धावणे
Running
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
"स्व-काव्यांकुर बहरला सचित्र माहितीनी, आस्वाद घ्यावा सुजाण वाचकांनी " Wise readers should enjoy Swa-kavyankur Bahar with illustrated information
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
एकंदरीत, श्रद्धा (Credence) ही मानवी जीवनातील अविभाज्य संकल्पना आहे. ती नेहमीच थेट पुराव्यावर आधारित नसली तरी ती व्यक्तीच्या मानसिक स्थैर्यासोबत सामाजिक जीवनाला दिशा देते. श्रद्धेमुळे व्यक्तीला विश्वास, आशा आणि धैर्य लाभते, तर समाजामध्ये परस्पर सहकार्य आणि एकात्मता निर्माण होते. म्हणूनच, श्रद्धा ही मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी एक मूलभूत आणि अपरिहार्य घटक मानली जाते.
स्वप्नपूर्तीसाठी धडपड,
करा समृद्ध भावप्रवृत्ती,
ही देते प्रेरणा व बळ,
हीच सामर्थ्यशाली श्रध्देची वृत्ती...
श्रद्धा असते पुराव्याशिवाय विश्वास,
जी गोष्ट अस्तिवात येईल,
श्रद्धा देते लढण्याची इच्छाशक्ती,
पुढे जाण्याचं धैर्य श्रद्धा देईल...
धाडस आणि साहस करायला,
प्रेरणा विचारातून मिळते,
नाविन्याचा शोध घेण्यास,
स्फूर्ती श्रध्देतून जन्मते..
श्रद्धा केवळ प्रवृत्ती नव्हे,
तर ती असते प्रत्यक्ष कृती,
तुमच्या कृतीवर किती श्रद्धा,
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
मिळावा अभिजात भाषेचा दर्जा,मराठी भाषेला,
जाणून घ्या माझ्या या काव्यरूपी निवेदनाला...
मराठी भाषेची अस्मिता जागृत ही पूर्वापार,
समजून घ्या हो आमच्या मराठी भाषेची धार...
ग्रंथ मराठीचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून,
लीळाचरित्र,विवेकसिंधु ज्ञानेश्वरी या ग्रंथापासून...
भाषेच्या आरंभकालापासून, आहेत प्रगत रचना,
म्हणून आम्ही मागतो अभिजात दर्जा हा मिळेलना..
प्राचीन,मौखिक परंपरेतून तुम्ही घ्या मराठीचा शोध,
भाषेच्या प्राचीनतेबाबत आमचा हा शोध आणि बोध
मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार,
अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढतोय आरपार...
मराठी भाषेची मौलिकता प्राचीन काळापासून,
मराठी भाषेची सलगता ही आहे माैखीक ग्रंथापासून
अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कसोट्या केल्या,
कसोट्यांच्या दाव्यावर त्या पूर्णपणे आहेत उतरल्या
आजवर केंद्र सरकारने दर्जा दिला सहा भाषांना,
मराठी भाषेविषयी हा दुजाभाव दिसतो होतांना
भाषा विकासासाठी सरकारकडून भरीव अनुदान
आम्ही करताे मराठी भाषेच्या दर्जाविषयी प्रमाण...
अभिजात दर्जा मिळाल्यावर वाढेल भाषेची प्रतिष्ठा,
अभिजात दर्जासाठी पाळल्या तंतोतंत कसोट्या...
भाषेच्या श्रेष्ठतेवर उठते राजमान्यतेची मोहर,
भाषेच्या विकासासाठी आमची चालना बिनघोर...
भाषिक, वाड्ःमयीन परंपरा आमचे स्वयंभूषण,
अभिजात दर्जा मिळावा यासाठी हे विनम्र निवेदन...
अभिजात दर्जासाठी प्रा.पठारे समिती केली स्थापन,
या समितीने दिले पुरावे प्राचीन भाषेविषयी ज्ञापन...
मराठी भाषेचे वैविध्य हेच आहे आमचे बलस्थान,
या भाषेत दिसतील बोलीभाषेचे विविध वाण...
प्राचीन भाषा व तिचे रूप याची बसवली सांगड,
दर्जाच्या कसाेटीवर उतरली भाषा नाही भाकड...
मराठीचे प्राचीनत्व पुरावे अभ्यासून दिला अहवाल,
अभिजात दर्जा म्हणून वाट पाहतो सालोसाल...
अहवालात मांडले आम्ही मराठी भाषेचे प्राचीनत्व,
भाषेची प्राचीन परंपरा सूचित करून मांडले हे तत्व
बाराव्या-तेराव्या शतकापासूनआढळलेभाषेचे पुरावे,
प्रगत रचना व दर्जासाठी प्राचीनतेकडे झुकावे...
आजची मराठी व मूळ व्यापक पदावर केला विचार
एकाअर्थी मराठी बदलाचा इतिहासाचा हा आचार...
प्राचीन शोधामध्ये सातवाहनांच्या कालखंडाचा,
हा वाड्ःमयीन आधार शोधला त्यातील संदर्भाचा...
महत्त्वपूर्ण ग्रंथ "गाथासप्रशती संदर्भ गंगाथडीचे,
ग्रंथात उल्लेख गोदाकाठच्या तत्कालीन प्रदेशाचे...
कला,विद्या क्षेत्र सातवाहनांच्या काळात भरभराट,
गाथासप्रशती बृहत् कथा ग्रंथ राजवटीची आहे वाट
सातवाहनांची राजवट आहे चारशे वर्षापूर्वीची,
या कालखंडात रोवली मुहूर्तमेढ मराठी ग्रंथाची...
नंतर वाकाटक,राष्ट्रकुट,चालुक्ययादव राजघराणी,
चालुक्यकाळात लिहिली मानसाेल्लास ग्रंथ लेखणी
महानुभाव,वारकरी संप्रदाय केली विपुल रचना,
भाषेची मौलिकता,सलगता यादृष्टीने हा कणा...
या राजवटीचे कालखंड आहेत वैशिष्टयाने वेगवेगळे,
प्रत्येक टप्प्यात विकास करत होते भाषाप्रेमी सगळे
सरकारने ध्यानात घ्यावे प्राचीन कालखंडाची भाषा,
आज तर पूर्णपणे विकसित आधुनिक भाषेची दिशा
दीर्घ भाषेचा इतिहास समजण्यासाठी अभिलेख,
राजकीय व सामाजिक परिस्थिती वर्णनाचे लेख.
शिलालेख,कोरीवलेख ही अस्सल संशोधन साधने,
लेण्याद्री शिलालेखही भाषेसंदर्भातले व्यक्त हाेणे.
दाेन हजार वर्ष जुनी मराठी भाषेची परंपरा,
याचे सबळ पुरावे आतातरी अभिजात दर्जा करा..
अभिदर्जा मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली,
असंख्य पत्राद्वारे ही मोहीम निवेदनाने साध्य केली...
पहातो वाट मायबोली मराठीच्या अभिजात दर्जाची,
भाषा प्रेमीसाठी ही गोष्ट असेल अभिमानाची...
अभिजात दर्जाविषयी करू नका राजकारण,
मराठी भाषेला द्यावा अभिजात दर्जा
यासाठी पेटून उठेल प्रत्येक मराठी मन...
©दीपक केदू अहिरे,नाशिक
ई मेल- deepakahire1973@gmail.com
पूर्वग्रहांची जळमटं
जिवंत असतात अनेकांच्या मनात,
जोपर्यंत येत नाही अनुभव
ते जगत नाही वर्तमानात...
अनुभवाच्या बळावरच
माणसं जबाबदारी घेतात,
अनुभवशून्य माणसं मात्र
परिस्थितीलाच दोष देतात...
अनुभवासारखा दुसरा मार्गदर्शक
नाही कोणी गुरू,
अनुभव ज्ञानाने करतं शहाणं
त्याच्या मदतीने आपण तरू...
अनुभवाला सज्ज असणारी माणसं
राहत नाही अवलंबून,
संकटाना तोंड देण्याची सवय
होते अनुभव घेण्याच्या वृत्तीतून...
www.ahiredeepak.blogspot.com
संगत फार महत्वाची गोष्ट,
तुम्ही कोणाच्या सानिध्यात,
यावर भविष्य अवलंबून,
संगतीवर यशापयश जोखतात...
योग्य संगत माणसाला घडवते,
संगतीचा प्रभाव पडतो,
चुकीच्या कृतीचा प्रभाव,
अयोग्य संगतीने माणूस बिघडतो..
संगत असते सामर्थ्यवान,
सकारात्मक माणसं सोबतीला,
सर्वोत्तम माणसाच्या सहवासाने,
झळाळी येते व्यक्तित्वाला...
तुम्ही कुणाची निवड करता,
यावर तुमचं ठरतं यश-अपयश,
चुका होऊ नये म्हणून रहा दक्ष,
याच मार्गाने मिळते सुयश...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
महत्त्वाकांक्षेचा अर्थ व गरज
अम्बिशन (Ambition) या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे “ध्येयपूर्तीची प्रबळ इच्छा”. मानवी जीवनातील प्रत्येक यशस्वी प्रवासामागे एखादी ठाम महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षा नसलेला व्यक्ती म्हणजे समुद्रात दिशेविना भटकणारी होडी. ती व्यक्ती कदाचित काही साध्य करू शकेल, पण त्यामध्ये सातत्य, प्रगती आणि आत्मसंतोष नसेल. म्हणूनच महत्त्वाकांक्षा ही जीवनातील प्रगतीची मूलभूत गरज मानली जाते.
महत्त्वाकांक्षेचे प्रकार
महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते त्यात शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पाहिली तर उच्च शिक्षण घेणे, संशोधन करणे, नवीन शोध लावणे. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेत एखाद्या क्षेत्रात करिअर घडविणे, स्वतःचा व्यवसाय उभारणे किंवा उच्च पद मिळविणे. सामाजिक महत्त्वाकांक्षेत समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे, ग्रामीण भागाचा विकास साधणे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पाहिली तर स्वतःच्या जीवनमानात सुधारणा करणे, कुटुंबाला सुखसोयी उपलब्ध करून देणे या आहेत.
महत्त्वाकांक्षेची सकारात्मक बाजू
योग्य दिशेने नेलेली महत्त्वाकांक्षा ही यशाची गुरुकिल्ली ठरते. ती व्यक्तीला मेहनतीकडे प्रवृत्त करते, शिस्त घडवते आणि आत्मविश्वास वाढवते. इतिहासात डोकावले तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी आपल्या ठाम महत्त्वाकांक्षेमुळे समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांचे ध्येय फक्त वैयक्तिक नव्हते, तर समाजहिताचे होते. त्यामुळे योग्य महत्त्वाकांक्षा ही वैयक्तिक प्रगतीसोबतच सामूहिक प्रगतीचेही साधन ठरते.
महत्त्वाकांक्षेची नकारात्मक बाजू
तथापि, महत्त्वाकांक्षा जर अतिरेकी झाली, तर ती व्यक्तीला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. स्पर्धेत आंधळेपणाने धावण्यामुळे ताणतणाव, असंतोष आणि कधीकधी नैतिक मूल्यांचा ऱ्हासही होऊ शकतो. केवळ स्वतःच्या फायद्यापुरती मर्यादित असलेली महत्त्वाकांक्षा इतरांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे महत्त्वाकांक्षा ही नेहमी मर्यादित, संतुलित आणि नैतिक चौकटीत राहणे आवश्यक आहे.
संतुलन व निष्कर्ष
महत्त्वाकांक्षा ही जीवनाची दिशा ठरवते, पण ती विवेकबुद्धीने नियंत्रित करणे आवश्यक आहे. शिक्षण, कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्त या चार गोष्टी महत्त्वाकांक्षेला यशाच्या मार्गावर नेणारे आधारस्तंभ आहेत. संतुलित महत्त्वाकांक्षा व्यक्तीला यशस्वी करते, समाजासाठी उपयुक्त ठरवते आणि जीवनाला अर्थपूर्ण बनवते.
अखेरीस असे म्हणता येईल की, महत्त्वाकांक्षा ही मानवी जीवनातील प्रेरणेचा मूळ स्रोत आहे. योग्य मार्गावर ठेवलेली महत्त्वाकांक्षा ही केवळ वैयक्तिक ध्येयपूर्तीपुरती मर्यादित न राहता समाजाच्या प्रगतीलाही चालना देते. म्हणूनच प्रत्येकाने आपली महत्त्वाकांक्षा निश्चित करून ती साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या जगी ज्यांनी केले विशेष,
ती माणसं महत्वाकांक्षी,
सामान्य माणसं गुंततात,
छोट्या गोष्टीत आकांक्षी...
शिवरायांची महत्वाकांक्षा,
होती स्वराज्य मिळवण्याची,
अशीच माणसं ठरतात,
केंद्रीभूत विश्वाच्या सामर्थ्याची...
महत्वकांक्षेच्या पूर्तेतेसाठी,
अंगी येते खूप झपाटलेपण,
आंकाक्षेचा करावा लागतो त्याग,
वळवाव लागतं मन...
अज्ञान दूर होण्यासाठी,
कर्मवीर अनवाणी पायाने फिरले,
पूर्ती केली महत्वकांक्षेची,
सर्व अडचणींना दूर सारले...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
आजचा कसाही दिवस,
उद्या असेल चांगला,
आशा माणसाला नेते पुढे,
सामोरे जातो समस्येला...
आपण जिंकणार ही आशाच,
संकटावर मात करते,
प्रत्येक प्रयत्नामागे उभी आशा,
साथ सोडत नसते...
ज्याच्यात असते योग्यता,
त्याच्यात निर्माण होते आशा,
आशापूर्तीसाठी गरज प्रयत्नांची,
नाही होणार निराशा..
आशेचे किरण ठेवतात,
माणसाला कायम चिंतामुक्त,
ते घेऊन जातात माणसाला,
यशाच्या सूर्योदयापर्यंत...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
उत्कटता ही जीवनाची खरी ऊर्जा आहे. मनुष्याच्या जीवनात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात – ध्येय आणि त्या ध्येयाकडे नेणारी शक्ती. ध्येय नसेल तर जीवन दिशाहीन वाटतं, आणि शक्ती नसेल तर ध्येय अपूर्ण राहते. ही शक्ती म्हणजेच उत्कटता. उत्कटता म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची तीव्र आवड, आतून येणारी ओढ आणि सतत काहीतरी साध्य करण्याची जिद्द.
उत्कटतेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती आंतरिक प्रेरणा देते. बाहेरचं कौतुक, पैसा, किंवा सामाजिक मान-सन्मान ही तात्पुरती ऊर्जा असते. पण उत्कटता ही मनाच्या गाभाऱ्यातून येते. म्हणूनच ज्या व्यक्तीच्या आयुष्यात उत्कटता असते, तो माणूस कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतो.
अडचणी आणि अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु उत्कटतेने काम करणारी व्यक्ती अपयशाकडे ‘थांबवणारा अडथळा’ म्हणून नाही तर ‘शिकवणारा धडा’ म्हणून पाहते. म्हणूनच आपण पाहतो की शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजक किंवा समाजसुधारक यांनी मोठ्या अडचणींचा सामना केला, पण त्यांची उत्कटता त्यांना पुन्हा उभं राहायला भाग पाडते.
उत्कटतेमुळे कामात सतत शिकण्याची वृत्ती निर्माण होते. एखाद्या क्षेत्रात उत्कटता असेल तर व्यक्ती तासन्तास मेहनत करून, नवीन गोष्टी वाचून, नवे प्रयोग करून स्वतःला अधिकाधिक घडवत राहते. वेळेचं भान राहत नाही. उदाहरणार्थ, चित्रकलेची आवड असलेल्या व्यक्तीला रंग व कॅनव्हास यांच्यात रमून तास कसे जातात हे कळतही नाही.
जीवनात उत्कटता असली तर त्याचा परिणाम फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तर इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळते. उत्कटतेने कार्य करणारी व्यक्ती समाजात सकारात्मक ऊर्जा पसरवते. तिच्या कामातून गुणवत्ता, तिच्या बोलण्यातून जिद्द आणि तिच्या वागण्यातून न थकणारी उर्मी दिसून येते.
पण प्रश्न असा निर्माण होतो की उत्कटता शोधायची कशी? त्यासाठी स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारावे लागतात कशात मला आनंद मिळतो? कोणत्या कामामुळे मला समाधान मिळतं? कोणती गोष्ट मी थकलो तरी पुन्हा करायला उत्सुक होतो? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपली खरी उत्कटता दाखवतात. तसेच विविध क्षेत्रात प्रयोग करून, नवनवीन गोष्टी करून पाहूनही आपण आपल्या आवडीला ओळखू शकतो.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात पैसा, यश, मान-सन्मान यामागे धावण्याची घाई सर्वांनाच आहे. पण हे सर्व केवळ तात्पुरतं समाधान देतं. खरी ऊर्जा आणि खरा आनंद फक्त उत्कटतेतूनच मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात एक क्षेत्र असं शोधलं पाहिजे की जिथे आपण उत्कटतेने झोकून देऊ शकतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, उत्कटता हीच जीवनाची खरी ऊर्जा आहे. जी व्यक्ती उत्कटतेने जगते ती कधीच रिकामी, उदास किंवा दिशाहीन राहत नाही. कारण उत्कटता हेच जीवनाला प्रेरणा, समाधान आणि यश देणारं खरं इंधन आहे.
कोणत्याही गोष्टीत जीव ओतणं,
म्हणजेच उत्कटता,
तीव्र उत्कटताच असते,
यशाची मर्मग्राही मानता...
उत्कटतेतून निर्माण होते,
जिद्द आणि समर्पणवृत्ती,
उत्कटतेमुळे मिळते यशाला,
आवश्यक ती गती...
उत्कटतेची असीम ऊर्जा,
नेते अपेक्षित यशाकडे,
आपण फक्त लक्ष द्यायचं,
ध्येयपूर्वक लढण्याकडे...
यश मिळवायलाच हवे,
हे उत्कटतेचे झपाटलेपण,
विसरावी लागते तहानभूक,
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई ...