२३ च्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली होती भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद व  तिफन राज्यस्तरीय कविता महोत्सवांमध्ये ते अध्यक्ष होते,  

  उजगाव बेळगाव कर्नाटक साहित्य अकादमी आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कविवर्य वसंत, ना.घ सावंत राज्य साहित्य पुरस्कार, साहित्य शिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अंकुर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, गिरणा गौरव प्रतिष्ठान, स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, मुक्ताई राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जालना, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा कवी गोविंद काव्य पुरस्कार, उत्तर महाराष्ट्राचा मानाचा गिरणा गौरव पुरस्कार, कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनाचा प्रथम पुरस्कार अशा विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 
   
   चिंतन आणि चर्चा समकालीन मराठी कविता आस्वाद ग्रामीण कविता १९८० नंतरच्या ग्रामीण कवितेतील बदलत्या वास्तवांचा शोध, शेतकरी संघटना मराठी साहित्याचा अनुबंध अशा विविध कवितेची त्यांनी समीक्षा केली आहे. गावकुसाच्या कविता या काव्यसंग्रहास त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
  कविवर्य एकनाथ रेंदाळकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ राज्य साहित्य पुरस्कार मंचर, भी.ग. रोहमारे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार, परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा परिवर्तन पुरस्कार, अक्षरबंध प्रतिष्ठानचा अक्षरबंध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, श्री शब्द राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, तिफन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कन्नड, अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************



फलभूमी : शाश्वत शेतीच्या उपायांसह शेतीमध्ये क्रांती | Phalbhoomi: Revolutionizing Agriculture with Sustainable Farming Solutions

फलभूमी : शाश्वत शेतीच्या उपायांसह शेतीमध्ये क्रांती | Phalbhoomi: Revolutionizing Agriculture with Sustainable Farming Solutions

phalbhoomi


 फलभूमी ही एक नाविन्यपूर्ण कृषी क्षेत्रातील सेवा कंपनी आहे. ही कंपनी  महाराष्ट्रातील नागपूर येथे असून या संस्थेची स्थापना शेतकरी आणि बागायतदार तज्ज्ञ  श्री. दीपक नवघरे यांनी केली आहे.  


  फलभूमी काय आहे ? फलभूमीविषयी सांगा असे मी विचारताच श्री. नवघरे यांनी सांगितले कि, मी प्रथमतः विदर्भातील शेतकऱ्यांसमोरील एक महत्त्वाचे आव्हान ओळखले ते म्हणजे शास्त्रीय व तंत्रशुद्ध फलोत्पादन करण्याचा अभाव, मी स्वतः कृषी पदवीधर असल्याने फळबाग लागवड आणि त्याचे संगोपन यातील गुंतागुंत खूप वाढत चालल्याचे माझ्या लक्षात आले. आणि  तेव्हाच ठरवले कि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मी सर्वसमावेशक कृषी सेवा देण्यासाठी प्रथम नवघरे ॲग्रो कन्सल्टन्सीची स्थापना केली. या सेवांमध्ये ऑर्किड सल्लागार, सिंचन पुरवठा आणि देखभाल, कृषी-पर्यटन सल्लागार आणि कृषी-निविष्ट विक्री यांचा समावेश आहे. 
   
     ही कन्सल्टन्सी जसजशी वाढत गेली, तसतशी तिच्या कामाची व्याप्ती आणि प्रभावही वाढला. पुढे २०२१ मध्ये श्री. दीपक आणि त्यांच्या समर्पित टीमने 'फलभूमी' या ब्रँड अंतर्गत  फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्ण विस्तार आणि तांत्रिक सेवा सुरु केली. अशा पद्धतीने फलभूमीचा प्रवास सुरु झाला. पुढे त्यांनी त्यांच्या नर्सरीद्वारे ५० हून अधिक फळपिकांची अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध आणि चांगले कलमी, हमी देणारी रोपे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले. 

phalbhoomi
 
     फलभूमीच्या स्थापनेपासून विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झाला असल्याचे श्री. नवघरे यांनी सांगितले. फलभूमीने १५० हून अधिक शेतकऱ्यांना थेट सेवा दिली आहे. यात ५०० एकरपेक्षा जास्त ऑर्किड फार्मचा समावेश आहे. फलभूमीचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि फार्म मीटिंगद्वारे त्यांनी ४००० हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे, त्यांना त्यांच्या कृषी पद्धती वाढवण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज केले आहे. 
    फलभूमीच्या प्रयत्नांमुळे केवळ उत्पादनच वाढले नाही तर स्थानिक शेतकरी समुदायाच्या शाश्वत विकासातही योगदान दिले असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी सांगितले. फलभूमीच्या ऑन-फिल्ड कन्सल्टन्सी सेवा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा बनल्या आहेत. 
  
 श्री. नवघरे यांनी  विविध संस्थांद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी मॅनेज हैदराबाद मधून ॲग्रिकलिनिक आणि ॲग्रीबिझनेस प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे.

 शेतकऱ्यांना सर्वसमावेशक आणि शाश्वत उपाय प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन झालेल्या फलभूमीने कोणकोणत्या सेवा देऊ केल्या आहेत? याविषयी विचारले असता श्री. नवघरे  म्हणाले कि, फलभूमी फलोत्पादनात माहिर आहे.  आंबा, ड्रॅगन फ्रूट आणि इतर फळ पिकांच्या लागवडीसाठी तज्ञ मार्गदर्शन देत असून जमीन तयार करणे आणि लागवड करण्यापासून ऑनफील्ड ते पीक व्यवस्थापन आणि कापणीपर्यंत कंपनी सर्वसमावेशक सोल्यूशन्स प्रदान करत असून यामुळे   शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेतात. 
    
     खास करून आम्ही ऑर्किड कन्सल्टन्सीही देऊ करतो. ऑर्किड लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विदर्भात ऑर्किडची लागवड वाढली आहे. फलभूमीचे ड्रॅगन फ्रूट फार्म हे यशस्वीतेचे मॉडेल बनले आहे. या मॉडेलला वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या  शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.
   
     फलभूमी फुलांच्या शेतीच्या उच्चमूल्याच्या क्षेत्राचा शोध घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कृषी व्यवसायांना मदत करत असल्याचे श्री. नवघरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सल्ला सेवांमध्ये यशाची खात्री करण्यासाठी इष्टतम वाढणारी परिस्थिती, कीड व्यवस्थापन आणि काढणीनंतरची तंत्रे यावर देखील मार्गदर्शन समाविष्ट आहे. 
   
      शाश्वत शेतीसाठी सक्षम पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. फलभूमी पाण्याचा वापर काटेकोर  करण्यासाठी, पीक उत्पादन वाढवण्यासाठी प्रगत सिंचन प्रणाली पुरवते आणि त्यावर देखरेख करते. ठिबक ते स्प्रिंकलर प्रणालीपर्यंत कंपनी दीर्घकालीन कामगिरीसाठी योग्य स्थापना आणि नियमित देखभाल सुनिश्चित करते.
   
      शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी मदत करण्याच्या प्रयत्नात, फलभूमी कृषी-पर्यटनविषयक सल्ला देते. कृषी-पर्यटन उपक्रम कसे स्थापित करायचे आणि चालवायचे, शेतांना पर्यटन स्थळांमध्ये कसे बदलायचे याबद्दल अंतर्दृष्टी देतात. आधुनिक शेती पद्धतींबद्दल जागरूकता वाढवतात  यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. अनेक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी सांगितले.
   
      फलभूमी बियाणे, खते आणि शेती उपकरणांसह उच्च दर्जाची कृषी निविष्ठा देखील प्रदान करते. विश्वासार्ह उत्पादने ऑफर करून कंपनी शेतकऱ्यांना निरोगी पिके सुनिश्चित करण्यास आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करते. 

    फलभूमीने आयसीआयसीआय फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, बजाज फाउंडेशन, एसएफफाउंडेशन, कृषी विभाग, एमजीआयआरआय वर्धा, केव्हीके दुर्गापूर, आत्मा विभाग या उल्लेखनीय संस्थांसोबत मजबूत सहयोग स्थापित केला आहे. या सहकार्यांमुळे जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती आणि कृषी-व्यवसाय विकासावर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प राबविण्यास फलभूमी सक्षम झाली आहे, ज्याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

phalbhoomi


 श्री. दीपक नवघरे यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कृषीथॉनच्या व्यासपीठावर फलभूमीचा प्रवास शेअर केला. त्यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कारही  देण्यात आला. 

 अधिकाधिक शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतींकडे जाण्यास मदत करून संपूर्ण भारतभर आपली पोहोच वाढवण्याचे फलभूमीचे उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग करून  शेती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या उत्पादनक्षम असेल.

  फलभूमीची सेवा अनेक कारणासाठी फलदायी असल्याची शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. स्वतः फलभूमीचे कार्यकारी संचालक दिपक नवघरे यांना फलोत्पादनात नैपुण्य आहे. अनुभवी फलोत्पादन तज्ञ यांच्या नेतृत्वाखाली फलभूमी विश्वसनीय आणि नाविन्यपूर्ण कृषी उपाय व शाश्वतता प्रदान करते. प्रत्येक सेवेची रचना टिकाऊपणा लक्षात घेऊन केली जाते, पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन देते. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रे आणि उपाय आणण्यासाठी फलभूमी आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारी करते.
 
     फलभूमीकडे सर्वसमावेशक सेवा असून पीक सल्लामसलत ते सिंचन उपायांपर्यंत फलभूमी सर्व शेती गरजांसाठी वन-स्टॉप शॉप ऑफर करत असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी www.Falbhumi.com या वेबसाइटला भेट द्या. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

फुलले शरदाचे चांदणे (Bloomed autumn moons)

फुलले शरदाचे चांदणे
Bloomed autumn moons

शरदाचे चांदणे


फुलले शरदाचे चांदणे 

आयुष्य सत्कारणी लागले, 

स्वतः चंदन होऊन

सुगंध दरवळत राहिले...


फुलले शरदाचे चांदणे 

परीसस्पर्श तुम्ही जपला,

माणुसकीने अवघं आयुष्य 

जमवला तुम्ही गोतावळा...


फुलले शरदाचे चांदणे 

शिक्षणसंस्था उभारली, 

साहित्याच्या क्षेत्रातही

आवड आपण जोपासली...


फुलले शरदाचे चांदणे 

शतायुषी तुम्ही व्हावे, 

आनंदाने जीवन गाणे 

गुणगुणतच रहावे...


© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

(मा. प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख वाढदिवसानिमित्त भव्य काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

*******************************************



नजर...( Look)

नजर
Look

Najar


    नजर हा शब्द आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप वेळा ऐकायला मिळतो. साध्या भाषेत सांगायचे तर, नजर म्हणजे आपली दृष्टी, म्हणजेच पाहण्याची क्षमता. पण मराठी भाषेत "नजर" या शब्दाचे अर्थ फक्त एकच नसून अनेक संदर्भात त्याचा वापर केला जातो. नजर हा शब्द दृष्टी, पहाण्याची पद्धत, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तर कधी कधी नकारात्मक ऊर्जेसाठीदेखील वापरला जातो.म्हणूनच या शब्दामध्ये अर्थाचे अनेक स्तर आहेत. चला तर, नजर म्हणजे नेमकं काय, कशी काम करते आणि तिचे जीवनातील महत्त्व काय हे समजून घेऊया...

     नजरचा मुख्य अर्थ म्हणजे—आपली दृष्टी, जी डोळ्यांमुळे काम करते. मानवी डोळा हा शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव आहे. आपण जगातील ८०% माहिती डोळ्यांद्वारे घेतो असं म्हटलं जातं. प्रकाश डोळ्यात येतो, रेटिनावर फोकस होतो आणि नंतर मेंदू त्या प्रकाशातून प्रतिमा तयार करतो—यालाच आपण ‘बघणे’ म्हणतो. दृष्टी नसती तर आपल्या जगण्याची गुणवत्ता पूर्णपणे बदलून गेली असती. म्हणून डोळ्यांची काळजी घेणे ही दररोजची गरज आहे.

      नजर म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणे नव्हे… तर मनाने पाहणे, समजणे हेही त्याचा एक महत्त्वाचा अर्थ आहे. उदा: “तो माणूस जगाकडे सकारात्मक नजरेने पाहतो.” “तिची नजर खूप बारकाईची आहे.”  याचा अर्थ, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन चांगला आहे किंवा तो/ती गोष्टी खूप बारकाईने समजून पाहते. म्हणजेच नजर या शब्दात अंतर्मनाची दृष्टी देखील सामावलेली आहे.

      भारतीय संस्कृतीत “नजर” हा शब्द एक विशेष अर्थानेही वापरला जातो—वाईट नजर. अनेकांच्या मते, एखाद्या व्यक्तीकडे, बाळाकडे, पिकावर किंवा घरावर कोणीतरी मत्सर, ईर्षा किंवा तीव्र इच्छा ठेवून पाहिल्यास ते “नजर लागणे” असे म्हणतात. त्यामुळे: बाळ रडू लागते, पिकात अचानक समस्या येतात, घरातील वातावरण बदलते, प्राणी अस्वस्थ होतात अशा गोष्टी लोकांच्या अनुभवातून येतात.

    नजर लागणे हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसला तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या त्याचा परिणाम दिसतो—कारण नकारात्मक विचारांची ऊर्जा वातावरणावर परिणाम करू शकते. त्यावर उपाय म्हणून लोक: काळा टिळा, लिंबू-मिरची, काळ्या धाग्याचा वापर, धूप अशा गोष्टी वापरतात.

एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजेही नजर—अशी व्याख्या केली जाते. 

    चांगला शेतकरी, कलाकार, कारागीर किंवा शास्त्रज्ञ यांची नजर बारकाईची असते. ती नुकसानीचे, बदलांचे, सौंदर्याचे, समस्यांचे संकेत अगदी व्यवस्थित पकडते. गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहणे म्हणजेच “नजर ठेवणे”. मनुष्याचे भाव ५०% पेक्षा जास्त डोळ्यांतून व्यक्त होतात. नजरेतून व्यक्त होणारे भाव म्हणजे आनंद, राग, भीती, प्रेम, आत्मविश्वास, संकोच. एखाद्याच्या नजरेतून त्यांची भावना पटकन ओळखता येते. म्हणून नजर हा संवादाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

      एक साधा दिसणारा “नजर” हा शब्द आपल्या जीवनात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो--तो डोळ्यांची दृष्टी, मनाची दृष्टी, दृष्टिकोन, निरीक्षण आणि कधी कधी नकारात्मक ऊर्जेचे प्रतीकही असतो. मानवी दृष्टिकोन बदलला की जग आपोआप बदललेले वाटते—म्हणून आपली नजर सकारात्मक, शांत आणि समजून घेणारी असणे आवश्यक आहे.

नजर
Look

Look

नजर नजरेतला भाव
मला लगेच कळताे,
म्हणून तर त्याच्याकडे
मी नजर वळवताे...

नजर ना लागाे कुणाला
दुष्ट भावनांची, 
काळजी असावी नजरेत
फिकिर करावी कुणाची..

नजर असावी सहज
विविध भाव सांगणारी,
काहींची असते भेदक 
नजरेतला भाव जाणणारी..

नजरेआड सृष्टी
पहावी नजरेतून, 
नजरा नजर हाेताच
भाव कळावा आतून...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************



जुने पेच ते (It's an old embarrassment)

जुने पेच ते 
It's an old embarrassment
 
It's an old embarrassment

जुने पेच ते
नव्याने ते साेडवावे,
प्रसंगी साेडून द्यावे
पेच ते...।१।

जुने पेच ते
साेडवून ते घ्यावे, 
सुटले नसल्यास सांगावे
पेच ते....।२।

जुने पेच ते
कशाला ते साचवावे,
कचरा समजून फेकावे
पेच ते....।३।

जुने पेच ते
गुंता वाढवू नये, 
गुंता वाढल्यास साेडावे
पेच ते.....।४। 

© दीपक अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************

मनाच्या एका कोपऱ्यात (In a corner of the mind)

मनाच्या एका कोपऱ्यात
In a corner of the mind

In a corner of mind

मनाच्या एका कोपऱ्यात, 
आपले स्थान आहे अढळ,
निश्चित श्रध्दा आपल्याप्रती,
तुमचं स्थान राहिल अटल

मनाच्या एका कोपऱ्यात,
हळवा काेपरा आपल्यासाठी,
आपण झालाेय एकजीव,
प्राणपणाने लढा देण्यासाठी

मनाच्या एका कोपऱ्यात, 
साहित्य तुमचं बहारदार,
वाचनीय चेतना पेटवणारं, 
झेलताेय संघर्षाचे हे वार

मनाच्या एका कोपऱ्यात
धृवताऱ्याप्रमाणे तुमचं स्थान,
तुमच्याबाबत ऐकण्यासाठी 
माझे आतुर झालेय कान

© दीपक अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...