💪पतीच्या निधनानंतर जिद्दीची नवी वाटचाल– शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणीA new walk of stubbornness after the death of her husband – Inspirational story of Shobha Gatkal
जीवनात काही प्रसंग असे येतात जे आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. पण त्याच प्रसंगातून काही जिद्दी माणसं नव्या उमेदीने उभी राहतात. लासलगावजवळील मातेरवाडी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील शोभा शरद गटकळ यांची कहाणी ही अशाच संघर्षातून घडलेली प्रेरणादायी गाथा आहे.
🌱 सुरुवात साधी पण संघर्षमय
शोभा यांचा जन्म कोलटेक गावात झाला. शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झाले. २००८ साली वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह शरद गटकळ यांच्याशी झाला. २०१५ मध्ये पतींना गंभीर फुफ्फुसाचा आजार झाला. घरात ऑक्सिजन सिलिंडरवरच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचवेळी घरकाम, शेती, वृद्ध सासू-सासरे आणि दोन मुलांची जबाबदारी शोभा यांच्यावर आली.
🌾 शून्यातून शेती शिकण्याचा प्रवास
शेतीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी हळूहळू प्रत्येक गोष्ट शिकली.औषधांची नावे न वाचता येत नसतानाही रंग व चिन्हांवरून औषधे ओळखायला शिकल्या. ट्रॅक्टर चालवायला शिकल्या. द्राक्ष बागेची छाटणी, फवारणी, पाणी व्यवस्थापन स्वतः करू लागल्या. प्रत्येक अडचण त्यांना नवं धडे देऊन गेली.
💔 आयुष्य बदललेला क्षण
२०२१ साली पतींचं निधन झालं. शोभा यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार हरपला. तरीही त्या खचल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर फक्त सातव्या दिवशी त्यांनी द्राक्षबागेची छाटणी केली आणि बाराव्या दिवशी पेस्ट लावली. त्यांचा आत्मविश्वास वाकवू शकणारा कोणताही प्रसंग उरला नाही.
📈 द्राक्ष निर्यातीत मिळवलेले यश
शोभा यांनी केवळ शेती टिकवून ठेवली नाही, तर तिला नवी उभारी दिली.
२०२२ – ८.४२ टन द्राक्ष → उत्पन्न ₹५.२२ लाख
२०२३ – १२.०५ टन द्राक्ष → उत्पन्न ₹७.०५ लाख
२०२४ – ७.४६ टन द्राक्ष → उत्पन्न ₹४.९९ लाख
२०२५ – ११.६३ टन द्राक्ष → उत्पन्न ₹९.१७ लाख
आज त्या सह्याद्री फार्म्सच्या शेअर्सधारक असून स्थानिक बाजारपेठेतही विक्री करतात.
👩👦 कुटुंब आणि समाजासाठी आदर्श
दोन मुलांचे शिक्षण व संगोपन त्यांनी सक्षमपणे केले. वृद्ध सासू-सासऱ्यांची जबाबदारीही पार पाडली. स्वतःच्या नियोजन व मेहनतीवर संपूर्ण कुटुंब उभं केलं.
✨ प्रेरणादायी संदेश
शोभा गटकळ यांची कहाणी शिकवते की – संकटं टाळता येत नाहीत, पण त्यांना सामोरं जाता येतं. स्त्री केवळ घर नाही, तर शेती व समाजही सक्षमपणे सांभाळू शकते. जिद्द आणि मेहनत असेल तर शिक्षण कमी असूनही यश नक्की मिळतं.
👉 शोभा गटकळ या खऱ्या अर्थाने आजच्या ग्रामीण भारतातील "जिद्दी महिला शेतकरी" आहेत. त्यांची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा