name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): May 2025

व्यवसाय/उद्योगासाठी उद्योगनीती ! (Industrial policy for business/industry)

व्यवसाय/उद्योगासाठी उद्योगनीती ! 
Industrial policy for business/industry


Vyavasay udyogasathi udyogniti


तहान लागल्यानंतर विहीर खोदून काम उपयोग? ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजेच भविष्यातील आपल्या गरजा ओळखून त्यासाठी योग्य तजवीज करणे आवश्यक आहे. उद्योग-व्यवसाय उभारणीपासून तो यशोशिखरावर नेण्यासाठी करावयाच्या आवश्यक सर्व बाबींची मार्मिक पद्धतीने मांडणी सदर कवितेत केली आहे. चला तर मग जाऊया या कवितेच्या गावा... 


व्यवसाय-उद्योगात असावा माथा । 
नुसता नसावा नीतीचा काथा ।।

व्यवसाय-उद्योगात करावे वाचन। 
मनात होते त्यामुळे 'उद्योजकीय' सिंचन ।।

व्यवसाय-उद्योगात आचरावी कुटिल नीती । 
त्याने घडेल स्वउद्योगाची दिवसेंदिवस प्रगती ।।

व्यवसाय-उद्योगात आणा सर्वसमावेशी बुध्दिमत्ता । 
तेव्हाच चौफेर येईल तुमची उद्योगात सत्ता ।।

Vyavasay udyogasathi udyogniti



व्यवसाय-उद्योगात नका धरू कुणाला वेठीस । 
तेव्हाच पैसे खुळखुळतील तुमच्या गाठीस ।।

व्यवसाय-उद्योगात जपा उद्योजकतेची मूल्ये । 
त्यानेच साम्राज्य होईल खुले ।।

व्यवसाय उद्योगात जुने विचार द्या टाकून ।
करावा स्वीकार आदबीने वाकून।।

व्यवसाय उद्योगात करावा नफ्याचा विचार । 
पण नफ्यासाठी करू नका भ्रष्ट आचार ।।

व्यवसाय-उद्योगात द्या चांगली सेवा । 
सेवा घेऊन ग्राहकांचा काढू नका मेवा ।।

व्यवसाय-उद्योगात ठेवा रागावर नियंत्रण । 
उ‌द्घाटनानिमित्त पाठवा सर्वांना सस्नेह निमंत्रण ।।

व्यवसाय-उद्योगात नसावा उर्मटपणा । 
त्यासाठी सिंधी-मारवाडींचे गुण आचरणात आणा ।।

व्यवसाय-उद्योग करावा दूरदृष्टीने । 
कामगारांची काळजी घ्या नेकीने ।।

व्यवसाय-उद्योगात करा सर्व धर्माचा आदर । 
यानेच आपले नांव जाईल दूरवर ।।

व्यवसाय-उद्योगच करा, करू नका चाकरी । 
का लोटतात दूर आपल्या हक्काची भाकरी ।।

व्यवसाय उद्योगात करावे बाजारपेठ मंथन । 
हर एक ग्राहकाचे करावे स्वमनन ।।

व्यवसाय-उद्योगात आचरावी सकारात्मकता । 
हीच तरी तुमची खरी पात्रता ।।

व्यवसाय-उद्योगात करावी अपार मेहनत । 
असू द्यावी चांगल्या विचारांची दानत ।।

व्यवसाय उद्योगात करावा स्पर्धकांचा विचार । 
त्यासाठी करावा निकोप स्पर्धेचा आचार ।।

व्यवसाय-उद्योगात ठेवू नका पर्याय । 
तेव्हाच होईल मुंबईचे शांघाय ।।

व्यवसाय उद्योगात ठेवा अंतरंगी चिकाटी । 
तेव्हाच फोडू शकाल स्वउद्योगाची लाठी ।।

व्यवसाय-उद्योगात ग्राहकांवर व्हा एकाग्र । 
तेव्हाच उद्योग तुमचा बहरेल समग्र ।।

व्यवसाय-उद्योगात करा आर्थिक संचय । 
पैशांबरोबर करा समाजसेवेचा समुच्चय ।।


व्यवसाय-उद्योगात असावी ज्वलंत इच्छाशक्ती । 

त्यासाठी करावी लागते स्वकर्तृत्वावर भक्ती ।।


Vyavasay udyogasathi udyogniti


व्यवसाय-उद्योगात मिळवावे लागते झगडून यश । 

परंतु त्यासाठी आधी पचवावे लागते अपयश ।।


व्यवसाय उद्योगात असावे संभाषण चतुर । 
त्यासाठी करू नका ग्राहकापुढे कुरबूर ।।

व्यवसाय-उद्योगात नसावा भाऊबंदकीचा शाप । 
आटोकाट भरावे आपल्या कर्तृत्वाचे माप ।।

व्यवसाय-उद्योगात झगडावे परिस्थितीशी । 
तीच तुमची पंढरी आणि काशी।।

व्यवसाय उद्योगात गाठा सर्वोच्च शिखर । 
वेळप्रसंगी घाला नीतिमत्तेवर नांगर ।।

व्यवसाय-उद्योगात असू द्यावे प्रसंगावधान । 
तुमच्या उद्योगाचे तुम्हीच व्हावे राजा नि प्रधान ।। 

व्यवसाय-उद्योगात असू द्यावे स्मित हास्य । 
तरच तुम्ही जिंकू शकतात ग्राहकाचे कास्य ।।

व्यवसाय-उद्योगात करा दैवावर मात । 
जुन्या विचारांची वेळोवेळी टाकावी कात ।।

व्यवसाय उद्योगात करू नका वेळेचा विचार । 
कधी पसरू नका हात, होऊ नका लाचार ।।

व्यवसाय-उद्योग करता म्हणून वाटू देऊ नका कमीपणा ।  
सोडू नका तुमच्या मनाचा सरळपणा ।।

व्यवसाय-उद्योगात वेळप्रसंगी घ्यावे कठोर निर्णय । 
पण कामाची बिघडू देऊ नका लय ।।

व्यवसाय उद्योगात चांगली माणसं सतत जोडा । 
तेव्हाच नीट चालेल आपल्या उद्योगाचा गाडा ।।

व्यवसाय उद्योगात स्वभाव ठेवा मनमिळावू । 
प्रसंगी उद्योग कर्तृत्वाचेच गाणी गाऊ ।।

व्यवसाय उद्योगात केव्हाही पडते अघटित । 
तेव्हाच अनुभव मिळतो अनेक पटीत ।।

व्यवसाय उद्योगात प्रत्येक असतो असमाधानी । 
हिच खरी ओळख असते उद्योजकाच्या मनी ।।

व्यवसाय उद्योगात असतात अमर्याद संधी । 
या लाटेवर आरुढ होतो उद्योजकाचा नंदी ।।

व्यवसाय उद्योगात स्वतःच करा स्वमूल्यमापन । 
कशाला हवे दुसऱ्या कुणाचे ज्ञापन ।।

व्यवसाय उद्योगात हस्तगत करावे व्यवहार ज्ञान । 
त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही मान ।।

व्यवसाय उद्योगात होत असते चारित्र्याचे मुल्यमापन । 
तेव्हाच ग्राहक ठरवतो तुमचे 'शहाणपण' ।।

व्यवसाय-उद्योगात करावे मनाचे व्यवस्थापन । 
तेव्हाच सुधारेल आपले 'अर्थकारण' ।।

व्यवसाय-उद्योगात द्या इतरांना प्रेरणा । 
त्यानेही मिळेल आपल्या उद्योगाला चालना ।।

महाराष्ट्रात आहे भौगोलिक संपत्तीचे सडे । 
म्हणूनच आपण आहोत औद्योगिकीकरणात पुढे ।।

व्यवसाय उद्योगासाठी मी खूप काही सांगितलं । 
माफ करा मला जेवढं कराल तेवढं चांगलं ।।

व्यवसाय-उद्योग करणाऱ्यांवर मी करतो प्रेम । 
जेवढं जमेल तेवढे करा माझेच मला सप्रेम ।।

व्यवसाय-उद्योजकांना जावो दिवस आनंदाचा । 
घेतो रजा आता सोशल मीडियाच्या वाचकांचा ।। 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


पाणी समस्या सोडविण्याची गरज (Need to solve water problem )

पाणी समस्या सोडविण्याची गरज 
Need to solve water problem 

समस्येच्या समाधानातून संधींचा पाऊस !
Rain of opportunities from solving the problem!

Pani samsya sodvinyachi garaj

 पाण्याच्या बाबतीत परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. बहुतेक पाण्याचे सर्व स्रोत दूषित झाले आहेत. शुद्ध पेयजल ही एक मोठी समस्या भारतात निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी फक्त लाभार्थीचाच नव्हे तर प्रत्येक भारतीयांचा सहभाग यामध्ये मिळणे नव्हे तर मिळविणे ही काळाची गरज आहे. या समस्येच्या समाधानासाठीच्या प्रयत्नांतून निश्चितच पाण्याबरोबर युवावर्गासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे सांगायला नकोच.    

     
  शासनाच्या वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मी व माझ्या सहकाऱ्यांनी ५२ गावांना पाणलोट कार्यक्रमाविषयी जाणीव, जागृती मेळावे घेतले. त्यावेळी प्रचार फेरी, कलापथक आदी माध्यमांद्वारे पाणी बचतीविषयी जाणीव जागृती केली. यावेळी फिरताना नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ही गावे होती. या गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. या परिसरात पाणलोटचे काम करत असताना एक वृद्ध पुरुष बाजेवर आंघोळ करीत होते. बाजेखाली तांब्याचे मोठे पातेले ठेवले होते. आंघोळीचे पाणी त्या घंगाळात येत होते. मी म्हटलं, तुम्ही असं का करतात, ते म्हणाले, साहेब... हे पाणी मी पाच किलोमीटरवरून आणले आहे. या पाण्याचा थेंबही इकडे तिकडे गेला तर मला तीन दिवस हे पाणी पुरवायचे आहे. म्हणून मी इतकं सांभाळून जपवून ठेवतो आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. परंतु अशी छोटी छोटी अनेक उदाहरणे मी बघायचो. 

 या भीषण समस्येवरती कायमस्वरूपी उपायच नाही का? एक तर भरपूर पावसाचे पाणी... दुसरीकडे विषण्ण परिस्थिती.. पाण्याअभावी जनावरांचे, माणसांचे हाल... हे चित्र असं का? याचे कारण आपण अजूनही पाण्याचं मोल समजत नाही. दिवसेंदिवस भूजलाची पातळी खोलवर जात आहे. हवामानाचे चक्र अनिश्चित झाले आहे. कधी गारपीट तर अवकाळी पावसाचा कहर...दुसरीकडे फुकट मिळणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि जतन करण्यास लोकसहभागाचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले. सरकारही योजना राबवूनही अपयशी ठरले आहे. मात्र नियोजनाअभावी पाण्याचा दुष्काळ उग्र स्वरूप धारण करीत आहे.
    
  पाण्याचा नोबेल पुरस्कार राजस्थानच्या राजेंद्रसिंह यांना मिळाला. अशा राजेंद्रसिंह यांनी या प्रश्नाचे मोल जाणले. राजेंद्रसिंह यांनी ग्रामीण विकासाची चळवळ उभी केली आणि सातत्याने पाणी अडवा व पाणी जिरवा या सूत्रावर काम केले. आज राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशांत मुबलक पाणी दिसते आहे. 

Pani samsya sodvinyachi garaj


  भारतात एकूण ३२९ दशलक्ष हेक्टर्सपैकी १७५ दशलक्ष हेक्टर्स पडीक अवस्थेत आहे. आपल्या कृषिप्रधान देशासाठी आपली नैसर्गिक संपदा अधिकाधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी जलसंधारणाचे अनेक मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग भूपृष्ठावरील दुय्यम स्रोतांचा म्हणजे सरोवरे, नद्या, तळी, डोह, ओढे, नाले, झरे इत्यादी भूपृष्ठावरील जलसंधारणाचे नैसर्गिक प्रकार आहेत. धरणे, कालवे, पूर बंधारे, प्रवाह बंधारे, तलाव, पाझर तलाव, हौद, टाक्या हे भूपृष्ठावरचे जलसंधारणाचे कृत्रिम प्रकार आहेत आणि दुय्यम स्रोतात जसे भुपृष्ठावर जलसंधारण आपण करतो तसेच भूगर्भातही जलसंधारण करता येते. 

  जमिनीत पाणी जिरून निर्माण झालेले भूगर्भ जलसाठे, नदीपात्रांच्या शेतीतळ्याखालील जलसाठे हे नैसर्गिक भूगर्भ जलसंधारणाचे प्रकार आहेत तर समतलचर, झिरपचर, झिरपखड्डे, शोषखड्डे हे भूगर्भजलसंधारणाचे कृत्रिम प्रकार आहेत. वनराई, वृक्ष, झाडेझुडपे, गवत, हिरवळ यांच्या साह्याने भूगर्भ जलसंधारण साधता येते. वरील प्रकारचे जलसंधारण लोकसहभागातून उत्तम रीतीने साधत हे काम घडवून आणण्यासाठी निरपेक्ष, निःस्पृह नेतृत्वाची गरज असते. 

  गावपातळीवर शेतकरी ग्रामस्थ यांना एकत्र आणून त्यांना त्यातले फायदे समजावून सांगून प्रवृत्त करणे या कामासाठी तांत्रिक मार्गदर्शन स्वयंसेवी संस्थेकडून उपलब्ध करून देणे, बऱ्याच ठिकाणी हे पारंपरिक तंत्रज्ञान उपलब्ध असते पण त्याला पुनरुज्जीवन करणे, योजना कार्यान्वित करून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन ग्रामस्थांच्या हातात देऊन या कार्याची जाणीव निर्माण करून द्यावी. राजस्थानात तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजेंद्रसिंह चौहान या तरुणाने असेच मोठे कार्य उभे केले आहे. 

 पाणी अडवण्याचे व साठवण्याचे राजस्थानातले पारंपरिक तंत्र वापरून या आदिवासी भागात जोहाड दगडमातीच्या बांधांचे बांधकाम केले गेले. त्यामुळे सरकारने डार्क झोन म्हणून घोषित केलेला प्रदेश आता व्हाईट झोन समृद्ध पट्टा म्हणून ओळखला जातो.

Pani samsya sodvinyachi garaj

 
   गेल्या तीस वर्षांत तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यांनी ११ जिल्ह्यांत लहान मोठी अधिक दहा हजारांहून अधिक जोहाड म्हणजे मातीची धरणे बांधली आहेत. या ११ जिल्ह्यांत ११०० गावांमध्ये ही जोहाड बांधून समृद्धी फुलवण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. 

  राजस्थानात तर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य अनियमित पावसामुळे हा प्रदेश रुक्ष आणि विदीर्ण बनला होता. त्यामुळे तेथील लोकांचे स्थलांतर असायचे. अशा या लोकांमध्ये जलसंधारणातून चेतना जागविणारे राजेंद्रसिंह यांनी येथील खेड्यांतल्या लोकांचे दुःख पाहिले. पाण्याअभावी तडफडणाऱ्या गावांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य झोकून दिले.
      

 तरुण भारत संघाच्या माध्यमातून त्यांच्या कामाची सुरुवात राजस्थानच्या अलवार या लहानशा खेड्यातून झाली. या गावातली पाणी अडवण्याची परंपरागत पद्धत जोहाड होती. ज्यात डोंगर उतारांवर मातीचे बांध घालतात किंवा छोटे धरण बांधून पाणी अडवण्याची पद्धत असते. पूर्वी पाणी पडलं की या जोहाडात साठवण होत होती. त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढायची. हे पाणी पुष्कळ दिवस टिकायचे पण या गावाने या जोहाडाकडे दुर्लक्ष केले. 

  मागच्या पन्नास वर्षांत ते बदलले. अनेक जोहाड नादुरुस्त होऊन कालवे शिगोशिग भरले. या जोहाडाची वर्षानुवर्षे कोणी दखल घेतली नाही. सरकारी पातळीवर हे काम व्हावे अशी लोकांची इच्छा होती यामुळे येथील लोकांना मूग गिळून गप्प बसायचे अशी परिस्थिती! या परिस्थितीत राजेंद्रसिंह यांनी जोहाड दुरुस्त करण्याचे ठरविले. 

  अनेक वर्षांपासून साठून राहिलेले गाळ, दगड धोंडे काढण्याचे काम सोपे नव्हते. या कामासाठी गांवकरीही पुढे येत नव्हते. परंतु कोणतीही हार न खाता त्यांनी कुदळ-फावडं हाती घेतलं. माती उपसताना, खणताना त्यांना पाहून गावकऱ्यांच्या मनात हे चित्र बदलण्याचे विचार आले. त्यानुसार त्यांनी राजेंद्रसिंहांना मदत केली. बघता बघता जोहाडांचे पुनरुज्जीवनही झाले. त्यानंतर तीन वर्षांच्या दुष्काळानंतर पाऊस पडला. 

  हा जोहाड दुथडी भरून वाहू लागला. हे पाहून आसपासच्या गावकऱ्यांनाही जोहाडाचे वेध लागले. याचे महत्त्व पटवून देण्यात राजेंद्रसिंह सरसावले. शेकडो गावांमध्ये हे जोहाड उभे राहिले.
    

  नुसतं पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर व्हावं याचबरोबर त्या त्या संबंधीत गावातील अनेक लोक सामाजिकदृष्ट्या मागासलेले होते. दारूच्या व्यसनात अडकले होते. म्हणून त्यांनी अट घातली की, ज्यांना जोहाड बांधून पाहिजे असतील त्यांनी दारू गाळायची नाही, घ्यायची नाही त्यानुसार अनेक गावांनी चुकीचा मार्ग सोडला व कसोशीने कामाला लागले. 

   एक एक करता अनेक जोहाड राजेंद्रसिंहांच्या मार्गदर्शनातून गावच्या लोकसहभागातून आकाराला आली. पाण्याचा अभाव असलेला प्रदेश म्हणून सरकारने घोषित केला होता तो आता व्हाईट झोनमध्ये बदलला आहे. राजेंद्रसिंहांच्या या बहुमोल कामामुळे येथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

  या गावामध्ये फक्त २० टक्के जमीन कसण्यायोग्य होती. आता हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातच शेती करता येत होती. ते या हंगामाताच ज्वारी, बाजरी यासारखीच पिके घ्यायची आता हे शेतकरी रब्बी हंगामातही गहू, बाजरी, उसासारखी पीके घेतात. भाजीपाल्यांचेही भरघोस उत्पन्न काढतात. आता त्यांच्या शेतीतले उत्पन्न दहापटीने वाढले आहे. स्थलांतर थांबवून शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून देण्याचे बहुमोल काम त्यांनी केले आहे.

Pani samsya sodvinyachi garaj

 वर्षानुवर्षे नैसर्गिक संपत्तीपासून वंचित राहिलेल्या लोकांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याचे लाभ त्यांना व्हावेत व नैसर्गिक संपत्तीचा विनाश थांबवून त्याचे जतन आणि संवर्धन झालं पाहिजे अशी ठाम भूमिका तरुण भारत संघाने घेतली. वेळोवेळी त्यांनी अरवली बचाव पदयात्रा, जंगल जीवन बचाओ पदयात्रा, गंगोत्री यात्रा, अकाल मुक्ती यात्राही काढली. 
 
  यावेळी राजेंद्रसिंहांना समाजकंटकांकडून खूप त्रास झाला पण संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा धडाका चालूच ठेवला आणि येथील सारिस्कार अभयारण्याचा कायापालट झाला. लोकांच्या हातात पाण्याचे व्यवस्थापन जलबिरादरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण भारत संघाने सोपवले आहे. 

  सामुदायिक हिताची जाणीव, नैसर्गिक संपत्तीवरील अधिकारांची जाणीव आणि त्यासाठी प्रसंगी लढा देण्याची मानसिकता त्यातून विकसित करण्यात राजेंद्रसिंह तसेच तरुण भारत संघ यशस्वी झाला आहे. जलसंवर्धनाच्या उद्देशाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प त्यांनी राबवले आहे. त्यांनी पाण्याचं रक्षणाचे आणि संवर्धनाचे साधन लोकांच्या हाती सोपवलं आहे. 

  याचे बाळकडू विद्यार्थीदशेतच मुलांना लागावे म्हणून या उद्देशाने आपल्या परिसरातील झाडे, पशुपालन, शेतजमिनीची माहिती, मातीचा कस ओळखणे यासाठी एक हजारापेक्षा अधिक मुलांना प्रशिक्षण दिले आहे. तरुणांसाठी श्रमदान शिबिर घेऊन गावातील पारंपरिक जल साठवण्याची दुरुस्ती व सफाई केली जाते. 

  पारंपरिक बी बियाणे, दुष्काळ निवारण, स्वयंरोजगार, वनसंवर्धन, सरकारी विकास प्रबोधन वर्ग, ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण, सहकार, सामाजिक जाणीव आदी अनेक योजनांमधून त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवले आहे. 

  त्यांना या कामाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जगात प्रतिष्ठेचा समजला जाणारा २००१ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाला जगाने दिलेली ही एक पावतीच होती. आता त्यांना पाण्याचा प्रति नोबेल समजला जाणारा पुरस्कारही मिळाला आहे. 
   

  महात्मा गांधीच्या उक्तीनुसार 'थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली' म्हणजे विचार जागतिक पातळीवर करा, कृती मात्र स्थानिक पातळीवर करा यानुसार जलसंधारणाचा, पाणी बचतीचा, भूगर्भ जलपातळीचा जागतिक विचार करताना कृती मात्र गावांगावांमधून शिवाराशिवारांतून आचरणात आणली तर अशक्य असं काहीच नाही. 

  राजेंद्रसिंहांच्या कार्याने पेटून उठणारे तरुण गावागावांत तयार व्हावेत तरच गावांसाठी पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. आपल्या महाराष्ट्रातही अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी जलसंधारणाच्या, मृदसंधारणेच्या अशाच योजना ग्रामस्थांच्या मदतीने अमलात आणून अक्षरशः चमत्कार घडवला आहे. त्यांच्या कार्याचा वसा प्रत्येक शेतकरी ग्रामस्थाने घेतला पाहिजे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
      
 पाण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले जात असले तरी शाश्वत पाण्यासाठी आर्थिक निधीचा अभाव असल्याचे दिसते. दरवर्षी राज्यात सरासरी पंधराशे टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा खर्च येतो. नळ पाणीपुरवठा योजनांसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र पाण्याचे स्रोत शाश्वत ठेवण्यासाठी निधीची तरतूद समाधानकारक होत नाही. 

   राज्यातील बहुतांश गावे, शहरे आणि वाड्या-वस्त्या यामध्ये नळ पाणीपुरवठा योजना आकाराला आल्या असल्या तरी त्यांनी पाणी कुठून आणायचे हा प्रश्न भेडसावतो आहे. त्यासाठी पाणी संवर्धन आणि जतन या पद्धतींना सरकारने प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे. 

  रेन वॉटर हार्वेस्टिंग सरकारी कार्यालये, पंचतारांकित हॉटेले, उद्योग, चित्रपटगृहे, मोटार गॅरेजेस, गगनचुंबी इमारती, बागबगीचे, सरकारी निवासस्थाने आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग कायद्याने बंधनकारक केली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा स्वतंत्र विभाग असावा. 

  ग्रामीण स्तरावर पाण्याचे स्रोत शोधून त्यांचे संवर्धन व जतन करण्याचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत. यासाठीचा निधीही ग्रामसभेकडे हस्तांतरित करावा. गावागांवात प्रत्येक घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी काही नियम आणि निकष ठरवून त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत. 

  सरोवर संवर्धन योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. वाळू उपशावर ग्रामसभेचे नियंत्रण असावे. पावसाचे पाणी वाहून जाणार नाही यासाठी नळ पाणी पुरवठ्याप्रमाणेच यंत्रणा विकसित करावी. डोंगराळ भागात "पाणी अडवा, पाणी जिरवा" मोहीम प्रभावीपणे राबवावी. पाण्याचे स्रोत शोधून त्यांचे जतन करण्याचे अधिकार ग्रामसभेला द्यावेत. 

  पाण्याच्या जुन्या आटलेल्या स्रोतांच्या पुनर्भरणाची महत्त्वाकांक्षी मोहीम जनसहभागातून राबवावी. अशा पद्धतीने पाणी प्रश्नांवर ज्वलंतपणे, विधायक दृष्टीने काम करण्याची गरज आहे. सकाळ वृत्तपत्र समूहाने पाणी बचतीच्या साक्षरतेविषयी प्रबोधन केले आहे. 

  माध्यमांत अशी विधायक काम करण्याची ताकद जर समाजमनाला पेटवून ठेवण्याचे काम करेल तो दिवस दूर नाही की आपण पाणी प्रश्न संपूर्ण नाही पण त्यातील काही भाग सत्कारणी लागला तरच धन्य होईल असे मला वाटते. म्हणून म्हणतो, पाणी अडवा... पाणी जिरवा..!, पाणी पिकवा... पाणी साठवा...!!

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम (Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा
कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम 
Agri Business Management Course of Yashwantrao Chavan Maharashtra Open University


Mukta vidyapithacha krushi vyavasay vyavasthapan abhyaskram

 मुक्त विद्यापीठातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सन २००१ पासून सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, कृषी व्यवस्थापन संकल्पना आणि महत्त्व, वित्त व्यवस्थापन, कृषी विपणन, शेतीमालाची विक्री व्यवस्था, शेती उत्पादनाची निर्यात इ.चा समावेश आहे. तसेच मालाचा दर्जा, फळे, भाजीपाला व फुलांची तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यात, कृषी व्यवसाय विश्लेषण साधने आदी घटकांविषयी सविस्तर माहिती असल्यामुळे हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.


   जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार भारतीय बाजारपेठ जगासाठी नुकतीच खुली करण्यात आली. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असलेल्या भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अमर्याद वरदान लाभलेल्या भारताने कृषी क्षेत्रात आश्चर्यजनक प्रगती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मागासलेल्या या देशाने स्वातंत्र्यानंतर आधुनिक शेतीचा अवलंब करीत हरितक्रांती घडवली. यामध्ये शेतक-यांसह कृषी विद्यापीठे, मुक्त विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था, कृषिशास्त्र यांचाही बहुमोल वाटा आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार एक अब्ज लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरविण्याचे प्रचंड आव्हान कृषी क्षेत्रासमोर आहे. तसेच जागतिक स्पर्धेचाही विचार करावा लागणार आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ उठवून अन्नधान्य, फळे, फुले, भाज्या, वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, तेलबिया आदींच्या निर्यातीला प्रचंड वाव आहे. तसेच उद्योगधंद्यासाठी लागणारा प्रचंड कच्चा माल पुरविण्याचे कामही कृषी क्षेत्राला करावे लागते. त्यामुळे या क्षेत्राकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच अत्याधुनिक, शास्त्रीय, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासकम या व्यवसायातील संबंधितांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.

     
  अविकसीत देशात हजारो वर्ष शेतीव्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जात होता; परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर शेतीक्षेत्राचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण होत आहे. विविध प्रकारच्या नवनवीन शेतीआदाने नवीन तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. 
 
  उदाहरण द्यायचे झाले तर संकरीत बी-बियाणे, रासायनिक कीटकनाशके, औषधे आपल्या शेतावर वापरल्यास त्यापासून अधिक उत्पादन होईल? त्याच्या विक्रीस जादा खर्च किती येईल? ही नवी आदाने वापरल्यामुळे विशिष्ठ आकाराच्या शेतीपासून निव्वळ नफा किती मिळेल? इत्यादी प्रश्नांची चर्चा करणे, उत्पादन खर्च व त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटू लागले. साहजिकच यातून शेतीचे व्यवस्थापन या विषयाकडे अधिकाधिक लक्ष वेधले जाऊ लागले व त्यातून शेतीचे व्यवस्थापन हे नवे शास्त्र उदयास आले.
     
 या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांकडे शिक्षणाबरोबरच काही अन्य पात्रता असाव्यात. शेतीउद्योग मनुष्यबळावर आधारीत आहे. यातील बहुतेक काम करणाऱ्या व्यक्ती अकुशल, निरक्षर असल्याने त्यांच्याशी जुळवून काम करून घेण्यात कौशल्य लागते. उन्हातान्हात काम करण्याचा कष्टप्रद व्यवसाय असल्याने उत्तम आरोग्य हवे. शेती पूर्णपणे निसर्गांवर आधारीत असल्याने हवामानाचे सखोल ज्ञान गरजेचे आहे. 

  टोळधाड, झाडांवर अचानक उद्भवणारे रोग, किड़ी, अळ्या इत्यादींमुळे लक्षावधी मनुष्यबळाची आणि पैशाची नासाडी होण्याची शक्यता गृहीत धरून अनपेक्षित संकटाला सामोरे जाण्याची तयारी कायम ठेवावी लागते. अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शास्त्रीय दृष्टी आवश्यक ठरते. तयार मालाला चांगला भाव मिळविण्याच्या दृष्टीने बाजारपेठेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. हे ज्ञान डोळसपणे घेता यावे, त्याकडे पाहण्याची दृष्टी मिळावी म्हणून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम आज महत्त्वाचा ठरला आहे.
 
  शेतीच्या व्यवस्थापनात विशिष्ट शेतावर कोणते पीक घेणे योग्य होईल, त्याचे प्रमाण काय असावे, कोणते आदान किती प्रमाणात वापरावे, विक्रीव्यवस्था, मुख्य पिकाबरोबर इतर जोडधंदे इत्यादी विश्लेषण करून घ्यावे लागतात. हे निर्णय कृतीत आणणे म्हणजे कृषी व्यवस्थापन होय. 

   आधुनिक काळामध्ये शेती ही केवळ एक जीवनपद्धती न राहता तो एक व्यवसाय आहे. जीवनपद्धतीमध्ये केवळ पोटापुरते हा मुख्य उद्देश असतो तर व्यवसायामध्ये उत्पादन कार्यदक्ष करून जास्तीत जास्त नफा मिळविणे हा मुख्य हेतू असतो. उत्पादन कार्यदक्ष आणि फायदेशीर करण्यासाठी शेती उत्पादनामध्ये नवीन तंत्रे आणि निविष्ठांचा वाढता वापर होत आहे. तसेच जागतिक मुक्त व्यापारामुळे निरनिराळ्या देशातील बाजारभाव, मागणी, पुरवठा इत्यादी माहितीसाठी कृषी व्यवस्थापनात माहिती-तंत्रज्ञानाचे सुद्धा महत्त्व आहेच.
       
 शहरी भागात मोठ्या प्रमाणावर झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण त्याचबरोबर खेड्यातून शहराकडे येणारा लोकांचा लोंढा थांबविण्यासाठी ग्रामीण भागातच लोकांना रोजगार पुरविणे, शेतीशिवाय कुटीर व लघुउद्योग यांचा विकास करणे, ग्रामीण भागातच उद्योगांच्या विकासाला चालना देणे, त्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन देणे इत्यादी उपाय सुचविण्यात येतात आणि शेतीच्या विकासास योग्य स्थान, प्राधान्य दिले तर शेती उत्पादन वाढून वाढीव उत्पादन कुटिरोद्योगांच्या उत्पादन व विकासासाठी वापरता येईल. 

  एकूणच ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येईल व त्याचबरोबर शहरी भागातही निर्माण होत असलेल्या गंभीर समस्या कमी करता येतील. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रमुख असलेला शेतीव्यवसाय व त्याचे व्यवस्थापन चांगले होण्यासाठी हा अभ्यासक्रम चालना देतो. 

 मुक्त विद्यापीठाची कार्यप्रणाली इतर विद्यापीठापेक्षा बंदिस्त नसल्यामुळे या अभ्यासक्रमाला तळागाळातील शिक्षित युवा शेतकरी प्रवेश घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी संयोजक, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी विज्ञान विद्याशाखा, य.च.म. मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.

© दीपक केदू अहिरे
नाशिक

(पूर्वप्रसिध्दी : दै.देशदूत, कृषीदूत पुरवणी,दि.४ सप्टेंबर २००१,पान १२)


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

तरसाळीचे अनिरुद्ध पाटील यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान (Aniruddha Patil of Tarsali awarded National Gopal Ratna Award)

तरसाळीचे अनिरुद्ध पाटील यांना 
राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान
Aniruddha Patil of Tarsali awarded 
National Gopal Ratna Award

Annirudha patil yanna rashtriya gopalratna puraskar pradan

 बागलाण तालुक्यातील तरसाळी  येथील अनिरुद्ध पाटील यांना नुकताच राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग आणि राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 


राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार

  केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशनतर्फे महाराष्ट्राला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

  हा पुरस्कार सोहळा जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ए.पी.शिंदे सभागृहात घेण्यात आला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला. 


पाच लाख रुपयांचा पुरस्कार 

Annirudha patil yanna rashtriya gopalratna puraskar pradan

   पुरस्कार प्राप्त श्री. पाटील हे अभियंता असून त्यांनी  काही काळ नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन त्यांनी सारजा डेअरी फार्म सुरू केला. 

  सध्या त्यांच्याकडे १३० देशी गीर गायी आहेत. या गायींपासून दररोज २०० लिटर दूध मिळते. गायींचे संगोपन, दुग्धव्यवसाय, देशी गोवंशाची वाढ व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानिक शेतकऱ्यांना पशुधनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम ते करतात. 


विशेष कार्याची दखल

 गायीपासून दुध, गोमूत्र, गायीच्या शेणापासून गोवऱ्या, देशी गायीचे तूप, सेंद्रिय खत आदींचे उत्पादनही करतात. या विशेष कार्याची दखल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे आहे.


महाराष्ट्राला चार पुरस्कार 

 महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला चार पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांनी स्वीकारला.  या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे. 

 उत्कृष्ट पशुचिकित्सकाचा पश्चिम विभागाचा पुरस्कार कऱ्हाड तालुक्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांना प्रदान करण्यात आला. पश्चिम विभागाचा दुसरा पुरस्कार पंढरपूर येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांना देण्यात आला.

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...