name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): February 2025

व्यापारवृद्धीसाठी बारा कानमंत्र (Twelve mantras for business growth)

व्यापारवृद्धीसाठी बारा कानमंत्र 
Twelve mantras for business growth

Vyapar vriddhisathi bara kanmantra

  कोणताही व्यापार यशस्वीपणे करावयाचा असेल तर खालील कानमंत्र व्यापारीबंधूनी आत्मसात करावयास हवेत. त्यायोगे व्यापारात वृद्धी होईलच.

१) अभ्यासू वृत्ती : Industriousness -

 मनुष्य जन्मभर विद्यार्थी असतो हे व्यापार क्षेत्रात पण खरे आहे. व्यापारात अभ्यासू वृत्ती नसेल तर आजच्या यांत्रिक युगात तुमचा पाडाव होणार हे निश्चित ! व्यापारात स्पर्धा असते, नव्हे ती अतिशय तीव्र असते. भांडवलापेक्षा आजच्या व्यापारात कल्पकतेला जास्त महत्व आहे. कल्पकता वाढविण्यासाठी अभ्यासू वृत्ती, निरीक्षण, माहिती घेणे यांची जरूरी असते. सुसंवाद साधून माहिती मिळवता येते. त्या त्या धंद्याची संपूर्ण अनुरूपता ठरवावी लागते. आणि मग उडी मारावी लागते.

२) धाडसी वृत्ती : Courageousness -

  अशास्त्रीय निष्कर्षाचे ठोकळे आपण कुरवाळत असतो. धाडसी वृत्ती ही अभ्यासाने, कल्पकतेने, अनुभवाने वाढवावी लागते. बाजारपेठेचे सूक्ष्म ज्ञान अगदी २०-३० वर्षांचा अनुभव असला तरी - एखादी वस्तू बाजारात खपेल की नाही याचा अंदाज करता येत नाही. समाजाच्या अभिरुचीचा, त्यांच्या मनाचा शंभर टक्के अंदाज कधीच कोणाला बांधता येत नाही. अगदी क्षुल्लक कारणाने पण लोकांची मनोवृत्ती बदलते व लोक ती वस्तू घेत नाहीत. व्यापारात धाडस जरूर पाहिजे. कल्पकतेने जोखीम स्वीकारावी लागते. बाजारपेठेचे, समाज मनोवृत्तीचे ज्ञान असावे लागते. आपला ग्राहकवर्ग, त्याची मानसशास्त्रीय वृत्ती याचे ज्ञान घेणे आवश्यक असते.

 काही उद्योगपती, उत्पादक म्हणतात, "आम्ही लोकांची अभिरुची बदलू, त्यांना आमच्या मर्जीप्रमाणे वाकवू." सद्यःस्थितीत हे शक्य नाही. सर्वच घरात क्रयशक्ती वाढली आहे. आज सोशल मीडिया, रेडिओ, टी. व्ही, वर्तमानपत्रे ही जाहिरातींची माध्यमे अभिरूची घडवण्यास कारणीभूत ठरतात.

३) नावीन्याचा सोस : Innovation -

  नावीन्याचा सोस हा सनातन वारसा आहे. निरनिराळ्या फॅशन्स हा नावीन्याचाच भाग आहे. नाटक, सिनेमा व जाहिरातदार त्याची माहिती देतात. सावधानता हा गुण व्यापाऱ्याला आत्मसात करावा लागतो.

४) मंदीची लाट : Recession -

  व्यापारात तात्पुरत्या मंदीच्या लाटा नेहमी येतात. बजेटमध्ये करवाढ झाल्यास तात्पुरती मंदी येतेच. लोकांच्या मनातील मरगळ संपली की, व्यापार वाढतो. मंदी ही नेहमी व्यापाऱ्याच्या दृष्टीने मारक ठरते.

५) महागाई : Inflation - 

   लोकसंख्येचा भस्मासूर वाढत आहे. वैद्यकीय शोधांमुळे मृत्यूचे प्रमाण घटत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती कमी व खाणारी तोंडे जास्त हा प्रकार आहे. कामगारांच्या महत्वाकांक्षा वाढत आहेत. हक्काने ते पगारवाढ पदरात पाडून घेतात. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वाढल्याने उत्पादनखर्च वाढला आहे.

६) बाजारपेठ : Market -

  कल्पक उत्पादक नवीन गरजा समाजात निर्माण करतात. ती वस्तू खुशीने लोकांना घ्यायला प्रवृत्त करतात. बाजार लक्ष्य ठरवायला कल्पकता फायदेशीर ठरते.

७) विक्रीची आधुनिक तंत्रे : Modern sales techniques - 

 मानसशास्त्रात लागलेल्या नवनव्या शोधांमुळे विक्री तंत्रात अद्भुत क्रांती झाली आहे. जाहिरातशास्त्र प्रगत आहे. उत्पादनाचा निम्मा खर्च या जाहिरातीवर होतो. जाहिरातीची नवनवीन माध्यमे शोधली जात आहेत. निरनिराळ्या तंत्राचा अवलंब केला जात आहे.

८) मनुष्य हा घटक : Human factor -

  मनुष्य हा प्रमुख घटक मानून व्यापार-तंत्र ठरवावे लागते. मानसशास्त्राचा अभ्यास करून उपभोग्य वस्तूंचा आस्वाद घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करावे लागते. 

९) यशस्वी व्यापाराचा मूलमंत्र : The key to successful business -

 आत्मविश्वासपूर्वक सर्व बाजूंचा विचार करून छोट्या प्रमाणात सुरुवात करून कष्टाने, जिद्दीने अतिलोभाच्या आहारी न जाता चिकाटीने लोकप्रियता व विश्वास संपादन करणाऱ्याने धंदा करावा. भ्रष्टाचार, स्मगलिंग अशा रानटी स्पर्धेला तोंड देत शास्त्रशुद्ध पद्धतीने पाया भरभक्कम करायला हवा.

१०) महत्वाकांक्षी व्हा : Be ambitious -

  स्पर्धेने स्फुरण चढायला हवे, उत्साह सळसळला पाहिजे. कल्पनांनी बाजारपेठ फुलविली पाहिजे, बाजारपेठेचा इतिहास, भूगोल अभ्यासला पाहिजे. अल्पसमाधानी न राहता महत्वाकांक्षी व्हायला हवे. रास्त मार्गाने समृद्धी मिळविण्यात काहीच गैर नाही.

११) निराशेला रामराम :  End despair - 

   फायदा-तोटा असे जरी गणित व्यापारात असले तरी अपयशाची पर्वा न करता निराशेला रामराम करून उत्साही मनाने, कष्टाने यशस्वी व्हायला हवे. चंगळवादाच्या आहारी न जाता, ऐषआरामी न होता अथवा नुसते दैववादी न बनता कार्यप्रवण राहिले पाहिजे. दैववादाच्या पाया पडण्यापेक्षा निराशेला रामराम ठोकून आत्मविश्वास, उत्साह वाढविला पाहिजे. वर्तमानकाळातील गोष्टीला सामोरे जाऊन भविष्य घडविले पाहिजे. 

१२) आक्रमक वृत्ती : Aggressive attitude -

 व्यावसायिक आक्रमक वृत्तीचाच हवा. भित्रा, लोकेच्छा मानणारा यश मिळवू शकेलच असे नाही. संधी ही चालून येत नाही. तिला खेचून आणावे लागते 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' ही आध्यात्मिक वृत्ती व्यापारास पोषक नाही. ही संस्कृती परिस्थितीशरण होण्यास कारणीभूत ठरल्याने आक्रमक वृत्तीचा अविष्कार हा आवश्यक गुण आहे. 

© श्री. दीपक केदू अहिरे, नाशिक
पूर्व प्रसिध्दी : व्यापारी मित्र-डिसेंबर २००० 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कामधेनु दत्तक ग्राम योजना (Kamdhunu Dattak gram yojna)

  

कामधेनु दत्तक ग्राम योजना
Kamdhenu Dattak gram yojna

Kamdhenu adoptive village scheme

 कामधेनू दत्तक ग्राम योजना राज्यातील विविध जिल्हा परिषदांमार्फत चालवली जाते. पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 

 गाई व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येते. संबंधित गावामध्ये योजनाबद्धरीत्या पशुसंवर्धकविषयक कार्य मोहिमा हाती घेण्यात येतात.

  कामधेनु दत्तक ग्राम योजनेत जनावरांना चारा, औषधी, लसीकरण, वंध्यत्व निवारण, रोगनिरोधक तपासणी करून गायींच्या संख्येला वाढवण्यासाठी राबवली जाते. या योजनेमुळे गायींच्या संख्येला वाढवणे आणि दुध उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असते. कामधेनू योजना खालील दिलेल्या घटकाच्या आधारे राबवली जाते.

१) ग्रामसभेचे आयोजन

२) पशुगणना

३) पशुपालक मंडळ स्थापना

४) सहलीचे आयोजन

५) जंतनिर्मूलन शिबीराचे आयोजन

६) गोचिड, गोमाश्या निर्मुलन शिबीराचे आयोजन

७) रोग प्रतिबंधक लसीकरण

८) वैरण विकास योजना

९) वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

१०) निकृष्ट चारा सकस करणे

११) नाविन्यपूर्ण उपक्रम

१२) दुग्ध स्पर्धा व वासरांच्या मेळाव्याचे आयोजन

१३) अझोला लागवड

१४) मुरघास

१५) जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे व्यवस्थापन

१६) मुक्तसंचार गोठा

Kamdhenu adoptive village scheme

नैसर्गिक आपतीमध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी

  उन्हाळा व पावसाळा ऋतूमध्ये आणि अनुषंगिक अतिवृष्टी गारपिट, वीजपडणे व पूरपरिस्थिती या आपदांमध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी यासाठी वेळीच नियोजन शक्य होण्यासाठी वेळोवेळी प्रसिध्द होणा-या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे. त्यानुसार तयारी करावी. वेळोवेळी निर्गमित होणा-या शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे

जैव सुरक्षा

१. पावसाळ्यात अनुकुल वातावरणामुळे विविध रोगजंतूची वाढ झपाट्याने होत असते. त्यासाठी पशुधनाची व त्यांचा निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्वाची आहे.

निवारा

१. पावसाचे पाणी गळणे, भिंती ढासळणे, पशुधनाच्या शेडवर वृक्ष पडणे यामुळे पशुधनाचे नुकसान होऊ नये यासाठी पशुधनाच्या निवा-याची वेळीच डागडूजी करून घ्यावी. पाणी गळू नये म्हणून पशुधनाच्या निवाऱ्याच्या छताची डागडुजी करून घ्यावी. निवारा नसल्यास निवारा तयार करावा.

२. निवारा शक्यतो कोरडा राहील याची दक्षता घ्यावी.

३. गोठ्यातील जमिनीचा ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की शिंपडावी.

४. शेडचे व निवाऱ्याचे नियमित निर्जुतुकीकरण करावे.

५. पावसाचे पाणी पशुधनाच्या निवाऱ्याजवळ साचू नये यासाठी आवश्यक चर काढून ते साठणार नाही याची दक्षता घ्यावी.

चारा

१. नविन हिरव्या चाऱ्यामुळे हगवण, तसेच एचसीएन व नायट्रेट विषबाधा, हायपोमॅग्नेशियम टिटॅनी यासारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

२. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता ठेवावी, तो भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

३. पशुधनास पावसात चरावयास सोडू नये.

४. हिरवा चारा कापून पुरेसा साठा करून ठेवावा.

५ . नदीकडील भागात जनावरे चरावयास सोडू नये.

६. शक्यतो चारा पावसाने भिजलेला असू नये, तसेच साठवलेला चारा पावसाने मिजणार नाही याची दक्षता घ्यावी. साठवण कोरड्या जागेत असावी, बुरशी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच बुरशीयुक्त चारा देण्याचे शक्यतो टाळावे.

७. मुरघास साठवण चाऱ्यामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

८. पावसाळ्यात वातावरणाची तीव्रता / पावसाची दिर्घकालीन उघडीप / तणनाशक किंवा किटकनाशक फवारणी यांच्यामुळे उगवलेल्या गवतावर / चाऱ्यावर विपरीत परिणाम होऊन त्यातील विषद्रव्यांची साठवण वाढते त्यामुळे ते जास्त घातक ठरतात. नायट्रेट व एचसीएन विषबाधेच्या घटना वाढण्याची शक्यता जास्त असते.

Kamdhenu adoptive village scheme

पिण्याचे पाणी

१. स्वच्छ व निर्जतुक पाणी पशुधनास पिण्यास उपलब्ध असावे. पशुधन साचलेले पाणी पिणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पशुधनास साचलेले पाणी पिण्यास देऊ नये.

२. पिण्याच्या पाण्याच्या हौदाची स्वच्छता करावी. शेवाळ जमलेले असल्यास काढून टाकावे. या हौदास चुना लावून घ्यावा.

आरोग्य

१. साथरोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे / तज्ञाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

२. दुभत्या पशुधनाच्या कासेच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

३. गाभण, वीण्या योग्य, विलेल्या व नवजात वासरांची निगा घ्यावी

४. स्थलांतरीत पशुधनाची निवा-याची विशेष दक्षता घ्यावी.

५. जंत / कृमीनाशक औषधी पाजविणे.

६. बाह्यपरजीवींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी.

७. माशांच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधक औषधी फवारणी करावी. शेण व मुत्र विल्हेवाट लावावी.

८. शेण व लेंड्यांच्या विल्हेवाटीसाठी शेणखताचा खड्डा असावा. तो शेडच्या अतिजवळ असू नये. विसर्जीत मुत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा शोषखड्डा असावा.

उन्हाळ्यातील पशुधनाची काळजी

  उष्ण लहरी व उष्माघाताच्या विपरीत परिणामांपासून बचावासाठी पशुधन व्यवस्थापनात काय करावे व करू नये या बाबी खालीलप्रमाणे -

उष्णलहरीच्या वेळी काय करावे :

१. स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावे.

२. चारा व वैरण यांचा पुरेसा साठा ठेवावा.

३. पशुखाद्य देताना पुरेसे क्षार व जिवनसत्व मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.

४. दुभत्या पशुधनांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळा टप्या टप्प्याने किमान १ तास उशीराने ठेवाव्या. जेणेकरून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल.

५. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलरची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारणे / फवारणे किंवा म्हैसवर्गीय पशुधनासाठी शक्य असल्यास पाण्यात बसण्यासाठी स्वच्छ पाण्याच्या हौदाची सोय करावी.

६. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतो दिवसा १२ ते ४ या वेळी किंवा स्थानिक उन्हाच्या वेळानुसार) वेळी विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत अथवा थंड व भरपूर खेळती हवा असलेल्या जागेत बांधावे.

७. स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

८. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद अथवा इतर सुविधा गोठ्याजवळ व सावलीत असावी. नसल्यास अशा ठिकाणी सावलीसाठी शेड उभारण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून पशुधनास थेट उन्हाचा संपर्क येणार नाही.

९. अश्ववर्गीय पशुधनास उष्णलहरीपासून बचावासाठी पायाकडून शरीराच्या वरील भागास थंड पाण्याचा हळूवार शिडकावा करावा.

१०. गाभण पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा / वैरण द्यावे.

११. वराह प्रजातीच्या पशुधनास पुरेसा निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय असावी.

१२. कुक्कुट पक्षांसाठी वातानुकुलीत पक्षीगृह सर्वोत्तम असतात. तथापि ज्या पक्षीगृहांना अशी सोय नाही त्यांनी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे, पक्षीगृहाच्या जाळयांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षीगृहात भरपूर खेळती हवा राहील याची दक्षता घ्यावी.

१३. पाळीव पशुधनास उन्हाच्या वेळी शक्यतो घरात ठेवावे.

१४. पशुधनाच्या निवा-यासाठी / छतासाठी उष्णता रोधक साहित्य वापरावे

उष्णलहरीच्या वेळी काय करू नये

१. पशुधनास उन्हात उघड्यावर बांधू नये.

२. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये.

३. शेतीविषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये.

४. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.

५. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधू नये.

६. भर उन्हात पशुधनाची हालचाल / वाहतूक करू नये.

७. उन असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करू नये.

८. मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

  या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा 

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


उन्हाच्या दाहकतेत...(In the heat of the sun)

उन्हाच्या दाहकतेत...
 In the heat of the sun

Unhachya dahaktet

उन्हाच्या दाहकतेत 
धरती भाजून निघाली, 
धरतीचा ताजेपणा गेला 
जशी कोमेजून गेली...

उन्हाच्या दाहकतेत 
चाहूल भीषण उन्हाळ्याची, 
कसे बाहेर निघावे 
झळ बसते उन्हाची...

उन्हाच्या दाहकतेत 
कोरडे वाळवंट भासते, 
लाही लाही अंगाची 
त्वचा कशी भाजते...

उन्हाच्या दाहकतेत 
पाण्याची लागते तहान 
कसा करावा बचाव 
विचार करी थोर सान...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेती (अहिराणी कविता) sheti (Ahirani kavita)

 शेती (अहिराणी कविता) 

sheti (Ahirani kavita)


Farming poem


नोकरीवालास्ना भलता हाल 

शेतीमा चालत नही त्यासनी चाल,

सालदारास्ले पैसा देना पडतस मालामाल 

पण गडी कुठे घालस पुरं साल...


अर्धा पैसा इकडून काढ 

अर्धा पैसा तिकडून काढ,

आणखी वरतीन जेवण वाढ 

जत्राले जावाना सेतंस लाड...


सालदार किंमत धरत नही 

येळ, वकूत जाणी घेत नही, 

उत्पन्न दमडीनं नही 

पण पैसा घेवानी,भलतीच घाई... 


फेडानं नाव काढत नही 

अर्धी रातले पळी जाई, 

त्यानाबरोबर जास बाई 

नातेवाईकस्नी वळख त्याले नही...


या जमानामा मांगे उभं राह्यनं

त्यानी शेती राह्यनी, 

सग्गासाई, भाऊबंदकी 

लुबाडीत खात जाई...


दीपक के. अहिरे
नाशिक


Farming poem

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

चारित्र्य : व्यक्तिमत्त्वाचा पाया आणि जीवन यशाची खरी ओळख I Character: The Foundation of Personality and the True Identity of Life Success

चारित्र्य : व्यक्तिमत्त्वाचा पाया आणि जीवन यशाची खरी ओळख

Character: The Foundation of Personality and the True Identity of Life Success

charitrya

चारित्र्य म्हणजे केवळ बाह्य वर्तन नाही, तर माणसाचे विचार, मूल्ये, नैतिकता आणि त्याची जबाबदारी यांचा सुंदर मिलाफ. कोणतीही परिस्थिती आली तरी योग्य तेच करण्याची वृत्ती म्हणजेच खरे चारित्र्य.


चारित्र्य म्हणजे काय?

    चारित्र्य म्हणजे मनुष्याच्या आत रुजलेले सद्गुण, नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, शिस्त आणि संयम.
हे व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास, सत्याशी उभे राहण्यास आणि समाजात आदर्श बनण्यास मदत करते.


चारित्र्याचे मूलभूत घटक —
  • प्रामाणिकपणा

  • नैतिकता

  • जबाबदारी

  • सहानुभूती

  • संयम

  • शिस्त

  • आदर व कर्तव्यभाव


चारित्र्य का महत्त्वाचे?

1. व्यक्तिमत्त्वाला दिशा देते

    चारित्र्य व्यक्तिमत्त्वाला आकार देते. चांगले विचार आणि योग्य निर्णय हे चारित्र्यपूर्ण मनातूनच जन्म घेतात.

2. विश्वास निर्माण करतो

    समाजात, नात्यात, व्यवसायात — सर्वत्र विश्वास हवा. चारित्र्यवान व्यक्तीवर लोक सहज विश्वास ठेवतात.

3. जीवनाला स्थैर्य मिळते

    विचारांची शुद्धता, संयम आणि शिस्त या गुणांमुळे मन मजबूत होते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते.

4. यशाची खरी ओळख

    यश केवळ संपत्ती किंवा पदांमध्ये नसते. व्यक्तीच्या चारित्र्यावरूनच त्याच्या यशाची खरी ओळख होते.


चारित्र्य कसे घडते?

1. घरातील संस्कार

आई-वडील, घरातील वातावरण, संवाद, उदाहरणे — हे चारित्र्य घडवण्याचे पहिले शाळा असते.

2. समाज आणि मित्रपरिवार

आपल्या संगतीतले लोक आपल्या विचारांवर मोठा प्रभाव टाकतात. जशी संगत, तशी रंगत!

3. शिक्षण आणि स्वअनुशासन

शाळा- महाविद्यालयातील मूल्यशिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची शिस्त हे चारित्र्याची मजबूत पायवाट तयार करतात.

4. आत्मचिंतन आणि नियमित साधना

आपल्या कृतींचे मूल्यांकन, चुका मान्य करणे आणि सुधारण्याची वृत्ती हा चारित्र्य विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.


चांगले चारित्र्य कसे विकसित करावे?



  • सत्याशी प्रामाणिक राहा

  • इतरांचा आदर करा

  • चांगल्या सवयी जोपासा

  • अभ्यास, काम आणि नात्यांमध्ये शिस्त पाळा

  • चुकीचे वर्तन समजून ते सुधारण्याची तयारी ठेवा

  • सकारात्मक विचारांची ऊर्मी जपा

  • संयम आणि सहनशीलता विकसित करा

  • समाजासाठी उपयोगी कामांत सहभागी व्हा


चारित्र्य आणि आधुनिक जीवन

    तंत्रज्ञान, सोशल मिडिया आणि वेगवान जीवनशैलीमुळे मूल्ये आणि संस्कार विसरण्याची शक्यता वाढली आहे.
पण आजच्या काळातही चारित्र्याची गरज तितकीच — कदाचित अधिकच — आहे.

    पूर्ण माहिती उपलब्ध असताना योग्य निर्णय घेणे, आव्हानांतही नैतिकता न सोडणे, आणि नात्यांना जपणे — हे आजच्या युगातील महत्त्वाचे चारित्र्य गुण आहेत.


चारित्र्यसंपन्न व्यक्तीचे गुण

  • योग्य तेच करण्याची हिंमत

  • नम्रता व सहानुभूती

  • कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा

  • चुका मान्य करण्याची वृत्ती

  • सतत शिकण्याची उर्मी

  • समाजासाठी योगदान देण्याची इच्छा


समारोप : चारित्र्य हीच खऱ्या यशाची ओळख

    चारित्र्य नसले तर कोणतेही ज्ञान, कौशल्ये किंवा संपत्ती अपूर्णच राहते.
चारित्र्य असलेली व्यक्तीच समाजात आदर्श ठरते, नाती जोडते आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जगते.
म्हणूनच — “ज्ञानाने माणूस मोठा होतो, पण चारित्र्याने महान.”

चारित्र्य
Character

charitrya

चारित्र्य हेच माणसाचं

चरित्र घडवत जातं,

ज्याच्याकडे संस्काराचं भावसंघटन 

त्यांनाच चारित्र्य लाभतं...


माणसाचं चारित्र्य त्याचं

वैयक्तिक आयुष्य घडवतं,

अशा माणसाचं सामूहिक चारित्र्य

राष्ट्राचं चरित्र घडवत असतं...


माणसांच्या भावना 

ज्या प्रवृत्तीवर होतात स्थिर,

ज्या प्रवृत्तीला मानतात सर्वोत्तम

याने चारित्र्याचा ठरतो तीर...


चारित्र्यसंपन्न माणसांवर

यश विश्वास ठेवतं,

तुम्ही चारित्र्य घडवा

चरित्र आपोआप घडतं...

© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषी पणन मंडळाचा 'मिलेट महोत्सव' सुरू (Agriculture Marketing Board's 'Millet Festival' begins)


कृषी पणन मंडळाचा 'मिलेट महोत्सव' सुरू
३१ जाने. ते २ फेब्रू. दरम्यान आयोजन
Agriculture Marketing Board's 'Millet Festival' begins
31 Jan To 2 February Organized between

Shri anna abhiyan

Nashik Millet Mahotsav 2025 : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते.

     पणन मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामार्फत 'मिलेट महोत्सव - २०२५'चे आयोजन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, के. बी. टी. इंजिनीअरिंग कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.
Millet Mahotsav

   महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न अभियान' सुरू करण्यात आले असून त्याअनुषंगाने पणन मंडळामार्फत पुण्यात ८ ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या मिलेट्स महोत्सवावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कृषी पणन मंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर मिलेट्स महोत्सवाचे आयोजन करण्याचे सुचविले होते. त्यानुसार हा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे.

 नाशिक येथील मिलेट महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत. उत्पादकांना सुमारे ३५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

  या महोत्सवात मिलेट उत्पादन, मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व या विषयावर नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित केले आहे असे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी यांनी सांगितले. 

        दीपक अहिरे, नाशिक 
         deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...