name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): April 2025

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न (Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded)

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न...
Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded...

Rajiv Gandhi krushi vidnyan pratishthanchi patrakar parishad sampanna


      अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार २०२४-२५ याबाबत माहिती विशद करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली. 


   यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश दादा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य अनुला खान, सन्माननीय ज्योतीताई ढोकणे, राहुल तायडे, दत्तात्रय किटुकले, प्रा.सुनील सावळे, प्रवीण वानखडे, प्रा. सतीश काळे, राहुल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २७ एप्रिल २०२५ रोजी पत्रकार परिषद पुणे येथे संपन्न झाली.
    
    २१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान विज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान राज्यस्तरीय राजीव गांधी, कृषीरत्न पुरस्कार देऊन साजरा केला जाणार आहे. 
    
    सन २००७ पासून सातत्याने हा उपक्रम सुरू असून शेतकरी सन्मानाचे सलग १९ वे वर्ष आहे. आजपर्यंत २७० प्रगतशील शेतकरी, कृषी कंपनी, शेतमजूर, कृषी वैज्ञानिक, कृषी उद्योजक, कृषी पत्रकार, महिला शेतकरी यांना सदर पुरस्कार प्रदान केला आहे. राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार प्राप्त १२८ शेतकऱ्यांना आजपर्यंत राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राधान्याने जाहीर झाले आहेत. 
     
  राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार सोहळा २१ मे २०२५ ते २७ मे २०२५ पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात २१ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बैल जोडी पूजनाने होणार आहे.  सदर सोहळा अमरावती तालुक्यातील अंगोळा या गावातून उत्कृष्ट बैल जोडी मालक शेतकऱ्याचा सन्मान व बैलजोडी पूजनाने होईल. सोहळ्याचा समारोप २७ मे २०२५ रोजी राजीव गांधी शेतकरी सद्भावना पुरस्कार देऊन होणार आहे.या सोहळ्याचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती तर्फे होत आहे. 
 
 सदर पुरस्कारासाठी राज्यभरातील विविध प्रांतामधून २१ शेतकरी निवडले जाणार आहे. यामध्ये प्रयोगशील शेतकरी महिला, शेतकरी कृषी वैज्ञानिक, उत्कृष्ट शेतकरी,कृषी उद्योजक फार्मर  कंपनी तसेच कृषी पत्रकारिता प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मधून एक अशा पद्धतीने निवड होणार आहे. यावर्षी विशेष कृषी पुरस्कार देणार देण्यात येणार आहे. ज्यामध्ये शेतकरी सद्भावना मित्र पुरस्कार, दुग्ध उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट कृषी अवजार संस्था, उत्कृष्ट बैल जोडी मालक, उत्कृष्ट शेतकरी मित्र, कृषी अधिकारी, फळबागायतदार, प्रगतशील आदिवासी शेतकरी, बियाणे संशोधक, फुलशेती उत्पादक शेतकरी, वनऔषधी उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट मत्स्यपालन व्यवसायी, रानभाजी उत्पादक शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, युवा शेतकरी अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष कृषी कार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
      
    राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानने शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी व ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवई यांच्या अध्यक्षतेखाली १६ कृषीतज्ञांची शेतकरी निवड समिती नेमली असून ही समिती दिनांक १० मे २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची निवड करणार आहे. 
     
  निवड झालेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, राजीव गांधी यांची प्रतिमा, मानधन, प्रमाणपत्र, सन्मानाच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय आयोजनामध्ये राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे पुरस्कारासाठी जवळपास ३०० प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. 
      
   सदर शेतकरी सन्मानाचा सोहळा हा स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारा देशभरातील एकमेव कार्यक्रम आहे. कृषीक्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन देशातील शेतकऱ्यांना प्रगतीचे नवे दालन उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. तेव्हा या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने २१ मे ला स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 

  या शेतकरी सन्मानाच्या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या भागातील मान्यवर मंडळी, कृषीतज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी सपत्नीक व सहपरिवार सन्मानित करण्यात येणार आहे. 

  सदर पुरस्कारासाठी आवेदन करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे. सदर पुरस्कार व्हॉट्सॲप, ई-मेल आयडी किंवा खालील शेतकरी निवड समितीच्या सदस्यांच्या पत्त्यावर किंवा ऑनलाईन पाठवावे
   
  पुरस्कारासाठी आवेदन करण्याचा संपर्क व पत्ता व ईमेल आयडी पुढीलप्रमाणे असून पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 श्री. प्रकाश भाऊसाहेब साबळे मु. पो. नया अकोला, ता. जि. अमरावती पिन- ४४४८०१ आहे. मोबाईल क्र.- 9607735913 (व्हॉट्सॲप), ई-मेल आयडी-prakashsable123@gmail.com

  डॉ. दिलीप काळे, अध्यासन प्रमुख, श्री संत गाडगेबाबा अध्यासन, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, डॉ. श्रीकांत जिचकर मेमोरियल हॉल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मोबाईल नंबर-9423424512

  सौ. पौर्णिमाताई सवाई, मु. पो. टाकरखेडा शंभू , ता.भातकुली जि.अमरावती, व्हाट्सअप नंबर-9766022126


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


कृषिपत्रकारिता : एक आव्हानात्मक क्षेत्र (Agricultural journalism: A challenging field)

कृषिपत्रकारिता : एक आव्हानात्मक क्षेत्र
Agricultural journalism : A challenging field

Krushipayrakarita : Ek avhantmtak kshetra

--------------------------------------------------------------------

पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंत शेतीचे सर्व अर्थकारण कृषीपत्रकारांस माहित असायला हवे. नुसते माहित असूनही भागत नाही तर उत्पन्नात तफावत का आली ? सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेता येईल का? असा सांगोपांग विचार व्हायला हवा. एकंदरीत शेती विषयामध्ये जाणीवपूर्वक कृषीपत्रकार निर्माण व्हायला हवेत. पण ही गोष्ट सोपीही नाही...

--------------------------------------------------------------------

  पत्रकारितेमध्ये सर्वच प्रवाह एकवटलेले आहेत. साहित्य, सांस्कृती, समाजकारण, राजकारण, क्रीडा आदी विषयांची पत्रकारिता स्वतंत्र अंगाने बहरत आहे. त्याचप्रमाणे आज कृषीपत्रकारिता हे एक नवे क्षेत्र उदयाला आले असून या विषयावरची दैनिकं, मासिकं, पाक्षिके, साप्ताहिके यांमधून कृषी पत्रकारितेचे दर्शन घडतेच. 

    

  पूर्वीपेक्षा आज शेतीज्ञानाला खूप महत्त्व आहे. ज्ञान आणि मेहनत घेण्याची वृत्ती हेच आजचे मोठे भांडवल आहे याची जाण शेतकरीवर्गाला होत आहे. मग हे ज्ञान मुद्रित माध्यमातून असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असो. या दोन्ही माध्यमातून शेतीविषयक ज्ञान घेऊन शेतकरी आपल्या शेतीमध्ये सुधारणा करू लागला आहे. पारंपरिक शेतीऐवजी सुधारित, नगदी पिकाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. (आज शेतकऱ्याचे एकरी उत्पादनही बरेचसे वाढले आहे) आपल्या योजक व शोधक बुद्धीने शेतकऱ्याने चिकित्सकता जोपासली आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारी शेती कशी फुलेल याच विचाराने शेतकरी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहे. 

 

 कृषिपत्रकारितेचा विचार करता वर्तमानपत्रांनी शेतीविषयक लेख, बातम्या प्रकाशित केल्या, पण त्याचे स्थान खूप कमी आहे. जिल्हा वर्तमानपत्रात शेती विषयावरच्या पुरवणीला स्वतंत्र स्थान मिळाले. पण या कृषिप्रधान देशात किती शेती विषयावरची दैनिके, पाक्षिके, साप्ताहिके, मासिके आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल अशी परिस्थिती पूर्वी होती पण आता शेतीज्ञानाविषयी जागृती वाढली आहे. ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कृषिप्रदर्शनात शेतकरी भेट देतो. तेथे असणारे पुस्तकांच्या, मासिकांच्या स्टॉलवर खरेदी करतो. शेती मासिकांची वर्गणी भरतो यावरून कृषिपत्रकारितेला नक्कीच चांगले दिवस आले आहेत.


  शेती विषयामध्ये जाणीवपूर्वक कृषिपत्रकार निर्माण होणे सोपी गोष्ट नाही. इथले बारकावे तसेच प्रत्येक पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंतचे सर्व अर्थकारण या कृषिपत्रकारास माहित असायला हवे. नुसते माहित असूनही भागणार नाही तर त्या उत्पन्नातील तफावत का आली? सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पत्र घेता येईल का? याचा सांगोपांग विचार व्हायला हवा. कृषिपत्रकारितेत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे 'यश कथा' पूर्वापार रीतीने खेडयातला शेतकरी अधिक उत्पन्न मिळालेल्या शेतकऱ्याला भेटायचा, त्याची उत्पादन काढण्याची पद्धत समजून घ्यायचा आणि आपलं नेमकं कुठं चुकलं याचा अंदाज बांधून शेतीत बदल करायचा. आज त्याला प्रत्यक्ष शेतक-याची शेतीही दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दिसते. त्याने केलेले प्रयोग वर्तमानपत्रांतून अथवा मासिकातून वाचतो. ज्याची यशकथा दाखवली आहे त्या शेतकऱ्याशीही तो दूरध्वनीने संपर्क करतो. प्रत्यक्ष शेताला भेट देतो. यातून शेतीज्ञानाची लालसा त्याच्या अंगी वाढीस लागली आहे; परंतु लिखाणातून हिच परिणामकारकता दाखविण्यासाठी आज 'कृषिपत्रकार' बोटावर मोजण्याइतकेच आहेत असे चित्र आज आहे. त्यामुळे पुढे कृषिपत्रकारितेला फार मोठा वाव आहे. तसेच कृषिपत्रकारालाही ! अनेक वाहिन्यांत, वर्तमानपत्रांना अभ्यासू, व्यासंगी कृषिपत्रकाराची गरज भासते. पण या पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळण्यासाठी फार कमी ठिकाणी सोय आहे. किंबहुना नाहीच! परंतु नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कृषिपत्रकारितेचा 'अॅग्रो  जर्नालिझम' हा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. 


  जूनपासून याची प्रवेशप्रक्रिया विविध केंद्रावर सुरू होत असते. शेतीविषयक नियतकालिकांमध्ये बहुतांशी लिहिणारे लेखक हे प्रामुख्याने कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन संस्था तसेच खते-बियाणं, शेतीविषयक उपकरणे, अवजारे यांच्या निर्मिती उद्योगात गुंतलेल्या व्यावसायिक संस्था यामध्ये कार्यरत असलेले संशोधक, प्राध्यापक असतात. त्यांचा भर प्रामुख्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर असतो. या संशोधनाच्या आधारावर ते आपल्या लेखांमधून शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शकाची भूमिका घेतात. त्याचं लेखन एका विशिष्ट ढाच्यात बांधलेलं असतं. उदा. एखाद्या पिकाविषयीच्या लेखात त्या पिकाचं शास्त्रीय नाव, त्याचे गुणविशेष, त्या पिकाला अनुकूल जमिनीचा प्रकार, हवामान, पेरणीचा काळ, लागवड आणि मशागत, पिकावर पडणारी कीड-रोग, त्याचे नियंत्रण, काढणीचा काळ आणि काढणीचं तंत्र वगैरे माहिती असते. अशा बहुतांशी लेखांमध्ये शास्त्रीय परिभाषेचा आणि परिणामांचा वापर असतो.

    त्याविषयी अनेक शेतकरी अनभिज्ञ असतात. अशा लेखांमध्ये शेतावरचा प्रत्यक्ष अनुभव क्वचितच आढळतो. संशोधक प्राध्यापकांचं लेखन, त्यांनी त्यांच्या संस्थेच्या शेतावर केलेल्या प्रयोगावर आधारित असतं. त्यामुळे ते प्रामाणिक असतं. प्रयोगनिष्ठ असतं. यात शंकाच नाही. पण प्रत्यक्ष शेतावरच्या अनुभवाअभावी ते बऱ्याचदा 'सैद्धान्तिक' ठरतं. वेगवेगळ्या भागातल्या, वातावरणातल्या शेतकऱ्यांना अशा लेखामध्ये प्रतिपादित केलेले निष्कर्ष किंवा लाभ मिळतातच असं नाही. अशा सैद्धान्तिक लेखनापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्याचं कृषीपत्रकाराचे धोरण असावे. यासाठी स्थानिक कृषीपत्रकारांची गरज पडते. तो प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला भेटून त्याने केलेल्या प्रयोगाचा अवलंब लेखाद्वारे मांडेन, अशी अपेक्षा असते. कृषीपत्रकाराने केवळ सल्लेबाजी करायची नसून किंवा एखाद्या समस्येवरचा हाच उपाय रामबाण असला दावाही करायचा नसून शेतक-यांचे अनुभव वस्तुनिष्ठ पातळीवर तपासून ते शेतकरी वाचकांसमोर मांडायचे त्या शेतकऱ्याची प्रयोगशीलता आणि हुशारी, परिस्थितीनुसार हे प्रयोग, अनुभव स्वीकारावेत त्यावर आणखी प्रयोग करावेत, अशी भूमिका कृषी पत्रकाराची असावी.


  महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ कार्यरत आहेत. या विद्यापीठातून संशोधन आणि शेती विकासाची नवनवीन प्रणाली शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कृषीपत्रकाराची गरज आहे. पुढील काळात कॉर्पोरेट कंपन्या शेतीमध्ये उतरणार आहेत. मालाची खरेदी करणार आहेत. त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा व फसवणूक टाळता यावी या दृष्टीने कृषीपत्रकाराने सजग राहिले पाहिजे. शेतक-यांच्या हिताचे निर्णय, शेतीविकासाच्या योजना सातत्याने कृषी पत्रकाराने मांडल्या पाहिजे. यासाठी त्याने स्वतःचे कृषीज्ञान अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

कृषी शिक्षणाचा राज्यातला विचार करता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ नुसार महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांवर प्रामुख्याने कृषी व संलग्न क्षेत्रातील शिक्षण व संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याची जबाबदारी आहे. कृषी विद्यापीठांतर्गत निम्नश्रेणी शिक्षण म्हणजे कृषी शाळा, माळी प्रशिक्षण, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन इ. पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि उच्च शैक्षणिक म्हणजे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी. अभ्यासक्रमामुळे कृषी व संलग्न क्षेत्राकरिता निरनिराळ्या पातळीवर उच्चशिक्षित/प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. या चार विद्यापीठांतर्गत कृषी क्षेत्रातील दरवर्षी अंदाजे १६५० पदवीधर उपलब्ध होतात. एकूण उपलब्ध प्रवेश क्षमता २१९० विद्यार्थी असली तरी फार मोठ्या प्रमाणात (अंदाजे १५,०००) प्रवेश इच्छुकांचे अर्ज विद्यापीठ/कृषी परिषदेकडे प्राप्त होतात. तथापि उपलब्ध मयर्यादित प्रवेशक्षमतेमुळे अनेक विद्याथ्यांना प्रवेश मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांनी कृषीपत्रकारितेकडे वळणे गरजेचे आहे. कृषीपत्रकारिता हे एक नवे क्षेत्र असून याचा अभ्यासू, व्यासंगी पत्रकारांनी उपयोग करून घ्यावा असे मला वाटते. 

  Krushipatrakarita: Ek avhantmtak kshetra


© दीपक केदू अहिरे, नाशिक
पूर्व प्रसिद्धी : 
दै. लोकसत्ता (काऊन्सेलर पुरवणी) 
बुधवार,२६ सप्टेंबर २००७ (पान ४)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

असे उपक्रमशील उद्योजक (पुस्तक परिचय) (Such enterprising entrepreneurs )

असे उपक्रमशील उद्योजक
Such enterprising entrepreneurs

पुस्तक परिचय 
Book introduction

Ase upkramshil udyojak

"असे उपक्रमशील उद्योजक" हे पुस्तक पत्रकार व सामग्री लेखक श्री. दीपक केदू अहिरे यांनी लिहिले आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावना दिली आहे. 

  
   "असे उपक्रमशील उद्योजक" या पुस्तकात बहुगुणी मेट्रेसेसची कल्पक निर्मिती करणाऱ्या सौ. सुजाता सुनिल पवार, ढासळणाऱ्या गडाला वैभव देणारी जिगरबाज ! असणाऱ्या सौ. विजया विनायक पाटील, बालपणीच्या संस्कारानी प्रेरणा दिली आणि उद्योजक झालेल्या सौ. निलीमा अजीत पाटील, ज्यांचे बहरले शेत फुलांचे! अशा सौ. मेघा संजीव बोरसे, अख्खे दुकान ग्राहकाच्या दारात नेणाऱ्या सौ. दीपाली पुष्कराज अकोलकर,गृह उद्योगातून अर्थार्जन करणाऱ्या सौ. प्रतिभा पिंपळवाडकर, वनौषधीची वाढती मागणी, वाढती संधी हेरणाऱ्या डॉ. सौ. अरूणाताई पगार, कलासक्त दृष्टीचा अविष्कार 'साईबन'ची निर्मिती करणाऱ्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया, शुध्द दर्जेदार उत्पादनांची हमी, ग्राहकांची नाही कमी असे तत्व अंगिकारणारे श्री. विशाल राजकुमार चोरडिया, ऑटोमोबाईल बॉडी बिल्डींग क्षेत्रातील एक नाव ! श्री. दिलीप पिंगळे, 
  
 संगणकावरील बोलका शब्दकोष निर्मिती करणारे श्री. सुनिल शिवाजी खांडबहाले, शेती उपयोगी सायकलीचे निर्माते श्री.गोपाळ मल्हारी भिसे, टाकाऊतून टिकाऊ उत्पादन देणारा उद्योजक श्री. योगराज सुकदेव सोनवणे, ग्राहकांचे समाधान हेच ध्येय ठेवणारे श्री. वामन त्र्यंबक आहिरे, सहकारातून दुग्धप्रकल्प साकारणारे श्री. विलास शिंदे, कृषीपूरक उद्योगातील एक नवे पर्व साकारणारे श्री. महेंद्र भामरे, लायब्ररीतून स्वयंरोजगार निर्माण करणारे श्री. संजय कराळे, सायकस शेतीचा प्रेरणादायी प्रयोग करणारे श्री. मुकेश छेडा, डाळिंबापासून शीतपेय निर्मितीचा प्रकल्प साकारणारे श्री. रविंद्र अहिरे, मत्स्यपालन, कोरफड शेती करणारे वकिल अॅड. एस.टी. सानप, उद्योगात प्रखर निश्चय महत्वाचा मानणारे श्री. सुधीर मुतालिक, अपारंपरिक ऊर्जेचे संशोधन आणि वापर करणारे उद्योजक डॉ. रवींद्र देव, श्री. किशोर कंठीकर, 'टेलीमॅन' : प्रशिक्षण सेवेचे एक आगळेवेगळे दालन उभारणारे श्री. विक्रम गायकवाड, इमू तेलापासून विविध उत्पादनांची निर्मिती करणारे श्री. हरीश दीक्षित इ. उद्योजकांच्या यशोगाथा या पुस्तकात वाचायला मिळतील. 
    
 "असे उपक्रमशील उद्योजक" या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक श्री. विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावना म्हटली की विषयाचा, लिखाणाचा सखोल अभ्यास करूनच लिहिण्यासाठी मी होकार देत असतो. श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या 'एक पूर्ण एक अपूर्ण' या पुस्तकाचा विषय आणि 'असे उपक्रमशील उद्योजक' यातील विषय हे दोन्हीही माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे असल्यामुळे मी प्रस्तावना लिहिण्याचे अहिरे साहेबांना कबूल केले असल्याचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे. 

   ते पुढे प्रस्तावनेत म्हणतात की भारत-माझा देश जगात अग्रेसर व्हायचा असेल (आणि तो होईलच...) तर शेतकरी व उद्योजक अधिकाधिक निर्माण झाले पाहिजेत आणि या निर्मितीसाठी पोषक वातावरण उभारण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे असे मी मानतो.
  
  यशस्वी उद्योजक हे समाजाची गरज ओळखून ती योग्य वेळी, योग्य स्थळी व योग्य मोबदला घेऊन, स्वार्थाची तमा न बाळगता पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा करतात. प्रसुतीच्या वेदना व त्यांचा अनुभव हा शब्दात व्यक्त होत नाही, पण सुदैवाने उद्योजकांच्या वेदना व अनुभव अशा प्रकारच्या पुस्तकातून मांडता येत असल्याने भावी पिढीमध्ये या पुस्तकाचा उपयोग होऊन अनेक यशस्वी उद्योजक तयार होतील हा माझा विश्वास असल्याचे श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. 
   
 दुर्दम्य इच्छाशक्ती हे उद्योजकाचे खरे भांडवल! याचबरोबर 'अथक परीश्रम; 'चिकाटी', आणि 'माणसे हाताळण्याची कला' हे गुण उद्योजकाला आत्मसात करावेच लागतात; आणि याच गोष्टीचा, इच्छाशक्तीचा प्रत्यय या पुस्तकातील सौ. बोरसे, पवार, सौ.पाटील, सौ.पगार, श्री. भिसे आणि श्री. सोनवणे (टाकाऊतून टिकाऊ उत्पादन) या आणि अशा इतर सर्वच उद्योजकांच्या कृतींमधून पुस्तक वाचतांना कणाकणातून येत असल्याचे श्री. विठ्ठल कामत यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे. 
 
  "असे उपक्रमशील उद्योजक" हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. या पुस्तकातील उद्योजक आपल्या अडचणीतून मार्ग काढत कसे यशोशिखरावर पोहचले आहेत. हे सर्व उद्योजक तळागाळातील असून उपक्रमशील आहेत. याचा प्रत्यय पुस्तक वाचताना ठायी ठायी येतो. या पुस्तकाच्या लेखकाला लेखनसेवा हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला आहे. हे पुस्तक विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध आहे.  

Ase upkramshil udyojak

असे उपक्रमशील उद्योजक 
लेखक : श्री. दीपक के.अहिरे
प्रस्तावना : श्री. विठ्ठल कामत
प्रकाशक : दीपयोग प्रकाशन
पाने : ११०   मूल्य : ११०

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषी विद्यापीठ (Agricultural university)

कृषी विद्यापीठ
Agricultural University


Krushi vidyapith


शेती विकासात महाराष्ट्रातील राहुरी विद्यापीठाचे योगदान,
विविध पुरस्कारांनी त्यांना मिळाला बहुमान... 


शिक्षण संशोधनात अग्रेसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, 
गुणवत्तेच्या दृष्टीने देशातील हे प्रमुख कृषी विद्यापीठ... 


या विद्यापीठाने विकसित केले सर्व पिकांचे लागवडीचे तंत्रज्ञान, 
दिले बहुसंख्य पिकांचे अधिक उत्पादनाचे वाण... 


अधिक दुधासाठी विकसित केली गाय "फुले त्रिवेणी",
विद्यापीठ प्रक्षेत्र विकसित केले उच्च तंत्रज्ञानानी... 


सुगंधी वनस्पतीचे उद्यानही केले विकसित, 
तळागाळातील विद्यार्थी, शेतकऱ्यांना केले शिक्षीत...


अनेक क्षेत्रात विद्यापीठाने टाकले धाडसी पाऊले,
आधी केले मग सांगितले या न्यायाने वागले...


दिपू म्हणे नावलौकिक राहुरी विद्यापीठाचा, 
लाभ घ्यावा तेथील विस्तार कार्यातील शिक्षणाचा...


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषियोगचा माहितीपूर्ण फुलशेती विशेषांक (Krishiyoga's informative Flower Farming Special Issue)

कृषियोगचा माहितीपूर्ण 
फुलशेती विशेषांक 
Krishiyoga's informative 
Flower Farming Special Issue


Krushiyog fulsheti visheshank

   हॉलंडमध्ये फुले म्हणजे माणसे, माणसांजवळ जायचे असेल तर फुलांजवळ जा. फुलांपासून दूर राहिलात तर माणसांपासूनही लांब राहाल इतकं त्या देशात फुलाचं महत्व आहे. भारतातही फुलशेतीला खूप महत्व आले आहे. देशाने आतापर्यंत एक अब्ज फुलांचा व्यापार केला आहे. 

   

   देशात व्यावसायीक फुलशेती करण्याचा कल वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत फुले पुरविण्याचा विश्वसनीय स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. देशातील फुल उद्योगाला आधुनिक उद्योगाचे स्वरूप प्राप्त होत आहे. देशात फुलांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. 

     

     फुलांशिवाय मानवी जीवन हे अपूर्ण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये! देवपूजा, सजावट, उत्सव, मिरवणुका अशा अनेक ठिकाणी फुलांचा वापर मुक्त प्रमाणात होतो. या सर्व बाबींमध्ये गेल्या ३० वर्षात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे फुलांची मागणी सतत वाढते आहे. त्यातून औद्योगीक आणि सेवा क्षेत्रात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे आणि भारतातल्या विविध प्रकारच्या हवामानामुळे वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेणे शक्य असल्याने फुलांच्या व्यवसायाकडे एक मोठा उद्योग म्हणून पाहण्यात येऊ लागले आहे.

    

    जागतिक स्तरावर फुलांची बाजारपेठ ११ अब्ज डॉलरची आहे आणि यात भारताचा हिस्सा केवळ ०.६५ टक्के आहे. देशात फुलांची बाजारपेठ वाढती आहे. २०२३-२४ मध्ये २९८.५७ कोटी रूपयाची फुलांची निर्यात केली आहे. यावरून फुलशेतीला खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. यात वाढ होण्यास मोठा वाव आहे. ही वाढ आपण फुलशेतीचे अद्ययावत प्रशिक्षण व प्रचार आणि प्रसार या कार्यातून करू शकतो. याचा एक भाग म्हणजे कृषियोगने फुलशेती विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यात फुलशेतीच्या सर्व घटकाचा समावेश केला आहे. सर्व व्यापारी फुलाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान यात दिले आहे. 

  

  या विशेषांकात हरीतगृहाचे अद्ययावत तंत्रज्ञानावरचे लेखांचा समावेश आहे. इतकेच नसून जिगरबाज फुलशेती उत्पादकाच्या यशकथा या अंकात दिल्या आहेत त्यांचे या विषयातील ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल व ते या क्षेत्रात सहजपणे येतील इतक्या सोप्या, सुटसुटीत व त्यांच्या ख-याखु-या अनुभवावर लिहिलेल्या आहेत. 

  

  कृषीयोगच्या व्यापारी फुलशेती विशेषांकात बाजारपेठ, परसबाग व नर्सरीसह विविध विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. या अंकात गुलाब,जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, सोनतुरा (डेझी), अबोली, झिनिया, शेवंती, बर्ड ऑफ पॅराडाईज, लिली, निशिगंधा, अॅन्थुरियम, गॅलार्डिया, झेंडू, ग्लॅडिओलस, अॅस्टर, डेलीया, मोगरावर्गीय फुलझाडांची लागवड ते काढणी, बाजारपेठांसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

  

  याशिवाय या विशेषांकात पडिक जमिनीवर फुलशेती करणारे रमेश पाटील, हरीतगृहातील फुलशेती : फायदे आणि उभारणी, श्रीरोझची आफ्रिकेत हरीतगृहाची उभारणी, झेंडू फुलशेतीमधून भरघोस उत्पन्न (यशकथा), बोनसाय (वामनवृक्षकला), हिवाळी फुलझाडे,  मुंबईचा फुलबाजार, फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती, नाशिकमधील फुलबाजार, ग्लॅडिओलसची फुलशेती (यशकथा), मनपाचा पुष्पोत्सव, पुष्पगुच्छासाठी सायकसची शेती, जिगरबाज फुलशेती उत्पादक, कृषी प्रदर्शन (वृत्त विशेष),अपेडाची फुल लिलाव केंद्रे, स्वरुपचे इको-होम गार्डन शॉपी उत्पादने, जरबेऱ्याची फुलशेती करणाऱ्या यशकथांचा समावेश आहे. 

   

 अंकात यशस्वी फुलशेतीचा आदर्श मावळफ्लोरा, आयएसओ. श्रेणी मिळवणारे फुलशेती उत्पादक, फुलशेतीला चालना देणाऱ्या योजना, परसबागेसाठी फुलझाड-जास्वंद, हॉलंडमधील फुलांचा देखणा लिलाव, यशस्वी फुलउत्पादक सौ. केसरकर यांचे अनुभव, केंद्रीय कृषी मंत्रालयाची व्यावसायिक फुलशेती योजना, फुलांची शेती, देईल श्रीमंती, पुष्परचना कुठे व कशी करावी?, उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फुलशेतीचा प्रकल्प, बहरले शेत फुलांचे! (यशकथा-सौ. मेघा बोरसे), फुलशेतीचे अद्ययावत प्रशिक्षण एच.टी.सी, अल्पभूधारक शेतकऱ्याने फुलविली अॅस्टरची फुलशेती, परसबागेसाठी फुलझाडे-अॅन्टीन्होनम, कर्दळ, महाराष्ट्र सहकारी पुष्प विकास संस्था, फुलशेती, फुलांची निर्यात व वाव आदी विषयावर इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.       

 कृषियोगचा हा फुलशेती विशेषांक ७० पानांचा असून त्याची किंमत ५० रुपये आहे. या अंकाचे संपादक दीपक अहिरे हे आहेत. विशेषांक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये (Chakravarti Baliraja National Literary Conference in Nashik)

चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये 
Chakravarti Baliraja National Literary Conference in Nashik

चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअल निमिर्तीची घोषणा
Chakravarti Baliraja TV Serial Production Announcement

Chakrvarti baliraja sahitya sammelan
बळीराजा : ईडा पिडा टळो। बलीचे राज्य येवो।।

नाशिक : गोदावरी नदीच्या तिरावर कृषी संस्कृतीचा जागर करण्याच्या हेतूने जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी द्राक्षभूमी व देवभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक नगरीत दुसरे चक्रवर्ती बळीराजा साहित्य संमेलन २५ व २६ मे या दोन दिवसात संपन्न होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. 

       देशभरातील बळीराजाच्या विविध पैलूंवर कार्य करणारे अनेक अभ्यासक, संशोधक, कलावंत, किर्तनकार, प्रवचनकारांचा समावेश बळीराजा साहित्य संमेलनात असणार आहे. हे संमेलन चक्रवर्ती बळीराजा साहित्य नगरी, बळीराजा मंदिर परिसर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक या स्थळी भरविण्यात येणार आहे.

Chakravarti baliraja rashtriya sahitya sammelan
बळीराजा

     या बळिराजा साहित्य संमेलनात चक्रवर्ती बळीराजा कोण, त्याची संस्कृती कोणती, असे विविध परिसंवाद तसेच नाटक, कवी संमेलन, लोकगीत, धनगरी ओवी, पोवाडे, भजन, कीर्तनाचा समावेश असणार आहे.  सलग दोन दिवस हे संमेलन बहरणार असून या संमेलनात चक्रवर्ती बळीराजाच्या इतिहासाचे संशोधक व विचारवंत संमेलनात उपस्थित राहणार आहेत. संमेलनानिमित्ताने समाजातील मान्यवरांचा बळीराजा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात येणार आहे. 


   चक्रवर्ती बळीराजांनी समस्त माणसांनी कसे वागावे यासाठी कृषी संस्कृतीची स्थापना केली नाग, बैल, काळी आईचे महत्व स्पष्ट केले. याच बळीराजाच्या उज्वल संस्कृतीचा पुरावा म्हणजे आजचा कृषीप्रधान भारत देश आहे. बळी संस्कृती ही भारताची सुवर्णमयी संस्कृती आहे. बळीराजाने मातेला प्रमाण मानून अंबाई, तुळजाभवानी, येडाई, मरी काळूआई, रेणुका, नवलाई अशा नऊ कुळमातांची जागरण परंपरा सुरु केली. आज ज्या कुलदैवतांची आपण मनोभावे आराधना करतो ते खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा हे बळीराजांचे राखणदार आहेत. रक्षाबंधन, मकरसंक्रांत, ओनम, नवरात्र, काल बैसाखी, बिहू, पोंगल, दिपावली यासारखे सण ज्यांनी सुरु केले तो राजा बळी होय.

      यावेळी चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअलच्या निर्मितीची घोषणाही करण्यात आली.ही सिरिअल लेखक शरद तांदळे यांच्या "चक्रवर्ती बळीराजा" या कादंबरीवर आधारीत असेल. त्याचे दिग्दर्शन संजय पाटील करणार आहे. सध्या या संमेलनाची पूर्वतयारी सुरु आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजन समितीशी संपर्क साधून संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीस तन,मन,धन स्वरुपात मदत करण्याचे आवाहन बळी महाराज देवस्थान ट्रस्ट, नाशिक,  चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र, बळी अमर मित्र मंडळ, नाशिक या संस्थेच्या संयोजकांनी केले आहे.

     अधिक माहितीसाठी चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन, नाशिक २०२५ (वर्ष दुसरे), कार्यालय: बळी महाराज मंदिर, मुंबई-आग्रा रोड, नाशिक पिनकोड ४२२००३ E-mail: balirajasahityasammelan@gmail.com यावर संपर्क करावा. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...