श्रीकृष्ण जन्माष्टमी
Shrikrushna Janmashtami
© दीपक के.अहिरे, नाशिक
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
"स्व-काव्यांकुर बहरला सचित्र माहितीनी, आस्वाद घ्यावा सुजाण वाचकांनी " Wise readers should enjoy Swa-kavyankur Bahar with illustrated information
© दीपक के.अहिरे, नाशिक
विचारांच्या गर्दीतून
बाहेर कसा येताे,
विचारांच्या कुपीचे
अत्तर मी शिंपडताे...
विचारांच्या गर्दीतून
नेमके विचार मांडताे,
विचारांचा आनंद
ओसंडून वाहताे...
विचारांच्या गर्दीतून
देत राहताे सुविचार,
अडल्या नडलेल्यांना
मिळताे त्यातून उपचार...
विचारांच्या गर्दीतून
विचारांची हाेते काेंडी,
विचारच माझे सर्वस्व
मांडताे विचार ताेंडी...
© दीपक अहिरे, नाशिक
करा आले लागवड
ताजे आले व सुंठासाठी,
उत्पादन मिळते वीस टन
प्रति हेक्टर गड्डयाकाठी...
जमीन मध्यम व हलकी
आले लागवडीला,
असतो विशिष्ट सुवास
स्वाद,तिखटपणा याला...
सुप्रभा,सुरुची,सुरभी
वरदा ह्या आल्याच्या जाती,
कमी पाण्यातही
जास्तीत जास्त उत्पन्न देती..
लागवडीचा हंगाम साधून
करा लागवड,
घ्या काळजी,
होणार नाही पिकाला सड...
लागवड करा सरी वरंबा,
सपाट वाफे पद्धतीने,
योग्य काळजी घ्या
कीड व रोग व्यवस्थापनाने..
लागवडीनंतर आल्याला
द्या हलके पाणी,
याने उगवतील रशरशीत
आल्याचे बेणी...
शिफारशीप्रमाणे द्या
नत्र, स्फुरद, पालाश,
बेणेप्रक्रियेने होतो
बुरशीजन्य रोगांचा नाश...
लागवडीसाठी दर हेक्टरी
पंधराशे किलो आले,
बाजारभावामुळे "रामराव",
मालामाल झाले...
तापमान, आद्रता नियंत्रणाने
करा साठवण,
आल्याला नेहमी तेजी,
असू द्या आठवण...
"दिपू" म्हणे करा लागवड
किफायतशीर आल्याची,
नाही भासणार वानवा
मुरंबा, कँडी नी सुंठाची...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
https://ahiredeepak.blogspot.com/?m
गोस्वामी तुलसीदास
युगप्रवर्तक महाकवी झाले,
बालपण फारच कष्टात
अनाथ म्हणून वाढले...
राम व हनुमानावर
त्यांची श्रद्धा अपार,
रसिक आणि विनम्र वृत्तीने
मनाने कोमल, स्वभावाने उदार...
रामचरितमानस, कृष्णगितावली
यासारखे बारा ग्रंथ लिहिले,
तुलसीदासांचे सर्वच लिखाण
लोकप्रिय असे साहित्य झाले...
तुलसीदासांनी शिकवला
समस्त मानवतावादी धर्म,
उच्च नीतिमूल्यांचे संस्कार
कर्तव्य आणि मर्यादा कर्म...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
राज्यातील मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करणे आणि समाजघटकांचे उद्योग, सहकार, क्रीडा, शिक्षण, कृषी क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरिता हे अधिवेशन होणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर केले जातील अशी माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाची माहिती देताना श्री. कोंढरे म्हणाले, की राज्यातील सर्वांत प्रगत जिल्ह्यांमध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर आहे. कृषी, पर्यटन, सहकार, क्रीडा, कला या क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचे मार्गदर्शन मराठा समाजातील युवकांना मिळेल.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सातला विविध क्षेत्रांतील २०० नामवंत व्यक्तींची गोलमेज परिषद होणार आहे. 'नाशिक आजचे, उद्याचे आणि मराठा समाज' हा या परिषदेचा विषय राहील.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हे अधिवेशन होत असल्याने राज्यातील नेत्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
अधिवेशनाची मुख्य परिषद ही रविवारी (ता. ११) राहणार असून, यात समाजातील नामवंत व्यक्ती विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, उद्योजक शशिकांत जाधव, अर्थतज्ज्ञ गिरीश चकोरिया आदी मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच 'शिक्षण, महिला व युवकांचे भवितव्य' या विषयावरही विचारमंथन होईल. परिषदेने मंजूर केलेले ठराव राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, कोशाध्यक्ष प्रमोद जाधव, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, अशोक कदम, नानासाहेब बच्छाव, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲड. स्वप्नाली राऊत, संजय पडोळ, दीपक पाटील, राजेंद्र जाधव, राम निकम, रोहिणी उखाणे, सुवर्णा पाटील, अनिता डेमसे, शैलजा चव्हाण, रूपाली सोनवणे, वंदना कदम आदी उपस्थित होते.
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन हे पशुपालक, पशुवैद्यक, पशुसहाय्यक, पशुउद्योजकासाठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे असून, याचा उपयोग पशुपालकांनी आपला व्यवसाय, तांत्रिक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन जयगुरु विमा आणि कृषीपूरक व्यवसायाचे उद्घाटन मंत्री गडकरी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथे करण्यात आले.
नाशिकमधील युवक व कंपनीचे संचालक हेमंत महाजन यांनी पशुमित्र मोबाइल ॲप्लिकेशनबाबत विस्तृत माहिती दिली.
पशुमित्र मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास अत्यंत सोपे असल्याने पशुपालक व नवीन व्यवसाय करू इच्छिणारे युवकांना सहज रीतीने वापरता येईल.
यावेळी नितीन गडकरी यांनी पशुंची किंवा उत्पादनाची खरेदी-विक्री करतांना फसवणूक होणार नाही. याची दक्षता घेणेबाबत सूचित केले. तसेच पशुपालक, खरेदीदार यांनी प्रत्यक्ष खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत, असा मोलाचा सल्ला दिला.
पशुपालक यांना लागणारी सर्व माहिती देणारे असे एकमेव ॲप असून हे ॲप व जय गुरु विमा आणि कृषीपूरक कंपनी पशुसंवर्धन विभागाची क्रांती करेल व बेरोजगार तरुणांना पशु उद्योजक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.
या पशुमित्र ॲप्लिकेशनमुळे गोपालकांना चांगल्या जातीची जनावरे शोधण्यासाठी पशुंचे आठवडे बाजारात जाण्याची गरज पडणार नसून, पशुपालक यांचे गोठ्यातील जनावरांची माहिती मिळणार आहे. तसेच चारा, वैरण, मुरघास. पशुखाद्य विक्रेत्यांना सुध्दा त्याच्या जाहिरातीतून सर्वांपर्यंत पोहोचण्याची सोय होणार आहे.
पशुपालक यांना विविध नोंदणीकृत पशुवैद्यक, पशुमित्र, पशुंची औषधी विक्रेते, रोग निदान प्रयोगशाळा, शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशु वाहतूकदार, प्रशिक्षण संस्था, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, उद्योगासाठी लागणारे साहित्य, उपकरणे विक्रेते, उत्कृष्ट डेअरी फार्म्स, शेळी, मेंढी फार्म्स, पोल्ट्री फार्म्स यांची माहिती, पशु ग्रंथालय, व्यवसाय कारण्यासाठी माहिती, पुस्तके तसेच अनुभव देवाण घेवाणमध्ये पशुवैद्यक यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ या ॲपद्वारे मिळणार आहे.
पशुपालक यांना अत्यंत फायदेशीर असे हे ॲप असून यामुळे बेरोजगारी कमी होईल, पशुसंवर्धनविषयक व्यवसाय वृध्दींगत होतील, असा विश्वास प्रो. एस. पी. सिंह बघेल यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येक राज्यात पशुपालक, पशुवैद्यक यांचे होणाऱ्या चर्चासत्रात याची माहिती द्यावी अशी सूचना केली.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. नरवाडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक तसेच मत्स्य विकास विभागाचे उपआयुक्त प्रदीप जगताप हजर होते.
संचालक हेमंत महाजन यांनी ॲपबाबत सविस्तर माहिती दिली व आभार व्यक्त केले. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे.
सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...