name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): एप्रिल 2025

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न (Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded)

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न...
Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded...

Rajiv Gandhi krushi vidnyan pratishthanchi patrakar parishad sampanna


      अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार २०२४-२५ याबाबत माहिती विशद करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली. 


   यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश दादा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य अनुला खान, सन्माननीय ज्योतीताई ढोकणे, राहुल तायडे, दत्तात्रय किटुकले, प्रा.सुनील सावळे, प्रवीण वानखडे, प्रा. सतीश काळे, राहुल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २७ एप्रिल २०२५ रोजी पत्रकार परिषद पुणे येथे संपन्न झाली.
    
    २१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान विज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान राज्यस्तरीय राजीव गांधी, कृषीरत्न पुरस्कार देऊन साजरा केला जाणार आहे. 
    
    सन २००७ पासून सातत्याने हा उपक्रम सुरू असून शेतकरी सन्मानाचे सलग १९ वे वर्ष आहे. आजपर्यंत २७० प्रगतशील शेतकरी, कृषी कंपनी, शेतमजूर, कृषी वैज्ञानिक, कृषी उद्योजक, कृषी पत्रकार, महिला शेतकरी यांना सदर पुरस्कार प्रदान केला आहे. राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार प्राप्त १२८ शेतकऱ्यांना आजपर्यंत राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राधान्याने जाहीर झाले आहेत. 
     
  राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार सोहळा २१ मे २०२५ ते २७ मे २०२५ पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात २१ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बैल जोडी पूजनाने होणार आहे.  सदर सोहळा अमरावती तालुक्यातील अंगोळा या गावातून उत्कृष्ट बैल जोडी मालक शेतकऱ्याचा सन्मान व बैलजोडी पूजनाने होईल. सोहळ्याचा समारोप २७ मे २०२५ रोजी राजीव गांधी शेतकरी सद्भावना पुरस्कार देऊन होणार आहे.या सोहळ्याचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती तर्फे होत आहे. 
 
 सदर पुरस्कारासाठी राज्यभरातील विविध प्रांतामधून २१ शेतकरी निवडले जाणार आहे. यामध्ये प्रयोगशील शेतकरी महिला, शेतकरी कृषी वैज्ञानिक, उत्कृष्ट शेतकरी,कृषी उद्योजक फार्मर  कंपनी तसेच कृषी पत्रकारिता प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मधून एक अशा पद्धतीने निवड होणार आहे. यावर्षी विशेष कृषी पुरस्कार देणार देण्यात येणार आहे. ज्यामध्ये शेतकरी सद्भावना मित्र पुरस्कार, दुग्ध उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट कृषी अवजार संस्था, उत्कृष्ट बैल जोडी मालक, उत्कृष्ट शेतकरी मित्र, कृषी अधिकारी, फळबागायतदार, प्रगतशील आदिवासी शेतकरी, बियाणे संशोधक, फुलशेती उत्पादक शेतकरी, वनऔषधी उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट मत्स्यपालन व्यवसायी, रानभाजी उत्पादक शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, युवा शेतकरी अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष कृषी कार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
      
    राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानने शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी व ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवई यांच्या अध्यक्षतेखाली १६ कृषीतज्ञांची शेतकरी निवड समिती नेमली असून ही समिती दिनांक १० मे २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची निवड करणार आहे. 
     
  निवड झालेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, राजीव गांधी यांची प्रतिमा, मानधन, प्रमाणपत्र, सन्मानाच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय आयोजनामध्ये राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे पुरस्कारासाठी जवळपास ३०० प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. 
      
   सदर शेतकरी सन्मानाचा सोहळा हा स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारा देशभरातील एकमेव कार्यक्रम आहे. कृषीक्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन देशातील शेतकऱ्यांना प्रगतीचे नवे दालन उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. तेव्हा या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने २१ मे ला स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 

  या शेतकरी सन्मानाच्या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या भागातील मान्यवर मंडळी, कृषीतज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी सपत्नीक व सहपरिवार सन्मानित करण्यात येणार आहे. 

  सदर पुरस्कारासाठी आवेदन करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे. सदर पुरस्कार व्हॉट्सॲप, ई-मेल आयडी किंवा खालील शेतकरी निवड समितीच्या सदस्यांच्या पत्त्यावर किंवा ऑनलाईन पाठवावे
   
  पुरस्कारासाठी आवेदन करण्याचा संपर्क व पत्ता व ईमेल आयडी पुढीलप्रमाणे असून पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 श्री. प्रकाश भाऊसाहेब साबळे मु. पो. नया अकोला, ता. जि. अमरावती पिन- ४४४८०१ आहे. मोबाईल क्र.- 9607735913 (व्हॉट्सॲप), ई-मेल आयडी-prakashsable123@gmail.com

  डॉ. दिलीप काळे, अध्यासन प्रमुख, श्री संत गाडगेबाबा अध्यासन, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, डॉ. श्रीकांत जिचकर मेमोरियल हॉल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मोबाईल नंबर-9423424512

  सौ. पौर्णिमाताई सवाई, मु. पो. टाकरखेडा शंभू , ता.भातकुली जि.अमरावती, व्हाट्सअप नंबर-9766022126


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


असे उपक्रमशील उद्योजक — पुस्तक समीक्षा | Ase Upkramshil Udyojak Book Review (Marathi)

📚 असे उपक्रमशील उद्योजक — पुस्तक समीक्षा | Ase Upkramshil Udyojak Book Review (Marathi)

Ase upkramshil udyojak

    उद्योजकतेचा मार्ग कधीच सोपा नसतो; त्यासाठी लागते दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रम, चिकाटी आणि दृष्टी. या सर्वांचा प्रत्यय देणाऱ्या विविध उद्योजकांच्या प्रेरणादायी वाटचालींचे संकलन म्हणजे—

पत्रकार व सामग्री लेखक श्री. दीपक केदू अहिरे लिखित आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विठ्ठल कामत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक आजच्या उद्योजक पिढीसाठी एक मौल्यवान मार्गदर्शक ठरते.


🌟 पुस्तकाची वैशिष्ट्ये (Book Highlights)

या पुस्तकात विविध क्षेत्रातील उपक्रमशील उद्योजकांच्या २५+ प्रेरणादायी कथा समाविष्ट आहेत. प्रत्येक कथा हे दाखवून देते की—

“संधी शोधणारा नव्हे, संधी निर्माण करणारा उद्योजकच खरा यशस्वी ठरतो.”

या पुस्तकातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत:

  • कल्पक मेट्रेसेस उत्पादक

  • स्व-उद्योगाच्या गड जिंकणाऱ्या महिला उद्योगस्वामीनी 

  • गृहउद्योगातून आर्थिक उन्नती मिळवणारे

  • वनौषधी, फुलशेती, सायकस, मत्स्यपालन करणारे

  • संगणकावरील बोलका शब्दकोश तयार करणारे

  • टाकाऊतून टिकाऊ उत्पादन निर्मिती करणारे

  • ऑटोमोबाईल बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील नाव

  • लायब्ररीतून स्वयंरोजगार देणारे

  • कृषीपूरक उद्योग उभारणारे
    … असे अनेक उपक्रमशील चेहरे!

प्रत्येक कथा प्रेरणा, संघर्ष आणि यशाचा वेगळा पैलू उलगडते.


⭐ विठ्ठल कामत यांची प्रस्तावना — पुस्तकाची भक्कम ताकद

प्रस्तावनेत श्री. विठ्ठल कामत म्हणतात:

  • भारत जगात अग्रेसर व्हायचा असेल तर उद्योजकांची निर्मिती गरजेची आहे.

  • उद्योजक आपल्या समाजाच्या गरजा अचूक ओळखतो आणि त्यानुसार नवकल्पना करतो.

  • या पुस्तकातील प्रत्येक उद्योजकाने “इच्छाशक्ती, चिकाटी आणि परिश्रम” यांचा अचूक मिलाफ साधला आहे.

त्यांची प्रस्तावना पुस्तकाची विश्वासार्हता आणि महत्व वाढवते.


📖 वाचताना काय अनुभव येतो? (Reading Experience)

हे पुस्तक वाचकाला शब्दशः खिळवून ठेवते.
१००+ पानांत संक्षिप्त पण प्रभावी कथा रचलेल्या आहेत.

वाचताना जाणवते की—

  • हे उद्योजक अक्षरशः तळागाळातून वर आले आहेत

  • संघर्ष, संकटे, आर्थिक अडचणी पेलत त्यांनी उभा केला व्यवसाय

  • ग्रामीण, शहरी, शैक्षणिक, कृषी, तंत्रज्ञान—सर्व क्षेत्रांचा समतोल संग्रह

उद्योजक बनायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक “प्रॅक्टिकल मोटिवेशन” ठरते.


📌 लेखक परिचय

श्री. दीपक केदू अहिरे

  • पत्रकार

  • कंटेंट रायटर

  • उद्योजकता, समाजकारण, शेती, महिलांच्या उद्योग क्षेत्रावर लेखन

  • “लेखन सेवा” हा पुरस्कार प्राप्त

त्यांच्या लिखाणात वास्तव, प्रामाणिकता आणि संवेदनशीलता जाणवते.


📘 पुस्तकाची माहिती

Ase upkramshil udyojak

  • पुस्तक नाव : असे उपक्रमशील उद्योजक

  • लेखक : श्री. दीपक के. अहिरे

  • प्रस्तावना : श्री. विठ्ठल कामत

  • प्रकाशक : दीपयोग प्रकाशन

  • पाने : 110

  • मूल्य : ₹110


📝 एक निष्कर्ष

हे पुस्तक केवळ "यशोगाथा" नसून
उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
प्रॅक्टिकल उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करणारे एक उत्तम पुस्तक आहे.
⚡ ग्रामीण–शहरी दोन्ही पार्श्वभूमीतील वाचकांसाठी मूल्यवर्धक!

उद्योजकता, स्वयंरोजगार, स्टार्टअप्स किंवा प्रेरणादायी साहित्य वाचणाऱ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

****************************************
****************************************
****************************************
****************************************

****************************************
****************************************
Koo :
****************************************
****************************************
****************************************
@DeepakA86854129
****************************************

****************************************

कृषी विद्यापीठ : शेती, संशोधन आणि उज्ज्वल करिअरचे केंद्र Agricultural University: Hub of Agriculture, Research & Career Growth

कृषी विद्यापीठ (Agricultural University) – शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक

krushi vidyapith

    कृषी हा भारताचा कणा आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचवणे आणि कृषी क्षेत्रात संशोधनाला चालना देणे यासाठी कृषी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावतात. या ब्लॉगमध्ये कृषी विद्यापीठ म्हणजे काय, त्यांचे कार्य, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.


कृषी विद्यापीठ म्हणजे काय?

कृषी विद्यापीठ ही अशी शैक्षणिक व संशोधन संस्था आहे जी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, अन्नतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी इत्यादी विषयांमध्ये शिक्षण व संशोधन करते. ही विद्यापीठे विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व नवनवीन तंत्रज्ञान पुरवतात.


कृषी विद्यापीठांची मुख्य उद्दिष्टे

  • कृषी क्षेत्रात संशोधन करणे

  • आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञान विकसित करणे

  • शेतकऱ्यांना प्रशिक्षण व विस्तार सेवा देणे

  • कृषी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे

  • अन्नसुरक्षा व उत्पन्नवाढीस हातभार लावणे


कृषी विद्यापीठांमधील अभ्यासक्रम

कृषी विद्यापीठांमध्ये खालील प्रमुख अभ्यासक्रम उपलब्ध असतात:

पदवी (Undergraduate)

  • बी.एससी. (कृषी)

  • बी.एससी. (उद्यानविद्या)

  • बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)

  • बी.एफ.एससी. (मत्स्य विज्ञान)

पदव्युत्तर (Postgraduate)

  • एम.एससी. (कृषी/उद्यानविद्या)

  • एम.टेक (कृषी अभियांत्रिकी)

  • एम.बी.ए. (अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट)

डॉक्टरेट

  • पीएच.डी. (विविध कृषी विषय)


शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठांचे महत्त्व

कृषी विद्यापीठे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाहीत तर शेतकऱ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत:

  • सुधारित बियाणे व वाणांची माहिती

  • कीड व रोग व्यवस्थापन मार्गदर्शन

  • मृदा परीक्षण व खत सल्ला

  • पीक पद्धती, सिंचन व तंत्रज्ञान प्रशिक्षण

  • कृषी मेळावे, शेतकरी मेळावे व कार्यशाळा


महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली


प्रवेश प्रक्रिया (थोडक्यात)

  • 12वी (सायन्स – PCB/PCM) उत्तीर्ण

  • CET/ICAR किंवा राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया

  • गुणवत्ता यादी (Merit List) नुसार प्रवेश


निष्कर्ष

कृषी विद्यापीठे ही शेतीच्या प्रगतीची केंद्रे आहेत. आधुनिक ज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही विद्यापीठे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअर घडवण्यास मदत करतात. शेतीत भविष्य घडवायचे असेल तर कृषी विद्यापीठ हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.

कृषियोगचा माहितीपूर्ण फुलशेती विशेषांक — आधुनिक फूलशेतीसाठी मार्गदर्शक I Krishiyoga Flower Farming Special Issue

कृषियोगचा माहितीपूर्ण फुलशेती विशेषांक — आधुनिक फूलशेतीसाठी मार्गदर्शक  

Krishiyoga Flower Farming Special Issue

Krushiyogcha mahitipurna fulsheti visheshank


🌍 हॉलंडपासून भारतापर्यंत – फुलांचे वाढते साम्राज्य

हॉलंडमध्ये म्हणतात — “फुलांजवळ जा, म्हणजे तुम्ही माणसांजवळ जाता.”
या देशात फुलांना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाते.

आज भारतातही व्यावसायिक फुलशेतीचा विस्फोटक वेगाने विकास होतो आहे.
भारताने आतापर्यंत एक अब्ज फुलांचा व्यापार केला आहे आणि जागतिक बाजारपेठेत भारताकडे विश्वसनीय पुरवठादार म्हणून पाहिले जाते.


📈 फुलशेती—सर्वात वेगाने वाढणारा कृषी व्यवसाय

  • भारतातील फुलांचे एकूण ग्लोबल मार्केट: 11 अब्ज डॉलर

  • भारताचा सध्याचा हिस्सा: फक्त 0.65%

  • 2023–24 ची फुलांची निर्यात: ₹298.57 कोटी

ही आकडेवारी स्पष्ट सांगते—फुलशेती म्हणजे भविष्याचा मोठा उद्योग!


🌿 फुलशेतीचे सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्त्व

फुले ही केवळ सजावटीसाठी नव्हे तर:

  • देवपूजा

  • मिरवणुका

  • इव्हेंट डेकोरेशन

  • परसबाग

  • परफ्यूम इंडस्ट्री

  • हॉटेल/रिसॉर्ट सेक्टर

या सर्व ठिकाणी मागणी सातत्याने वाढत आहे.

म्हणूनच फुलांच्या उद्योगाला आधुनिक कृषी-उद्योगाचे स्वरूप मिळत आहे.


📘 कृषियोगचा फुलशेती विशेषांक — ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभवांचे एकत्रित विश्व

या ७० पानी विशेषांकात फुलशेतीचे संपूर्ण तंत्रज्ञान सोप्या भाषेत दिले आहे.

🌺 या अंकात काय-काय मिळणार आहे?

महत्त्वाचे व्यापारी फुलांचे उत्पादन तंत्रज्ञान

  • गुलाब

  • जरबेरा

  • कार्नेशन

  • ऑर्किड

  • निशिगंधा

  • लिली

  • झेंडू

  • ग्लॅडिओलस

  • अँथुरियम

  • अॅस्टर

  • शेवंती

  • डेलीया

  • मोगरा-वर्गीय फुले

  • झिनिया

  • गॅलार्डिया

  • बर्ड ऑफ पॅराडाईज

सर्व फुलांची रोगव्यवस्थापन, काढणी, ग्रेडिंग आणि बाजारपेठ याची विस्तृत माहिती.


हरीतगृह (Greenhouse) तंत्रज्ञान

  • आधुनिक हरीतगृह उभारणी

  • फायदे, व्यवस्थापन

  • श्रीरोझचे आफ्रिकेतील अनुभव


प्रेरणादायी यशकथा

त्या त्या भागातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित:

  • झेंडू फुलशेती यशकथा

  • ग्लॅडिओलस फुलशेती (मेघा बोरसे)

  • अॅस्टरची फुलशेती करणारे अल्पभूधारक शेतकरी

  • हॉलंडचा फुलांचा लिलाव अनुभव

  • जरबेऱ्याचे उद्योजक

या कथा नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देतात.


मार्केटिंग, निर्यात आणि संधी

  • मुंबई फुलबाजार

  • नाशिक फुलबाजार

  • सुगंधी द्रव्य निर्मिती

  • APEDA फुल लिलाव केंद्रे

  • फुलांची निर्यात प्रक्रिया

  • फुलशेतीला चालना देणाऱ्या सरकारी योजना

  • ISO श्रेणी मिळवणारे उत्पादक


परसबाग व नर्सरी विभाग

  • जास्वंद

  • अँटिरहिनम

  • कर्दळ

  • सायकस (पुष्पगुच्छासाठी)

  • वनशेती व घरगुती फुलशेती मार्गदर्शक


🏆 का विकत घ्यावा हा फुलशेती विशेषांक?

  • आधुनिक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक

  • फुलशेती करणाऱ्यांसाठी संपूर्ण तंत्रज्ञान एकाच ठिकाणी

  • नवशिक्यांपासून अनुभवी शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त

  • फुलांची बाजारपेठ, नफा मॉडेल आणि नवीन संधींची माहिती

  • प्रेरणादायी १५+ यशकथा

  • २५+ व्यापारी फुलांची माहिती


📚 अंकाची माहिती

  • एकूण पाने: 70

  • किंमत: ₹50

  • संपादक: दीपक अहिरे

  • उपलब्धता: कृषियोग मार्फत विक्रीसाठी उपलब्ध

  • Link - https://forms.gle/FotcgoyZ3J26w19p8


🛒 **फुलशेती शिकायची आहे?

हा विशेषांक तुमच्यासाठीच!**

👉 आधुनिक फुलशेती सुरू करायची असेल
👉 हरीतगृह प्रकल्प उभारायचा असेल
👉 बाजारपेठ, निर्यात किंवा नफा वाढवायचा असेल
👉 फुलउद्योजक बनायचे असेल

तर कृषियोगचा हा विशेषांक तुमच्या हातात असायलाच हवा!

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये (Chakravarti Baliraja National Literary Conference in Nashik)

चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये 
Chakravarti Baliraja National Literary Conference in Nashik

चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअल निमिर्तीची घोषणा
Chakravarti Baliraja TV Serial Production Announcement

Chakrvarti baliraja sahitya sammelan
बळीराजा : ईडा पिडा टळो। बलीचे राज्य येवो।।

नाशिक : गोदावरी नदीच्या तिरावर कृषी संस्कृतीचा जागर करण्याच्या हेतूने जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी द्राक्षभूमी व देवभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक नगरीत दुसरे चक्रवर्ती बळीराजा साहित्य संमेलन २५ व २६ मे या दोन दिवसात संपन्न होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. 

       देशभरातील बळीराजाच्या विविध पैलूंवर कार्य करणारे अनेक अभ्यासक, संशोधक, कलावंत, किर्तनकार, प्रवचनकारांचा समावेश बळीराजा साहित्य संमेलनात असणार आहे. हे संमेलन चक्रवर्ती बळीराजा साहित्य नगरी, बळीराजा मंदिर परिसर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक या स्थळी भरविण्यात येणार आहे.

Chakravarti baliraja rashtriya sahitya sammelan
बळीराजा

     या बळिराजा साहित्य संमेलनात चक्रवर्ती बळीराजा कोण, त्याची संस्कृती कोणती, असे विविध परिसंवाद तसेच नाटक, कवी संमेलन, लोकगीत, धनगरी ओवी, पोवाडे, भजन, कीर्तनाचा समावेश असणार आहे.  सलग दोन दिवस हे संमेलन बहरणार असून या संमेलनात चक्रवर्ती बळीराजाच्या इतिहासाचे संशोधक व विचारवंत संमेलनात उपस्थित राहणार आहेत. संमेलनानिमित्ताने समाजातील मान्यवरांचा बळीराजा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात येणार आहे. 


   चक्रवर्ती बळीराजांनी समस्त माणसांनी कसे वागावे यासाठी कृषी संस्कृतीची स्थापना केली नाग, बैल, काळी आईचे महत्व स्पष्ट केले. याच बळीराजाच्या उज्वल संस्कृतीचा पुरावा म्हणजे आजचा कृषीप्रधान भारत देश आहे. बळी संस्कृती ही भारताची सुवर्णमयी संस्कृती आहे. बळीराजाने मातेला प्रमाण मानून अंबाई, तुळजाभवानी, येडाई, मरी काळूआई, रेणुका, नवलाई अशा नऊ कुळमातांची जागरण परंपरा सुरु केली. आज ज्या कुलदैवतांची आपण मनोभावे आराधना करतो ते खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा हे बळीराजांचे राखणदार आहेत. रक्षाबंधन, मकरसंक्रांत, ओनम, नवरात्र, काल बैसाखी, बिहू, पोंगल, दिपावली यासारखे सण ज्यांनी सुरु केले तो राजा बळी होय.

      यावेळी चक्रवर्ती बळीराजा टि.व्ही. सिरिअलच्या निर्मितीची घोषणाही करण्यात आली.ही सिरिअल लेखक शरद तांदळे यांच्या "चक्रवर्ती बळीराजा" या कादंबरीवर आधारीत असेल. त्याचे दिग्दर्शन संजय पाटील करणार आहे. सध्या या संमेलनाची पूर्वतयारी सुरु आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजन समितीशी संपर्क साधून संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीस तन,मन,धन स्वरुपात मदत करण्याचे आवाहन बळी महाराज देवस्थान ट्रस्ट, नाशिक,  चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र, बळी अमर मित्र मंडळ, नाशिक या संस्थेच्या संयोजकांनी केले आहे.

     अधिक माहितीसाठी चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन, नाशिक २०२५ (वर्ष दुसरे), कार्यालय: बळी महाराज मंदिर, मुंबई-आग्रा रोड, नाशिक पिनकोड ४२२००३ E-mail: balirajasahityasammelan@gmail.com यावर संपर्क करावा. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण | From Corporate Career to Green Rural Entrepreneurship – Nature’s Bliss Story

  कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण: ‘Nature’s Bliss’ने घडवलेला ग्रामीण परिवर्तनाचा प्रवास | From Corporate Career to Green Rural Entrepre...