साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस'
'Rain' in the words of writers
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या. ‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
www.ahiredeepak.blogspot.com
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.
शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.
deepakahire1973@gmail.com
जगात सर्वाधिक दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये जपानी लोकांचा अग्रक्रम लागतो. जपानमध्ये 90–100 वर्षांपर्यंत सक्रिय व आजारमुक्त जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. मग प्रश्न पडतो — जपानी लोक इतके निरोगी कसे राहतात? चला जाणून घेऊया त्यामागची कारणे.
भात (Rice)
मासे (Fish)
समुद्री शैवाळ (Seaweed)
भाज्या
मिसो सूप
टोफू व सोयाबीन पदार्थ
👉 तेलकट, प्रक्रिया केलेले (processed) अन्न फार कमी प्रमाणात घेतले जाते.
यामुळे:
लठ्ठपणा टाळला जातो
पचन सुधारते
मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी होतो
जपानी लोक:
लहान अंतरासाठीही चालतात
सायकलचा वापर करतात
वृद्ध वयातही सक्रिय राहतात
👉 व्यायाम म्हणजे फक्त जिम नव्हे, दररोजची हालचाल हेच त्यांचे रहस्य आहे.
जपानी संस्कृतीत:
ध्यान (Meditation)
निसर्गाशी जवळीक
काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल
यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. ताण कमी = आजार कमी हे जपानी लोक उत्तमरीत्या पाळतात.
कुटुंबाशी घट्ट नाते
समाजात सक्रिय सहभाग
आयुष्याला अर्थ देणारे काम
यामुळे मानसिक समाधान व दीर्घायुष्य मिळते.
जपानमध्ये:
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता
वेळेचे काटेकोर पालन
शिस्तबद्ध जीवनशैली
👉 स्वच्छता आणि शिस्त यांचा आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो.
कमी कॅलरी पण पौष्टिक आहार
सक्रिय जीवनशैली
सकारात्मक विचार
यामुळे येथे शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक मोठ्या संख्येने आढळतात.
✔ संतुलित आहार घ्या
✔ जास्त खाणे टाळा
✔ रोज चालण्याची सवय लावा
✔ ताण कमी ठेवा
✔ आयुष्याला उद्देश द्या
✔ निसर्गाशी जोडलेले राहा
निरोगी जपानी लोक हे केवळ जनुकीय कारणांमुळे नाहीत, तर त्यांच्या साध्या, शिस्तबद्ध आणि संतुलित जीवनशैलीमुळे ते आजारमुक्त व दीर्घायुष्य जगतात. आपणही त्यांच्या सवयी आत्मसात केल्यास आरोग्यपूर्ण जीवन नक्कीच जगू शकतो.
होत आहे सुरूवात,
पूर्वजांप्रति आपले
कर्तव्य श्राद्धाची रुजवात...
पूर्वज आणि पितरांची
काढा श्रद्धापूर्वक आठवण,
पिंडदान करून करा
अपत्य धर्माचे पालन...
श्राद्धावेळी द्यावे
पाच जणांना भोजन,
गाय, श्वान, कावळा, पाहुणा
आणि मुंगीसाठी अन्नदान...
श्राद्ध पितरांना तात्काळ
सूर्य व वायूच्या रूपाने मिळतो,
पृथ्वीलोक व पितृलोकाचा थेट संपर्क
पितृगण अन्नदानाने संतुष्ट होतो...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रादेशिक कार्यालय, नाशिक मार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनाटेड नेशन टुरिझम यांचे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनासाठी "पर्यटन आणि शांतता" हे घोषित केले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास, उपहारगृहे, बोटक्लब येथे २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पर्यटनदिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त राबविले जाणारे विविध उपक्रम प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अति महत्वाच्या माननीय व्यक्ती, नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ, पर्यटन व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार असून या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटन दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. ही स्पर्धा महाविद्यालयांनी आपआपल्या महाविद्यालयात घ्यावयाची असून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले चित्रकला व निबंध महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय, नाशिक कार्यालयाकडे २० सटेंबर २०२४ पर्यंत जमा करावेत. दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा २७ सप्टेंबर २०२४ रोजी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतील.
चित्रकला स्पर्धेचे विषय : जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधुन आपण पर्यटन आणि शांतता या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील. विजेत्यांना प्रथम पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.
निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंध व चित्र २० सटेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक-४२२००२
दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२९७००४९ येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. तरी परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेली चित्र व निबंध कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी केले आहे.
भारतात ५ सप्टेंबर रोजी
शिक्षक दिन साजरा होतो,
शिक्षकांप्रती असते कृतज्ञता
त्यांचे योगदान आपण पाहतो...
उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जन्मही पाच सप्टेंबरचा,
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे
हा दिवसही त्यांचा वाढदिवसाचा...
अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक
विद्यार्थ्यांना करत असतात खंबीर,
शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्याला दिशा
शाळाबाह्य जगात धरावा लागतो धीर...
जडणघडण करण्यात गुरूचा वाटा मोठा
जिथे शिक्षण तिथेच होतो विकास,
शिल, क्षमा आणि कलेचा संगम
शिक्षक, गुरूत असतो हमखास...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण: ‘Nature’s Bliss’ने घडवलेला ग्रामीण परिवर्तनाचा प्रवास | From Corporate Career to Green Rural Entrepre...