name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): जून 2025

पुस्तक परिचय : सर्वतीर्थ (Sarvatirtha)

पुस्तक परिचय 
Introduction to the book 
सर्वतीर्थ
 Sarvatirtha

Pustak parichay: sarvtirtha

'सर्वतीर्थ' हे पुस्तक नाशिक येथील हं.प्रा.ठा. महाविद्यालय व नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचे प्रदीर्घ नोकरीतून सेवानिवृत्त झालेले श्री. संभाजीराव दौलतराव निंबाळकर यांनी लिहिले आहे


  धार्मिक विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असतांना सुद्धा हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता का आहे याचे कारण सोप्या पध्दतीने किंवा कमी खर्चाने किंवा खर्च न करता, वेळ न दवडता परमेश्वराची अनुकूलता, परमेश्वराची कृपा प्राप्त करू शकतो. असे लेखक श्री. निंबाळकर यांना वाटते. ज्यांना पैसा व वेळेअभावी तीर्थयात्रा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी या पुस्तकात कमी खर्चात, कमी वेळेत किंवा खर्च न करता पर्याय दिले आहे. स्वतः लेखक श्री. निंबाळकर यांनी ही माहिती दक्षिण व उत्तर भारतातील व महाराष्ट्रातील तीर्थयात्रेतून मिळविलेली आहे. 


 'सर्वतीर्थ' या पुस्तकात 'मोक्षदायी' गणेशांची बारा नांवे, पृथ्वीतलावावरील 'गंगा' गोदावरी आणि 'तीर्थ' महात्म्य, गरिबांसाठी श्राध्दविधी, अस्थिविलयतीर्थ, येथे देवांची वस्ती, पितरांना स्वर्गवास व मोक्ष देणारे श्रीराम (कुंड) तीर्थ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महात्म्य - त्यासी नाही यमपुरी, श्रीभगवानविष्णू यांनी स्थापन केलेले 'श्रीकपालेश्वर मंदिर, ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ शिवलिंग 'तिळभांडेश्वर मंदिर, सर्वग्रहांवर सत्ता चालविणारे दहामुखी 'रुदाक्ष, चारी वेदांचे सार 'ॐ', लाख पिढ्यांचा उध्दार करणारी मोक्षदायीनी 'काशी', पृथ्वी प्रदक्षिणा, शिवलिंगात श्रेष्ठ नर्मदा शिवलिंग, ब्रह्महत्येचे पातक नाहिसे करणारी 'नर्मदा मैय्या', कोटीकन्यादानाचे फळ देणारा 'सूर्याचा महिमा, कोटी कल्पापर्यंत 'स्वर्ग' देणारी मैं तुलसी तेरी अंगण की, आवळ्याचे फळ, देई पुण्याचे फळं !, 'घंटानादाचे' आकाशाएवढे महत्त्व, पांचाळेश्वर येथील 'मुक्ती' देणारे आत्मतीर्थ, कोटी कोटी पापापासून मुक्त करणारा 'शिवनामाचा महिमा', आत्मज्ञान या विषयावरील माहितीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. 


  याबरोबरच सर्वतीर्थ पुस्तकात जणु ३३ कोटी देवतांची इंद्रपरीच 'उज्जैनी','गोवर्धन महात्म्य', श्रीकृष्णजन्मभूमी - मोक्षनगरी - मथुरा, 'राजेनिंबाळकर यांनी स्थापन केलेले श्रीकमलादेवी मंदिर', पुनर्जन्मी नाही - श्रीक्षेत्र तुळजापूर, सर्वतीर्थांचे पुण्यफळ देणारी शरयुनदी - अयोध्या, नंदीग्रामचा महिमा वर्णावा किती !, मोक्ष प्राप्तीसाठी केवळ 'हरेकृष्ण' मंत्र, चारी मुक्ती देणारी श्रीकृष्णाची 'मथुरा', संपूर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ 'श्रीमद्भगवत्गीता', संत एकनाथ भग्वतगीते बद्दल काय म्हणतात ?, कलीयुगातील समस्या, दोष नष्ट करणारा 'श्रीभागवत ग्रंथ', आयुष्याचे सोने करणारे तिरुपती बालाजी, कर्मकांडाची गरज नाही, घरातल्या घरात 'श्रीयंत्र' दर्शनाचा महिमा, घरपण देणारे 'आदर्श देवघर', मी कुरुक्षेत्री जाईन ! भगवद्गीता गाईन !!, मृत्युपुर्वी आपल्याकडे किती वेळ आहे ?, जेवतांना श्रीकृष्णांचे चिंतन केल्यास परमेश्वराची प्राप्ती, आयुष्यातील भांडवल अर्थात दैवी संपत्ती, तर अंतःकाळी भगवंतालाच प्राप्त होतो, हजारो यज्ञ केले तरी भक्ती नसेल तर.. व्रताची आवश्यकता नाही, पुण्याची गणना कोण करी-भू वैकुंठ पंढरपूर, आणखी काही सर्वतिर्थ, परमेश्वराला प्रार्थना या विषयावर लेखकाने माहिती संकलित करून लिहिली आहे. 


  या पुस्तकातील वैविध्यपूर्ण माहितीमुळे पुस्तक वाचनीय झालेले आहे. दीपयोग प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे.


Pustak parichay: sarvtirtha

सर्वतीर्थ

संकलन व लेखन : श्री. संभाजीराव दौलतराव निंबाळकर 

प्रकाशक : दीपक केदू अहिरे

प्रकाशन : दीपयोग प्रकाशन, पंचवटी, नाशिक-३

पृष्ठे : ६५, किंमत : ५० रुपये

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey)

बाजारपेठ सर्वेक्षण
Market Survey
तरुणांसाठी संधी, उद्योजकांसाठी फायदा
Opportunities for youth, benefits for entrepreneurs

Bajarpeth sarveykshan

आज हजारो तरुण-तरुणी नोकरीच्या पाठीमागे धावतात, नोकऱ्या मिळत नाही. आज उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ सर्वेक्षणाला (Market Survey) अतिशय महत्त्व आहे. या क्षेत्रात तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरुणांनी बाजारपेठेचे सर्वेक्षण करण्याची कला आत्मसात केली तर त्यांच्या दृष्टीने संधी होईल तर या सर्वेक्षणाचा उपयोग करून उत्पादनाचा खप वाढण्याचा मार्ग सापडल्यास उद्योजकांसाठी फायदा होईल. अशा या बाजारपेठ सर्वेक्षणाबद्दल माहितीचा ब्लॉग : 


बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey)नव्याने एखादे उत्पादन बाजारात आणायचे असेल तर त्यापूर्वी बाजाराच्या स्थितीचा सांगोपांग अभ्यास करावा लागतो. नव्याने येणाऱ्या उत्पादनाला बाजारात आधीपासून असलेली स्पर्धा, नव्याचा टिकाव लागण्याची शक्यता, जुन्या उत्पादनांची वैशिष्ट्ये व त्यातील त्रुटी त्यानुसार आपल्या उत्पादनात करायचे बदल व किंमत या गोष्टी बाजारपेठ सर्वेक्षणात येतात.

Bajarpeth sarveykshan

भारतात शहरी व ग्रामीण अशा दोन बाजारपेठा आहेत. त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. बाजारपेठेच्या दुनियेत घडणारे बदल सर्वेक्षण केल्याशिवाय समजू शकत नाहीत. भारतीय जाहिरातीत बाजारपेठ संशोधनाचा (Market Survey)अभाव आहे. केवळ एकांगी जाहिरात सफल होऊ शकत नाही. 


जाहिरातींच्या यशस्वीतेसाठी बाजारपेठ संशोधन करणे महत्त्वाचे आहे. एखादी वस्तू बाजारात सर्व प्रकारची काळजी घेऊनही टिकू शकत नसेल तर 'बाजारपेठ सर्वेक्षण' (Market Survey) तिच्या मदतीला येते. ते बाजाराचा सर्वांगीण मागोवा घेऊन या अपयशाची कारणे शोधून काढते. आजची पत्रकारिता ही बाजारपेठप्रधान पत्रकारिता बनली आहे. आधुनिक जाहिरात बाजारपेठ संशोधन (Market Survey)आणि वृत्तपत्राचे स्वरूप एक नवा प्रवाह पुढे येत आहे. संपादकापेक्षाही भारतात आता व्यवस्थापन व विक्री तज्ज्ञास अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.


बाजारपेठ सर्वेक्षणाचं (Market Survey)उदाहरण घ्यायचं ठरलं तर 'एनर्जी' या नावाने लोकप्रिय असलेलं पेय खूप पूर्वी 'आरे दूध' या नावाने ओळखलं जायचं पण त्याला त्यावेळी फारसा उठाव नव्हता. सर्वेक्षणाअंती लक्षात आलं की, या पेयाचं नाव अत्यंत गद्य असून ते ग्राहकांना फारसं आकर्षित करत नाही. इतर अनेक सूचनांबरोबर या उत्पादनाचं नाव बदलावं अशी सूचनाही केली गेली. काही नावंही सुचविली गेली त्यात 'एनर्जी' हे एक नाव होतं. नवीन स्वरूपात नवं नाव धारण करून या दुधाच्या, बाटल्या बाजारात आल्या. त्याने नंतर किती मार्केट जिंकल हे तर माहीतच आहे. हे सर्व ग्राहकांच्या आवडीनुसार जाहिराती बनवल्या गेल्या, सर्वेक्षण केले गेले, त्यामुळे हे शक्य झालं.

Bajarpeth sarveykshan

आपल्याकडे फार पूर्वापार म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लोक जाहिरातीशी संबंधित आहेत. राजे-महाराजांच्या काळापासून जाहिरातींची प्रथा आपल्याकडे होतीच. आता जाहिरातींपेक्षा प्रसार माध्यमांतील जाहिरातीना अधिक महत्त्व आले. रेडिओ, टी.व्ही. आणि नंतर खाजगी वाहिन्या (सॅटेलाईट मिडिया) ते अलीकडे थेट इंटरनेटवरसुद्धा आपल्या उत्पादनाच्या जाहिराती झळकताना दिसतात. बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey)जाहिरात तयार करणं यात येत नाही पण; त्यासाठी आवश्यक सूचना मार्केट रिसर्चमधून मागवल्या जातात. 


जाहिरातीत मांडलेली एखादी गोष्ट लोकांपर्यंत नीट पोहचत का नाही? त्यात काय अडचणी येतात ? संभाव्य ग्राहकांना कशा प्रकारची जाहिरात 'अपील' होईल या गोष्टी मार्केट रिसर्चमध्ये (Market Survey) येतात. जाहिरातीच्या मजकुरामध्ये आकर्षक मथळ्याचं महत्त्व वाढलं. काही नव्या शब्दप्रयोगांची कल्पक निर्मितीही होऊ लागली. मिनर्व्ह मुव्हीटोनचे प्रसिद्धी प्रमुख अनंत हरी गद्रे हे कल्पक शब्द प्रयोगाचे आद्यप्रणेते 'हाऊस फुल्ल' हा अत्यंत समर्पक शब्द पद्धतशीरपणे त्यांनी प्रचारात आणला आणि अजरामर केला. आजही तो तितकाच लोकप्रिय आहे.


'जाहिरात' हे आजच्या बाजाराचे मुख्य लक्षण असून त्याच्या विविध अंगासाठी बाजार सर्वेक्षणाची (Market Survey) आवश्यकता आहे. जाहिरात कशी आहे, तिने ग्राहकांना किती आकर्षून घेतले हे तर झाले; पण काही वेळा जाहिरातीतून दिलेला 'मेसेज' अत्यंत चुकीच्या पद्धतीने नकळतपणे ग्राहकांपर्यंत पोहचत असेल तर असे सर्वेक्षण वेळीच उत्पादकाला सावध करते. त्यामुळे संभाव्य नुकसान टळते, अशी उदाहरणेही घडलेली आहेत.


बाजाराचे असे सांगोपांग सर्वेक्षण करणे, शेकडो लोकांना 'प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्या मुलाखती घेणे, समूह-चर्चा आयोजित करणे व त्यापासून नेमका निष्कर्ष तयार करणे यासाठी हुशार, कल्पक व मेहनती व्यक्तींची गरज असते. तरुण-तरुणी हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांच्या सळसळत्या, उत्साही, तरुण वयामुळे त्यांना बाजारात सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळू शकतो. तरुणांसाठी बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey) आव्हानात्मक क्षितीज खुले झाले आहे. 'करियर' म्हणून तरुणांनी त्याचा जरूर विचार करावा.


आजकाल दूरदर्शनवरून सर्वजण 'एक्झिट पोल' पाहतात. निवडणुकांच्या निकालासंदर्भात केलेले सर्वेक्षण असते. पाच वाजता मतदान संपलं की पाच मिनिटांतच त्यांचे अंदाज बाहेर येऊ लागतात. ते जवळजवळ तंतोतंत बरोबर ठरतात. ही कल्पक सर्वेक्षणाची फलश्रुती असते. मत देऊन बाहेर आलेल्या माणसाला 'मत कुणाला दिलं?' असा प्रश्न विचारून हे अंदाज तयार केलेले असतात. अर्थात मतदान करून बाहेर येणाऱ्या माणसाला असा थेट प्रश्न विचारल्यास तो नीट किंवा खरं उत्तर देईलच याची खात्री नसते, हे कुणीही सांगेल इथे 'फिल्ड वर्क' करणाऱ्यांची खरी कसोटी असते. तो थेट प्रश्न न विचारता खुबीने समोरच्या माणसाकडून ते उत्तर काढून घेतो. बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey) हेच महत्त्वाचे आहे.


वर्तमानपत्रातही मार्केट रिसर्च केला जातो. आपल्या वाचकांना काय लागतं, जाहिराती का कमी झाल्या? वर्तमानपत्राचा खप कसा वाढेल? या सर्व अंगाने वर्तमानपत्रात बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey) केले जाते. उदा. सकाळ वृत्तपत्राने उत्तर महाराष्ट्र आवृत्तीसाठी बाजारपेठ सर्वेक्षण केले, वाचकांची मते समजावून घेतली. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात बदल करून वाचकांचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात घेतला. आज सकाळ आपले स्थान टिकवून आहे.


बाजारपेठ सर्वेक्षणाला (Market Survey) मुक्त आर्थिक धोरण व अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा आपल्या देशात झालेला प्रवेश यामुळे अधिक महत्त्व आले आहे. उद्याच्या बाजाराला, नव्या उत्पादनाला व तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी हे क्षेत्र अधिकाधिक विस्तारीत बनवावे लागेल. हुशार, मेहनती तरुणांनी या क्षेत्रात प्रवेश करायला काहीच हरकत नाही. मराठी तरुणांकडे खरं तर या दोन्ही गोष्टी असतात, पण कारकुनीच्या सुरक्षित मध्यमवर्गीय विचारांचा पगडा त्यांच्यावर इतका असतो की या क्षेत्रात मराठी तरुण फारसे दिसत नाहीत.


पाश्चात्त्य देशांपेक्षा आपल्याकडे मार्केट रिसर्चचं (Market Survey) काम सामाजिक स्थितीमुळे वेगळ्या प्रकारे चालते. तिकडे असं कुणाला घरी किंवा ऑफिसात भेटणं योग्य मानत नाहीत. बऱ्याचशा मुलाखती किंवा समूह-चर्चाही फोनवरूनच चालतात; पण आपल्याकडे मात्र व्यक्तीशः भेटण्यामुळे हे काम अधिक नेमके होऊ शकते. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात त्याला वेगळे महत्त्वही आहे. त्यामुळे हे क्षेत्र विस्तारले आहे. या क्षेत्रात तरुण मंडळी असल्यास सर्वेक्षणाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.


मार्केट रिसर्चचं (Market Survey)अर्ध वेळ काम करून आपलं उच्च शिक्षण पूर्ण करणारेही तरुण दिसतात. एखादा प्रोजेक्ट किंवा समस्या घेऊन तेवढ्यापुरतं सर्वेक्षणाचं काम सुटीत करणारे व उरलेल्या काळात कॉलेजचे शिक्षण घेणारे तरुण-तरुणीही आहेत. विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची वा तांत्रिक कौशल्याची याला तितकीशी गरज नसते. मात्र, संभाषण कला जरूर लागते, इंग्रजीवर प्रभूत्व लागतं. स्थानिक भाषा, बोली भाषा याचं ज्ञान व मुख्य म्हणजे मेहनतीची तयारी असावी लागते. 


साधारणतः अर्धवेळ हे काम करणाऱ्या म्हणजे शिकत असताना ३ ते ४ तास रोज हे काम करणाऱ्या तरुणांनी, महिन्याला सरासरी पाच-दहा हजार रुपये मिळवत असल्याची माहिती आहे. शिवाय या कामातून मिळणारा आनंद, अनुभवाचे संचित व उज्ज्वल भविष्य आहे. ग्राहक राजाचे मन या सर्वेक्षणातूनच कळू शकते. अशा प्रकारे मार्केट रिसर्च (Market Survey) हे क्षेत्र तरुणांसाठी नवे क्षितीज आहे. त्याचा सुयोग्य वापर करून, बाजारपेठांचा अभ्यास करून आपले उत्पादन विकू शकता. ही सुवर्ण संधी आहे याचा तरुणांनी उपयोग करून घ्यावा.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सटाणा येथे रेसिड्यू फ्री कांद्याचे यशस्वी उत्पादन – श्री. मधुकर मोरे यांची किमया | Residue Free Onion Farming in Satana

🟩 सटाणा येथे रेसिड्यू फ्री कांद्याचे यशस्वी उत्पादन – श्री. मधुकर मोरे यांनी साधली किमया

Satana yethe residue free kandyache utpadan

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर मोरे यांनी तब्बल ३ हजार क्विंटल रेसिड्यू फ्री (Residue Free) कांद्याचे उत्पादन घेऊन एक अनोखी किमया साधली आहे.
    सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कांदा युरोपियन स्टँडर्डमध्ये उत्तीर्ण झाला असून आता युरोपियन देशांमध्ये एक्सपोर्ट होणार आहे.


🌾 कांदा उत्पादकांसाठी आव्हानात्मक काळात मोठे यश

    सध्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव, पावसामुळे होणारे नुकसान आणि वाढती उत्पादन खर्च यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत.
    अशा परिस्थितीत श्री. मोरे यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने रब्बी कांदा उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे.


🌱 सेंद्रिय पद्धतीने कांदा उत्पादन – दोन वर्षांची यशस्वी वाटचाल

    श्री. मोरे गेल्या दोन वर्षांपासून पूर्णतः सेंद्रिय कांदा लागवड करत आहेत.
    त्यांनी ३० एकरांवर रब्बी कांद्याची लागवड केली होती.

वापरलेली सेंद्रिय साधने:

  • शेणखत

  • निंबोळी अर्क

  • मळी

  • सेंद्रिय/जैविक बुरशीनाशके

  • सेंद्रिय कीटकनाशके

यामुळे त्यांच्या कांद्याची:
✔ साईज
✔ क्वालिटी
✔ रंग
✔ चव
सर्वच उत्तम दिसून आली.


📈 कांदा उत्पादन – १२० ते १३๐ क्विंटल प्रती एकर

Satana yethe residue free kandyache utpadan

काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने ५ एकरवरील नुकसान झाले असले तरी बाकीच्या २० एकरांवर मोरे यांनी उत्कृष्ट उत्पादन मिळवले.

👉 एकरी उत्पादन : 120–130 क्विंटल
👉 एकूण उत्पादन : ३,००० क्विंटल

हे उत्पादन महाराष्ट्रातील रेसिड्यू फ्री पद्धतीतील मोठे उदाहरण ठरते.


🧪 युरोपियन स्टँडर्डमध्ये मोरे यांचा कांदा पास – BLQ रिपोर्ट मिळाला

satana yethe residue free kandyache yashaswi utpadan

हा कांदा मे महिन्यात BLC / BLQ चाचणीसाठी पाठवण्यात आला होता.
लॅब रिपोर्टनुसार हा कांदा:

✔ रेसिड्यू फ्री
✔ युरोपियन क्वालिटी
✔ एक्सपोर्ट-ग्रेड

या सर्व मापदंडांमध्ये पूर्णतः पास झाला आहे.

आता हा कांदा युरोपियन देशांना निर्यात केला जाणार आहे—जे कोणत्याही शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक यशापेक्षा कमी नाही.


💬 श्री. मोरे यांचे अनुभव

शेतकरी मधुकर मोरे सांगतात:

“मागील वर्षी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा एकत्रित वापर केला होता. उत्पादन वाढले, पण क्वालिटी मिळाली नाही.
यंदा पूर्ण सेंद्रिय पद्धत अवलंबली, क्वालिटी उत्कृष्ट आली. कांदा दोन महिने चाळीत ठेवला तरी खराब झाला नाही.”

त्यांचा कांदा:

✔ आकाराने मोठा
✔ चवीला उत्तम
✔ टिकाऊ
✔ झिरो रेसिड्यू

असा झाला आहे.


🏭 एक्सपोर्टसाठी विशेष तयारी

Satana yethe residue free kandyache utpadan

  • चाळीची योग्य वेंटिलेशन

  • तापमान नियंत्रण

  • ओलावा नियंत्रण

  • क्वालिटी चेक

  • साठवण तंत्रज्ञान

यामुळे कांदा दोन महिने जरी साठवला तरी “पट्टी न सोडता” तसाच टिकून राहिला.


👨‍🏫 मार्गदर्शन लाभलेल्या संस्था व मार्गदर्शक

Satana yethe residue free kandyache utpadan

या यशामागे श्री. मोरे यांना मिळालेले मार्गदर्शन:

  • डॉ. प्रफुल्ल गाडगे सर (Biomi Director)

  • भारत सर व संपूर्ण बायोमी टीम (अहिल्यानगर)

  • मे. वाय. जी. मोरे टीम, सटाणा

त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे रेसिड्यू फ्री उत्पादनाची गुणवत्ता अधिक सुधारली.


निष्कर्ष – सेंद्रिय व रेसिड्यू फ्री कांद्याचे आदर्श उदाहरण

मोरे यांचे हे यश रेसिड्यू फ्री शेतीच्या दिशेने:

✔ प्रेरणादायी
✔ शाश्वत
✔ एक्सपोर्ट-ग्रेड
✔ उच्च-गुणवत्तेचे

असे उत्तम उदाहरण आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी  हे  मोठे  प्रेरणास्थान  आहे. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

*****************************************

भूमिगत वापसा सिंचन पद्धती ( Underground irrigation system)

पाण्याची बचत
saving water
भूमिगत वापसा 
सिंचन पद्धती
Underground irrigation system

Bhumigat vapsa sinchan padhati

  शेतीमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून आपण जमिनीवरून पाणी देण्याची पद्धत वापरीत आहोत. या पद्धतीमुळे पाण्याचा गैरवापर होतोच परंतु यामुळे जमिनीचा सामु (पी.एच.) वाहून गेलेला आहे. तसेच जमिनीची उत्पादनक्षमता फारच खालावलेली आहे. वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाण्याची बचत व जमिनीची धूप थांबविण्यासाठी भूमिगत वापसा सिंचन पद्धती विकसित करण्यात आली अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंचन पद्धतीविषयी ब्लॉग...


Bhumigat vapsa sinchan padhati

   भूमिगत वापसा सिंचन पद्धती ही एक पिकास पाणी देण्याची आधुनिक पद्धत असून यामध्ये अमेरिकेहून आयात केलेला चक्रित रबर व पॉलिथिलिन मिश्रित केशवाहिनी निर्माण केलेला पोरस पाईप जमिनीमध्ये साधारण ६ ते ९ इंच खोलवर जमिनीचा प्रकार व पिकानुसार टाकलेला असतो. हा पाईप सर्वत्र जमिनीच्या दाबामुळे एकसारखा पाझरतो व जमीन गरजेनुसार यामधून केशवाहिन्यांद्वारे पाणी शोषण करीत राहते. म्हणून जमिनीत कायम वापसा राहतो. 


     या पद्धतीचा वापर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, झेंडू, टोमॅटो, मिरची या पिकांसाठी व गुजरातमध्ये उस या पिकासाठी केलेला असून यापासून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळालेला आहे. या पद्धतीमध्ये पाण्याची जवळ जवळ ५० ते ७० टक्के बचत होत आहेच. तसेच विजेची व वेळेचीसुद्धा बचत होते. सध्याच्या परिस्थितीत पाण्याची नैसर्गिक कमतरता, भरमसाट वाढलेल्या खतांच्या व औषधांच्या किमती यामुळे कृषी क्षेत्रामध्ये खर्च व नफा यांचे गणित बसणे फारच अवघड झालेले आहे. यासाठी वरील साधनांमध्ये बचत होणे ही काळाची गरज आहे व हे भूमिगत वापसा सिंचन पद्धतीने आता भारतातसुद्धा शक्य झाले आहे.


भूमिगत वापसा सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये 

   

   ही आधुनिक पद्धती अती कमी दाब (प्रेशर) म्हणजे ०.१ किलो दाब व सावकाश पाण्याचा प्रवाह यावरती चालते. अति संथ प्रवाहाने पाणी प्रत्यक्ष मुळांना जमिनीच्या शोषण क्षमतेनुसार मिळते. म्हणून पाणी वाहून जात नाही. या पद्धतीला अर्धा किलो प्रेशरपेक्षा जास्त आवश्यकता नाही.


    या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष मुळांना पोरस पाईपद्वारा पाणी, हवा व खते पिकांच्या गरजेनुसार दिली जातात. पाणी जमिनीवर आपटत नसल्यामुळे जमिनीमधील क्षार पृष्ठभागावर येऊन सूर्यप्रकाशामुळे जास्त कडक होत नाही. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व मुळांची झपाट्याने वाढ होते तसेच खतांचे बाष्पीभवन होत नाही व वाहून जात नसल्यामुळे बचत होते.


    जमिनीच्या पृष्ठभागांवर पाणी साठत नसल्यामुळे जवळ जवळ ८५ टक्के तणांचा बंदोबस्त होतो व पर्यायाने रोग व किडीचे नियंत्रण होते. कीटकनाशके व बुरशीनाशकावरील ५० टक्क्यांपर्यंत खर्च कमी होतो.


Bhumigat vapsa sinchan padhati

पाणी, खते व विजेची बचत 


   या भूमिगत वापसा पद्धतीत पाण्याचा ओलावा जमिनीच्या आत असल्याने हवा व प्रकाशाने पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व संथ गतीमुळे पाणी वाहूनही जात नाही. पर्यायाने इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ७० टक्के पाण्याची बचत होते. या पद्धतीमध्ये सबमेनची गरज नसते. एकाच कॉकद्वारा जास्तीत जास्त क्षेत्र कमीत कमी वेळेत ओलिताखाली घेता येते. खते व पाणी पाईपमधूनच देता येते. त्यामुळे विजेची व वेळेची बचत होते.


  मायक्रोपोरस पाईपद्वारा जमिनीतून सिंचन होत असल्याने प्रत्यक्ष पाणी जमिनीवर साठत नाही. पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीमधील खते, मूलद्रव्ये पिकांच्या मुळांजवळ टिकून राहतात. पर्यायाने जमिनीची धूप थांबते. जमिनीचा पोत व दर्जा वाढतो. त्यामुळे जमीन वर्षानुवर्षे चांगले उत्पन्न देऊ शकते. 


  जमिनीत मुळांजवळ योग्य वापसा असल्यामुळे आगंतुक (पांढऱ्या) मुळांची जाळे विकसित होऊन झाडांची जोमदार सशक्त वाढ होते व पर्यायाने उत्पन्नात वाढ होते. 


   अन्य सिंचन पद्धतीचे पाईप जमिनीवर असल्यामुळे सिस्टिम (संच) बंद केल्यावर थोडे पाणी पाईपमध्ये शिल्लक राहते. या पाण्याचे सूर्यप्रकाशाने बाष्पीभवन होत असल्यामुळे क्षार जमा होतात. त्याने सिंचन पद्धती चोकअप होते. परंतु या पद्धतीत पोरस पाईप जमिनीत असल्यामुळे सूर्यप्रकाशाशी पाईपचा प्रत्यक्ष संपर्क न आल्यामुळे व तसेच संच बंद केल्यामुळेसुद्धा पाईपमधले पाणी जमीन शोषून घेते. (कॅपिलरी अॅक्शन) त्यामुळे पाईप खाली होतो व पाणी आत राहत नाही. यामुळे पाईप क्षारांनी चोकअप होत नाही.


वीज नसतानासुद्धा सिंचन कार्य होते :


  ही आधुनिक सिंचन पद्धती कमीत कमी दाबावर चालत असल्यामुळे सर्वसाधारण दहा फूट उंचीवर पाण्याची टाकी भरली असताना व वीज नसतानासुद्धा फक्त कॉक चालू केला तरी शेतीच्या विस्तृत क्षेत्रात सिंचनाचे कार्य सहज होऊ शकते. 


   या सिंचन पाईपच्या बाजूला सतत ओलावा असल्यामुळे उंदीर पाईपजवळ जाऊ शकत नाही. उंदराचे दात कायम वाढतात त्यामुळे स्वतःचे दात घासण्यासाठी पी.व्ही.सी. व इतर वस्तूंना उंदीर कुरतडत असतात. परंतु हा पाईप लवचिक असल्यामुळे उंदराचे दात यात रुततात व तो कुरतडू शकत नाही. त्यामुळे उंदरापासून नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. या पद्धतीत जमिनीच्या आत मुळांजवळ पाणी नेहमी येत नसल्यामुळे झाड निश्चित होऊन झपाटून वाढते. जमिनीत कायम वापसा असल्यामुळे गांडूळ व इतर रासायनिक खतांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. परिणाम अधिकतम उत्पन्न मिळते. हेच या वापसा सिंचन पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


Bhumigat vapsa sinchan padhati

दीर्घ आयुष्य व कमी देखरेख 

   

  या पद्धतीत वापरला जाणारा पोरसपाईप व चक्रित रबर थर्मोप्लास्टिकद्वारा निर्मित होत असल्यामुळे याला दीर्घ आयुष्य आहे व त्याचप्रमाणे जमिनीत असल्याने कोणत्याही प्रकारची डागडुजी देखरेख व सांभाळ खर्च व धोका नाही. पाणी व मजुरांच्या गैरवापराने व सांभाळामुळे होणारे नुकसान टळते.


   पाईपजवळ नेहमी ओलावा असल्याने व पाईपमधील पाणी जमीन शोषून घेत असल्यामुळे पाईप नेहमी रिकामा असतो. पाईपला अतिसूक्ष्म केशवाहिनी असल्यामुळे मुळांना आत जाणे शक्य व आवश्यक नाही. इतर प्रचलित पद्धती जमिनीवर असल्यामुळे ऊस पिकामध्ये उंदीर, कोल्हे व अन्य जंगली प्राणी पाईप कुरतडतात. तसेच देखभाल करण्यासाठी अडचणीचे आहे परंतु या पद्धतीसाठी वापरलेले पोरस पाईप जमिनीमध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारची देखभाल करावी लागत नाही. उंदीर व जंगली प्राण्यांपासून पाईपला नुकसान होत नाही. पिकास हमखास कमीत कमी पाणी असतानासुद्धा जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली विकसित होऊ शकते. 

 

    नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव मांडवडे, आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर आण्णा कापडणीस या शेतकरीबंधूंनी डाळिंब बागेसाठी या आधुनिक भूमिगत वापसा सिंचन पद्धतीचा उपयोग केला आहे. या वापसा सिंचन पद्धतीच्या अधिक माहितीसाठी अॅप्रोटेक, नॅशनल प्लाझा, रेल्वे स्टेशनसमोर, सुरत नाशिक कार्यालय - अॅप्रोटेक, फ्लॅट नं. ३, पटेल आर्केड, मार्केट यार्डसमोर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक-३. या पत्त्यावर संपर्क साधावा.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

पुस्तक परिचय - शेतकऱ्यांच्या समस्या : शोध आणि बोध (Book Introduction-Farmers' problems: research and lessons learned)


पुस्तक परिचय 
Book Introduction
शेतकऱ्यांच्या समस्या : शोध आणि बोध
Farmers' problems: research and lessons learned

Pustak parichay - shetkaryanchya samasya: shodh aani bodh

 शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारं, एका शेतक-यानं लिहिलेलं एक दर्जेदार पुस्तक "शेतकऱ्यांच्या समस्या: शोध आणि बोध" हे पुस्तक प्रकाशित झाले असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका, भोयेगांव येथील प्रगतशील शेतकरी शिवनाथ बोरसे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 


   या पुस्तकात पाच भाग केलेले असून विभागवार प्रश्नांची उकल करण्यात आली आहे. पहिल्या विभागात भारतीय अर्थव्यवस्था- दिशा आणि दशा यावर प्रकाश टाकला आहे त्यात भारत उदय! कोसळणारा भारत, शेतकरी जिवाला का वैतागला? सरकारची उपाययोजना- कर्जाचे वरदान, महागाई निर्देशांकाचे परीणाम, अर्थसंकल्पीय तरतुद एक भ्रम, समस्यांच्या विळख्यात, लोकशाही आणि शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि शेतकरी, कृषी पतपुरवठा धोरण, संगणक आणि आय.टी. क्रांती आदी विषयांची खुलासेवार मांडणी करण्यात आली आहे.


  पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात शेती का परवडत नाही? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न श्री. बोरसे यांनी केला आहे. ते स्वत: शेतकरी असल्यामुळे शेतीच्या प्रश्नांची योग्य जाण या पुस्तकात ठायी ठायी आढळते. यात त्यांनी शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन, मागणी पुरवठ्यांचे गणित, निसर्गाचा अनियमितपणा, रासायनिक खतांचे दुष्परीणाम, पिकसंरक्षक फवारण्या डिझेल दरवाढ, अनियमित वीजपुरवठा, बाजारभावाची अनिश्चितता, निर्यातीवरील अनावश्यक बंधने, आयातीला खुली परवानगी, शेतीविषयक राष्ट्रीय धोरणांचा अभाव, शिक्षणाची वाटचाल बेरोजगारीकडे, परावलंबन, नियोजनाचा अभाव, फसवणूक, वाढलेले कौटुंबिक खर्च, वाढलेले उत्पादन खर्च, शेतीकाठी साहित्याचे अनियंत्रित दर, गावपातळीवर असलेले राजकारण, शेतीमालाचे मार्केटींग, शेती कर्जाचे व्याज आणि इतर खर्च, व्हॅट करार-नवा सापळा, पीक विमा- शुध्द फसवणूक, शेतकरी कोठे चुकतो? बेजबाबदार ग्राहक चळवळी या उपविषयांचा अंतर्भाव चांगल्या प्रकारे हाताळला आहे.

       

     राष्ट्रीय कृषी धोरणाची पार्श्वभुमीही लेखकाने विषद केली आहे. त्यात कृषीप्रधान अर्थव्यवस्था, कृषीप्रधान निती कशी असावी? क्रियाशक्तीत वाढ झाली पाहीजे, कापड उद्योगनिती, कृषीमालाची निर्यात, शेतीपुरक दुग्धव्यवसाय सरकारी पातळीवरून इतर काही उपाय, गावचे राजकारण, आदी प्रासंगिक मुद्यांचा समावेश केला आहे. 


Pustak parichay - shetkaryanchya samasya : shodh aani bodh


     लेखकाने शेतक-यांच्या आणि शेतीच्या समस्यांचा नुसता उहापोह केला नसुन त्यावरचे समाधानकारक उत्तरही मिळवून दिले आहे. याचा प्रत्यय पुस्तक वाचतांना येतो. यात देशातील ७० कोटी जनतेची कैफियत मांडली आहे. सारस्वतांच्या लेखण्या या कामांसाठी झिजत नाही ही खंतही लेखकाने मनोगतात मांडली आहे. ते पुढे म्हणतात की, कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्यामुळे २० कोटी जनतेची क्रयशक्ती कमी झाली आहे त्यामुळे रोजगार, उद्योग, व्यवसायवृध्दीच्या संधी गोठल्या आहेत. याचा विचार जे लोक करीत नाहीत त्यांना मी बुध्दीवादी विचारवंत, अर्थतज्ज नाहीत असे म्हणेन असं त्यांनी नमूद केले आहे. 

    

     पुस्तकाच्या चौथ्या भागात निसर्गासारखेच जगा- एक संदेश या मुख्य शिर्षकातंर्गत आपणच आपले वैरी, उद्योगी बना, उठा आणि तयार व्हा, हिशेब करा आणि निर्णय घ्या, उत्पादन खर्च कमी करा, कर्जाबाबत निर्णय घ्या. गरजा निश्चित करा, पर्यायांचा विचार करा, तुझे आहे तुजपाशी, अत्याधुनिक शेतीच्या दिशेने, गाय, गवत, आणि गांडूळ नियोजन करा, शेतीचे नियोजन, पिकाचा फेरपालट करा, पाण्याचे नियोजन करा, खताचे नियोजन, पिक संरक्षणाचे नियोजन, श्रमाचे नियोजन, बडेजाव टाळा, आरोग्य, गावपंचायत स्थापन करा. शेतीला जोडधंदा सुरू करा आदी विषयांवर विस्तृतपणे मुद्देसूद विवेचन केलेले आहे.


      पुस्तकाच्या शेवटी लेखकाने धांडोळा लिहिला असुन त्यात त्यांनी म्हटले आहे की, कृषीक्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की, आम्ही पारंपारिक शेतीला आधुनिक सुधारीत शेतीचे रुप दिले, काय मिळाले? बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि बहुमोली आरोग्यधाम- इस्पितळे!  पुन्हा एकदा जागतिक पातळीवर शेतीचा प्रवास सेंद्रिय शेतीच्या दिशेने निघाला आहे. आमच्या पूर्वजांच्या पारंपारीक कृषी तंत्रांचा आणि परंपरांचा धांडोळा नवे शोध? हे सर्व पाहता सुरुवात कोठून केली आणि पहा पोहचलो कोठे! 


         मराठीत एक म्हण आहे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाण्याने भरलेली कळशी तर काखेत आहे पण भ्रम निर्माण झाला म्हणून आम्ही ती जगभर शोधीत आहोत. पुन्हा आपण सेंद्रिय शेतीकडे वळल्याचा दाखलाही लेखकाने दिला आहे अशी वास्तवता लेखकाने वेळोवेळी दाखवून दिली आहे. १५२ पानी असलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना नवयुग या नावाने विनायकदादा पाटील यांनी लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, शिवनाथासारखे पेरणारे लिहिणारे झाले हे कृषीक्षेत्रातील नवयुग आहे. 

     

    मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांचे अवलोकनही या पुस्तकाला लाभले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ साधे परंतु आशयगर्भ आहे. नाशिकच्या वसुधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून एका शेतकऱ्याचे पुस्तक आपण जरूर वाचले पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे. 


शेतकऱ्यांच्या समस्याः शोध आणि बोध

लेखक: शिवनाथ बोरसे 

वसुधा प्रकाशन नाशिक 

:: प्रकाशक ::

सौ. कल्पना वि. गायकवाड 

द्वारा प्रसाद बुक स्टॉल,

मातृप्रेम, गुरांच्या दवाखान्याची गल्ली, 

अशोकस्तंभ, नाशिक-२

पानेः १५२, मूल्यः १००


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

संस्था परिचय : ग्रामीण विकासासाठी झटणारी आरती (Aarti striving for rural development)


संस्था परिचय
Organization Introduction
ग्रामीण विकासासाठी झटणारी आरती
Aarti striving for rural development

Sanstha parichay: gramin Vikassathi zatnari arti

पारंपरिक, वडिलोपार्जित उद्योगधंद्यांचा विकास करणे, नवीन उद्योगधंदे वाढविणे आणि नोकरीच्या सुविधा उपलब्ध करून देणे या परोपकारी तत्त्वावर 'आरती' अॅप्रोप्रिएट रुरल टेक्रॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. अशा या संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी.


आरती संस्थेची स्थापना :

   भारतातील ग्रामीण भागांचा, ग्रामस्थांचा विकास करण्यासाठी, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व जीवनशैलीचा विकास करण्यासाठी मुख्यतः 'आरती' संस्थेची स्थापना झाली आहे.

  ग्रामीण तंत्रज्ञानाची गुणवत्ता वाढविणे, त्याचे व्यापारीकरण करणे, लोकप्रियता वाढविणे, एकाच मापनाखाली मूल्यमापन करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. कृषितज्ज्ञ ए.डी. कर्वे या संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेचे सभासद या नात्याने यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.. ए.आर.टी.आय. ने संस्थेसाठी सक्रिय काम करणाऱ्यांची तुकडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. तंत्रज्ञानात काही बदल घडवून आणले, या दृष्टीने औद्योगिक विकास करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता :

    आरतीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. फक्त तांत्रिक ज्ञानाच्या आधारावर ग्रामस्थ उद्योगपती होऊ शकत नाही. 

   नवीन उत्पादन बाजारात आणून ते लोकप्रिय होईपर्यंत होणारी आर्थिक तूट (तोटा) भरून काढण्याची क्षमता ही फक्त काही संस्थांतच असते. ती गरीब शेतकऱ्यांत कशी असणार? हा धोका गरीब गावकरी पत्करू शकत नाहीत. तांत्रिक ज्ञानाबरोबर यात आर्थिक पाठबळही आवश्यक ठरते. ही कामे संघटनांच्या आधाराशिवाय कशी होणार? नवीन मार्ग अवलंबिलेले हे उद्योगधंदे करोडो, अब्जावधी रुपयांची उलाढाल करू शकतात. 

   नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन करण्यास उत्सुक असलेल्या व्यावसायिकास अर्थसाह्य करणे, त्याचे उत्पादन बाजारात आणणे ही जबाबदारी ए. आर.टी.आय. ने उचलली आहे. कोणाला तरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या व्यावसायिकाची आर्थिक क्षमता सिद्ध करून दाखवावी लागते.

योजना काय आहे : 

     सुप्तावस्थेतील ग्रामीण उद्योगपतींना शिकविण्याचा ठोस कार्यक्रम आरतीने आखला आहे. पण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास हे सुप्त उद्योगपती धजावत नाहीत असे निदर्शनास आले आहे. म्हणून या तंत्रज्ञानावर आधारित, व्यापारी तत्त्वांवर काम करणाऱ्या गटांची स्थापना करून, उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच या तंत्रज्ञानाचे महत्त्व, आर्थिक व्यवहार पटवून देण्याचा निर्णय ए.आर.टी.आय.ने घेतला आहे. 

    या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सुधारीत चुली, अत्याधुनिक रोपवाटिकेचे तंत्र विकसित करण्यासाठी आरतीने 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम' या म्हणीप्रमाणे प्रथम स्वतःची रोपवाटिका स्थापन केली. यामध्ये मुळे धरलेली रोपे, कलम केलेली झाडे, लहान आकारांची फुलझाडे, औषधी वनस्पती व मौसमी पिकांची रोपे यांचा समावेश केला. एका आठवड्यात नवशिक्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले.


Sanstha parichay: gramin Vikassathi zatnari arti

योजनेची अंमलबजावणी :

  आरतीच्या सुविधांचा लाभ घेऊन एकदा त्यांनी नवीन उद्योगधंदा सुरू करायचे ठरवले की, त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्यासाठी आरतीचा ताफा सज्ज असतो. यात सावली धरण्यासाठी जाळी, जास्त दमटपणा देणारी खोली स्वरूपातील काच घर, कठीणता टिकविण्याची खोली, वाळूचे वाफे, वाढत्या रोपांसाठी कंपोस्ट खत असलेली जमीन व पूरक प्रकाश योजना या सुविधांचा समावेश असतो. 

  आरतीच्या अनुभवी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली (साईटवर) जमिनीवर याची उभारणी केली जाते. या योजनेखाली अंदाजे वीस ट्रेनीजनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. पाच जण औषधी पिकांच्या उत्पादनात निष्णात जाणकार झाले असून आठ जण फक्त उसाच्या धंद्यावर आपली गुजराण करत आहेत. उरलेल्या रोपवाटिका या फक्त सुशोभीकरणासाठी लागणारी फुलझाडे, कलम केलेली फुलझाडे व इतरही वनस्पती पुरवितात, लागवड करतात. हा उद्योग मुख्यतः ग्रामीण स्त्रिया चालवितात. 

   या माध्यमातून ग्रामीण अशिक्षित स्त्रियासुद्धा महिना ५००० ते ६००० कमावतात. रोपवाटिकेच्या तंत्रज्ञानासाठी मुख्य पुरवठा केंद्र या एस.टी., सीएपीएआरटी तत्त्वाखाली ए.आर.टी.आय. सध्या काम करत आहे. आरतीतर्फे मदत केलेल्या अनेक संघटनांचे जाळं उत्तरेकडून दक्षिणेकडे हिमाचल प्रदेश ते केरळ असं भारतभर विखुरलेलं आहे. 

  काचगृहातील तांत्रिक पद्धतीचा वापर करून पीक घेणे हे काम नित्याचेच आहे. पण काचगृहातील तांत्रिक पद्धतीचा वापर करून खुल्या आकाशाखाली घेतले जाणारे पीक हे यापेक्षा दुपटीने येते हे आरतीच्या कुशल तंत्रज्ञांनी निदर्शनास आणलं आहे, कारण ही उत्पादने म्हणजे उदा. भाज्या, फळ, स्ट्रॉबेरीज, औषधी वनस्पती होत. यांचा खप होण्याकरिता ए.आर.टी.आय.ला जाहिरातबाजीचीही व बाजारपेठेचीही आवश्यकता लागणार नाही, लागत नाही. ए.आर.टी.आय. कडून प्रशिक्षण घेतलेले वीस जण या पद्धतीने पीक घेण्यात यशस्वी ठरले आहेत. ज्याद्वारे हिंदी, मराठी व इंग्रजी या भाषेद्वारे तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी आरतीने व्हिडिओ कॅसेटस उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी आरतीला साहाय्य केले.

प्रशिक्षणाची सोय : 

  निरनिराळ्या शाखांमध्ये सहभागी होण्यास, प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांची मनोकामना पूर्ण करण्याकरिता आरतीने आयसीआयसीआय बँकेकडून अर्थसाह्य घेतले. ४००० चौरस फुटांच्या प्लॉटसाठी आयसीआयसीआयने ५ लाख रक्कम दान दिली आहे. आर.इ.डी.सी. अलगुवाडी, सातारा येथे ही इमारत उभी राहत आहे. २० लोकांचा समावेश होऊ शकेल असे भव्य शयनगृह, स्वयंपाकघर, जेवणाचे सभागृह व प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह असे या इमारतीचे स्वरूप आहे. 

  यासाठी अमेरिकेतील भारतीयांनी स्थापिलेल्या 'एड इंडियाज' डेव्हलपमेंट या संस्थेकडून २००० पौंड इतकी रक्कम मंजूर झाली आहे. मुख्यतः दृकश्राव्य विभागासाठी व रंगकाम करण्यासाठी या रकमेचे पाठबळ मिळाले आहे. आरतीच्या या उद्योजकता विकास कार्यक्रमाला योग्य दिशा मिळेलच असा विश्वास वाटतो.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण | From Corporate Career to Green Rural Entrepreneurship – Nature’s Bliss Story

  कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण: ‘Nature’s Bliss’ने घडवलेला ग्रामीण परिवर्तनाचा प्रवास | From Corporate Career to Green Rural Entrepre...