name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): January 2025

साईदत्त संस्थानतर्फे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ( Idol Pranpratistha and Kalsharohana ceremony organized by Saidatta Sansthan from 7th to 10th February )

साईदत्त संस्थानतर्फे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा 
Idol Pranpratistha and Kalsharohana ceremony organized by Saidatta Sansthan from 7th to 10th February 

Murti pranpratishta aani kalasharohan

नाशिक : साईनगर येथील साईदत्त संस्थानतर्फे  शिव पिंड मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान अमृतधाम, साईबाबा मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती साईदत्त संस्थानकडून देण्यात आली आहे. 

 शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दु. ४ ते १० वाजेपर्यंत साईनगर परिसरातून मूर्तीची सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत अघोरी पथक, छ. शिवाजी महाराज व मावळे, गोल्डन बॅण्ड, नाशिक ढोल ताशा पथक, डि.जे., पावरी नृत्य, लेझिम पथक यांचा सहभाग असणार आहे. 

  शनिवार ८ फेब्रुवारी रोजी स. ८ वा. मानसी पाटील यांच्या गणेश वंदना, दत्त संगीत, शिव भजन याने सुरूवात होणार असून स. ९ ते १ पर्यंत व दु. ३ ते ७ पर्यंत महापूजा व रात्री ८ ते १० बाळू गायकवाड यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. 

   सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी स. ९ ते १ व दु. ३ ते ७ महापूजा व रात्री ८ वाजता ह.भ.प. सोपान महाराज यांचे व्याख्यान व १२ ते ४ पर्यंत महाप्रसाद देण्यात येणार आहे. प. पु. श्री. संत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य प.पु. श्री. माधवगिरी महाराज व प. पु. श्री संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन पूजा होईल. 

   परिसरात होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी नागरिकांनी भरभरून सढळ हाताने आर्थिक व अन्नदानासाठी  मदत करण्याचे आवाहन साईदत्त संस्थान व ओम साई फ्रेंड सर्कल यांनी केले आहे.

Murti pranpratishta va kalasharohan

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

विविध सन्मान मिळविणारे ग्लोबल फार्मर : गणेश नानोटे (Global Farmer with various honors : Ganesh Nanote)

विविध सन्मान मिळविणारे ग्लोबल फार्मर : गणेश नानोटे
Global Farmer with various honors : Ganesh Nanote

Global farmer

 अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंभारा येथील श्री. गणेश शामराव नानोटे यांना यंदाचा कृषीथॉन आदर्श शेतकरी सन्मान मिळाला आहे.  


श्री. नानोटे यांनी शेतीक्षेत्रात संशोधन आणि माहिती विस्ताराचे काम केले आहे. ते शेतात कापूस, केळी, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू तसेच जवस पिके घेतात.

कमी मशागत तंत्र

"जमिन श्रीमंत तर शेतकरी श्रीमंत" याचा आधार घेत आणि विविध समस्यांचा विचार करून ते संवर्धित शेती करतात. मागील पंधरा वर्षांपासून शेतातील कचरा, पीक अवशेष शेतातच कुजवत असून खोल नांगरटीस बगल दिली आहे. त्यांनी कमी मशागत तंत्र अवलंबले असल्याचे श्री. नानोटे यांनी स्पष्ट केले. 

जैविक खतांचा वापर

  त्यांच्या शेतीच्या बाबतीत ते म्हणाले कि, 'जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे शेतीचा प्राण आहे. तो मी वाढवला असून जमीन भुसभुशीत पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे सुधारला असून त्यामुळे जमिनीची होणारी धूप आणि वाहून जाणारे पाणी संवर्धन करण्यास कमालीची मदत झाली. श्री नानोटे हे जैविक खतांचा वापर करून पिकाचे उत्पादन घेतात. जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला असून याच्या परिणामाने पीक उत्पादन वाढले आहे. 

जमिनीतील जैविक घटक वाढवले

 जमिनीची भौतिकता सुधारल्याने पावसाचा प्रत्येक थेंब जागेवर जिरविणे शक्य झाले. पाणी आणि जमिनीची होणारी प्रचंड प्रमाणातील धूप थांबली. जमिनीतील जैविक घटक वाढण्यास मदत झाली. यामुळे पीक उत्पादनात शाश्वतता आली. दुष्काळी परिस्थिती असतांना सुद्धा पिकांच्या वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के पर्यंत वाढ दिसून आली. 

तंत्रज्ञानाचा अवलंब प्रत्यक्ष शेतात

  श्री. नानोटे हे देशातील आणि विविध राज्यातील वेगवेगळी संशोधन केंद्र, विद्यापीठे, कृषी प्रदर्शने, प्रकल्प यांना भेटी देऊन माहिती व तंत्रज्ञान समजून त्यांचा अवलंब प्रत्यक्ष शेतात करतात. त्याबरोबरच ते इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवून त्याचा अवलंब कसा करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून ते सर्व प्रयोग त्यांच्या शेतावर करून घेतले आहेत. त्यांच्या शेतावर विविध पिकांवर आधारित शिवार फेरीचे आयोजन केले जाते.. विविध पिकांवर सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले जाते. विविध दैनिके, आकाशवाणी आणि टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून श्री. गणेश नानोटे यांच्या यशोगाथा प्रकशित झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  शाश्वत आणि संवर्धित शेतीचा अवलंब श्री. नानोटे यांनी शेतीत केला असून इतर शेतकऱ्यांना त्यांनी संवर्धित शेतीकरिता प्रोत्साहित केले आहे. कृषी विद्यापीठातील एम.एस.सी तसेच पी.एच.डी.करीता सुरु असलेल्या शेती पद्धतीवर प्रयोग करण्यास ते मदत करतात. कृषी विभागामार्फत येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. 

जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून दखल

  श्री. गणेश नानोटे यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून आहे. शेती क्षेत्रात स्वतःची प्रगती करत असताना इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. 

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************


अग्रिस्टॅक प्रकल्पाच्या 'युनिक फार्मर आयडी'मुळे शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ (Agristack Project's 'Unique Farmer ID' Farmers will get benefit of various schemes)

अग्रिस्टॅक प्रकल्पाच्या 'युनिक फार्मर आयडी'मुळे 
शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ
Agristack Project's 'Unique Farmer ID' 
Farmers will get benefit of various schemes


Shetkari olakhpatra

 देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र निर्माण करून देण्यासाठी आधारकार्डप्रमाणेच 'युनिक फार्मर आयडी' देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा उभारणे हा अग्रिस्टॅक उपक्रमाचा (Agristack Farmer Registration Maharashtra) उद्देश आहे

योजनेची अंमलबजावणी सुरू

  कृषी व महसूल विभागाकडून आयडीचे काम सुरू झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील सीएसी सेंटर चालकांनाही यात समाविष्ट करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. 

  सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येकवेळी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. या युनिक आयडी मुळे शेतकऱ्यांचा मनःस्ताप कमी होणार आहे.

 जिल्ह्यातील १३ लाख ८७ हजार २३० शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सीएससी सेंटरचालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

Shetkari olakhpatra

युनिक फार्मर आयडीचे फायदे

  • युनिक फार्मर आयडीचा उपयोग पीएम किसान योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी होईल. 
  • किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी या आयडीचा उपयोग होईल. 
  • पीकविमा काढणे तसेच त्याअंतर्गत परतावा मिळवण्यासाठी  याचा उपयोग होणार आहे. 
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून जाहीर पिकांची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आयडीचा वापर करता येणार आहे. 
  • पीक कर्ज तसेच शेती विकासासाठी मिळणारे कर्जासाठी याचा वापर करता येईल. 
  • शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, विपणन, कृषी तज्ज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनासाठी या युनिक आयडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 
  • जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. 
  • पीक व शेतीविषयक सर्वेक्षण करून घेणे, शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करण्यासाठी युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे. 
  • जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहे. 

Shetkari olakhpatra

लागणारे कागदपत्रे

 फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांचा ७/१२, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, जमिनीचा गट क्रमांक, सव्हें नंबर, पत्याचा पुरावा, इ-मेल आयडी अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. 

 ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेतजमिनींचा ७/१२ आधारकार्ड संलग्न असलेला मोबाइल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहे.

 नोंदणी व अधिक माहितीसाठी https://developer.agristack.gov.in यावर संपर्क करावा. 



© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

पुनीत भूमी नाशिक (Puneet Bhoomi Nashik)

 पुनीत भूमी नाशिक 
 Puneet Bhoomi Nashik


पुनीत भूमी


प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने 
नाशिक आहे पुनीत भूमी, 
वनवासाचा काळ आणि सीताहरण 
घडले याच श्रीक्षेत्र नाशिक धामी... 

रामायणातील दंडकारण्याचा 
भाग आहे आताचे "पंचवटी", 
तपोवनजवळील क्षेत्रात आहे 
लक्ष्मणाने बांधलेली "पर्णकुटी"... 


Poonit bhoomi

सीताहरणाचे जे स्थान आहे
ते मोडते "तपोवन" पंचवटी भागात, 
काळाराम मंदिराजवळील परीसरात 
"सीतागुंफा" आजही वसली दिमाखात... 

सीतेबद्दलच्या वाईट वक्तव्यामुळे 
लक्ष्मणाने कापले शुर्पणखेचे नाक,कान, 
या घटनेमुळे जनस्थान भागाला  
मिळाला "नाशिक" नावाचा मान...


Poonit bhoomi

नाशिकला श्रीरामकुंडात केले श्रीरामांनी  
आपल्या वडिलांचे श्राध्द,
आजही तेथे आहेत 
"सीताकुंड","लक्ष्मणकुंड" प्रसिद्ध... 


पुनीत भूमी


सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने 
लक्ष्मणरेषा काढली पर्णकुटीभोवती, 
आजही लक्ष्मणरेषा मंदिर 
दिमाखाने उभे आहे पंचवटी सभोवती...


© दीपक केदू अहिरे, नासिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram : 
*******************************************
YouTube :

*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************



पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे उद्घाटन संपन्न (Piu'j Heart Sanjeevani Rhythm Clinic inaugurated)

वैविध्यपूर्ण वैद्यकीय सेवेसाठी समर्पित
Dedicated to diversified medical care

पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे उद्घाटन संपन्न
Piu'j Heart Sanjeevani Rhythm Clinic inaugurated


Hrudya sanjivani

नाशिक :  पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे नुकतेच उद्घाटन निफाडचे चिरडे बाबा यांच्या हस्ते करण्यात आले असून या हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रोफिजियोलॉजी स्टडी या नवीन प्रकारच्या सेवेसह पर्मनंट पेसमेकर, कंडक्शन सिस्टीम पेसींग, कार्डियाक रेसिन्सीक्रोनायझेशन थेरपी (सी.आर.टी.), इंट्राकार्डियाक डिफिब्रिलेटॉर (आय.सी.डी.), ईसीजी, एको, स्ट्रेस टेस्ट, हॉल्टर मॉनिटरिंग, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी  या वैविध्यपूर्ण सेवा देण्यात येणार असल्याची माहिती पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे  हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निखिलकुमार पटेल यांनी पत्रकार  परिषदेत दिली. 

  ते पुढे म्हणाले कि, नाशिकमध्ये प्रथमच ही उपचार पद्धती या क्लीनिकमध्ये उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच स्थायिक असणारी ही सेवा नाशिकमध्ये आली असल्याचे डॉ. निखिलकुमार पटेल यांनी माहिती दिली. त्यांच्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार पटेल, आहार तज्ज्ञ डॉ. सिमरन पटेल हे उपस्थित होते. 

 

 

 क्लिनिकमध्ये देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेची माहिती देतांना डॉ. निखिलकुमार पटेल यांनी सांगितले कि इलेक्ट्रोफिजियोलॉजी अभ्यास (ईपी अभ्यास) ही एक चाचणी असून जी तुमच्या हृदयाच्या विद्युत प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि असामान्य हृदय लय तपासण्यासाठी वापरली जाते. 

  नैसर्गिक विद्युत आवेग हृदयाच्या वेगवेगळ्या भागांच्या आकुंचनांचे समन्वय साधतात. यामुळे हृदयाचे ठोके किंवा हृदय लय तयार होते आणि रक्त जसे हवे तसे वाहते.ईपी अभ्यासादरम्यान, हृदयाच्या लयीतील तज्ञ किंवा इलेक्ट्रोफिजियोलॉजी तज्ञ प्रत्येक ठोक्यादरम्यान हृदयाच्या विद्युत आवेगांच्या प्रसाराचे मॅपिंग देखील करू शकतात. असामान्य हृदयाच्या ठोक्याचे स्रोत शोधण्यात मदत करण्यासाठी हे केले जाऊ शकते. 

 कायमस्वरूपी पेसमेकर (पीपीएम) हे एक लहान उपकरण आहे जे तुमच्या छातीच्या त्वचेखाली घातले जाते जेणेकरून हृदयाचे ठोके नियमित लयीत चालतील. पीपीएममध्ये दोन भाग असतात: बॅटरी व सॉफ्टवेअर असणारा एक लहान पेसमेकर आणि तुमच्या हृदयाशी जोडलेले लीड्स असतात. 

 ड्युअल चेंबर पेसमेकर हृदयाच्या वरच्या चेंबर (अ‍ॅट्रिया) आणि खालच्या चेंबर (व्हेंट्रिकल्स) च्या वेळेचे समन्वय साधण्यास मदत करू शकते.  दीर्घकालीन पेसींग केल्याने हृदयाची पंपिंग कमी होऊ शकते. एकूण मृत्युदरात वाढ होऊ शकते. आता उजव्या वेंट्रिकल एपिकल पेसिंगचा पर्याय म्हणून कंडक्शन सिस्टम पेसिंग वाढत्या प्रमाणात होत आहे. 

 कार्डियाक रीसिंक्रोनायझेशन थेरपी (सीआरटी) ही हृदयाच्या ठोक्यांची सामान्य लय पुनर्संचयित करण्यात मदत करणारी उपचारपद्धती आहे. सीआरटी म्हणजे बाय व्हेंटिकुलर पेसींग यामध्ये उजव्या आणि डाव्या चेंबरमध्ये (व्हेंटिकुलर) असून समन्वय साधण्यास मदत होते. 

   या सर्व सेवा कायमस्वरूपी, विनाविलंब देण्यात येतील.  हृदयरोगाच्या विविध सेवेसाठी पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक, शॉप नं. १०८,पहिला मजला, आर्चित साई स्केअर, सुयश हॉस्पिटल शेजारी, मुंबई नाका - ४२२००२, मोबा.- ८८६२००१००५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. निखिलकुमार पटेल, डॉ. सिमरन पटेल यांनी केले आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (Toyota Kirloskar Motor has introduced the new 'Camry' hybrid electric vehicle)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन
Toyota Kirloskar Motor has introduced the new 'Camry' hybrid electric vehicle

Camrey hybrid vechicle

नाशिक : टोयोटा किर्लोस्कर मोटरने नुकतेच "सेडान टू द कोअर" म्हणून डिझाइन केलेले पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन सादर केले. 

  पर्यावरणाला अनुकूल असलेले हे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन शक्तिशाली कार्यक्षमतेसह उत्कृष्ट शैली, सुरक्षिततेचे अविष्कार प्रदान करून आजच्या समकालीन ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक लक्झरी पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन असल्याचे वासन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजिंदर बेदी यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. 

  यावेळी जनरल मॅनेजर श्रीकांत नायक, यूज्ड कार्सचे विभागप्रमुख हृषिकेश सोनवणे, सेल्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर  रमणदीप कलसी, फायनान्स मॅनेजर योगेश भोसले, सेल्स मॅनेजर मयूर लोहारकर, रवींद्र बैरागी, ग्राहक हर्ष पटेल हे उपस्थित होते. 

  कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाचे विविध वैशिष्ट्य मनमीत सिंग सलुजा यांनी सांगितले. टोयोटाच्या पाचव्या पिढीतील हायब्रिड तंत्रज्ञानाद्वारे समर्पित असलेल्या कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात उच्च-क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी असून जी सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, मजबूत कामगिरी आणि शाश्वत गतिशीलता दोन्ही प्रदान करते. 

  अपग्रेडेड डायनॅमिक फोर्स इंजिन, नवीनतम टोयोटा सेफ्टी सेन्स ३.०, ९ एसआरएस एअरबॅग्ज दिल्या असून सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित, चिंतामुक्त प्रवासासाठी प्रगत सुरक्षा आणि सोयीचे संयोजन केले जाते. 

 "एनर्जेटिक ब्युटी” या संकल्पनेखाली डिझाइन केलेले हे वाहन असून एक बोल्ड न्यू लूक प्रदर्शित करते. रीडिझाइन केलेल्या फ्रंट बंपर आणि एक्सप्रेसिव्ह उंच आणि रुंद लोअर ग्रिलसह कमांडिंग रोड प्रेझेन्स तयार करते. 

 डेटा कम्युनिकेशनसह अत्याधुनिक टेलिमॅटिक्ससह सुसज्ज मॉड्यूल (डीसीएम), रिमोट एसी पॅकेज आणि १२.३-इंच मल्टीमीडियासह  मनोरंजन आणि अॅप्स यात आहे. मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एमआयडी) एक पूर्ण ग्राफिक मीटर जो स्पष्ट ग्राफिक्स आणि उत्कृष्ट डिस्प्ले गुणवत्ता प्रदान करतो.

  ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात डायनॅमिक फोर्स इंजिन असून स्पोर्ट, इको, सामान्य ड्रायव्हिंग मोडमध्ये ट्रान्समिशन उपलब्ध आहे. 

   मॅन्युअल ड्रायव्हिंगसाठी १०-स्पीड सिक्वेंशियल शिफ्ट मोड आहेत. आरामदायी प्रवासासाठी ऑप्टिमाइली ट्यून केलेले मॅकफर्सन स्ट्रट सस्पेंशन (एफआर) आणि मल्टी-लिंक प्रकार (आरआर) उपलब्ध आहे. 

  या वाहनाच्या डायनॅमिक डिझाइन आणि स्टाइलने बॉडी साइड आणि रीअर डिझाइनसह लो नोज आक्रमक स्पोर्टी लूक दिसतो. एलईडीने सुसज्ज सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट (DRL)सिस्टम, अत्याधुनिक बंपर आणि ग्रिलसह स्टायलिश हुड आणि फेंडर, ऑटोमॅटिक रिट्रॅक्टेबल, टर्न सिग्नल, ऑटोरिव्हर्स टिल्टसह बाहेरील रीअर-व्ह्यू मिरर (ORVM) एकसंध ड्रायव्हिंग अनुभवासाठी नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स स्पोर्टीनेस वाढवतात

  सॉफ्ट अपहोल्स्ट्रीने सजवलेले प्रशस्त केबिन, सीट, इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पिवळा तपकिरी सॉफ्ट लेदर अपहोल्स्ट्री, ऑर्नामेंट इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पियानो ब्लॅक फ्रंट कन्सोल बॉक्स, ऑटो अप/डाउन आणि जॅम प्रोटेक्शनसह पॉवर विंडो, गिटार-आकाराचे ऑडिओ गार्निश, 3-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, नॅनोईटीएम एक्स आयन जनरेटर, इंटीरियर इल्युमिनेशन पॅकेज/एंट्री सिस्टम, फेड-आउट स्मार्ट रूम लॅम्प + डोअर,आत हँडल व  ४ फूटवेल दिवे ही कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाची अंतर्गत वैशिष्ट्ये आहेत. 
  नवीन मॉडेलच्या लाँचिंगबद्दल बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मसाकाझू योशिमुरा म्हणाले कि, ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलचे लाँचिंग हे टोयोटाच्या जागतिक पर्यावरणीय आव्हान २०५० च्या अनुषंगाने अधिक चांगले, शाश्वत गतिशीलता पर्याय विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
  भारतासाठी आमची उत्पादन रणनीती कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा ध्येय साध्य करण्याच्या  राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे. ऑल-न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलची ग्रीन मोबिलिटी ऑफर म्हणून ओळख होईल भविष्यातील कार्बन-मुक्त, आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी आमचे योगदान आणखी मजबूत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनाच्या हायब्रीड बॅटरीवर ८ वर्षांची किंवा १,६०,००० किमी, जे आधी येईल त्याची वॉरंटी मिळते. कारची टेस्ट ड्राईव्ह टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे.     ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनासाठी बुकिंग सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी वासन टोयोटा, वासन नगर, कै. श्री कुंदनलाल वासन मार्ग, मुंबई-आग्रा रोड, नाशिक मोबा. नं- ८८८८८ ४७१९, या शो रूमला   भेट द्या किंवा www.toyotabharat.com वर ऑनलाइन बुकिंग करावी.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau)

राजमाता जिजाऊ 
Rajmata jijau

Rajmata


समयसूचकता,संघटन कौशल्य 
अनेक गुणांची झळाळी, 
राजमाता जिजाऊंच्या 
व्यक्तिमत्त्वाला लाभली... 

स्वराज्य स्थापनेच्या ध्येयापासून 
नाही विचलित झाल्या, 
माणूस हाच कर्ता 
कृषी क्षेत्रात बदल केला... 

जिजाऊंच्या जीवनात 
हतबल करणारी परिस्थिती, 
दृढ निश्चयाने घेतले निर्णय 
सारासार निर्णय घेण्याची गती... 

जिजाऊंनी माणसाला व 
समाजाला आकार दिला, 
उच्चतत्त्व आणि नीतीमूल्य 
सातत्याने संघर्ष केला... 

जिजाऊंनी स्वराज्यामध्ये 
पुरुष व महिलांना दिला सन्मान, 
सामाजिक न्यायाची बाजू 
समतेला दिला सर्वोच्च मान... 

जिजाऊंनी सर्व क्षेत्रात 
घेतला कृतीशील सहभाग,
तात्विक मूल्यांची पायाभरणी 
काढला प्रगतीचा माग... 

जिजाऊंनी शिवरायांना दिला 
सल्ला बुद्धीपूर्वक कृतीचा, 
आधुनिक समाजाला प्रेरणा 
सकल जनवादी जीवनदृष्टीचा... 

आजचे प्रश्न सोडवण्यासाठी 
अभ्यासा जिजाऊंचे प्रशासन, 
त्यांच्या समग्र विचारांनी 
जीवनी मिळते मार्गदर्शन...

राजमाता Rajmata

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram : 
*******************************************
YouTube :

*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************


शेकोटी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक (Principal Laxman Mahadik presided over Shekoti Kavi Sammelan)

 

शेकोटी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक

Principal Laxman Mahadik presided over Shekoti Kavi Sammelan

Shekoti

  गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित आशिया खंडातील सलग ४८ तास चालणाऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती प्रा. संदीप जगताप, रवींद्र मालुंजकर, संजय आहेर, विजयकुमार मिठे, प्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी दिली
  
 नाशिक येथील भावबंधन मंगल कार्यालय येथे १० आणि ११ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार तर स्वागताध्यक्षपदी मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली असून, दरम्यान रात्री शेकोटी कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची निवड करण्यात आली.   
 
 कुणब्याच्या कविता, गावकुसाच्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह असून धुक्यातले धुके, दिवस हे त्यांचे ललित लेखन आहे. कुणब्याची कुंडली हा त्यांचा कवितासंग्रह आहे.  स्तंभलेखन, आकाशवाणी नाशिक केंद्रावरून व्याख्यान, श्रुतिका लेखन, विविध नियतकालिकातून साहित्य लेखन त्यांनी केले आहे. 
  
   विविध विद्यापीठांच्या बी.ए., बी.कॉम, एम.ए अभ्यासक्रमात त्यांच्या कवितासंग्रहाचा समावेश आहे.
    
   महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता दहावी आंतरभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश असून, भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने गोवा येथे महाराष्ट्र राज्यातून मराठी भाषेचे साहित्यविषयक प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांची निवड करण्यात आली होती. 
    
   अजिंठा येथे झालेल्या राष्ट्र निती काव्य महोत्सवातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. कुणब्याची कविता काव्यसंग्रहाची राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.  
   
  नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन समितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. सर्वोदय साहित्य संमेलनाच्या परिसंवादात त्यांचा मोठा सहभाग होता. 
  
 मराठी सेवा संघाच्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. नाशिक जिल्हा परिवर्तन साहित्य संमेलन २०२३ च्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली होती भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद व  तिफन राज्यस्तरीय कविता महोत्सवांमध्ये ते अध्यक्ष होते,  

  उजगाव बेळगाव कर्नाटक साहित्य अकादमी आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कविवर्य वसंत, ना.घ सावंत राज्य साहित्य पुरस्कार, साहित्य शिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अंकुर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, गिरणा गौरव प्रतिष्ठान, स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, मुक्ताई राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जालना, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा कवी गोविंद काव्य पुरस्कार, उत्तर महाराष्ट्राचा मानाचा गिरणा गौरव पुरस्कार, कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनाचा प्रथम पुरस्कार अशा विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 
   
   चिंतन आणि चर्चा समकालीन मराठी कविता आस्वाद ग्रामीण कविता १९८० नंतरच्या ग्रामीण कवितेतील बदलत्या वास्तवांचा शोध, शेतकरी संघटना मराठी साहित्याचा अनुबंध अशा विविध कवितेची त्यांनी समीक्षा केली आहे. गावकुसाच्या कविता या काव्यसंग्रहास त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
  कविवर्य एकनाथ रेंदाळकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ राज्य साहित्य पुरस्कार मंचर, भी.ग. रोहमारे प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार, परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा परिवर्तन पुरस्कार, अक्षरबंध प्रतिष्ठानचा अक्षरबंध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, श्री शब्द राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कोल्हापूर, तिफन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कन्नड, अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************



फलभूमी : शाश्वत शेतीच्या उपायांसह शेतीमध्ये क्रांती (Phalbhoomi : Revolutionizing agriculture with sustainable farming solutions)

फलभूमी : शाश्वत शेतीच्या उपायांसह शेतीमध्ये क्रांती
Phalbhoomi : Revolutionizing agriculture with sustainable farming solutions


फलभूमी


 फलभूमी ही एक नाविन्यपूर्ण कृषी क्षेत्रातील सेवा कंपनी आहे. ही कंपनी  महाराष्ट्रातील नागपूर येथे असून या संस्थेची स्थापना शेतकरी आणि बागायतदार तज्ज्ञ  श्री. दीपक नवघरे यांनी केली आहे.  


  फलभूमी काय आहे ? फलभूमीविषयी सांगा असे मी विचारताच श्री. नवघरे यांनी सांगितले कि, मी प्रथमतः विदर्भातील शेतकऱ्यांसमोरील एक महत्त्वाचे आव्हान ओळखले ते म्हणजे शास्त्रीय व तंत्रशुद्ध फलोत्पादन करण्याचा अभाव, मी स्वतः कृषी पदवीधर असल्याने फळबाग लागवड आणि त्याचे संगोपन यातील गुंतागुंत खूप वाढत चालल्याचे माझ्या लक्षात आले. आणि  तेव्हाच ठरवले कि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मी सर्वसमावेशक कृषी सेवा देण्यासाठी प्रथम नवघरे ॲग्रो कन्सल्टन्सीची स्थापना केली. या सेवांमध्ये ऑर्किड सल्लागार, सिंचन पुरवठा आणि देखभाल, कृषी-पर्यटन सल्लागार आणि कृषी-निविष्ट विक्री यांचा समावेश आहे. 
   
 ही कन्सल्टन्सी जसजशी वाढत गेली, तसतशी तिच्या कामाची व्याप्ती आणि प्रभावही वाढला. पुढे २०२१ मध्ये श्री. दीपक आणि त्यांच्या समर्पित टीमने 'फलभूमी' या ब्रँड अंतर्गत  फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्ण विस्तार आणि तांत्रिक सेवा सुरु केली. अशा पद्धतीने फलभूमीचा प्रवास सुरु झाला. पुढे त्यांनी त्यांच्या नर्सरीद्वारे ५० हून अधिक फळपिकांची अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध आणि चांगले कलमी, हमी देणारी रोपे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले. 

फलभूमी
 
 फलभूमीच्या स्थापनेपासून विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झाला असल्याचे श्री. नवघरे यांनी सांगितले. फलभूमीने १५० हून अधिक शेतकऱ्यांना थेट सेवा दिली आहे. यात ५०० एकरपेक्षा जास्त ऑर्किड फार्मचा समावेश आहे. फलभूमीचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि फार्म मीटिंगद्वारे त्यांनी ४००० हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे, त्यांना त्यांच्या कृषी पद्धती वाढवण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज केले आहे. फलभूमीच्या प्रयत्नांमुळे केवळ उत्पादनच वाढले नाही तर स्थानिक शेतकरी समुदायाच्या शाश्वत विकासातही योगदान दिले असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी सांगितले. फलभूमीच्या ऑन-फिल्ड कन्सल्टन्सी सेवा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा बनल्या आहेत. 
  
 श्री. नवघरे यांनी  विविध संस्थांद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी मॅनेज हैदराबाद मधून ॲग्रिकलिनिक आणि ॲग्रीबिझनेस प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे.
  
 शेतकऱ्यांना सर्वसमावेशक आणि शाश्वत उपाय प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन झालेल्या फलभूमीने कोणकोणत्या सेवा देऊ केल्या आहेत? याविषयी विचारले असता www.Falbhumi.comचे श्री. नवघरे  म्हणाले कि, फलभूमी फलोत्पादनात माहिर आहे.  आंबा, ड्रॅगन फ्रूट आणि इतर फळ पिकांच्या लागवडीसाठी तज्ञ मार्गदर्शन देत असून जमीन तयार करणे आणि लागवड करण्यापासून ऑनफील्ड ते पीक व्यवस्थापन आणि कापणीपर्यंत कंपनी सर्वसमावेशक सोल्यूशन्स प्रदान करत असून यामुळे   शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेतात. 
    
 खास करून आम्ही ऑर्किड कन्सल्टन्सीही देऊ करतो. ऑर्किड लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विदर्भात ऑर्किडची लागवड वाढली आहे. फलभूमीचे ड्रॅगन फ्रूट फार्म हे यशस्वीतेचे मॉडेल बनले आहे. या मॉडेलला वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या  शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.
   
 फलभूमी फुलांच्या शेतीच्या उच्चमूल्याच्या क्षेत्राचा शोध घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कृषी व्यवसायांना मदत करत असल्याचे श्री. नवघरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सल्ला सेवांमध्ये यशाची खात्री करण्यासाठी इष्टतम वाढणारी परिस्थिती, कीड व्यवस्थापन आणि काढणीनंतरची तंत्रे यावर देखील मार्गदर्शन समाविष्ट आहे. 
   
  शाश्वत शेतीसाठी सक्षम पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. फलभूमी पाण्याचा वापर काटेकोर  करण्यासाठी, पीक उत्पादन वाढवण्यासाठी प्रगत सिंचन प्रणाली पुरवते आणि त्यावर देखरेख करते. ठिबक ते स्प्रिंकलर प्रणालीपर्यंत कंपनी दीर्घकालीन कामगिरीसाठी योग्य स्थापना आणि नियमित देखभाल सुनिश्चित करते.
   
  शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी मदत करण्याच्या प्रयत्नात, फलभूमी कृषी-पर्यटनविषयक सल्ला देते. कृषी-पर्यटन उपक्रम कसे स्थापित करायचे आणि चालवायचे, शेतांना पर्यटन स्थळांमध्ये कसे बदलायचे याबद्दल अंतर्दृष्टी देतात. आधुनिक शेती पद्धतींबद्दल जागरूकता वाढवतात  यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. अनेक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी सांगितले.
   
  फलभूमी बियाणे, खते आणि शेती उपकरणांसह उच्च दर्जाची कृषी निविष्ठा देखील प्रदान करते. विश्वासार्ह उत्पादने ऑफर करून कंपनी शेतकऱ्यांना निरोगी पिके सुनिश्चित करण्यास आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करते. 

फलभूमीने आयसीआयसीआय फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, बजाज फाउंडेशन, एसएफफाउंडेशन, कृषी विभाग, एमजीआयआरआय वर्धा, केव्हीके दुर्गापूर, आत्मा विभाग या उल्लेखनीय संस्थांसोबत मजबूत सहयोग स्थापित केला आहे. या सहकार्यांमुळे जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती आणि कृषी-व्यवसाय विकासावर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प राबविण्यास फलभूमी सक्षम झाली आहे, ज्याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

फलभूमी


 श्री. दीपक नवघरे यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कृषीथॉनच्या व्यासपीठावर फलभूमीचा प्रवास शेअर केला. त्यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कारही  देण्यात आला. 
  
 अधिकाधिक शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतींकडे जाण्यास मदत करून संपूर्ण भारतभर आपली पोहोच वाढवण्याचे फलभूमीचे उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग करून  शेती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या उत्पादनक्षम असेल.

  फलभूमीची सेवा अनेक कारणासाठी फलदायी असल्याची शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. स्वतः फलभूमीचे कार्यकारी संचालक दिपक नवघरे यांना फलोत्पादनात नैपुण्य आहे. अनुभवी फलोत्पादन तज्ञ यांच्या नेतृत्वाखाली फलभूमी विश्वसनीय आणि नाविन्यपूर्ण कृषी उपाय व शाश्वतता प्रदान करते. प्रत्येक सेवेची रचना टिकाऊपणा लक्षात घेऊन केली जाते, पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन देते. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रे आणि उपाय आणण्यासाठी फलभूमी आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारी करते.
 
     फलभूमीकडे सर्वसमावेशक सेवा असून पीक सल्लामसलत ते सिंचन उपायांपर्यंत फलभूमी सर्व शेती गरजांसाठी वन-स्टॉप शॉप ऑफर करत असल्याचे श्री. दीपक नवघरे यांनी माहिती दिली.

 अधिक माहितीसाठी www.Falbhumi.com या वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्या टीमशी  ८७६६८८३२६३, ७७७६९६३२७६ यावर संपर्क तसेच  ईमेल : nawgharedipak@gmail.com यावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी त्यांना फेसबुक : https://www.facebook.com/consultancyandservices2017?mibextid=LQQJ4d , युट्युब चॅनेल : https://youtube.com/@agrirobo2879?si=i6xYfSg8X5teVOgj , इंस्टाग्राम : https://www.instagram.com/falbhumi/profilecard/?igsh=MzM3MmQ4OXVpNzJq या सोशल माध्यमांवर फॉलो करा.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

*******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...