name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): September 2025

आधुनिक शेतीचा आदर्श : श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांची यशोगाथा (The model of modern agriculture: The success story of Shri. Dadasaheb Daulatrao Shinde)

आधुनिक शेतीचा आदर्श : श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांची यशोगाथा

The model of modern agriculture: The success story of Shri. Dadasaheb Daulatrao Shinde


Adhunik sheticha adarsh shri. Dadasaheb shinde

 मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन, पोस्ट. आडगाव बुद्रुक गावचे रहिवासी श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे हे केवळ शेतकरीच नव्हे तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीत नवे प्रयोग करणारे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहेत. बी.एस्सी. एल.एल.बी. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परंपरागत शेतीच्या पलीकडे जाऊन विज्ञानाधारित आधुनिक शेतीकडे वाटचाल केली.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

शेतीचा विस्तार आणि प्रयोगशील दृष्टिकोन

   श्री. शिंदे यांच्याकडे साडेसात एकर शेती आहे. एका एकर जागेत शेततळे उभारून त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण घातले आहे. अद्ययावत पॉलिहाऊस उभारून त्यांनी फुलोत्पादनाला चालना दिली आहे. मुख्य पिकांमध्ये डाळिंब, तूर, मका, भाजीपाला यांचा समावेश आहे.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

डाळिंबातून विक्रमी उत्पन्न

  त्यांच्या डाळिंब पिकातून मागील हंगामात तब्बल २९ लाख रुपयांचा नफा मिळाला. या यशातून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग त्यांनी शेती अधिक आधुनिक करण्यासाठी केला. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन, बाजारपेठेचा योग्य अभ्यास या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिल्याने डाळिंबाची शेती त्यांच्यासाठी “कॅश क्रॉप” ठरली.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

फुलोत्पादनात यश

  शेतातील पॉलिहाऊसमध्ये त्यांनी फुलांचे उत्पादन सुरू केले., बोर्डो गुलाब, निशिगंध या फुलांपासून त्यांना चांगला नफा मिळतो आणि बाजारपेठेत त्यांची विशेष ओळख तयार झाली आहे.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

फळझाडांचा पट्टा – पूरक उत्पन्न

   श्री. शिंदे यांनी आपल्या शेताची बांधबंदिस्ती करून बांधावर विविध फळझाडे लावली आहेत : नारळ, आंबा, जांभूळ, चिकू, आवळा या झाडांमुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न तर मिळतेच, शिवाय शेतीला पर्यावरणपूरक छटा मिळते.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde


जमिनीची सुपीकता जपण्यासाठी विशेष प्रयत्न

  आज बहुतेक ठिकाणी रासायनिक खतांचा अतिरेक होऊन जमिनीची सुपीकता कमी होत आहे. परंतु श्री. शिंदे यांनी वेगळा मार्ग अवलंबला आहे.

    ते सेंद्रिय द्रवखत (Slurry) चा वापर करतात : अन्नधान्य स्लरी, जिवाणू स्लरी, कडधान्य स्लरी याचा समावेश आहे.  या वापरामुळे मातीचा पोत सुधारतो, नैसर्गिक सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

मोर्फाशी सक्रिय सहभाग

   ते महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (MORFA) चे सक्रिय पदाधिकारी आहेत. या संस्थेमार्फत ते शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करतात. त्यांचा आग्रह आहे की, शेतीतील रासायनिक अवशेषमुक्त (Residue Free) उत्पादन हेच भविष्यातील गरज आहे.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

प्राप्त पुरस्कार

१) २०२१चा महाराष्ट्र शासनाचा शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार. 

२) वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांच्यातर्फे वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार. 

३) नारळ विकास बोर्ड यांच्यातर्फे पुरस्कार 

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

प्रेरणादायी संदेश

   श्री. दादासाहेब शिंदे यांनी दाखवून दिले आहे की – विज्ञानाधारित आधुनिक शेती, नैसर्गिक सुपीकता जपण्याची पद्धत, विविध पिकांचा समतोल वापर आणि पूरक व्यवसाय. या सगळ्यांच्या साहाय्याने शेतीत मोठे यश मिळवता येते. त्यांची यशोगाथा मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Adhunik sheticha adarsh shri Dadasaheb shinde

निष्कर्ष

   शेती म्हणजे फक्त मेहनत नव्हे, तर ज्ञान + तंत्रज्ञान + व्यवस्थापन यांचा उत्तम संगम आहे. श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा प्रवास हेच सिद्ध करतो की आधुनिकतेच्या वाटेवर चालत, सेंद्रियतेला धरून, आणि नव्या बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीत आर्थिक समृद्धी साध्य करता येते.



© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

#मराठवाडा शेती यशोगाथा 

#आधुनिक शेती महाराष्ट्र 

#डाळिंब शेती नफा 

#पॉलिहाऊस फुलोत्पादन 

#सेंद्रिय शेती फायदे 

#Residue Free Farming India 

#MORFA Farmers Maharashtra

दिपाली भाऊसाहेब खुर्दळ यांची प्रेरणादायी शेतीतील यशोगाथा (Dipali Bhausaheb Khurdal's inspiring agricultural success story)

संसाधन कमी… पण जिद्द आणि कल्पकतेने मिळविले लाखोंचं उत्पन्न!🌾
Resources are limited… but with determination and creativity, millions of rupees were earned! 
दिपाली भाऊसाहेब खुर्दळ यांची प्रेरणादायी शेतीतील यशोगाथा
Dipali Bhausaheb Khurdal's inspiring agricultural success story

Dipali khurdal yanchi yashogatha

परिचय

  भारतातील अनेक शेतकरी कमी जमिनीवर उपजीविका चालवतात. पण योग्य नियोजन, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कठोर परिश्रम असेल तर कमी शेतीतूनही मोठं यश मिळू शकतं. खतवड (जि. नाशिक) येथील दिपाली भाऊसाहेब खुर्दळ यांनी याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. अल्पभूधारक असूनही त्यांनी शेतीतूनच वार्षिक लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.


संघर्षातून उभी राहिलेली शेतकरी स्त्री 🌱

   दिपाली यांचे लग्न वयाच्या फक्त १७व्या वर्षी झालं. वडिलांच्या निधनामुळे शिक्षण थांबलं आणि लहानपणापासूनच शेतीत काम करावं लागलं. सासरी आल्यावरही त्या पतीसोबत ५ एकर शेतीत काम करू लागल्या (२.५ एकर स्वतःची + २.५ एकर बटाईने). या प्रवासात कधी आर्थिक संकटं आली, तर कधी कुटुंबातील आजारपणामुळे अडचणी निर्माण झाल्या. पण त्यांनी हार मानली नाही.


स्वीटकॉर्नचा विक्रम 🚜

  २०१८ नंतर आर्थिक संकटातून सावरताना दिपाली यांनी नवनवीन प्रयोग सुरू केले. २०२२ मध्ये त्यांनी अॅडव्हांटा कंपनीच्या गोल्डन हनी स्वीटकॉर्नची लागवड अभिनव पद्धतीने केली. पारंपरिक सऱ्यांऐवजी टोमॅटोच्या बेडवर झिग-झॅग पद्धतीने लागवड केली. जमीन तयार करण्याचा खर्च वाचवला. टोमॅटो वेस्टमधून पोषण मिळवले.


परिणाम :

   साधारणपणे मिळणाऱ्या ७-८ टन उत्पादनाऐवजी तब्बल १० टन उत्पादन मिळाले. एकरी उत्पन्न : १.४० लाख रुपये झाले. जपान व कॅन डाहून आलेल्या खरेदीदारांनी शेतभेट घेऊन कौतुक केलं!


आंतरपीक आणि दुहेरी फायदा 🌿

  टोमॅटोसोबत भुईमूगचं आंतरपीक घेतले.टोमॅटो संपल्यानंतर मंडपाचा वापर करून गिलक्याची लागवड केली. त्यामुळे उत्पन्नाचा प्रवाह अखंड सुरू झाला. याशिवाय २.५ एकर द्राक्षबागेतून गेल्या वर्षी ९ लाख आणि टोमॅटोतून ७ लाख उत्पन्न मिळालं.अशाप्रकारे एकूण वार्षिक उत्पन्न  १६ लाख रुपये मिळाले. 


नवी दिशा – सोलर ड्रायर प्रकल्प ☀️

   हवामान बदलामुळे द्राक्ष पिकावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे दिपाली यांनी  प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये १२ लाख गुंतवणूक केली. बँकेकडून ५ लाखांचं कर्ज घेतले. सह्याद्री फार्म्समध्ये १० दिवसांचं प्रशिक्षण घेतले. कुटुंबाच्या मदतीने बेदाणे, आले, टोमॅटो प्रक्रिया केली. याचा परिणाम असा झाला कि शेतमाल प्रक्रिया विक्रीतून ७.४८ लाख उत्पन्न, निव्वळ नफा : २.१८ लाख रुपये  इतका झाला. त्या बँकेचं कर्ज नियमित फेडत आहेत. 


दिपाली खुर्दळ यांचा प्रेरणादायी संदेश 💡

    कमी शेतीतही भरघोस उत्पन्न मिळवता येतं. संकट आलं तरी हार मानू नका; प्रत्येक अडचणीत संधी दडलेली असते. योग्य नियोजन, नव्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरीही यशस्वी उद्योजक होऊ शकतात.


निष्कर्ष

  दिपाली भाऊसाहेब खुर्दळ यांची कथा ही भारतीय महिलांच्या शेतीतील सहभागाची ताकद दाखवणारी आहे. त्यांनी सिद्ध केलं की  “संसाधन कमी असलं तरी जिद्द, कल्पकता आणि मेहनत असेल तर यश निश्चित आहे.” त्यांची यशोगाथा आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. 🌾✨

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

#शेतीतील यशोगाथा
#महिलांची शेतीतील भूमिका
#अल्पभूधारक शेतकरी
#आधुनिक शेती तंत्रज्ञान
#सोलर ड्रायर व्यवसाय

श्री स्वयंभु चिंचखेडेतील म्हाळसा देवी–१०७ कुळांची कुलस्वामिनी | Mhalsa Devi of Shri Swayambhu Chinchkhede–The Goddess of 107 Clans

श्री स्वयंभु चिंचखेडेतील म्हाळसा देवी – १०७ कुळांची कुलस्वामिनी |
Mhalsa Devi of Shri Swayambhu Chinchkhede – The Goddess of 107 Clans

Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

  

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणाजवळ असलेल्या चिंचखेडे या गावाला आज एक वेगळी ओळख लाभली आहे. ती म्हणजे स्वयंभु श्री म्हाळसा देवीचे पवित्र देवस्थान. हे मंदिर केवळ एक धार्मिक केंद्र नाही तर असंख्य भाविकांच्या श्रद्धेचा, आस्थेचा आणि भक्तीचा प्राण आहे.

स्वयंभु मूर्तीचा चमत्कारिक इतिहास

     सुमारे १२५ वर्षांपूर्वी पांझरा आणि इरावती नदीच्या संगमावर आलेल्या महापुरात देवीची शिलारूपी मूर्ती वाहून आली. कै. राजाराम जिभाऊ बेडसे यांच्या शेतात ही मूर्ती स्थिरावली आणि तेव्हापासून देवीची अखंड पूजा-अर्चा सुरू झाली. 

    विशेष म्हणजे ही मूर्ती कोणत्याही शिल्पकाराने तयार केलेली नसून ती स्वतः प्रकट झालेली स्वयंभु मूर्ती आहे. पुरोहितांच्या सांगण्यावरून खात्री झाली की ही मूर्ती म्हाळसा देवीचीच आहे. म्हाळसा देवीला खंडोबाची पत्नी व पार्वतीचा अवतार मानले जाते. त्यामुळे या देवीला १०७ कुळांची कुलस्वामिनी मानले जाते.


Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

मंदिराचा प्रवास – लहानशा देऊळापासून भव्य मंदिरापर्यंत

    सुरुवातीला कै. राजाराम बेडसे यांनी छोटेखानी मंदिर उभारून मूर्तीची सेवा सुरू केली. पुढे कै. भटू राजाराम बेडसे व कै. सुंदर भटू बेडसे यांनीही हाच परंपरेचा वारसा पुढे नेला. मात्र २०१९ मध्ये आलेल्या वादळामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. तेव्हा सौ. उषा रवींद्र बेडसे यांच्या स्वप्नातच देवीने दर्शन देऊन नवे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. कोरोनाच्या काळातील अडचणी असूनही मार्च २०२१ मध्ये रवींद्र व उषा बेडसे यांनी स्वतःच्या खर्चाने मंदिराचे नवे बांधकाम पूर्ण केले. विशेष म्हणजे मूर्तीला हात न लावता आणि ती हलविल्याशिवाय नव्या मंदिरात पुनर्स्थापित करण्यात आले. आज मंदिर परिसरात प्रशस्त मंडप, पार्किंग, भाविकांसाठी खोल्या, शुद्ध पाण्याची सोय, तसेच वृक्षलागवडीमुळे निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.

Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

नवरात्रोत्सवाची पर्वणी

   दरवर्षी नवरात्रोत्सवात मंदिर समितीतर्फे घटस्थापना आणि मानाचा ध्वज लावला जातो. पहाटे अभिषेक, सहा वाजता काकड आरती, दिवसभर पूजा-अर्चा असा उत्सवी माहोल असतो. लाखो भाविक या दिवसांत देवीचे दर्शन घेण्यासाठी चिंचखेडेला हजेरी लावतात. याशिवाय फेब्रुवारी आणि चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे म्हाळसा देवीची यात्रा भरते. चक्रपूजा, जावळ, शेंडी, नवस फेडणे, तसेच लग्नसोहळे यासारखे अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मंदिरात पार पडतात. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात.


Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

भक्तांचा अनुभव – नवसाला पावणारी माता

   म्हाळसा देवी ही नवसाला पावणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे. संकटात सापडलेल्या भाविकांना देवी स्वप्नात दर्शन देते आणि मार्ग दाखवते, अशी असंख्य उदाहरणे भक्त सांगतात. मानसिक तणाव, कौटुंबिक अडचणी, आजारपण – अशा प्रसंगांत देवीच्या चरणी शरण गेल्यानंतर मनःशांती लाभते, अशी श्रद्धा आहे.


Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

सामाजिक उपक्रम

  मंदिर फक्त पूजा-अर्चेपुरते मर्यादित नाही. येथे ट्रस्टतर्फे गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, संगणक दिले जातात. शिक्षणासाठी मदत मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. या सामाजिक कार्यामुळे मंदिराचा लौकिक अधिक वाढला आहे.

आरती – भक्तीचा अखंड झरा

भक्तांच्या तोंडी नेहमी गाजणारी आरती अशी : 

“जयदेवी जयदेवी, जय म्हाळसा

आरती ओवाळितो, चुकवी भववळसा...”

जयदेवी जयदेवी //धृ.//

नित्यस्वरूपाते वंदे त्रिजगाते

महिमा तुझा न कळे, विधीही अनुगाते 

शिवकारीणी अवतारीसी, इच्छा सांगाते 

शिवध्याना सन्मुद्रा, पावे भंगाते

जयदेवी जयदेवी //१//

दैवी दैत्यी सिंधू मथिता रनाते 

विभाग होता झाला, व्देष हा माते 

संकट समयी धरीले मोहिनी रूपाते 

निर्भय केले न लगता पात्याला पाते.

जयदेवी जयदेवी //२//

पाजुनि अमृत अमरां राहूते मारी 

किर्ती गातो जीची मुक्ती कामारि 

अखंड उत्सव शिषिका स्वारी 

रविवारी वर्णी पिता ज्याचा नाठे कामारी

“जयदेवी जयदेवी, जय म्हाळसा

आरती ओवाळितो, चुकवी भववळसा...”

  ही आरती केवळ शब्द नाहीत तर भक्तांच्या अंतःकरणातून ओसंडून वाहणारी भक्तिभावनेची अभिव्यक्ती आहे.

Sri swaymbhu chinchkhedetil mhalsa devi

  श्री स्वयंभु चिंचखेडेतील म्हाळसा देवी हे मंदिर म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचे सुंदर द्योतक आहे. नवरात्रोत्सवातील उत्साह, यात्रेतील गर्दी, मंदिराच्या सेवेत असलेली निस्वार्थ भावना  हे सर्व एकत्र येऊन या देवस्थानाला वेगळी ओळख देतात.

    ज्यांना जीवनातील संकटे, तणाव, अडचणींनी ग्रासले आहे त्यांनी एकदा तरी या कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. म्हाळसा माता ही केवळ दैवत नाही, तर भाविकांच्या जीवनातील अंध:कार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारी शक्ती आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

श्री.एस.बी.जाधव : शेती सल्लागार ते पर्यावरण संवर्धनातील प्रेरणादायी प्रवास (Shri.S.B. Jadhav: An inspiring journey from agricultural consultant to environmental conservation)

श्री.एस.बी.जाधव : शेती सल्लागार ते पर्यावरण संवर्धनातील प्रेरणादायी प्रवास
Shri.S.B. Jadhav: An inspiring journey from agricultural consultant to environmental conservation

S.b. jadhav: sheti sallagar te paryavran sanvardhan pravas

  मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारे श्री. एस. बी. जाधव हे नाव आज देशभरातील शेतकरी आणि पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी २००१ पासून नोकरी आणि शेती सल्लागार म्हणून महाराष्ट्रासह भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये काम करून शेतकऱ्यांच्या अडचणी, भौगोलिक परिस्थिती आणि निसर्गाच्या बदलत्या लहरींचा जवळून अनुभव घेतला.

श्री रोझ कन्सल्टन्सीची स्थापना

   २०१० साली त्यांनी “श्री रोझ कन्सल्टन्सी” या नावाने व्यवसाय सुरू केला.येथे शेतकऱ्यांसाठी खालील सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या :

  शेडनेट हाऊस उभारणी प्रकल्प रिपोर्ट, बँक लोन व सबसिडी मार्गदर्शन, लागवड व उत्पादन व्यवस्थापन, कृषी उत्पादन विक्री व विपणन सल्ला यामुळे हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल सुरू झाली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव

  श्री. जाधव यांनी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ईशान्य भारतातील राज्ये, गोवा, राजस्थान, केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी आफ्रिकेतील काही देशांमध्ये शेतीसंदर्भातील मार्गदर्शन देऊन आंतरराष्ट्रीय अनुभवही मिळवला. यामुळे त्यांना विविध भौगोलिक परिस्थिती, स्थानिक समस्या आणि त्यावरचे उपाय समजले.

निसर्ग संवर्धनाबाबतची जाणीव

   श्री. जाधव यांना ठाम विश्वास आहे की –“मनुष्य जीवन हे निसर्ग निर्मित आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाशिवाय मानवजातीचा टिकाव शक्य नाही.” त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जागृती अभियान राबवले.यामध्ये पुढील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला : वायू प्रदूषण, जल प्रदूषण, भू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

     ग्लोबल वॉर्मिंग आणि कार्बन क्रेडिट याबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करणे. निसर्ग व जैवविविधतेचे रक्षण करणे

हेरिटेज वृक्ष संकल्पना 

   श्री. जाधव यांनी मांडलेली “हेरिटेज वृक्ष संकल्पना” ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या मते प्रत्येक गाव, शहर आणि शासकीय कार्यालय परिसरात शेकडो वर्षे टिकणाऱ्या वृक्षांची लागवड झाली पाहिजे.

लागवडीसाठी सुचवलेली झाडे

    वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन, पळस, सिसम, लाल रक्तचंदन / सफेद चंदन (सरकारी ठिकाणी), लागवडीची अंमलबजावणी, पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, सरकारी दवाखाने अशा ठिकाणी वृक्ष लागवड, झाडांची जन्मतारीख दगडावर कोरून नोंद ठेवणे., झाडांचे जन्मदिवस साजरे करणे. कमीत कमी ५ ते ६ फूट उंचीची रोपे लावणे. यामुळे वृक्ष संवर्धन, जैवविविधता आणि नैसर्गिक संतुलन राखण्यास मोठा हातभार लागेल.

पर्यावरण संवर्धनाचे फायदे

  पक्षी, प्राणी, फुलपाखरे, मधमाश्या यांचे वास्तव्य सुरक्षित होईल.मातीची धूप कमी होईल.पाण्याचा अपव्यय कमी होईल.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल. स्वच्छ हवा व शुद्ध वातावरण उपलब्ध होईल. स्थानिक तापमान नियंत्रणात राहील.

प्रेरणादायी संदेश

   श्री. एस. बी. जाधव यांचा विश्वास आहे की,“जसा सैनिक सीमेवर लढतो, तसा मी निसर्ग संवर्धनासाठी लढत आहे.” त्यांच्या या संकल्पनांमुळे पुढील पिढीसाठी स्वच्छ, हरित आणि टिकाऊ भविष्य निर्माण होईल.

निष्कर्ष

   आजच्या काळात आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धन हे तितकेच महत्त्वाचे आहे. श्री. एस. बी. जाधव यांचा उपक्रम दाखवतो की – योग्य नियोजन, वृक्ष संवर्धन आणि जागृती अभियानातून आपण ग्लोबल वॉर्मिंग कमी करून, जैवविविधतेचे रक्षण करून आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करून देशाच्या विकासात मोठा हातभार लावू शकतो. 

S.b.jadhav : sheti sallagar te paryavran sanvardhan pravas

    श्री. जाधव यांना 📧 Email:jadhavs0999@gmail.com या ई-मेल वर संपर्क करू शकतात.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

वंदना प्रभाकर पाटील : बचत गटातून जागतिक दर्जाच्या उद्योगापर्यंतचा प्रवास I Vandana Prabhakar Patil: Journey from self-help group to world-class industry


वंदना प्रभाकर पाटील : बचत गटातून जागतिक दर्जाच्या उद्योगापर्यंतचा प्रवास
Vandana Prabhakar Patil: Journey from self-help group to world-class industry

Vandana prabhakar patil yancha pravas

   आजच्या काळात महिलांचा सहभाग ग्रामीण विकासात किती महत्त्वाचा ठरतो आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडा गावातील वंदना प्रभाकर पाटील. मर्यादित साधनं, छोटं गाव आणि पाच एकर शेती यावर त्यांनी आपल्या कौशल्य, चिकाटी आणि नाविन्याच्या जोरावर स्थानिक ते जागतिक स्तरावर गाजणारी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे.

बालपण व शिक्षण

   वंदना पाटील यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. पारंपरिक शेतकरी जीवन आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी समाजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. महिलांना सक्षम करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती.

Vandana prabhakar patil yancha pravas

स्वयंसहाय्यता गटाची स्थापना

  २ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी गायत्री स्वयंसहाय्यता समूह स्थापन केला. सुरुवातीला १० महिला एकत्र आल्या. आवळा कँडी, आवळा पावडर, आवळा सरबत, उडीद पापड, लिंबू लोणचं, भाजणी चकली अशी घरगुती उत्पादने तयार करून विक्री सुरू केली.

   शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी गटाला बळ दिलं. त्यांचा मंत्र होता – “अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही.”


कोरोना काळातील संघर्षातून संधी

  सन २०२० मध्ये जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा समूहाला मोठा फटका बसला. पण त्यांनी हार मानली नाही. वंदना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ९०,००० मास्क शिवून विकले. या उपक्रमातून ₹९ लाखांचा महसूल मिळाला. गावातील १५ महिलांना रोजगारही उपलब्ध झाला. यातून सिद्ध झालं की संकटाच्या काळातही महिलांचा जिद्दीपणा गावाला सक्षम करू शकतो.

फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना

  एप्रिल २०२१ मध्ये गायत्री शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली. या शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद संख्या ३०० शेतकरी असून कंपनीचा उद्देश  शेतमालाच्या योग्य दराची हमी आणि सामूहिक मार्केटिंग हा आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याचे काम करत आहे.

Vandana prabhakar patil yancha pravas

गायत्री फूड्स : आधुनिक प्रक्रिया उद्योग

  १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जागतिक महिला उद्योजिका दिनानिमित्त त्यांनी गायत्री फूड्स या प्रक्रिया उद्योगाची स्थापना केली.

प्रमुख उत्पादने

    टोमॅटो पावडर, अद्रक, लसूण, कांदा पावडर, बीट फ्लेक्स, पुदिना व कढीपत्ता पावडर, शेवगा पानांची पावडर (मोरिंगा), केळफूल पावडर या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल वाया जाणं थांबलं आणि गावातील महिलांना रोजगार मिळाला.

Vandana Prabhakar patil yancha pravas

वेस्टपासून बेस्ट – नाविन्यपूर्ण प्रयोग

    वंदना पाटील यांनी केवळ भाजीपाला प्रक्रिया केली नाही, तर वाया जाणाऱ्या उत्पादनांपासून नवीन मूल्यवर्धित पदार्थ तयार केले. केळफूल पावडर : मधुमेही रुग्णांसाठी पौष्टिक सूप तयार झाले. शेवग्याची पाने : कुपोषित मुलांसाठी बुस्टर म्हणून वापर.

   हा आशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता ज्याला केंद्रीय उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली. “मुसा फ्लॉवर सूप” हे उत्पादन आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होण्यासाठी सज्ज आहे.

ग्रामविकासातील योगदान

    वंदना पाटील यांनी केवळ स्वतःचा उद्योग उभारला नाही, तर समाजासाठीही अनेक उपक्रम केले त्यात पाणी फाऊंडेशन कामात श्रमदान, गावात वृक्षारोपण व संगोपन, वृद्धाश्रमात दिवाळी फराळ वाटप, दीपस्तंभ मनोबल केंद्राला देणगी त्यामुळे त्यांचे नाव केवळ उद्योजिका म्हणूनच नव्हे तर समाजसेविका म्हणूनही घेतले जाते.

Vandana Prabhakar patil yancha pravas

पुरस्कार आणि मान्यता

   त्यांच्या कार्याला अनेक मान्यता मिळाल्या आहेत : हिरकणी नवउद्योजिका पुरस्कार ₹५०,०००, महिला किसान दिन सत्कार – ऑक्टोबर २०२१, महिला दिन सत्कार कृषी विज्ञान केंद्र, जळगाव, लेवा गुर्जर मंडळ आणि ग्रामपंचायत पळासखेडा कडून सन्मान, १०१ प्रतिभावान महिला सन्मान – लिट्ल हेल्प ट्रस्ट व रेडिओ मेरी आवाज तर्फे, लखपती दिदी पुरस्कार – देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान – सोलर ड्रायिंग प्रकल्प २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत पळासखेडा येथे ₹३.९८ लाखांचा सोलर ड्रायिंग प्रकल्प राबविण्यात आला.

   प्रकल्पातून महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून सौर ऊर्जेच्या साहाय्याने निर्जलीकरण केले जाते. या प्रकल्पामुळे किमान १०० महिलांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.

नव्या पर्वाची सुरुवात – ₹३ कोटींचा प्रकल्प

  अलीकडेच केंद्र सरकारकडून ₹३ कोटींचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होईल.

Vandana Prabhakar patil yancha pravas

प्रेरणादायी ठसा

    वंदना पाटील यांची कहाणी केवळ एका महिलेची नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण भागातील महिलांची प्रेरणा आहे. पाच एकर जमिनीतून सुरुवात करून त्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावर आपली छाप सोडली.

    त्यांनी सिद्ध केलं की “संकल्प पक्का असेल, तर मर्यादित साधनं असूनही यशाची शिखरे गाठता येतात.”

यशाचे सूत्र (Highlights)

शेती + प्रक्रिया उद्योग = मूल्यवर्धन

✅ वेस्टपासून बेस्ट उत्पादनांवर भर

✅ बचत गटातून FPC व उद्योगाची उभारणी

✅ स्थानिक ते जागतिक बाजारपेठेपर्यंत विस्तार

✅ महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण

निष्कर्ष

   उत्तर महाराष्ट्रातील पळासखेडा गावातील वंदना प्रभाकर पाटील यांनी बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि गायत्री फूड्स या माध्यमातून गाव, तालुका व जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज गावातील अनेक महिलांना रोजगार मिळतोय, शेतकऱ्यांचा माल वाया जात नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते आहे.

  त्यांची वाटचाल प्रत्येक उद्योजक, विशेषतः ग्रामीण महिलांसाठी, आशेचा किरण आणि प्रेरणादायी आदर्श आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...