name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील (Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil)

शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील
Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil

Karmveer

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दि. २२ सप्टेम्बर रोजी सर्वत्र साजरी करण्यात येईल त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा लेख. (पूर्व प्रसिध्दी: २२ सप्टेंबर १९९०, दैनिक रामभुमी )

      

 कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.

  

 शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.

Karmveer

शैक्षणिक कार्यास प्रारंभ
भाऊरावांनी आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षी शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला १९२९ साली ग्रामीण जनतेच्या, गरीब रयतेच्या कल्याणासाठी भाऊरायांनी सातारा येथे एक शिक्षण संस्था काढली. ती संस्था आज 'रयत शिक्षण संस्था या  नांवाने आजरामर झाली आहे.

"इवलेसे रोप लाविले व्दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी"
  
  या पद्य पंक्तीप्रमाणे ह्या संस्थेचा विकास झाला आहे, होत आहे, होणार आहे. वयाच्या ३४व्या म्हणजेच १९२१ साली भाऊरावांच्या जीवनात एक क्रांतिक्षण आला. मुंबईला स्वदेशी चळवळीत भाऊरावांची म. गांधीशी भेट झाली. गांधीजीच्या व्यापक व्यक्तिमत्वाचा भाऊरावावर प्रभाव पडला. भाऊरावांनी विदेशी वस्त्रांचा त्याग केला व खादीची वस्त्रे वापरू लागले. टोपी व चप्पल वापरणेही सोडून दिले. अशा प्रकारे निः संगवृत्ती धारण केली.


ग्रामीण जनतेसाठी धडपड
   भाऊरावांची धडपड ग्रामीण गरीब जनतेसाठी होती. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. म्हणून प्रथम खेड्यात सुधारणा होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. तांत्रिक, वैज्ञानिक, वैद्यकीय ज्ञान खेड्यापर्यन्त पोहोचले पाहिजे असे त्यांचे मत होते. गरीब जनतेस, सुलभतेचे शिक्षण मिळावे ही आजची राष्ट्रीय गरज आहे व खेडी आपल्या पायावर उभी राहिली म्हणजे राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल हे भाऊरावांचे महत्वाचे विचार होते. महाग शिक्षणाबरोबरच गुणवत्तेवर निकालातील प्रवेशपध्दतीच्याही हे विरोधात होते. आपल्या गावापुरते एखादे कॉलेज, एक दोन शाळा काढणे हा मर्यादित दृष्टीकोन भाऊरावांचा नव्हता. त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळच हाती घेतली होती. प्रत्येक खेड्यात शाळा अशा शेकडो शाळा, बालकमंदिरे स्थापन करून प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची भाऊरावांची विशाल दृष्टी होती. या सर्वांमागे श्रम व श्रधेबरोबरच भाऊरावांच्या साथीला जनतेचे सहकार्य होते.
७५ टक्के स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. या सर्व परिस्थितीत निपटण्यासाठी प्रचंड निर्धार व आर्थिक सहाय्याची गरज आहे. आज शिक्षण महाग बनत चालले आहे. पिळवणूक केली जात आहे आणि अभ्यासक्रम अवघड व सदोष बनत आहे. बाहे. खाजगी क्लासेस व गाईड बुकांना महत्व दिले जात आहे.  शिस्त व चारित्र्य संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. बुध्दिमत्ता आळसावत चालली आहे. शिक्षण हे स्पर्धात्मक बनत आहे.  वयाच्या वीस- पंचविस वर्षानंतरच्या अध्ययनानंतरही नोकरी वा रोजगारांची निश्चिती नसल्याने तरुण पिढीत उदासिनतेचे सावट पसरलेले आहे. या सर्व परिस्थितीवर मात केली पाहिजे व ते शक्य आहे. केवळ कर्मवीरांच्या ध्येयदृष्टीची व निर्धाराची कास धरावी.

गरजा ओळखल्या
  भाऊरावांनी समाजाचे दुःख जाणले. त्यांच्या गरजा ओळखल्या. अशा असाहाय्य समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ह्या भावनेतून भाऊरावांनी जे शैक्षणिक कार्य केले ते प्रचंड आहे. चैतन्यमय आहे. यांच्या विशुद्ध भूमिकेने व दिशेने गेल्यास संपूर्ण देशात सामाजिक स्थित्यंतर घडून आल्यास नवल नाही. कर्मवीरांच्या बाबतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की, कर्मविर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपाऱ्यांना लिहिता वाचता केलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरायांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.
  अशा प्रकारे महाराष्ट्रातील दलित, गरीब समाजास जागृत करणारे कर्मवीर ९ मे १९५९ या दिवशी अनंतात विलीन झाले. परंतु हजारो ज्ञानदीप पेटवून गेला.
दीपक के. अहिरे,  
आनंदपूर (बागलाण)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


निरोगी जपानी लोक | Healthy Japanese People | दीर्घायुष्याचे रहस्य

निरोगी जपानी लोक: दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे रहस्य
Healthy Japanese People

nirogi japani lok

प्रस्तावना

    जगात सर्वाधिक दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये जपानी लोकांचा अग्रक्रम लागतो. जपानमध्ये 90–100 वर्षांपर्यंत सक्रिय व आजारमुक्त जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. मग प्रश्न पडतो — जपानी लोक इतके निरोगी कसे राहतात? चला जाणून घेऊया त्यामागची कारणे.


जपानी लोकांच्या निरोगी जीवनशैलीची वैशिष्ट्ये

1️⃣ संतुलित आणि नैसर्गिक आहार

nirogi japani lok

जपानी आहार हा हलका, पौष्टिक आणि नैसर्गिक असतो.
त्यांच्या आहारात प्रामुख्याने:

  • भात (Rice)

  • मासे (Fish)

  • समुद्री शैवाळ (Seaweed)

  • भाज्या

  • मिसो सूप

  • टोफू व सोयाबीन पदार्थ

👉 तेलकट, प्रक्रिया केलेले (processed) अन्न फार कमी प्रमाणात घेतले जाते.


2️⃣ “Hara Hachi Bu” – पोट 80% भरल्यावर थांबा

जपानी लोकांचा एक सुवर्णनियम आहे —
“Hara Hachi Bu” म्हणजे पोट पूर्ण न भरता 80% झाल्यावर खाणे थांबवणे.

यामुळे:

  • लठ्ठपणा टाळला जातो

  • पचन सुधारते

  • मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी होतो


3️⃣ नियमित चाल

nirogi japni lok


जपानी लोक:

  • लहान अंतरासाठीही चालतात

  • सायकलचा वापर करतात

  • वृद्ध वयातही सक्रिय राहतात

👉 व्यायाम म्हणजे फक्त जिम नव्हे, दररोजची हालचाल हेच त्यांचे रहस्य आहे.


4️⃣ ताणतणावमुक्त जीवन (Low Stress Life)

जपानी संस्कृतीत:

  • ध्यान (Meditation)

  • निसर्गाशी जवळीक

  • काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल

यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. ताण कमी = आजार कमी हे जपानी लोक उत्तमरीत्या पाळतात.


5️⃣ सामाजिक संबंध आणि उद्देशपूर्ण जीवन

nirogi japni lok

जपानी लोकांमध्ये Ikigai ही संकल्पना प्रसिद्ध आहे.
👉 Ikigai म्हणजे जगण्याचा उद्देश.

  • कुटुंबाशी घट्ट नाते

  • समाजात सक्रिय सहभाग

  • आयुष्याला अर्थ देणारे काम

यामुळे मानसिक समाधान व दीर्घायुष्य मिळते.


6️⃣ स्वच्छता आणि शिस्त

जपानमध्ये:

  • वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता

  • वेळेचे काटेकोर पालन

  • शिस्तबद्ध जीवनशैली

👉 स्वच्छता आणि शिस्त यांचा आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो.


7️⃣ ओकिनावा – दीर्घायुष्याचे बेट

जपानमधील Okinawa भागाला “Longevity Island” म्हटले जाते.
येथील लोक:

  • कमी कॅलरी पण पौष्टिक आहार

  • सक्रिय जीवनशैली

  • सकारात्मक विचार

यामुळे येथे शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक मोठ्या संख्येने आढळतात.


आपण जपानी लोकांकडून काय शिकू शकतो?

✔ संतुलित आहार घ्या
✔ जास्त खाणे टाळा
✔ रोज चालण्याची सवय लावा
✔ ताण कमी ठेवा
✔ आयुष्याला उद्देश द्या
✔ निसर्गाशी जोडलेले राहा


निष्कर्ष

निरोगी जपानी लोक हे केवळ जनुकीय कारणांमुळे नाहीत, तर त्यांच्या साध्या, शिस्तबद्ध आणि संतुलित जीवनशैलीमुळे ते आजारमुक्त व दीर्घायुष्य जगतात. आपणही त्यांच्या सवयी आत्मसात केल्यास आरोग्यपूर्ण जीवन नक्कीच जगू शकतो.


निरोगी जपानी लोक
Healthy Japanese People

nirogi japani lok

जपानी लोक जगतात
निरोगी जीवनशैली,
न चुकता व्यायाम
सवय प्रत्येक घरातली...


जपानचा निसर्ग
विलोभनीय खूप सुंदर,
सात्विक घरच्या भोजनावर
त्यांचा नेहमी असतो भर...


जपानी लोकांना
कशाची नसते हाव,
गरजेपुरती वस्तू नी वापर
म्हणून मिळतो वाव...


वेळ मिळाला की हे लोक
निसर्गाच्या सान्निध्यात जातात,
फोन, टेक्नॉलॉजीपासून दूर
ताजेतवाने, रिफ्रेश होतात...


जपानमध्ये "इकिगाई"
संकल्पनेला महत्व फार,
शोधतात जीवनाचा उद्देश
पूर्तता करतात अपरंपार...


इकिगाई जीवनात
देते अर्थ आणि दिशा,
जीवनात नेमका उद्देश
झटकतो कंटाळा नी निराशा...


सातत्याने शिक्षण
नी सुधारणा करणे,
नवीन शिकण्याची जिद्द
हा दृष्टिकोन अवलंबणे...


योग्य प्रमाणात आहार
जपानी हे तत्त्व पाळतात,
पचनक्रियेवर येत नाही ताण
शरीराला निरोगी ठेवतात...


जपानी तत्त्वज्ञान "काइझेन"
म्हणजे सतत सुधारणा,
मन स्थिरपणे कार्यरत
शरीर सुदृढतेचा बाणा...


"सेपुकु" हे जपानी
आत्मानुशासन, 
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी
हे महत्वाचे कारण...

nirogi japani lok

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

पितृपक्ष (PitruPaksha)

 पितृपक्ष
   PitruPaksha


Pitrupaksha


आजपासून पितृपक्षाची

होत आहे सुरूवात, 

पूर्वजांप्रति आपले

कर्तव्य श्राद्धाची रुजवात...


पूर्वज आणि पितरांची 

काढा श्रद्धापूर्वक आठवण,

पिंडदान करून करा

अपत्य धर्माचे पालन...


श्राद्धावेळी द्यावे

पाच जणांना भोजन,

गाय, श्वान, कावळा, पाहुणा 

आणि मुंगीसाठी अन्नदान... 


श्राद्ध पितरांना तात्काळ 

सूर्य व वायूच्या रूपाने मिळतो,

पृथ्वीलोक व पितृलोकाचा थेट संपर्क

पितृगण अन्नदानाने संतुष्ट होतो...


© दीपक केदू अहिरे, नाशिक 

Pitrupaksha



जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा ( Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day)

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा
Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day

World Tourism day

     महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, नाशिक विभागामार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण यांनी केले आहे.

   दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रादेशिक कार्यालय, नाशिक मार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनाटेड नेशन टुरिझम यांचे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनासाठी "पर्यटन आणि शांतता" हे  घोषित केले आहे. 

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास, उपहारगृहे, बोटक्लब येथे २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पर्यटनदिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त राबविले जाणारे विविध उपक्रम प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अति महत्वाच्या माननीय व्यक्ती, नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ, पर्यटन व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार असून या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  पर्यटन दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. ही स्पर्धा महाविद्यालयांनी आपआपल्या महाविद्यालयात घ्यावयाची असून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले चित्रकला व निबंध महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय, नाशिक कार्यालयाकडे २० सटेंबर २०२४ पर्यंत जमा करावेत.  दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व  प्रमाणपत्र वितरण सोहळा २७ सप्टेंबर २०२४ रोजी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतील.

निबंध स्पर्धेचे विषय : पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे त्यांचा शांतता संदेश, माइया स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय असतील. 

विजेत्यांना प्रथम पारितोषिक : नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.  द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ रात्र २दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


चित्रकला स्पर्धेचे विषय :  जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधुन आपण पर्यटन आणि शांतता या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील.  विजेत्यांना प्रथम पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंध व चित्र २० सटेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक-४२२००२ 

दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२९७००४९ येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. तरी परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेली चित्र व निबंध कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी केले आहे.

शिक्षक दिन (Teachers day)

 

शिक्षक दिन
 Teachers day

 भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. डॉ. राधाकृष्णन यांना अध्यापनाची फार आवड होती. एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर त्यांनी नम्रपणे सांगितले, “माझा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यापेक्षा तो दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला, तर मला अधिक आनंद होईल.”तेव्हापासून भारतात ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो.

   शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा शिल्पकार असतो.शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा, नैतिक मूल्ये, शिस्त आणि समाजासाठी जबाबदारीची जाणीव करून देतात.“गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः” या संस्कृतीत गुरुंना देवासमान स्थान दिलेले आहे. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथे विशेष कार्यक्रम होतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदर, शुभेच्छा, भेटवस्तू देतात. सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, कविता, नाटक, शिक्षकांचा गौरव समारंभ अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा कृतज्ञभाव व्यक्त होतो. सरकारतर्फे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन शिक्षकांचा सन्मान केला जातो.

  विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक हा प्रेरणेचा दीपस्तंभ असतो.शिक्षकांमुळे विद्यार्थी केवळ परीक्षेत यशस्वी होत नाही, तर जीवनातही सक्षम होतो.त्यामुळे शिक्षक दिन हा दिवस आपल्याला आपल्या आयुष्यातील गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.शिक्षक दिन म्हणजे गुरुंना वंदन करण्याचा दिवस. ज्ञान, संस्कार आणि मूल्ये यांची शिदोरी देणाऱ्या शिक्षकांविना समाज प्रगत होऊ शकत नाही.


Shikshak din


शिक्षक दिन
 Teachers day


भारतात ५ सप्टेंबर रोजी

शिक्षक दिन साजरा होतो,

शिक्षकांप्रती असते कृतज्ञता

त्यांचे योगदान आपण पाहतो...


उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

यांचा जन्मही पाच सप्टेंबरचा,

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे

हा दिवसही त्यांचा वाढदिवसाचा...


अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक

विद्यार्थ्यांना करत असतात खंबीर,

शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्याला दिशा

शाळाबाह्य  जगात धरावा लागतो धीर...


जडणघडण करण्यात गुरूचा वाटा मोठा

जिथे शिक्षण तिथेच होतो विकास,

शिल, क्षमा आणि कलेचा संगम 

शिक्षक, गुरूत असतो हमखास... 


© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

Shikshak din

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

जागतिक नारळ दिन (World Coconut Day)

 


जागतिक नारळ दिन 
World Coconut Day


World Coconut Day


जागतिक नारळ दिन 

दरवर्षी २ सप्टेंबरला, 

धार्मिक,आरोग्य,सांस्कृतिक

व्यावसायीकदृष्ट्या महत्व नारळाला... 


नारळ एकमेव असे फळ

ज्याचा प्रत्येक भागाचा वापर,

मोठ्या प्रमाणात पौष्टिक मूल्ये

नारळपाण्याचा वापर भरपूर...


विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी

वापर नारळाच्या दुधाचा,

दररोजच्या वापरातही

वापर होतो नारळ तेलाचा...


नारळाची सरासरी उंची ९८ फुट 

६० ते ८० फुटाचे नारळ बुटके,

जगात इंडोनेशिया, भारतात 

नारळाचे झाड १८६ फूट इतके...


नारळाची उपयुक्तता व मागणी

रोज दिवसेंदिवस वाढते,

म्हणूनच नारळाला 

कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते... 


© दीपक केदू अहिरे

नाशिक


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube


हॅरी पॉटरची लेखिका जे.के.रोलिंग (Harry Potters author j.k.rowling)

हॅरी पॉटरची लेखिका जे.के.रोलिंग

Harry Potterchi lekhika: j.k.rowling

वयाच्या १७ व्या वर्षी
महाविद्यालयातून काढले,
२५ वर्षाची असताना
आईचे निधन झाले...


२६व्या वर्षी पोर्तुगालला
इंग्रजी शिकण्यासाठी गेली,
२७ व्या वर्षी लग्न झाले
तिला एक मुलगी झाली...


२८ व्या वर्षी झाला घटस्फोट
निदान झाले गंभीर आजार,
२९ व्या वर्षी आली फुटपाथवर
आत्महत्या करण्याचा केला विचार...


तिला होती लिखाणात रुची
त्याचा विचार तिने केला,
३१व्या वर्षी पहिलं पुस्तक
प्रकाशित करण्याचा विचार झाला...


वयाच्या ४२ व्या वर्षी तिने
"हॅरी पॉटर"  प्रकाशित केले,
प्रकाशनानंतर पहिल्या दिवशी
१ कोटी १० लाख प्रति विक्री झाले...


या लेखिकेचं नाव आहे जे.के.रोलिंग
हॅरी पॉटर आज जागतिक ब्रँड बनला,
आयुष्यात कधी मानू नका हार
जिद्दीने चाला, भले थोडा उशीर झाला...


स्वतःवर ठेवा विश्वास
जिद्द ठेवा मेहनत करण्याची,
आपल्यासमोर ठेवा प्रेरणा
 जे.के.रोलिंग या बाईची...


© दीपक के.अहिरे, नाशिक 

Harry Potter

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

******************************************


बैलपोळा (Bull pola festival)

 बैलपोळा
Bull Pola Festival 


Bull Pola Festival


बैल आहे सखा सोबती

शेतकरी बंधूच्या जिवाभावाचा, 

बैलांप्रती आपली कृतज्ञता 

सण आहे हा बैलपोळ्याचा... 


शेतीच्या कामासाठी आली यंत्र 

बैलाच्या मेहनतीला नाही तोड,

पोळ्याच्या दिवशी सजवतात बैलांना 

नैवेद्य पुरणपोळीचा गोड-धोड...


ज्यांच्याकडे बैल नाही असे शेतकरी

बैलाच्या पुतळ्याची पूजा करतात, 

गावखेड्यात निघतात बैलांच्या मिरवणुका 

संपूर्ण गावात नाचत बैल फिरवतात...


सण माझ्या सर्जा- राजाचा 

ऋण त्याचं माझ्या भाळी, 

तुझ्या घामानं फुलणाऱ्या शेतीला 

सदा पिकू दे सर्व काळी... 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

Bull Pola Festival


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube


Linkedin :

https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...