name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र | Agri Tourism Center in Nashik District

 नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र
Agri Tourism Center in Nashik District 

  

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Shivparv Agrotourism Centre 
   

     ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपारिक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषीपर्यटन हा पर्याय पुढे आला आहे
  
    गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे.  शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषीपर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय.
  
आजच्या धावपळीच्या जीवनात विज्ञानयुगात पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशात तसेच देशांतर्गत अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावारुपाला येत आहे. 
       
कृषि व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषिपर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. 
     
आजमितीस कृषिपर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. कृषिपर्यटन हा जगातील अतिशय वेगाने वृध्दींगत होणारा व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रात अशी उल्लेखनीय कृषीपर्यटन केंद्र आहेत. त्या ठिकाणी भेट देणे गरजेचे आहे.

शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र 


    शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या  कृषिपर्यटन केंद्रात आहेत.

 

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Orchard of shivparv Agrotourism 

   निसर्गाच्या सान्निध्यात, ऐतिहासिक धोडप किल्लाच्या कुशीत, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र वसलेले आहे. सर्व प्रकारच्या फळबागांनी बहरलेल्या या शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतात. 

      
शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र हे विविधतेने नटलेले असून  बोटिंग स्विमिंग, रेनडान्स, धबधबा, खेळणी, बैलगाडी शिवारफेरी या सुविधा येथे उपलब्ध आहेत.  या ठिकाणी हॉल, किचन, कारंजा, मंदीर (देवालय) अशी आकर्षक आणि संदर ठिकाणे आहेत.

नारळवाडीत असलेली निवासव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. तेथे जाण्यासाठी ७०० फूट लांबीचा लोखंडी पूल तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विविध उंचीचे ठिकठिकाणी अनेक मनोरे असे निसर्गरम्य कृषी पर्यटन असून याचा आस्वाद घेणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
    
स्थानिक कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देताना ग्रामीण भागात शाश्वत पर्यटनाला चालना देणे हे शिवपर्व कृषीपर्यटनचे ध्येय आहे. ग्रामीण समुदायांसाठी आर्थिक संधी निर्माण करणे, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक परंपरा जतन करणे आणि पर्यटकांना शैक्षणिक आणि माहितीपूर्ण अनुभव प्रदान करणे हे शिवपर्व कृषी पर्यटनाचे उद्दिष्ट असल्याचे संचालिका सौ. अंजना केवळ देवरे यांनी सांगितले.

रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र

    

    नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. श्री.थविल यांचे इंजिनियरिंग शिक्षण झाले परंतु नोकरी न करता  आपल्या माळरानात रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलविले आहे. गावाकडच्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून गावात शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 


Nashik jillhyatil krushi parytan kendra
Ranzopadi Agrotourism 

    श्री. हर्षलला झाडांची आवड असल्याने त्याने सुरवातीला कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली.
    
ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरलेला असतो. ही बाब हेरुन हर्षदने कृषीपर्यटन सुरु केले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.

      

Nashik jillhyatil krushi parytan kendra


सध्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 'फॅमिली कॅम्पिंग' ची संकल्पना राबवण्यात येत आहे. रानझोपडी कृषीपर्यटन केंद्रात पारंपरिक जेवण दिले जाते.यात नागलीची भाकर, रानभाज्या दिल्या जातात.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

तृणधान्यापासून खाद्यान्न प्रक्रिया : आरोग्य, पोषण आणि ग्रामीण उद्योगांना नवी दिशा I Food Processing from Cereals – Health, Nutrition & Agro Industry

 तृणधान्यापासून खाद्यान्न प्रक्रिया : आरोग्य, पोषण आणि ग्रामीण उद्योगांना नवी दिशा

Food Processing from Cereals – Health, Nutrition & Agro Industry


Trundhanya

     


    जगातील जास्तीत जास्त लोक तृणधान्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात मुख्य खाद्यान्न म्हणून करतात. भारतामध्ये प्रामुख्याने भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी हे तृणधान्य मोठया  प्रमाणावर खाद्यान्न म्हणून वापरली जातात.  


   तृणधान्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च हा मुख्य अनघटक असतो आणि त्यापासून मानवी शरीरास सर्वात जास्त ऊर्जा पुरविली जाते. पिष्टमय पदार्थाबरोबरच तृणधान्यांमध्ये प्रथिने, कैल्शियम, लोह आणि बी. कॉम्प्लेक्स जीवनसत्वेसुद्धा मोठया प्रमाणावर असतात.

तृणधान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांची साठवण सहजासहजी, कमी खर्चात अधिक कालावधीसाठी करता येते. 

    तृणधान्यामुळे जेवणास मृदू, सौम्य चव निर्माण होते. याच कारणामुळे तृणधान्यांचा वापर बालआहारात जास्त केला जातो. तृणधान्याचे आकार, जडणघडणही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही तृणधान्य आकाराने मोठी तर काही अतिशय लहान आहेत. त्यांचे आकारमान गोलाकार, निमुळते, दंडगोल, चपटे, अंडाकृती, किडनीसारखे, अर्धगोल अशा प्रकारचे आहेत. यात ७५ ते ९० टक्के भाग स्टार्चचा असतो.

तृणधान्याचे दाणे प्रामुख्याने टरफलांनी, कोंड्याने किंवा जाड आवरणाने, रंगद्रव्याने, मेणाने आच्छादलेले असते. हा भाग खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच पचनासाठी सुलभ नसतो. त्यामुळे ते तृणधान्यापासून वेगळे करणे गरजेचे असते. 

  तृणधान्य दळण्याच्या प्रक्रियेत तृणधान्यात असणारे कठीण आवरण काढून टाकले जाते. तृणधान्यापासून चांगल्या प्रतीचे पीठ तयार व्हावे म्हणून त्या तृणधान्यास दळण्याअगोदर गरम पाण्याची प्रक्रिया करावी. गरम पाण्याच्या या प्रक्रियेमुळे तृणधान्यापासून कोंडा, बिजांकुर,फोलकटे लवकर व सहजा सहजी वेगळे होऊन त्यापासून बनवलेल्या पदार्थांची प्रत आणि प्रमाण वाढते. 


तांदूळ प्रक्रिया 

   तांदळापासून भात तयार करता येतो. अशा या तांदळाचे विविध प्रकार आहेत. त्यात थाय जासमिन व्हाईट राईस, तांबडा तांदूळ, पांढरा तांदूळ, तुटलेला तांदूळ, आखूड तांदूळ, पारबॉइल्ड राईस किंवा अपूर्ण शिजविलेला तांदूळ, गलुटेनियम राईस हे प्रकार आहेत. मुख्यत्वे तांदळामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार म्हणजे मेनरहित तांदूळ व मेणासहित तांदूळ हे आहेत.


Trundhanya


     तांदळापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यात पूर्ण शिजवलेला किंवा त्वरीत शिजणारा तांदूळ, शेवया, राईस केक, आंबविलेला तांदळाचा केक आणि पुढींग्ज, इनस्टंट राईस, रेडी टू- इट सिरीअल्स, तांदळाचे पोहे (साळीचे पोहे), भाजलेले पोहे (चुरमुरे), तांदळाच्या लाह्या, तांदळाचे इतर खाद्यापदार्थ तयार करता येतात.

भाताचा तुसाचा उपयोग विट भट्टीमध्ये विट भाजण्यासाठी करतात. तसेच तुस जाळल्यावर त्याच्यामध्ये असणाऱ्या वाळूचा उपयोग काच निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुस जाळल्यानंतर मिळणाऱ्या काळपट राखेचा उपयोग जमिनीचा सामू सुधारण्यासाठी होतो. अशी राख अल्कधर्मीय जमिनीमध्ये वापरतात.  

     भाताच्या तुसामध्ये व कोंड्यामध्ये १५ ते २० टक्के तेलाचे प्रमाण असते. याचा उपयोग कच्चे तेल (क्रूड ऑईल) म्हणून डांबरामध्ये करतात. तसेच या तेलावर प्रक्रिया केल्यास याचा पुरक खाद्यतेल म्हणूनही उपयोग करतात. ज्या भागात उकडा तांदूळ केला जातो त्या कोंड्यामध्ये या तेलाचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे आढळते.

याचा उपयोग मेन, चरबीयुक्त पदार्थ, संतुलीत पशुखाद्य व पेंड तयार करण्यासाठी करतात. पॉलीश करताना कोंड्यामध्ये जो भृम असतो तो २० ते २५ मेश चाळणीतून चाळून अलग करून कोंबड्याचे खाद्य म्हणून याचा उपयोग करता येतो. कारण त्यामध्ये अधिक पौष्टीकता असते. 

   मानवी आहारासाठी याचा उपयोग करावयाचा असेल तर यामधील भेसळयुक्त खडे, कसपटे, तुटलेले दाणे काढून टाकावेत. ह्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, शर्करा व तेलाचे भरपूर प्रमाण असते. तसेच लहान मुलांना शाळेमध्ये सुकडी म्हणून देता येते.

सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये उकड्या तांदूळ अन्न म्हणून शिजवतांना जे पाणी निघते त्याचा उपयोग पेज खाण्याकरीता करतात. उकड्या तांदळाला भाजून त्याचे पीठ तयार केले जाते. व त्यात साखर, वेलची, सुके खोबरे घालून लाडू तयार करतात. अशा प्रकारे भाताचे उपपदार्थ तयार करून आपला आर्थिक फायदा करून घेऊ शकतो. 


मका प्रक्रिया 

     मका तृणधान्याचा उपयोग खाद्यान्न म्हणुन मोठया प्रमाणात केला जातो कारण त्यात भरपूर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने आहेत.
भारतात ९० टक्के मका मानवी खाद्यपदार्थ म्हणून वापरतात. मक्यापासून पोहे मोठया प्रमाणावर तयार केले जातात. त्यांचा वापर न्याहरी, ब्रेकफास्टसाठी केला जातो. मक्यापासून लाह्या, स्टार्च, डेस्ट्रीन सायरप, कारखान्यातील अल्कोहोल, बिव्हरेजेस, पशुखाद्य आणि इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. 


Trundhanya

   

    मक्याच्या दाण्यातील स्टार्चच्या प्रकारानुसार फिल्ट कॉर्न, डेन्ट कॉर्न, स्वीट कॉर्न, पॉप कॉर्न, फ्लोअर कॉर्न, वॉक्सी कॉर्न असे प्रकार पडतात मक्याची सोजी म्हणजेच रवा वापरून उपमा, हलवा, इडली सारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात. गहू किंवा ज्वारीच्या पिठात ४० टक्के मका पीठ मिसळून बेकरी पदार्थ तयार केल्याने कमी किमतीत व पौष्टीक पदार्थ तयार करता येतील. 

   

    महागड्या बेसन पिठात ३० टक्के मक्याचे पीठ मिसळून बेसन पीठाचे उत्तम प्रकारचे कमी किंमत असलेले विविध खाद्यपदार्थ तयार करता येतील. मक्याच्या पिठापासून सूप, सॉस, कस्टर्ड पावडर, कॉर्न फ्लोअर बनविली जाते. शिजवलेल्या मका कणीचा उपयोग करून पोहे व चिवडा तयार करतात. काही विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या मक्याच्या वाणापासून लाह्या, पॉप कॉर्न तयार करून स्नॅक फूड म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. 

   

    मक्याच्या दाण्यापासून खाद्यतेल, पशुखाद्य, स्टार्च, सिरप बनवले जाते. दुय्यम पदार्थ यांचा वापर खुराक तयार करणाऱ्या उद्योगात केला जातो. कोंबड्यांचे खाद्य निर्माण करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या मक्याचा वापर करून अंड्याची गुणवता सुधारता येते. 

    मक्याच्या धान्याव्यतीरीक ताटांचा वापर ओला चारा म्हणून जनावरांना खाऊ घातला जातो. जनावरांनी न खाल्लेली ताटे सरपण, इंधन म्हणून वापरली जातात. मक्याच्या कणसापासून दाणे वेगळे केल्यानंतर जी बुरकुंडे किंवा बिट्टी मोठया प्रमाणावर इंधनासाठी वापरतात. या सर्व प्रक्रियेतून उरलेला माल कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो. 

    मक्यापासून अशा प्रकारे कोरडी (ड्राय मिलिंग) प्रक्रिया पद्धतीचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, पशुखाद्य तसेच औद्योगिक उपयोगाचा माल तयार करता येतो.


गहू प्रक्रिया 

  जगातील सर्वात महत्वाचे वैशिष्टयपूर्ण असे गहू तृणधान्य आहे. यात सर्वात जास्त प्रथीने असून, त्याचे पौष्टीक मूल्यही अधिक आहे. म्हणून याला तृणधान्यांचा राजा म्हटले जाते.

    बेकरी उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकपदार्थांपैकी सर्वात महत्वाचा व पायाभूत घटक म्हणजे मैदा होय. हा मैदा गव्हाच्या रोलर फ्लोअर मिलमध्ये विशिष्ट पद्धतीने दळून तयार केला जातो. मैद्याची प्रत ही  बऱ्याचवेळी गव्हाच्या मुलभूत गुणधर्मावर अवलंबून असते. काही गहू टणक असतात. अशा गव्हापासून तयार होणारा मैदा, ब्रेड चांगला तयार होतो. 


Trundhanya

    गव्हाचा उपयोग मुख्यत्वे शेवया, बोटवे, नखुले असे विशिष्ट खाद्य पदार्थ बनविण्यासाठी होतो. पशुखाद्यही तयार केले जाते. विविध प्रकारचे ब्रेड, बनस, केकस्, बनस, बिस्कीटे, कुकीज तयार करण्यासाठी गहू दळून त्याचे पीठ तयार करणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया होय.

    आधुनिक मैद्याच्या गिरणीमध्ये गहू मुख्यत्वे दोन टप्प्यात दळतात ते म्हणजे ब्रेक सिस्टीम व रिडक्षण सिस्टीम हा होय.  ब्रेक सिस्टीममध्ये रोलरच्या ४ ते ५ जोड्या असून त्याला लागून चाळण्या व प्यूरीफायर असतात. रिडक्सन सिस्टीममध्ये गव्हाच्या तुकडयांचे टप्प्याटप्याने आकारमान कमी करून शेवटी त्याचे रुपांतर मैद्यात करतात. 

   

    ही प्रक्रिया करतांना कोड्याचा व बीजांकुराचा भाग चाळण्याद्वारे वेगळा करतात.  कोंडा काढलेला म्हणजे पॉलिश केलेला आणि तडे गेलेला पारबॉईल गव्हाला बुलगूर असे म्हणतात. बुलगूर हा एक महत्वाचा गव्हाचा पदार्थ मानला जातो.

    या पदार्थापासून अनेक प्रकारचे शिजविलेले पदार्थ, न्याहरीचे पदार्थ तसेच पाहुणचाराचे पदार्थ बनवता येतात.  काही वेळेस तांदळास पर्याय म्हणून बुलगूर या पदार्थाचा वापर केला जातो. बालकाच्या आहारामध्ये वापरतात.


ज्वारी प्रक्रिया 

     भारतात भात आणि गव्हानंतर ज्वारीचा खाद्यान्न म्हणून उपयोग केला जातो. ज्वारीचा उपयोग विविध प्रकारचे खाद्यपदार्थ निर्मितीसाठी केला जातो. ज्वारीच्या धान्याबरोबरच त्याच्या ताटांचा, कडब्याचा उपयोग ओला किंवा वाळलेला असतांना पशुखाद्य म्हणून प्रामुख्याने करतात. ज्वारीच्या काही वाणात रस व साखरेचे प्रमाण अधिक आहे. अशा वाणांचा उपयोग सायरप तयार करण्यासाठी केला जातो. 


Trundhanya

  

ज्वारीत स्टार्च महत्त्वाचा घटक आहे. तो शुद्ध स्वरूपात वेगळा करून त्याचा उपयोग आंबविण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी व त्यापासून अल्कोहोल व इतर रासायनिक द्रावणे तयार करतात.

ज्वारीवर प्रक्रिया करताना प्रथम स्वच्छता करणे, कोंडा काढणे, कांडणे आणि शेवटी पिठामध्ये रुपांतर करणे या नंतरच्या प्रक्रियेमध्ये पिठाचे किंवा कच्च्या मालाचे रूपांतर पदार्थामध्ये पक्क्या मालामध्ये केले जाते. 

     

मानवी आहारात तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण पाहिजे ते ज्वारीच्या सेवनाने पुरेपूर मिळते. कावीळ झालेल्या रोग्यास ज्वारीचा आहार उपयुक्त ठरतो. मानवाचा लठ्ठपणा व मधुमेह कमी करण्यास ज्वारीचा उपयोग होतो.

    हृदयाचे विविध विकार ज्वारीने कमी होतात. भुक वारंवार लागत नाही. पोटाचे विकार कमी होतात. आजारी मानवास दूध ज्वारी भाकरीचा आहार देण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. अशी या बहुउपयोगी ज्वारीचे विविध अन्नपदार्थ बनवल्यास तरुणांना या क्षेत्रात मोठा रोजगार प्राप्त होऊ शकतो. 


बाजरी प्रक्रिया 

  बाजरी प्रामुख्याने खाद्यान्न म्हणून वापरतात.  बाजरीवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही. काही प्रमाणात पॉलीश करून हिरवा रंग घालवून पांढरा केला जातो. बाजरीपासून लाह्या तयार करण्यासाठी परलिंग केले जाते. आणि नंतर लाह्या तयार केल्या जातात. तसेच परलिंग केलेली बाजरी शिजवून अनेक पदार्थ तयार केले जातात. 


Trundhanya

   बाजरीपासून भाकरी, पोरजी यासारखे पदार्थ तयार करतात. या धान्यास माल्टींगची प्रक्रिया करून त्यापासून पेयही तयार करतात.

बाजरीचे पीठ साधारणपणे ४-५ दिवसांत कडसर होत असल्यामुळे पुष्कळ लोक बाजरी खाणे टाळतात. बाजरीचे धान्य फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात १५ ते २० सेकंद बुडविल्यास त्यातील पीठ कडू करणारे घटक निष्क्रीय होतात. अशा प्रक्रिया केलेल्या धान्यापासून तयार केलेले पीठ महिनाभरापर्यंत चांगल्या स्थितीत साठवता येते.

   अशा प्रकारे तृणधान्यांचा उपयोग मानवी आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. सध्या तर या तृणधान्यांच्या पदार्थाना, उपपदार्थाना भरपूर मागणी आहे. खाद्यान्न बरोबरच यापासून विविध पदार्थ बनवल्यास फार मोठी बाजारपेठ या पदार्थांना उपलब्ध होईल. 


© दीपक केदू अहिरे, 
नाशिक
deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

****************************************
Telegram :
****************************************
Facebook :
****************************************
Instagram : 
****************************************
YouTube :

****************************************
Quora :
****************************************
Koo :
****************************************
Pintrest:
****************************************
Share chat :
****************************************
Twitter :
@DeepakA86854129
****************************************
Website :

****************************************


संरक्षणात्मक शेतीतंत्र I Conservation Agriculture

     

     संरक्षणात्मक शेतीतंत्र        

Conservation Agriculture

   
    हवामानाचा लहरीपणा व सोयीने नियंत्रित करता येणारे पॉलीहाऊसमधील सूक्ष्म हवामान या प्रमुख कारणांमुळे शेतकरी वाढत्या प्रमाणात पॉलीहाऊस, शेड-नेट, लो-टनेल, वॉक-इन टनेल, फ्रुट / बंच प्रोटेक्शन बॅग यासारख्या संरक्षणात्मक शेतीतंत्रांचा (Conservation Agriculture) अवलंब करून आपले पीक मोकळ्या आभाळाखाली शाबुत राहील याची खात्री करीत असतो.

Conservation Agriculture
प्रो-बॅग (pro-bag)

फळझाडांना झाडावरच संरक्षण देण्यासाठी : झुलूक प्रो-बॅग”

        आमच्या झुलूक कॉर्पोरेशनने तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षणात्मक शेती पर्यायावर सतत संशोधन केले आहे. अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मालिकेतील एक तंत्रज्ञान म्हणजेच द्राक्ष, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी, टरबूज, खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी इ. फळझाडांना झाडावरच संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेली “ झुलूक प्रो-बॅग” हे नाविन्यपूर्ण उत्पादन सादर करण्यात आले आहे.

“झुलूक प्रो-बॅग”च्या वापरामुळे होणारे फायदे :

१. ऊन, पाऊस, वादळ, वारा, धुकं, गारपीट, यांसारख्या नैसर्गिक बाबींपासून सरंक्षण मिळते.
२. फळांचा ब्लूम (टवटवीतपणा / जोमदारपणा), साईज (आकार), कलर, शुगर, वजन, तसेच टिकण्याची क्षमता
(शेल्फ लाईफ)इ. मध्ये आमूलाग्र सुधारणा होते.
३. विविध प्रकारच्या रोगराई, कीटक, ककडे, सनबन (उकड्या), थ्रीप्स, डाग इ. पासून पिकांचे सरंक्षण होते.
४. सीझन  नसतांना (नॉन सिजनल) पीक घेणे सोयीस्कर होते.
५. एक्सपोर्ट व मानवजातीसाठी लाभदायक "रेसीड्युफ्री" शेती करता येते.

झुलूक प्रो-बॅगची वैशिष्ट्ये :

१. फळांना सहजरित्या लावता व काढता येते.
२. मोठ्या फळाच्या  प्रो-बॅग लहान फळाला सुद्धा चालतात
उदा. द्राक्ष, आंब्यासाठीच्या प्रो-बॅग डाळिंब,पेरू,सीताफळाला तर टरबूजासाठीच्या प्रो-बॅग खरबूज, पपईला तसेच पपईसाठीच्या प्रो-बॅग केळी, टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी व इतर कोणत्याही झुडूप वर्गीय फळभाजीला वापरता येते. फळ पीकाला प्रो-लो टनेल म्हणून वापर करता येतो.
३. झुलूक प्रो-बॅग अनेक वर्षापर्यंत वारंवार वापरता येतात. नियोजन केल्यास एका वर्षात एक एकराच्या खर्चात चार एकराचे काम करूनसुध्दा आपण ह्या प्रो-बॅग पुढील ५ ते१२ वर्षापर्यंत वापरु शकतो. किंवा एक एकराच्या प्रो-बॅग्समध्ये ४८ एकरापर्यंतचे काम शक्य होते. त्यामळु प्रती एकराची प्रभावी किंमत कागदापेक्षादेखील   स्वस्त पडते.
४. प्रो बॅगची उपलब्धतता (मापे) :- १८ सेमी.(रुं) X १८ सेमी.(उं) / २२ सेमी.(रुं) X २२ सेमी.(उं) २२ सेमी.(रुं) X २८ सेमी.(उं) / २८ सेमी(उं) X ३५ सेमी.(उं) ७० सेमी.(रुं) X १२५ सेमी.(उं) / --
५. प्रो बॅगचे प्रकार :- AAI / BAAI / BAC हे तीन प्रकार आहेत.
Conservation Agriculture
प्रो-पॅनल (pro-Panel)

द्राक्षबागेच्या आच्छादनासाठी : झुलूक प्रो-पॅनल

      द्राक्षबागेच्या आच्छादनासाठी अत्यंत कमी खर्चात प्रभावी उपक्रम डिझाईन केलेले आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (NRCC मांजरी, पुणे) यांनी या संशोधनाच्या वापरांना दुजोरा दिला आहे

झुलूक प्रो पॅनलची ठळक वैशिष्ट्ये :

१) वातावरणातील बदल व पिकाच्या गरजेनुसार सोयीने गोळा करता तसेच पसरवता येते.
२) पॉलिहाऊस फिल्मच्या तुलनेत पाच पटीने मजबूत व दोन पट अधिक टिकावू आहे म्हणजेच ताशी १५० कि. मी वेगाचा वारा सहज सहन करते व किमान ८ वर्षे चालते. 

झुलूक प्रो पॅनल (टाईप एएए) : 
   
हे सुधारित वाय (Y) स्ट्रक्चरसाठी असून दोन गल्लीतील अंतर व दोन वाय मधील अंतर यांच्या मापानुसार हे पॅनल बनवले जातात व सुधारित वाय स्ट्रक्चरमधील तीन तारांवर सहजरीत्या सरकवता येतात

झुलूक प्रो पॅनल (टाईप एएए) : 
     
    पारंपारिक मांडव पद्धतीसाठी असून प्लॉटच्या माप व आकारानुसार मांडवाच्या बाहेर आधारस्तंभ उभे करून संपूर्ण प्लॉटवर आच्छादन केले जाते. आच्छादनाचा संपूर्ण किंवा काही भाग हवा तेवढा खोलता किंवा बंद करता येतो

झुलूक प्रो पॅनलच्या वापरामुळे होणारे फायदे :

१) बेमोसमी पाऊस, वादळ-वारा, गारपीट व दव यापासून द्राक्ष बागेच्या पोगा,फुलोरा, पाने इत्यादींना संरक्षण मिळते.
२) अर्ली (नॉन सीझनल) पीक घेता येते. 
३) एक्सपोर्ट व मानवासाठी अधिक लाभदायक "रेसिड्यू फ्री" द्राक्षशेती करता येते. 
४) शेंडे, पाने व मणी झपाट्याने व अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे पिकाला अधिक बळकटी मिळते व उत्पादनाचा टनेज वाढतो. 
५) फळाला अधिक व्हिगरनेस, ब्लुम (जोमदारपणा व टवटवीतपणा) येतो. 
६) डाऊनी व इतर कीटकनाशकांच्या फवारणीच्या खर्चात बचत होते. 
७) खरड छाटणीनंतर वापरल्यास एकसमान डोळे फुटतात व ओलांडे डेड होत नाहीत. 
८) फळावर सनबर्न (उकड्या) होत नाही. 
९) पाण्याची बचत होते.
    झुलूक प्रो पॅनलचा उपयोग द्राक्षबागेसाठी तसेच डाळिंब, पेरू, केळी व पॉलीहाऊस इ.च्या आच्छादनासाठी देखील करता येतो. प्रो-पॅनलच्या वापरासोबत रूटझोनमधील जादा पाणी बाहेर काढण्याचा सल्लादेखील देण्यात येतो.

Conservation Agriculture
प्रो-स्टोर (pro-store)

कांदा साठवण्यासाठी झुलूक प्रो-स्टोर

     झुलूक कॉर्पोरेशनच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मालिकेतील एक म्हणजेच कांदा साठवण्यासाठी तयार केलेले “ झुलूक प्रो-स्टोर ” हे आहे.

झुलूक प्रो-स्टोरची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

१)  हवा खेळती राहण्यासाठी सातही बाजूंनी व्यवस्था केलेली आहे.
२) ऊन व पावसापासून सरंक्षण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण झुलूक प्रो-पॅनलने केलेले आच्छादन होय.

Conservation Agriculture


३) कमीतकमी जागेत सहजरीत्या कांदा ठेवता व काढता येण्यासाठी असलेले दरवाजे आहेत.
४) हाताळण्यास सुलभ व वापर नसताना विभक्त करण्याची सुविधा आहे.
५) १.७५ ते २.२५ टन म्हणजेच साधारणपणे १ ट्रॅक्टर कांदा साठवण्याची क्षमता आहे.
६) मापे :- २ मि. (लांबी) X २ मि. (रुंदी) X २.५ मि.(उंची).
        झुलूक प्रो-स्टोर हवे असल्यास ज्यादा क्षमतेचे ऑर्डरप्रमाणे बनवुन दिले जाते. अशा प्रकारच्या संरक्षणात्मक शेतीतंत्राने  (Conservation Agriculture) शेती केल्यास नुकसान होणार नाही. अधिक माहितीसाठी info.Zuluc@gmail.com यावर संपर्क करावा.  

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


डिजीटल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा पुरवणारी "ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी""Brands Z on Web Company" providing diversified services in digital sector

डिजीटल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा पुरवणारी "ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी" 

"Brands Z on Web Company" providing diversified services in digital sector

उपक्रमशील उद्योजक : श्री. वैभव महाले

        नाशिकच्या कॉलेजरोड स्थित येवलेकर मळ्यातील ब्रँडस् झेड ऑन वेब ही कंपनी वेबसाईट डिझाईन, डेव्हलपमेन्ट आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी उच्चशिक्षित श्री.वैभव महाले यांनी २०१९ मध्ये स्थापन केली असून अल्पावधीत त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतली आहे. 


   ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी काय सेवा पुरवते या माझ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले की, ब्रँडस् झेड ऑन वेब  ही कंपनी वेबसाईट डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन, डेटा प्रोसेसिंग,डोमेन रजिस्ट्रेशन, वेब होस्टिंग,वेब अँप्लिकेशन, प्रॉडक्ट्स सबमिशन, ३६० डिग्री व्हरच्यूअल टूर, डिजिटल व्हिडिओग्राफी, प्रॉडक्ट्स फोटोग्राफी इ.अनेक सेवा पुरवते. आमच्या व्यवसायाच्या नावातच सर्व काही आहे. आम्ही इतरांच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करून देतो. ज्याने त्यांच्या व्यवसायाची माहिती संपूर्ण जगात पोहचू शकते. त्याद्वारे प्रत्येक व्यक्ती त्या सेवेचा किंवा प्रॉडक्ट्सचा उपयोग करू शकत असल्याचे श्री. वैभव महाले यांनी स्पष्ट केले. 

           श्री. वैभव महाले यांचे शिक्षण कॉम्पुटर सायन्समध्ये एम.एस्सी झाले असून त्यांनी प्रथम एका नामांकित आय. टी. कंपनीत काम केले. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर कामाची सुरुवात केली. तिथे आपल्या कौशल्याच्या जोरावर मॅनेजर या पदापर्यंत जाऊन पोहचले. त्यात खूप शिकायला मिळाले. नंतर स्वतः चा व्यवसाय करावा या इर्षेने  ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीची स्थापना केली. श्री. महाले साहेबांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पहिल्यापासून आवड होती. काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि आज तो ईश्वर कृपेने माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे यशस्वीरीत्या चालवला जात असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. डिजिटल मार्केटिंग क्षेत्र आव्हानात्मक असून येथे दररोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होते. या क्षेत्रात रोज नित्यनवीन बदल घडत असतात.काम करण्याची पद्धत व त्यामागील कल्पकता दाखवावी लागते.म्हणून त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीही कुशल,कल्पक आणि हुशार असल्याचे मला जाणवले. त्यांच्या या कामात त्यांच्या सुविद्य पत्नीचीही साथ लाभत आहे.


           सध्या डिजिटल मार्केटिंगच्या युगात ग्राफिक्स डिझाईनचे बेसिक ज्ञान प्रत्येक उद्योजकाने घेणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्मबाबत सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व  इतर अनेक गरचेची प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक उपयोग करणे आवश्यक असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. हे प्लॅटफॉर्म काय कार्य करतात? आपला बिझनेस वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग केला पाहिजे. त्यांच्या मदतीने आपण आपला बिझनेस वाढवू शकत असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. जसे कि ग्राफिक्स डिझाईनने आपण आपल्या व्यवसायाचे लोगो डिझाईन, पॅम्पलेट, ब्रोशर, इ.आपण करू शकतो. परिणामकारकरीत्या  आपण आपल्या प्रॉडक्टचे फोटो, माहिती देऊ शकतो. वेबसाइट डिझाईनमुळे आपण आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती लोकांना डिजिटल स्वरूपात देऊ शकतो. 

          आपण तयार केलेल्या वेबसाइटचे मार्केटिंग आपण "एस.इ.ओ" ( सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) या सेवेने करू शकतो. तसेच आजच्या युगात सोशल मीडियाला खूप महत्व प्राप्त झाले आहे, त्याच सोशल मीडियाच्या मदतीने आपण आपल्या व्यवसायाचा संपुर्ण जगात प्रचार आणि प्रसार करू शकतो. आपण आपल्या व्यवसायाची लेखी, व्हिडिओ तसेच चित्र स्वरूपातील जाहिरात इतर वेबसाइट किंवा आप्लिकेशन वर दाखवू शकतो. त्याद्वारे आपले प्रोमोशन करू शकतो. याला एस.इ.एम. (SEM) असे म्हटले जाते. आपण वेब अँप्लिकेशनद्वारे आपल्या व्यवसायास डिजिटल करू शकतो. आपला व्यवसाय विविध प्रकारच्या वस्तू विकण्यावर आधारीत असेल तर आपल्या वस्तू ऑनलाईन विकण्याकरता काही वेबसाईटस् आहेत. तिथे आपण आपल्या वस्तू संपूर्ण जगात विकू शकतो. त्याकरिता प्रॉडक्ट सबमिशन (Products submission) ही सेवा दिली जात असल्याचे श्री. वैभव महाले यांनी सांगितले. 

      आजच्या घडीला लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची वास्तू किंवा जागा कशी आहे. त्यात कशा सोयी सुविधा आहेत. हे दाखवण्याकरिता एक उपयुक्त व प्रभावशाली साधन म्हणजे ३६० डिग्री व्हरच्यूअल  टूर (३६० degree virtual tour) हे आहे. सोशल मीडियावर याचे उत्तम सादरीकरण केल्यास या द्वारे आपण आपला व्यवसाय वाढवू शकत असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाला आजच्या डिजिटल युगात कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. त्याद्वारे लोकांना जोडण्याचे साधन म्हणजे व्हिडीओ हे आहे. यातही खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. आज लोकांना सर्व काही वेगाने हवे आहे. जसे की एखादी सेवा देण्यासाठी आपण व्हिडीओग्राफीचा वापर करू शकतो. जे ग्राहकांना खूप कमी शब्दात आणि कमी वेळेत व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर पुरवत असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. अशा असंख्य डिजिटल सेवा आहेत.ज्याद्वारे ते प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय वाढवण्याकरिता मदत करतात. तसेच त्यांच्या ग्राहकांना हवे ते मिळवून देण्याकरिता मदत करत असतात. 

       श्री. वैभव महाले हे ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीव्दारे विविध क्षेत्रातल्या ग्राहकांना गरजेनुसार सेवा पुरवतात.वेबसाईट डिझाईन,डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन ह्या सेवेत तर त्यांचा हातखंडा आहे. अनेक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांना वेगवेगळ्या नामांकित इ.कॉमर्स वेबसाइटवर प्रॉडक्ट्स सबमिशन करून देतात.  शोरूम असेल त्या व्यावसायिकाला त्यांची नवीन सेवा ३६० डिग्री व्हरच्यूअल  टूर ही सेवा उपलब्ध करून देतात. ग्राहकाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये संपूर्ण शोरूम दिसते. सणासुदीच्या दिवसात किंवा काही विशेष प्रसंगी व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांना शुभेच्छा द्यायच्या असतात. व त्यांच्या व्यवसायाच्या विशेष सुवर्णसंधी सांगायच्या असतात त्यासाठी  ग्राफिक्स डिझाईन ही सेवा पुरवतात. यात आकर्षक बॅनर्स डिझाईन करून दिले जातात. जे सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व  इतर प्लॅटफॉर्मवर सादर केले जाते. जेणेकरून ग्राहकांना याबद्दल माहिती होते. विविध हॉस्पिटलला त्यांच्या वेबसाइटची डिजिटल मार्केटिंग करून देतात. त्यांनी दिलेल्या सेवेत सातत्य, कल्पकता असल्याचे त्यांच्या क्लायंटनी सांगितले आहे. 

          आजच्या एकविसाव्या शतकात सर्वाना आपला व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान आहे. आजच्या या गतिशील युगात सर्वांनाच पुढे जायची व आपला व्यवसाय वाढवण्याची एक चढाओढ लागली आहे. याकरिता पारंपारिक मार्केटिंग पद्धती अपुऱ्या व मर्यादित आहे. आपल्या ग्राहकापर्यंत पोहाचण्याकरिता या पद्धती पुरेश्या नाहीत. त्यामुळे आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रॅण्डिंग ही ग्राहकांपर्यंत पोहोचणारी एक अतिशय उपयुक्त व लाभदायक पद्धत आहे जिचा वापर असंख्य लोक त्यांच्या व्यवसायवाढीसाठी व ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सर्रास वापर करतांना दिसून येतात. ग्राफिक डिझाईन ही गरज प्रत्येक व्यावसायिकाला असते. लोगो,सिम्बॉल, प्रॉडक्ट माहितीसाठी नवनवीन रंगात डिझाईनमध्ये क्रिएटिव्हीटी प्रदान करण्याची गरज व्यावसायिकाला असते. वेबसाईटची गरज ही  आपल्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी असते आणि  डिजिटल मार्केटिंग हे आपल्या व्यवसायाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता एक उत्तम साधन आहे. याचा प्रत्येक उद्योजकाने यथायोग्य लाभ उठविणे गरजेचे असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. 

     श्री. वैभव महाले सरांना या डिजिटल सेवा देण्याबरोबरच शिकवण्याचीही आवड आहे. त्यासाठी ते क्लासेससुद्धा घेतात. त्यांच्याकडे डिझाईन आणि डेव्हलपमेन्ट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन, डेटा प्रोसेसिंग, वेब अँप्लिकेशन, डेटा सायन्स, नेटवर्किंग या विषयाचे क्लास घेतले जातात.  सध्या या सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात कंपनीत काम करण्यापासून ते उद्योजक होण्याची देखील संधी आहे. श्री. वैभव महाले सर्व तरुणांना आवाहन वजा विनंती करतात की डिजिटल माध्यमात काम करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुण तरुणींनी यावे. स्वयंरोजगाराची संधीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी www.brandzweb.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

 © दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com 

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...