name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): August 2025

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात
Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran
भुसारी ॲग्रो' प्रकल्प ठरत आहे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
'Bhusari Agro' project is becoming a ray of hope for farmers

Sonaotil bhusari bandhuchi eranla thet 50 ton keli niryat n

  अहिल्यानगर जिल्हा, नेवासा तालुक्यातील सोनई गावातील शेतकरी संजय भुसारी आणि सुनील भुसारी या भावंडांनी आधुनिक शेती, सेंद्रिय उत्पादन आणि निर्यातीचे उत्तम नियोजन साधत थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. त्यांनी आपल्या ९ एकर क्षेत्रातून घेतलेला उच्च प्रतीचा ५० टन केळी माल थेट इराणला निर्यात केला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


   ही निर्यात व्हिवान (Vivan) या नामांकित निर्यात कंपनीच्या माध्यमातून झाली असून, यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि समन्वयाची भूमिका आशिष पाटील सरांनी बजावली. त्यांनी संपूर्ण निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक, दस्तऐवजीकरण व गुणवत्ता चाचणी या बाबींमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले.

Sonaitil bhusari bandhuchi eranla thet 50 ton keli niryat

    या शेतकरी भावंडांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता, गांडूळखत व निंबोळी पावडर प्रकल्प सुरू करून जैविक शेतीला अधिक बळ दिले आहे. सुमारे ६०% सेंद्रिय आणि ४०% रासायनिक खतांचा समतोल वापर करून घेतलेले केळी उत्पादन निर्यातक्षम ठरले. त्यातील प्रत्येक घडाचे सरासरी वजन ३५ किलो असून, एकूण ९ एकरातून तब्बल ३०० टन उत्पादनाचा संकल्प त्यांनी केला आहे.


   या यशामागे पुत्र शुभम भुसारी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे त्याचे बी.एस्सी (कृषी) शिक्षण  घेत असतानाच ‘भुसारी ॲग्रो’ या नावाने गांडूळखत व निंबोळी पावडरचे स्वतंत्र उत्पादन प्रकल्प सुरू केले. 

    त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११८ टन गांडूळखत व ३५ टन निंबोळी पावडर विक्री करून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण केली.

Sonaitil bhusari bandhuchi eranla thet 50 ton keli niryat

  ‘भुसारी ॲग्रो’ची उत्पादने आज अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, सातारा आदी भागांमध्ये पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर २०२५-२६ मध्ये शुभमने नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळखत प्रकल्प उभारला असून त्याची एकवेळ प्रक्रिया क्षमता तब्बल १०० टन इतकी आहे.


   विशेष म्हणजे, शुभम तयार करत असलेली निंबोळी पावडर कोणतेही तेल न काढता आणि कोणतेही रासायनिक पदार्थ न मिसळता पूर्णतः नैसर्गिकरित्या तयार केली जाते. तो सध्या एमआयटी पुणे या नामांकित संस्थेत एमबीए (मार्केटिंग) चे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच व्यवसायाचे उत्तम व्यवस्थापन करत आहे. ‘भुसारी ॲग्रोच्या माध्यमातून तो आज लाखोंची उलाढाल करीत आहे.


   आजच्या घडीला 'शिक्षण + शाश्वत शेती + उद्योजकीय दृष्टिकोन' याचा आदर्श नमुना भुसारी कुटुंबीयांनी अंगिकारला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात नव्या पिढीतील शेतकऱ्यांना नव्या दिशेने प्रेरणा मिळत आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यासाठी गुगलने सुरू केला एआय (AI) आधारित उपक्रम (Google launches AI-based initiative to modernize Indian agriculture)

भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यासाठी गुगलने सुरू केला एआय (AI) आधारित उपक्रम 
Google launches AI-based initiative to modernize Indian agriculture


Bhartiya shetila adhunik banvanyasathi googlne Suru kela AI

    शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्व सुरू होत आहे. गुगलने भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 'कृषी मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन' (Agricultural Monitoring and Event Detection) नावाचा हा प्रकल्प शेतीत मोठी क्रांती घडवून आणू शकतो.


  कृषी निरीक्षण आणि घटना शोध प्रणाली ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया आहे, जी शेतात घडणाऱ्या विविध घटनांचा वेळेवर शोध घेते व त्यावर आधारित योग्य कृती करण्यास मदत करते.


 गुगलचा नवा प्रकल्प 

गुगलने ओपन सोर्स एपीआय (API) तयार केला आहे, जो शेतीशी संबंधित अचूक आकडेवारी पुरवेल. एपीआय म्हणजे एक असा इंटरफेस जो दोन ॲप्सना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करतो. 


   सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या शेतकरी ॲपला हवामान, मातीचा ओलावा, किंवा पिकाची माहिती हवी असेल, तर ते थेट हवामान विभागाकडे न जाता गुगलच्या एपीआयचा वापर करेल आणि आवश्यक माहिती मिळवेल. यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ॲप्स तयार करणाऱ्या कंपन्यांना अचूक आणि रिअल-टाइम डेटा सहज उपलब्ध होईल.


या प्रकल्पाची उद्दिष्टे:

  • शेतातील पिकांचे सातत्याने निरीक्षण करणे.
  • कीड-रोगांचा वेळीच शोध घेणे.
  • हवामान बदल, पाण्याची कमतरता किंवा जमिनीतील बदल यांसारख्या घटनांचे वेळीच निदान करणे.
  • शेतकऱ्याला वेळेत इशारा/सूचना (Alert) देणे.
  • उत्पन्नात वाढ व नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेण्यास मदत करणे.


शेतकऱ्यांना होणारा फायदा

  रोग व किडींचे नियंत्रण वेळीच केल्याने नुकसान कमी होईल. निदान व उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात वाढ होईल.

Bhartiya shetila adhunik banvanyasathi googlne Suru kela AI adharit upkram

पाण्याचा कार्यक्षम वापर 

खते, पाणी यांचा बचतयुक्त वापर होईल उदाहरण द्यायचे झाले तर  एक स्मार्ट सेन्सर जर जमिनीतील ओलाव्याची पातळी खालच्या मर्यादेत आली आहे असे दर्शवतो, तर प्रणाली शेतकऱ्याला त्वरित पाणी देण्याचा इशारा पाठवते. त्यामुळे पिकं सुकण्यापूर्वी उपाययोजना करता येते.

उत्पादन खर्चात बचत होऊन अधिक शाश्वत व नफ्यातील शेती शेतकऱ्याला करता येईल.

  हा ओपन सोर्स एपीआय अनेक प्रकारे शेतकऱ्यांच्या मदतीला येईल:

 शेतीचे अचूक नियोजन: 

शेतकऱ्यांना पिकाची पेरणी कधी करावी, काढणी कधी करावी आणि शेतीचे क्षेत्रफळ किती आहे, याबद्दल सॅटेलाईट आणि मशीन लर्निंगच्या मदतीने अचूक माहिती मिळेल त्यामुळे अचूक नियोजन करता येईल. 


नैसर्गिक आपत्तीचे जोखीम व्यवस्थापन : 

 हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक आपत्ती यांची माहिती वेळेवर मिळाल्याने शेतीमधील जोखीम कमी होईल.

नवीन आणि उपयुक्त माहितीचे तंत्रज्ञान :

खाजगी कंपन्यांना एआयवर आधारित ॲप्स आणि सेवा तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत नवीन आणि उपयुक्त तंत्रज्ञान पोहोचेल.


    या प्रकल्पामुळे भारतीय शेती केवळ आधुनिकच नाही, तर हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठीही सक्षम होईल, असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे उपाय शोधता येतील. 

वापरले जाणारे तंत्रज्ञान :

ड्रोन (Drone) 

शेतावरून उड्डाण करून फोटो व व्हिडिओ घेतले जातात.

सेन्सर (Sensor) 

मातीतील ओलावा, तापमान, पोषणतत्त्वे यांचे मोजमाप.

सॅटेलाईट इमेजिंग (Satellite Imagery) 

शेतांची मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली जाते.

AI व मशीन लर्निंग  

फोटो/डेटा वापरून घटना ओळखल्या जातात.

GIS प्रणाली 

नकाशा व स्थान आधारित विश्लेषण.

मोबाईल अ‍ॅप्स व SMS अलर्ट 

शेतकऱ्यांना माहिती पोहोचवण्यासाठी मोबाईल ॲप्स व एस एम एस सेवेचा वापर करण्यात येईल. 


  थोडक्यात सांगायचे झाले तर गुगलचा हा उपक्रम भविष्यातील शेतीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो. अशा प्रकारचे निरीक्षण व घटना शोध तंत्रज्ञान हे स्मार्ट शेतीचं (Smart Farming)  महत्त्वाचं पाऊल आहे. भविष्यकाळात अधिक अचूक, डेटा-आधारित आणि नफा मिळवणारी शेती यामार्फत शक्य आहे

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...