name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): July 2025

आराध्या निकमची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (Aaradhya Nikam enters the London Book of World Records)

आराध्या निकमची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Aaradhya Nikam enters the London Book of World Records

Aaradhya nikamchi londan book of world record madhe nivad

नाशिक : शहरातील केवळ ८ वर्षांची आराध्या रोहिणी भूषण निकम (इ.४थी) हिने आपल्या कमी वयात 'Becoming a Smart Student' हे पुस्तक मराठी व इंग्रजी भाषेत लिहून जगात सर्वात लहान लेखिका म्हणून आपले नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (London Book of World Records) नोंदवले आहे.

    या विशेष यशाबद्दल तिला पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री दर्जाचे श्री. रघुनाथ कुचित, लोकसभा सदस्य राजेंद्र मोडक, एमआयटीचे संचालक महेश थोरवे, इंटरनॅशनल प्रेसिडेंट अविनाश सुकुंडे, लायन रवी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.


Aaradhya nikamchi londan book of recordmadhe nond

       

  आराध्याच्या या पुस्तकात विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास, तसेच आहार, वर्तन, एकाग्रता, दिनचर्या या विषयांचा समावेश आहे. हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालक व शिक्षकांसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहे.

      या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री दादाजी भुसे व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते. आराध्याला तिच्या या यशासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, आमदार सुहास कांदे, रावसाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा व सन्मान प्राप्त झाला आहे.

   आराध्याचे हे यश संपूर्ण राज्यासाठी, विशेषतः नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून तिच्या आई-वडिलांचे विशेष योगदान तिच्या या विक्रमी प्रवासात महत्त्वाचे ठरले आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

संकरित बियाण्यांचे वाण, कृषी क्षेत्राला देईल जान ! (Hybrid seed varieties will give life to the agricultural sector) !

संकरित बियाण्यांचे वाण, कृषी क्षेत्राला देईल जान !
Hybrid seed varieties will give life to the agricultural sector !


Sankrit biyananche wan


  जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक असलेल्या आपल्या देशातील लोकांची अन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी प्रचलीत वा परंपरागत बियाण्यांच्या वापराने पूर्ण होणे अवघड आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व संकरित बियाणांचा वापर ही काळाची गरज बनली आहे. यामुळे उत्पादन वाढ व रोजगारनिर्मिती होईल. संकरित बियाणे उत्पादनांविषयी उपयुक्त माहितीचा ब्लॉग...


 कृषी उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी बियाणे हा एक मूलभूत घटक आहे. संकरित व सुधारीत यांच्या प्रसाराबरोबरच त्यांचे स्रोत, बियाण्याची अनुवंशिक शुद्धता कायम राखल्यास कृषी उत्पादन वाढीचे ध्येय साध्य करणे शक्य आहे. उच्च उगवणशक्ती, अनुवंशिक व भौतिक शुद्धता, रोग व किडीपासून व इतर भेसळीपासून मुक्त बियाण्यास शुद्ध बियाणे म्हणता येईल. 

     आधुनिक शेती शास्त्रात शुद्ध व चांगले गुण असलेल्या बियाण्यांचा वापर हे सर्वात स्वस्त व शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचणारे भांडवल आहे. विविध कृषी संशोधन केंद्रातून अनेक वाण गरजेनुसार प्रसारित झालेले आहेत. परंतु या महत्त्वाच्या वाणांचे बीजगुणन होऊन ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाणे महत्त्वाचे आहे. तमाम शेतकऱ्यांची, संस्थांची गरज आणि मागणी लक्षात घेता देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठानी विकसित केलेल्या अधिक उत्पादनक्षम व जास्त फुटवे असणाऱ्या बुटक्या रोगप्रतिकारक, खताच्या मात्रांना प्रतिसाद देणाऱ्या व लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन होणे आवश्यक आहे. 

  सन १९७९-८० पासून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ प्रमाणित बियाणे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करून बीजोत्पादन क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करत आहे. याबरोबरच खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या बी-बियाणे निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.

  शेतीमध्ये नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व त्यापासून नफा मिळविणे हे शेती व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. इतर नगदी पिके घेण्यापेक्षा प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असून तांत्रिकदृष्ट्या ते सोपे आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी वर्ग बीजोत्पादनामध्ये सहभागी होत आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम या संस्था शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बियाणे खरेदी करतात. मात्र त्यासाठी या संस्थांशी करारनामा करावा लागतो. संकरित जातींच्या बियाण्याचे भाव हंगामापूर्वीच ठरवून देतात तर सुधारित वाणाच्या बियाण्याला त्या हंगामातील बाजारभावापेक्षा किफायतशीर भाव देतात म्हणून शेतकऱ्यांनी प्रमाणित बीजोत्पादनामध्ये सहभागी होऊन देशाची, राज्याची वाढीव बियाण्यांची उणीव भरून काढून स्वतःची शेती किफायतशीर करावी. 

बीजोत्पादन कार्यक्रम :

   बीजोत्पादनात सर्वप्रथम शुद्ध बियाणे म्हणजे उच्च उगवणशक्ती, अनुवंशिक व भौतिक शुद्धता, रोग व किडीपासून व इतर भेसळीपासून मुक्त बियाणे यांचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शुद्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी बियाण्यास निरनिराळ्या अवस्थांतून जावे लागते. गहू बीजोत्पादनाचा कार्यक्रम खालीलप्रमाणे पैदासकारांच्या स्तरावर राबविण्यात येतो.

Sankrit biyananche wan

केंद्रक बियाणे :

  नवीन जात विकसित होऊन प्रसारित झाल्यावर पीक पैदासकाराकडे जे बियाणे असते. त्यापासून बीजगुणन केलेल्या बियाण्यास केंद्रक बियाणे असे म्हणतात. केंद्रक बियाणे बीजोत्पादनाचा कार्यक्रम पैदासकाराच्या वैयक्तिक देखरेखीखाली राबविला जातो. बीज प्रमाणीकरणाची मानके, त्याचे गुणवैशिष्टये तपासून मग त्याला केंद्रक बियाण्याचा दर्जा दिला जातो.

मूलभूत बियाणे :

   केंद्रक बियाणे वापरात आणून जे बीजगुणन केले जाते त्याला पैदासकार किंवा मूलभूत बियाणे म्हणतात. मूलभूत बियाणे तयार करताना त्या जातीच्या बीजगुणन क्षेत्रातून संबंधीत जातीचे गुणधर्म असलेले जास्त उत्पादन देणारी सुमारे ५०० ते १००० झाडे निवडून वेगळे ठेवतात. पुढील वर्षी अशा निवडलेल्या योग्य झाडांची दोन ओळीत पेरणी करतात. पिकांची वाढ झाल्यावर अशा सर्व ओळीचे निरीक्षण केले जाते व ज्या ओळीतील सर्व झाडे मूळ जातीच्या गुणधर्मानुसार असतात तेवढ्याच ओळी निवडल्या जातात. निवडलेल्या प्रत्येक दोन ओळींची स्वतंत्रपणे अलग काढणी करतात. उत्पादनाच्या दृष्टीने सांख्यिकीदृष्टया सरस ठरलेल्या ओळींचे उत्पादन एकत्र केले जाते व त्यांचा मूलभूत बियाणे वाढीसाठी उपयोग केला जातो. 

पायाभूत बियाणे : 

 पायाभूत बियाण्यांचे बीजोत्पादन कृषी विद्यापीठे, तालुका बीजगुणन केंद्र व इतर संस्था येथे घेतले जाते. पायाभूत बियाणे घेतलेले क्षेत्र बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे ठराविक नमुन्यात अर्ज करून नोंदणी करावी लागते. या क्षेत्रास पिके पैदासकार, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व बीज प्रमाणिकरण अधिकारी कमीत कमी २ ते ३ वेळा तरी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करतात. जर या क्षेत्रात भेसळ असेल तर ते क्षेत्र नाकारले जाते. अशा रीतीने पायाभूत बियाणे तयार केले जाते.

प्रमाणित/सत्याप्रत बीजोत्पादन : 

  सत्यप्रत बियाणे उत्पादनासाठी पायाभूत बियाण्याचा दर्जा असलेले बियाणे वापरात आणले जाते. वरील बीजोत्पादनाच्या कार्यक्रमात फक्त पायाभूत किंवा सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम शेतकरी बांधवांना राबविणे शक्य आहे.

बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :
जमिनीची निवड : 

 बीजोत्पादन पिकासाठी जमिनीची निवड करताना मागील हंगामामध्ये त्याच प्रकारचे पीक घेतलेली जमीन निवडू नये. तसेच क्षेत्र सर्व बाजूंनी विलग करावे. बीजोत्पादन पिकासाठी मध्यम खोल व चांगल्या निचऱ्याची तणरहित समपातळीची जमीन निवडावी. अतिशय भारी, निचरा न होणारी किंवा वरकस जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये.

विलगीकरण अंतर :

 बीजोत्पादन पिकांची अनुवंशिक शुद्धता राखण्यासाठी बीजोत्पादनाचे क्षेत्र व इतर पिकांचे अथवा वाणांचे क्षेत्र यात योग्य ते अंतर ठेवतात. त्याला परागीकरण म्हणतात. विलगीकरण अंतर पिकाच्या परागीकरणाच्या पद्धतीवर अवलंबून असते. परागीकरणाच्या प्रकारानुसार पिकांचे वर्गीकरण स्वयंपरागीत, परपरागीत, किंचित परपरागीत अशा तीन प्रकारांमध्ये केले जाते.

पेरणीची पद्धत : 

 संकरित पिकांच्या बीजोत्पादनामध्ये नर व मादी वाणांचा समावेश असतो. या पिकांची पेरणी करताना नर वाण व मादी वाण, ओळीचे प्रमाण उदा. संकरित ज्वारीमध्ये २:४ किंवा १:२, बाजरीमध्ये २:४, मका २:५ असे ठेवावे लागते. तसेच बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती नर वाणाच्या ४ ते ६ ओळी पेराव्यात. संकरित पिकांच्या बीजोत्पादनामध्ये नर वाणांच्या ओळी याव्यात म्हणून त्या ओळींना टॅग लावून किंवा खुंट्या लावून खुणा कराव्यात. संकरीत पिकांच्या वाणांमध्ये पेरणी करताना नर वाण व मादी वाणाच्या लागवडीमध्ये जरूर ते अंतर ठेवावे. म्हणजे नर वाण व मादी वाण एकाच वेळी फूलावर येऊन बीजधारणा होण्यास अडचण येत नाही. पेरणीसाठी वापरलेल्या बियांची पिशवी व तिचे लेबल जपून ठेवावे. पिशवी खालच्या बाजूने फोडावी म्हणजे लेबल पिशवीला लावलेले राहते ते पिशवीचे लेबल प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्याने तपासून पाहिल्याशिवाय पहिली तपासणी केली जात नाही.

प्रक्षेत्र तपासण्या :  

   पीक पेरणीनंतर पिकांची काढणी करेपर्यंत पिकांच्या परागीकरणाच्या पद्धतीनुसार २ ते ४ वेळा बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रक्षेत्र तपासण्या केल्या जातात. पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये प्रक्षेत्राची तपासणी केली जाते. बीज प्रक्षेत्राची तपासणी करतांना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. भेसळयुक्त झाडे काढण्याबाबतही सूचना दिल्या जातात.

भेसळ झाडे काढणे : 

   बीजोत्पादनामध्ये बियाण्यांची अनुवंशीक शुद्धता राखण्यासाठी पिकांमधील भेसळयुक्त झाडे काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. पीकवाढीची अवस्था व फुलोऱ्याची अवस्था यामध्ये पिकांच्या जातीच्या गुणधर्मानुसार बीजोत्पादन क्षेत्रामधील भेसळ झाडे ओळखून उपटून टाकावीत. भेसळ झाडे, खोडाचा रंग, पानांचा रंग, मांडणी व आकार, फुलांचा रंग, झाडाची उंची, कणसाचा आकार इत्यादीवरून झाडे ओळखावीत तसेच मादी वाण, ओळीमधील नराची झाडे व रोगट झाडे व इतर पिकांची झाडे उपटून टाकावीत. 

Sankrit biyananche wan


नोंदणी : 

  पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादनासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात माहिती भरून नोंदणी फीसह पाठवावे. बीजोत्पादन पिकाची नोंदणी पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत करावी. बीजोत्पादन क्षेत्राच्या प्रमाणीकरणासाठी आवश्यक ती फी भरावी लागते.

बीज प्रक्रिया :

  शेतकऱ्यांचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर अवलंबून आहे. बियाणे उगवले नाही तर पीक चांगले येत नाही. बियाण्यामध्ये भेसळ असेल तर त्यांची किंमत बरोबर मिळणार नाही. रोगमुक्त बियाणे नसेल तर रोगराई जास्त होऊन उत्पन्न कमी येईल. हे सर्व टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही बियाण्याचा ओलावा नेमून दिलेल्या मानकापेक्षा जास्त असता उपयोगी नाही अथवा बियाण्यास नुकसान होईल असे बियाणे प्रथम नीट वाळवून घ्यावे व मगच प्रक्रिया करून घ्यावी. प्रक्रिया केंद्रावर खालीलप्रमाणे प्रक्रिया राबविली जाते. (१) सर्व बियाण्याचे चाळण करून शुद्ध बियाणे हे घाण, काडी कचरा व इतर पिकांच्या जातीच्या बियाण्यांपासून वेगळे करण्यात येते. 

(२) शुद्ध बियाण्यास कीड व रोगप्रतिबंधक औषध चोळण्यात येते. 

(३) प्रमाणित बियाणे, प्रमाणिकरण यंत्रणेने निश्चित केलेल्या दर्जा आणि आकारमानाच्या पिशव्यांत, पोत्यात ठरवून दिलेल्या वजनाप्रमाणे भरण्यात येते. वाळवून व औषधे लावून घेतलेल्या बियाण्यांचा नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविला जातो. बीज परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पिशव्या व पोते शिवून मोहोरबंद केल्यानंतर व त्याप्रमाणे ठरलेल्या बियाण्यांस प्रमाणपत्र देण्यात येते.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतीतील अचूक निर्णयांसाठी स्मार्ट मार्गदर्शक ! महाविस्तार-एआय (Smart guide for accurate decisions in agriculture! Mahavistar-AI)

शेतीतील अचूक निर्णयांसाठी स्मार्ट मार्गदर्शक!
महाविस्तार-एआय
Smart guide for accurate decisions in agriculture Mahavistar-AI

Shetitil achuk nirayasathi smart margdarshak: mshavistar AI

 राज्याच्या कृषी विभागाने विकसित केलेले "महाविस्तार एआय" हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भेट आहे. केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय विस्तार फ्रेमवर्क अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या ॲपद्वारे शेतकऱ्यांना हवामान, मृदा, बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण तसेच विविध शासकीय योजनांची एकत्रित आणि शास्त्रशुद्ध माहिती रिअल टाइममध्ये मिळते. 


   या ॲपमार्फत  मराठी व इंग्रजी भाषेत चॅटबोटमार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकणार असल्याने शेतीतील अचूक निर्णयासाठी महाविस्तार एआय ॲप स्मार्ट मार्गदर्शक म्हणून काम करणार


महाविस्तार ॲपची वैशिष्ट्ये 

  विद्यापीठांच्या मार्गदर्शनासह, हवामान, मृदा, मंडई,  शेती उपकरणे, गोदाम आणि शासकीय योजनांची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषामध्ये   शेतक-यांना उपलब्ध आहे.


कसे कराल ॲप डाउनलोड?

   महाविस्तार ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर MAHAVISTAAR-AI असे सर्च करावे, ॲप इन्स्टॉल केल्यावर शेतकयांना खालील विषयांवर माहिती बघता येईल.


पीक सल्ला : 

  तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके भाजीपाला, फळे, मसाला पिकांसाठी पूर्वमशागत काढणीपर्यंत सल्ला

  प्रमाणित कार्यपद्धती, प्रमाणित योग्य निवड, पेरणी, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कापणी व मोजणी, साठवणूक बाबत विविध पिकांच्या मशागतीच्या प्रमाणित कार्यपद्धती बघता येतील


मृदा आरोग्य पत्रिका: 

 आपल्या जमिनीच्या आरोग्याविषयी तपशीलवार माहिती


खत मात्रा गणकः 

पीक, क्षेत्र आणि पोषक तत्वांच्या आधारे अचूक खत गणना

हवामान आधारित पेरणी, वाढीच्या अवस्था, कापणी इत्यादीसाठी तंत्र

मार्गदर्शन, सुरक्षित फवारणी, पिकाची काढणी, मळणी साठवणूक तंत्रज्ञानाविषयी माहिती


किड व रोग नियत्रंण:

पीकनिहाय रोगांची ओळख व उपाय


बाजारभाव 

जिल्हानिहाय आणि पीकनिहाय बाजारभावांची रिअल टाइम माहिती


डिजिटल शेती शाळा: 

झुम लिंक आणि व्हिडीओ, डिजिटल प्रशिक्षण


गोदाम उपलब्धता : 

जिल्हानिहाय गोदामांची माहिती आणि संपर्क क्रमांक


 जिल्ह्यातील शेतक-यांनी महाविस्तार-एआय ॲप डाऊनलोड करुन शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शास्त्र शुद्ध, अचूक आणि वेळेत सल्ला मिळवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सौर कृषिपंप योजनेतून मुबलक वीज उपलब्ध होणार : मंत्री भुजबळ (Abundant electricity will be available through solar agricultural pump scheme: Minister Bhujbal)

सौर कृषिपंप योजनेतून मुबलक वीज उपलब्ध होणार : मंत्री भुजबळ 
Abundant electricity will be available through solar agricultural pump scheme: Minister Bhujbal

Sour krushipump yojnetun mublak vij uplabdh honar: mantri Bhujbal

   शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शेतीसाठी वीज ही अतिशय महत्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होण्यासाठी सौर कृषिपंप योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असून, लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


  निफाड येथील माणुसकी फाऊंडेशन आणि ॲग्रो केअर कृषी मंच आयोजित कृषी प्रेरणा पुरस्कार सोहळा नुकताच निफाड येथे  नक्षत्र हॉलमध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

Sour krushipump yojnetun mublak vij uplabdh honar :  mantri Bhujbal

   यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजीराव ढेपले, राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, बाळासाहेब पुंड, दत्ताकाका रायते, सचिन होळकर,सुरेखा नागरे, सुवर्णा पगार, सुमनताई शेलार, पांडुरंग राऊत, राहुल डुंबरे, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


   यावेळी कृषी क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस  अभिवादन करत मंत्री भुजबळ म्हणाले की येवला, निफाड परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. मात्र, अनेकदा कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतात, त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागा कांदा उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली.

Sour krushipump yojnetun mublak vij uplabdh honar : mantri Bhujbal

   ॲग्रोकेअर कृषी मंचसारखी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचं प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन, मार्गदर्शन, तालुका व जिल्हास्तरीय प्रेरणादायक शेतकऱ्यांचा सन्मान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, महिलांसाठी प्रशिक्षण असे विविध कार्यक्षेत्र हाताळणं ही खरोखरच विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर पत्रकार सागर निकाळे यांच्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नियमित राबविले जात असून या संस्थेचे काम देखील कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी मांडले.

Sour krushipump yojnetun mublak vij uplabdh honar : mantri Bhujbal

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,  ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी दीपक पगार यांची निवड (Deepak Pagar elected as member of Agricultural Prices Commission)

कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी दीपक पगार यांची निवड 
Deepak Pagar elected as member of Agricultural Prices Commission

Krushi mulya aayogachya sadasyapad deepak pagar yanchi nivadi

  रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख उत्राणे गावचे भूमिपुत्र दीपक पगार यांची राज्य सरकारने नुकतीच राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल नामपूर बाजार समिती संचालकांच्या वतीने त्यांचा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 
  
  दीपक पगार हे महाविद्यालयीन जीवनापासून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने झटत आहेत. आजपर्यंत त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असंख्य आंदोलने केली आहेत. शरद जोशी, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी आजपर्यंत शेतकरी संघटनेत काम केले आहे. 
     
    त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पणनमंत्री जयकुमार रावल, सदाभाऊ खोत यांनी त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळवून दिली आहे. आगामी काळात या पदाच्या माध्यमातून भुसार कडधान्य, कापूस तसेच कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सत्कारप्रसंगी नामपूर बाजार समिती संचालक विलास सावंत, सयाजी देवरे, के. पी. कापडणीस, गुलाब भामरे उपस्थित होते. शेतकरी वर्गातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी (Opportunity for farmers to study abroad)

 शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी
Opportunity for farmers to study abroad

Shetkaryana pardeshat abhyas douryachi sandhi

 नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार असून त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.


  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करण्यास साहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी आदींद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी १६ जून २०२५च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राबविण्यात येत आहेत.


   या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेले संभाव्य देशांत युरोप, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये १२ दिवसांत फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, तर इस्त्राईलमध्ये ९ दिवसांत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण तसेच जपानमध्ये १० दिवसांत सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्समध्ये १२ दिवसांमध्ये फळे, भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली, चीनमध्ये ८ दिवसांत विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरियातील ८ दिवसांत आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत माहिती अवगत करण्यात येणार आहे. 


  शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख यापैकी जी कमी असेल, ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.


  या अभ्यासदौरा यासाठी पुढील कागदपत्रे जोडावीत त्यात विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र १, स्वयंघोषणापत्र, वैध पारपत्राची छायांकित प्रत, सातबारा उतारा, ८ 'अ'ची मूळ प्रत (कालावधी मागील सहा महिने), शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र मूळ प्रत ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 


  तालुकास्तरावरून विहित कालावधीमध्ये प्राप्त पात्र प्रस्तावांची अभ्यासदौऱ्याच्या निवडीकरिता जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल. त्यानुसार जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुसार एक महिला शेतकरी, एक केंद्र, राज्य पुरस्कारप्राप्त तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. योजनेतंर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी २३ जुलैपर्यंत जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.

Shetkaryana pardeshat abhyas douryachi sandhi

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे (Farmers should take advantage of various government schemes to improve their standard of living: Agriculture Minister Manikrao Kokate)

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : कृषिमंत्री ना.  माणिकराव कोकाटे 
Farmers should take advantage of various government schemes to improve their standard of living: Agriculture Minister  Manikrao Kokate

Shetkaryanche jivanman unchavanyasathi shasanachya vividh yojanancha labh ghyava.

   शेतकरी हा विविध समस्यांना सामोरे जात आहे. शासन आपल्या स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप सलादे बाबा प्रतिष्ठान सारख्या स्वयंसेवी संस्थांनी दिल्यास शेतकरी करीत असलेल्या कार्याबद्दल अजूनच प्रोत्साहन मिळेल. असे मत राज्याचे कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले ते छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम बापू पाटील हे होते 


        वडनेरभैरव येथील सलादे बाबा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्हास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान सोहळ्याचे आयोजन १२ जुलैला हॉटेल दौलत शिरवाडे वणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृषिमंत्र्यांच्या हस्ते आयोजित केले होते. यावेळी स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे व ॲड पोपटराव पवार यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व नाथउपदेशी सलादे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.


Shetkaryanche jivanman unchavanyasathi shasanachya vividh yojanancha labh ghyava

   यावेळी खा.भास्करराव भगरे, आ. दिलीप काका बनकर, आ.डॉ. राहुल आहेर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, मविप्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बापू मोरे, जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन आहेर, स्वाभिमानी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कादवा कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजी दादा  बस्ते , राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, संचालक भाऊसाहेब देवराम भालेराव, दिलीप धारराव, रामभाऊ भालेराव, दत्ता शिंदे, बाळासाहेब माळी, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भवर, एन.डी दादा माळी, साहेबराव तात्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

       

    गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक ट्रस्टचे  संस्थापक सुरेश सलादे यांनी केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार अध्यक्ष नाना पाटोळे, उपाध्यक्ष रामचंद्र आप्पा मोरे, सरचिटणीस राहुल पाचोरकर, विश्वस्त दीपक पाचोरकर यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम बापू पाटील व आदर्श सरपंच हा सन्मान मिळाल्याबद्दल सरपंच रावसाहेब भालेराव यांचा सत्कार कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. 


  ग्रामपालिकेच्या वतीने सरपंच यांनी वडनेरभैरवला वेदर स्टेशन व्हावं म्हणून निवेदन दिले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन याप्रमाणे ४५ शेतकऱ्यांचा सन्मान मंत्री कोकाटे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.डॉ. राहुल आहेर, आ. दिलीप काका बनकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ॲड. पोपटराव पवार यांची भाषणे झाली यावेळी गौरव स्वीकारणाऱ्यांच्या वतीने अनिल पुंजाराम कड पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


Shetkaryanche jivanman unchavanyasathi shasanachya vividh yojanancha labh ghyava

   कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असून शेतकरी हा राज्यातील एक महत्त्वाचा घटक असून या बळीराजाला प्रत्येकाने योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे असा सन्मान स्वयंसेवी संस्था सलादे बाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत असल्याने नक्कीच स्वागतार्ह बाब असून त्यांचे याबद्दल अभिनंदन करावेसे वाटते. 


  आसमानी आणि सुलतानी संकटे बळीराजाला येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचवण्यासाठी  तसेच शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेचा प्रचार आणि प्रसार जागृत शेतकऱ्यांनी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले


 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अनिल पवार उत्तम भोसले मंगेश पवार, किशोर शिरसाठ महेंद्रसिंग परदेशी, नवनाथ पाटील, दत्तात्रय निखाडे यांनी परिश्रम घेतले. आभार सुरेश तात्या उशीर यांनी मानले.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...