name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): November 2022

भरड धान्यावर विविध प्रक्रिया उत्पादने (Multigrain Processing success story)

भरड धान्यावर विविध प्रक्रिया उत्पादने
समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ.सरोजिनी फडतरे यांची यशोगाथा
(Multigrain Processing success story) 


           "कृषिमू्ल ही जीवनम्" या उक्तीनुसार भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. म्हणूनच शेती ही भारतातील शेतकऱ्याची जीवनशैली म्हणून ओळखली जाते. भारताला वैविध्यपूर्ण हवामानाच्या देणगीमुळे भारत नेहमी कृषीप्रधान देश राहिला आहे. भरड धान्याचा विचार करता भारतामध्ये ८०पेक्षा जास्त जाती आपल्या आहाराचा भाग आहेत.  हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्याची लागवड मागे पडली. त्यावेळी आव्हान होते ते म्हणजे जनतेची भूक भागविणे. याच काळात तांदूळ आणि गहु आयात करण्यात येवून त्याला सरकारचे धोरणात्मक सहकार्य मिळाले. यामुळे भरड धान्य आहारातून हळु हळू मागे पडले. गहु आणि तांदूळ याच्यावरील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला तसा इतर भरड धान्याचा झाला नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गहु आणि तांदूळ यांच्यासाठी पूरक झाली. त्यामुळे भरड धान्य ही गरिबांचा सामाजिक सामना करीत राहिली. हळू हळू भरडधान्याची लागवडही मंदावत गेली.


पोषक धान्ये

       आज समाजामध्ये व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ई, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूल्य यांसारख्या अनेक कारणांनी आहारात कमतरता आली, त्यामुळेच जीवनशैलीचे अनेक आजार जसे की मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हार्ट समस्या दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी व भारताचे आरोग्य सुधारण्यासाठी भरड धान्याला, त्याचे पैष्टिकतेचे महत्व ओळखून भारत सरकारने पोषक धान्ये म्हणून राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.
          महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम भागात ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. कोकण, सह्याद्री पर्वताच्या रांगा यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरी यासारखी पिके घेतली जातात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी यामुळे मागील तीन दशकांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी हे मुख्य अन्न म्हणून खाण्यात कमी येत आहे. याला कारण वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण, मॉडर्न संस्कृतीचे अनुकरण, आणि यात भर म्हणून की काय शासन स्तरावरून फक्त गहु आणि तांदूळ यांच्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे भरड धान्य आहारातून हळु हळु कमी झाले आहे.      
       पुढील येणारे २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्टातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी चालून आल्या आहेत. शेजारील राज्यांमध्ये भरड धान्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला तसा तो महाराष्ट्रात झाला नाही. आज आपल्या येथे बोटावर मोजण्याइतके भरड धान्य प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. जागतिक बाजापेठेतील वाढत्या ग्लूटेन फ्री पदार्थांमुळे भरड धान्यात प्रचंड मोठी संधी आहे.कोरोनानंतरच्या काळात आरोग्याविषयी भरपूर जागरूकता निर्माण झाली आहे. भरड धान्यात असलेल्या पोषक तत्वामुळेच प्रक्रियायुक्त उत्पादनांना मागणी वाढली आहे. म्हणूनच या संधीचा फायदा घेत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.


भरड धान्याचे फायदे

       भरड धान्याचे खूप मोठे फायदे आहेत. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. प्रथिनाचे प्रमाण अधिक आहे.  भरड धान्य कमी कालावधीत तयार होत असल्याने दुष्काळ सहन करण्याची ताकद त्याच्यात असते त्यामुळं ती शेतकरी बांधवासाठी फायदेशिर आहेत. हीच संधी लक्षात घेऊन महाराष्ट्रात कृषी विभागाने भरड धान्य विकास कार्यक्रमाची योजना २०१२ साली सुरू झाली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखे भरडधान्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार व्हावीत. यासाठी भरड धान्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेविषयी अधिक माहिती घेता भरड धान्यापासून काही प्रक्रियायुक्त उत्पादने बनवण्याची कल्पना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ. सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी सुचली. या क्षेत्रात नावीन्य असले तरी त्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला आणि व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली.पूर्ण वेळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.


समृध्दी अॅग्रोची भरड धान्य प्रक्रिया
       समृद्धी अॅग्रो समूहाने २०१० पासून भरड धान्यप्रक्रिया सुरू केली. उत्पादनाच्या चवीशी कोणतीही तडजोड न करता भारताला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्याच्या प्रयत्नात समृद्धी अॅग्रो ग्रुपने नेहमी अस्सल आणि शुद्ध सेंद्रिय उत्पादने आणण्याचे मिशन ठेवले त्यादृष्टीने आम्ही झपाटल्यागत कामाला लागलो असल्याचे सौ. फडतरे यांनी स्पष्ट केले. संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. ही वाटचाल करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. संसाराचा व्याप वाढल्याने पतीच्या महाविद्यालयाच्या नोकरीच्या पगारात पुरेनासे झाले. म्हणून सरळगाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाले. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबादमधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले. शेती प्रक्रिया उद्योग चालू करावा असे मला वाटायचे. आयुष्यात काहीतरी नविन करण्याचं पक्क केलं.
         उद्योजक होण्याचं पहिलं पाऊल उचलल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. मी २०१० साली घरूनच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू पिठांची विक्री सुरु केली. पिठाची डिलिव्हरी पती कामावर जाताना देत असत असे रूटीन चालू केले. पतीचे  बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात त्यांच्या खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास केला.सन २०१२ मध्ये संधी चालून आली. कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असून यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणे आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला.

 
विक्रीचे व्यासपीठ
           आमचे मार्गदर्शक दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी  घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ  मिळाले. ज्वारीच्या चकल्या, शंकरपाळ्या, इडली हे पदार्थ केले. आणि स्टॉलवर उपलब्ध केले. पण आम्हा दोघांना नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. ग्राहक स्टॉलजवळ आले की संकोचून मान खाली घालून आम्ही दोघेही उभे असायचो. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली. त्यांनी तेथेच पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो, त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. आपली उत्पादने समजून सांगायची. त्याप्रमाणे आम्ही मार्केटिंग करायला लागलो. आणि काय आश्चर्य...पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची  विक्री झाली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
होम डिलिव्हरीचा प्रारंभ
              या प्रसंगाने आमचा आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढवले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरीचा टप्पा सुरु केला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देते , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्सचा जन्म झाला. ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले केले असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी, बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ही उत्पादने कधी आरोग्यदायक आहेत ते आम्ही ग्राहकांना समजून देत होतो.  नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग, मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होते. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. आमच्या या कामाची वाखाणणीही समाजात व्हायला लागली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. 

नाविन्यपूर्ण उत्पादने
        आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणीही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरेही सुरु केले आहेत. या सर्व उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.तो पुढेही मिळणार असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला. ही उत्पादने जे केवळ इष्टतम पोषणच नाही तर तुमच्या खाद्यपदार्थांच्या प्रोफाइलला अनुकूल चवदेखील देतात. . समृद्धी अॅग्रो ग्रुप वर्षानुवर्षे नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी काम करत आहे, भरड धान्याच्या उत्पादनांपासून ते मल्टीग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टीग्रेन मिक्स, पफ, स्नॅक्स जे केवळ निरोगी आणि चविष्ट खाद्यपदार्थांमधील रेषा अस्पष्ट करत नाहीत तर भारतीयांसाठी एक विश्वासार्ह जीवनशैली तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्यास सक्षम आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचे सतत निरीक्षण करतो. कनिष्ठ वर्ग, मध्यमवर्ग किंवा उच्च वर्ग या प्रत्येकालाच आमची उत्पादने मनापासून आवडत असल्याचे सौ.फडतरे यांनी सांगितले.समृद्धी अॅग्रो ग्रुपचा सर्वात चांगला भाग हा आहे की ते देशभरात आणि परदेशातही मापदंडांच्या अधीन राहून  वितरण करतात.
      समृध्दी एग्रो ग्रुप सध्या ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारीचे इडली मिक्स, नाचणीचे इडली मिक्स, डोसा मिक्स, ज्वारीचा रवा, नाचणीचा रवा,  भरड धान्याचे पीठ, असे अनेक पदार्थ तयार  करते. त्यांनी कुटुंबानुसार पदार्थाचे पॅकिंग आकर्षक बनविले आहे. आज त्यांना भारताबाहेर यूएसए, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या देशातही बाजारपेठ मिळाली आहे. लवकरच आम्ही इतर देशांतही आपली उत्पादने पाठविणार असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
दर्जेदार उत्पादने
       जेव्हा आपण राज्याबाहेर आणि परदेशातही पदार्थ पाठवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की, त्या देशातील प्रमाणित मानके काय आहेत. प्रायमरी पॅकिंग आकर्षक आणि योग्य, माहितीपूर्ण पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. आपल्या मालाचे भाव हे शक्यतो भारतीय रुपयात घेणे सोयीस्कर आहे. आम्ही आमचे सर्व धान्य आणि आवश्यक असलेला कच्चा माल शेतकर्‍यांकडून त्यांना बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने घेत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमचा लाल बहादूर शास्त्रींच्या "जय जवान, जय किसान" या उक्तीवर विश्वास आहे. आमचे शेतकरी आणि त्यांच्या नैसर्गिकरित्या पेरलेल्या आणि सेंद्रिय कच्च्या मालाच्या मदतीने आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय उत्पादने तयार करत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
        मूल्यवर्धित कच्च्या धान्याच्या सोयीस्कर आणि त्रासमुक्त खरेदीसाठी एकूण ३० पेक्षा जास्त शेतकरी उचित किंमतीच्या कराराच्या आधारावर भरड धान्य उत्पादन पुरवित आहेत. बाजारातील उपलब्ध दराच्या तुलनेत उच्च दर्जाच्या भरड धान्याच्या बदल्यात आमच्याकडून अधिक किमती ऑफर केल्या जात आहेत.

 
विविध आव्हाने
       या क्षेत्रात अनेक आव्हाने असल्याचेही त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. आज समाजामध्ये आरोग्याविषयी जागृती अभियान राबविणे आवश्यक आहे, भरडधान्याविषयी अनेक कारणांनी उदासीनता दिसून येत आहे. शासकीय व खाजगी स्तरावर सतत याबद्दल अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे. छोट्या उद्योजकाला कमी वेळेमध्ये सुलभतेने कर्ज पुरवठा होत नाही. एका छोट्या गावात तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री शहराच्या ठिकाणी करण्यासाठीं सोईचा अभाव आहे. आज बदलत्या परिस्थितीत विक्री कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे, म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत जागरूकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात भरड धान्याची जाहिरात होणे गरजेचे आहे.  हे काम छोट्या उद्योजकाला परवडणारे नाही. म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक भरड धान्य वर्षां तरुणांनी पुढाकार घेऊन या आरोग्यदायी अन्न व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आताच पाऊले उचलली पाहिजेत.


शून्यातून उभा केला प्रकल्प
          
 आपल्या दिनक्रमाविषयी बोलताना सौ.फडतरे म्हणाल्या की, आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं,माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
       शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे. सौ. फडतरे यांच्या कामात श्री. फडतरे यांनीही सर्वस्व झोकून दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. २०१३ मध्येच त्यांना सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकले. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून  दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.


भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार    
    नुकताच ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला  म्हणुन एक लाख रु.व सन्मानचिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यात १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा उद्देश महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा उद्देश होता.
          या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पना मांडल्या. यातून राज्य स्तरावर वेगवेगळ्या विभागातून २१ जणांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. यामुळे मिलेटच्या कामाला राजमान्यता मिळाली आहे. भरडधान्यातून प्रक्रिया उत्पादने करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अजून त्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे. त्यांची उत्पादने गुड २ इट या ब्रँडखाली ऑनलाईन तसेच ऑफलाईन विक्रीसाठी आहेत.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

 

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न बिकट: विकास हवा की भकास (Industrial Pollution)

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न बिकट: विकास हवा की भकास   (Industrial Pollution)

कोणत्याही देशाच्या विकासामध्ये औद्योगिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर औद्योगिकरण करताना पर्यावरणाचा समतोल सांभाळणे गरजेचे आहे. मात्र, आजही अनेक उद्योगातून उघड्यावर किंवा नदी नाल्यात सांडपाणी सोडले जाते. कंपन्यांतून निघणारा धूर जगणे अवघड करून टाकतो. उद्योग, पायाभूत सुविधांसाठी नैसर्गिक संपदेचा विनाश केला जातोय. अशा वेळी विकास हवा की भकास, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. विकास करताना तो समतोल, शाश्वत असायला हवा. उद्योग जगत याकडे निश्चितच लक्ष देईल अशी अपेक्षा आहे...

Indusrial pollution

पर्यावरणाचा सहसंबंध
     उद्योजकतेशिवाय औद्योगिक विकास होणे शक्य नाही. औद्योगिक विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येक कारखानदाराने घेणे गरजेचे आहे. सतत धूर ओकणाऱ्या व दूषित पाण्याचे लोंढे बाहेर टाकणाऱ्या कारखान्यांमुळे पृथ्वीवर प्रदूषण होत असते. याला जबाबदार आपल्या कारखान्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवून न घेणारे कारखान्याचे संचालक या गोष्टीस जबाबदार आहेत. औद्योगिक विकास करताना आपल्या देशासाठी अशा प्रकारचा विकास योग्य आहे का? या प्रश्नाकडे आज गांभीर्याने बघावे. कामगारांना विस्थापित करणे आणि पर्यावरणाचा विनाश करणे या दोन गोष्टी औद्योगिक विकासात टाळणे महत्त्वाचे आहे. 
       पर्यावरणाचा सहसंबंध औद्योगिक विकास आणि उद्योजकतेशी जेव्हा लावला जातो तेव्हा प्रथम उद्योजकता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. उद्योजकता ही व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अनेक गुणांची गोळाबेरीज होय. की जी व्यवसाय किंवा उद्योगक्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यातून त्यांचे कर्तुत्व फुलते आणि व्यवसायात यश प्राप्त होते. उद्योजकता हा उद्योग आणि व्यवसायाचा व्यवहारीक बाबींशी संबंधित असा भाग आहे की, ज्यात उद्योगाच्या उभारणीसाठी प्रकल्प आखणी, परवाना मिळवणे, भांडवल उभारणी, प्रकल्पाची रचना, उत्पादन घटकाचे संघटन, वस्तू व सेवांचे यशस्वीपणे विपणन करण्याचा समावेश होतो. 
पर्यावरणपूरक जीवनशैली 
      आज आपण मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास केला आहे परंतु आज समाजाने पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. भारतातील एकंदर शेतजमिनीपैकी ६० टक्के भागात जमिनीची धूप होणे, पाणथळ साचणे व जमीन क्षारयुक्त बनली आहे. सध्या शेतीखाली ३०० लाख हेक्टर संवेदनशील जमिनीचे पोत वेगाने नित्कृष्ट होत आहे. प्रतिवर्षी वेगाने अवर्षण वाढत असून मातीची धूप होते त्यामुळे शेतीही धोक्यात आली आहे. अशा वेळी नैसर्गिक, सेंद्रिय, जैविक शेतीचा मोठ्या प्रमाणात अंगीकार करावा.
   औद्योगिक क्षेत्रात पुढारलेल्या देशात आता झपाट्याने औद्योगीकरण वाढल्यामुळे ऊर्जेचा दरडोई वापर वाढला आहे. भविष्यकाळातील ऊर्जेबाबतची परिस्थिती सुधारण्यासाठी एकीकडे ऊर्जेचा पुरवठा चिरंतन स्वरूपात वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कार्यक्षम उपयोग करून ऊर्जेची मागणी कमी करायला हवी. जीवाश्म इंधनापेक्षा पर्यावरणास कमी हानिकारक असणारे आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या अधिक न्याय्य वाटप करू शकता येणाऱ्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा आपण विचार केला पाहिजे.
समस्या आणि दुष्परिणाम 
     पृथ्वीवरील तापमान वृद्धीचे दुष्परिणाम भारतीय उपखंडालाही जाणवत आहेत. कारखाने व वाहनांचे प्रदूषण वाढत असून जंगले नष्ट होत चालल्यामुळे वातावरणातील तापमान सातत्याने वाढत आहे. आपल्या देशातील अनेक भागातील पावसाचे प्रमाण दरवर्षी बदलत आहे. पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल होत आहे. ढगफुटी होत आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. आज तर मोठया प्रमाणात शहरीकरण झाले आहे. शहरात एमआयडीसी असल्यामुळे रोजगार वाढला आहे. खेड्यातून अनेक लोक शहरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परिस्थितीजन्य अनेक समस्या आज शहरात उद्भभवल्या आहेत.
    कारखान्यात कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. त्यातून उत्पादन निर्मिती केली जाते. तसेच सहउत्पादन म्हणजेच प्रदूषणासारखे निर्मिती प्रक्रियेतील अपरिहार्य परंतु अनिष्ट परिणाम काढले जातात. निर्मिती प्रक्रियेत उत्पादनास आवश्यक असलेल्या कच्च्या मालाबरोबरच ऊर्जा, पाणी इ.चा उपयोग केला जातो. तयार माल नंतर बाजारपेठेत पाठवला जातो. तेथून आपण तो विकत घेतो. कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषण हा सर्वप्रथम आणि उघड दिसणारा परिणाम आहे. पाणी व वायूप्रदूषण व काही बाबतीत घनकचऱ्याचे प्रदूषण हे सहजपणे कोणालाही दृष्टीस पडते. संबंध जगात अशा प्रदूषण समस्येने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले आहे. 
  

      वीस वर्षांपूर्वी भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यात गंभीर स्वरूपाचा औद्योगिक अपघात घडल्यामुळे औद्योगिक दुर्घटनांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. या अपघातात ४००० व्यक्तींचा मृत्यू ओढवला. तेथील लोकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. औद्योगिक अपघातांमुळे माणसे मृत्यू पावतात, जखमी होतात. पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो व नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होतो. 
    व्यवसायाशी निगडित आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. माणूस चरितार्थासाठी काम करतो परंतु काहीवेळा कामाची जागा किंवा कामाचे स्वरूपच आरोग्यास धोकादायक ठरते. उदा. कोळसा खाणीतील कामगार कोळशाची पूड नाकातोंडावाटे आत घेतो. आण्विक वीज केंद्रातील कामगारास आण्विक उत्सर्जनापासून सतत धोका असतो. गालिचे,काडेपेटी,फटाके अशा धोकादायक कारखान्यातील बालमजुरांची समस्या अतिशय गंभीर व काळजी करण्याजोगी आहे. 


कायद्यामार्फत अंमलबजावणी
      कार्यान्वित झालेल्या कारखान्याकडून पर्यावरणास हानी पोहोचू नये यासाठी भारतामध्ये अनेक नियम अस्तित्वात आहेत. या नियमानुसार सांडपाण्याचे प्रमाण, त्याची प्रत इ. गोष्टी ठरविल्या जातात. व कायद्यामार्फत त्याची अंमलबजावणी होते. त्यात जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश आहे. या संदर्भात असलेले कायदे व नियम पाळले जातात. याविषयी खातरजमा करणे यासाठी सरकारकडून कायद्याची अतिशय कडक व नि:पक्षपाती अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. कायद्याचा बडगा वापरण्यापेक्षा कारखाने स्वतःहून पुढाकार घेऊन पर्यावरणाची काळजी घेतील या दिशेने प्रयत्न करावे. पर्यावरणाबद्दलची जागरूकता शेवटी आर्थिकदृष्ट्या फायद्याची असते ही जाणीव करून देणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे.  काही कारखानदार अशा पर्यावरणाच्या बाबतीत अधिक दक्षता घेताना आढळून येतात. ही निश्चितच गौरवाची बाब आहे. 
    कारखान्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम फार मोठ्या स्वरूपाचे व गुंतागुंतीचेही असतात. शासन, उद्योजक व आपल्यासारख्या सामान्य जनतेने एकत्र येऊन आस्थापूर्वक योजनाबद्ध प्रयत्न केल्यास मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी सामान्य लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. विकास हा मानव आणि पर्यावरण या दोन्हीशी संबंधित आहे हे आपल्या लक्षात येईल.
पर्यावरणपूरक औद्योगिक विकास 
      औद्योगिक विकासाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखावा.  प्रचंड कारखाने, मोठ-मोठी धरणे, उत्तुंग इमारती भव्य पूल बांधून आणि वेगवान गाड्या किंवा संगणक निर्माण करून आपण विकास साधू शकतो का? आर्थिक प्रगती हा विकासाचा एक घटक आहे. त्यासाठी वरील सर्व गोष्टी आवश्यक ठरू शकतात. पण त्त्यावरच सारे प्रयत्न केंद्रित केल्यामुळे आणि तितक्याच महत्त्वाच्या दुसऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
        जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत संसाधनाचे उगमस्थान पर्यावरण आहे. पर्यावरणातूनच उद्योगधंद्यांना कच्चा माल, लोकांसाठी अन्न, वाहतुकीसाठी इंधन या गोष्टी मिळतात. विकास कामातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ पुन्हा पर्यावरणातच सामावले जातात. म्हणजेच पर्यावरण हे विकासकामांचे उगमस्थान आणि अंतिम स्थानही आहे म्हणून उद्योजकतेतून औद्योगीक विकास साधताना पर्यावरण जोपासावे.


औद्योगिक प्रदूषण

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न
दिवसेंदिवस होतो बिकट, 
गांभीर्याने घ्या आता
विचार प्राध्यान्याने सरसकट...

पर्यावरणाची हानी न होता 
घ्यावी काळजी उद्योजकाने, 
उर्जेचा दरडोई वापर 
झाला आता औद्योगीकरणाने...

परिस्थितीजन्य अनेक दुष्परिणाम
उद्योग व्यवसायात घडल्या
उत्पादन निर्मिती अत्यावश्यक 
प्रदूषण समस्या वाढल्या 

पर्यावरणाचा राखावा समतोल 
मुलभूत संसाधनेचे उगमस्थान 
उद्योजकतेतून औद्योगिक विकास 
पर्यावरण वाचवा, हेच अंतिम स्थान 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

 deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com

#औद्योगीकप्रदूषण #Industrialpollution

#पर्यावरणपूरकऔद्योगिकविकास 

#पर्यावरणविकासकामांचेउगमस्थान #उद्योजकता

#प्रदूषण #पर्यावरणाचा सहसंबंध






स्मार्ट शेतीसाठी ड्रोन (Drone for smart Farming)

शेतीत क्रांती घडवण्यासाठी ड्रोनचा वापर
Drone for smart Farming

        पिकांचे अधिक बारकाईने निरीक्षण करण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतावर उड्डाण करू शकले तर ही कल्पना किती उपयुक्त ठरेल? असा प्रश्न तुम्हाला पडला तर परंतु आज ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी असे करू शकतात.  

  ड्रोन माणसांना घेऊन जाऊ शकत नाहीत;  तथापि, ते उडताना खाली जमिनीचे स्पष्टपणे दृश्य प्रदान करतात.  शिवाय, ते सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकतात आणि अधिक अचूकपणे सर्वेक्षण करू शकतात.  ड्रोन अनेक उद्योग क्षेत्रात क्रांती घडवत आहेत.  ड्रोनच्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक कृषी क्षेत्रात वाढत्या प्रमाणात वापर होणार आहे.

डेटा विश्लेषणाने पिकनियोजन
 आज कृषी क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. वाढत्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे, अति पर्जन्यवृष्टीमुळे गंभीर पिक नासाडी होते. भविष्यातील अन्नसुरक्षेचे रक्षण करण्यासाठी, पिक उत्पादन वाढवण्यासाठी शेती अधिक शाश्वत आणि संसाधनक्षम बनली पाहिजे. डिजिटलायझेशनमुळे कृषी उद्योगाला एकत्रितपणे स्मार्ट फार्मिंग  करावी लागेल.  एकाधिक तंत्रज्ञान-सक्षम उपायांद्वारे ती करावी लागेल. 

      आजच्या शेतीची कामे काही दशकांपूर्वीच्या तुलनेत खूपच वेगळी दिसतात. नवीन तंत्रज्ञानाने आजच्या उत्पादकांना त्यांच्या प्रक्रियेचा प्रत्येक भाग नियंत्रित करता येतो. 

 शेतात फवारणीपासून ते पीकवाढीचे चक्र आणि पीक उत्पादनापर्यंत या परिवर्तनाचा मोठा भाग ड्रोन आणि इतर प्रकारच्या हवाई वाहनांना दिला जात आहे. कृषी ड्रोनमुळे शेतकऱ्यांना सखोल डेटा विश्लेषण आणि पिकनियोजन करता येते. 

स्मार्ट शेतीचा मार्ग
        शेतीसाठी ड्रोन वापरणे हा स्मार्ट शेतीचा एक मार्ग आहे  आणि स्मार्ट शेती हेच भविष्य पुढे आकाराला येणार आहे यात शंका नाही. प्रगत रिमोट सेन्सिंग क्षमता असलेल्या ड्रोनचा वापर पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी, कीटकनाशके आणि खते फवारण्यासाठी, सिंचन व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी, उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकतो. 
  भारत सरकार शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित करत आहे. ड्रोनमुळे शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन वाढविण्यात खूप मदत होते.  ड्रोनचा वापर करून काही शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पटही करू शकतात.
    ड्रोनचा वापर शेतीत क्रांती घडवून आणणारे पाच मार्ग पुढे दिलेले आहेत. कृषी-तंत्रज्ञान प्रणाली वापरून डिजिटल परिवर्तन आता घडणार आहे. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे.  आपल्या पूर्वजांनी अफाट व्यावहारिक ज्ञान जमा केले आहे आणि ते पिढ्यान पिढ्या चालत  आले आहे.  
  शेतीचे डिजिटल परिवर्तन ही डिजिटल प्रणालींमध्ये पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि जतन करण्याची एक चांगली संधी आहे.  ड्रोन शेतीसाठी प्रभावी डीप-टेक सिस्टम तयार करण्यासाठी आवश्यक व्हिज्युअल डेटाचे मोठे संच प्रदान करतात.  

        ड्रोन हे कृषी तंत्रज्ञान प्रणालीचे महत्त्वाचे घटक आहेत आणि ते भारतातील शेतीच्या डिजिटल परिवर्तनासाठी अग्रणी आहेत. 
  पीक व्यवस्थापनात ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो.  उदाहरणार्थ, बियाणे लागवड, पीक हंगामाचा कालावधी, हवामानाची परिस्थिती, वापरलेल्या खतांचे प्रमाण आणि चांगले परिणाम देणारी पिके यांची माहिती गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो.  
  चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या इष्टतम प्रक्रिया आणि खतांची मात्रा निर्धारित करण्यासाठी या डेटाचा वापर केला जाऊ शकतो.केवळ कृषी क्षेत्रातच नाही तर आज विविध उद्योगांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे. 
ड्रोनचा वापर
      कीटकनाशके आणि खते सुरक्षितपणे आणि सहज फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. काही देश कीटकनाशके आणि खतांच्या  प्रमाणाची चाचणी करतात आणि त्यांच्या कडक गुणवत्ता तपासणीत शेतमाल निर्यात होत नाही  हे नाकारण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वेळा खते आणि कीटकनाशकांची एकसमान नसलेली फवारणी होय.       
    विविध आवश्यक उत्पादन वाढवणाऱ्या नैसर्गिक आणि रासायनिक द्रव्यांची हाताने फवारणी करणे खूप कठीण आहे.  शिवाय, फवारणी करताना शेतकऱ्यांना हानिकारक रसायनांचा प्रादुर्भाव होतो. 
  ड्रोन मानवरहित असतात आणि ते रिमोट किंवा मोबाईल फोनवरील अॅप वापरून सहजपणे हाताळले जाऊ शकतात.  ड्रोनच्या सहाय्याने, शेतकरी खते, बुरशीनाशके आणि कीटकनाशके सुरक्षितपणे, समान प्रमाणात, योग्य प्रमाणात, कमी वेळात आणि कमी श्रमात फवारून उत्पादन आणि पीक गुणवत्ता वाढवू शकतात.  ड्रोनमुळे ही प्रक्रिया अधिक जलद होते.  सुमारे चार एकर शेतजमिन केवळ एका तासात शिफारशीत फवारण्यांनी फवारली जाऊ शकते.

       ड्रोन हे कृषी तंत्रज्ञान प्रणालीचे महत्त्वाचे घटक आहेत आणि ते भारतातील शेतीच्या डिजिटल परिवर्तनासाठी अग्रणी आहेत. 
 पीक व्यवस्थापनात ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो.  उदाहरणार्थ, बियाणे लागवड, पीक हंगामाचा कालावधी, हवामानाची परिस्थिती, वापरलेल्या खतांचे प्रमाण आणि चांगले परिणाम देणारी पिके यांची माहिती गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो.  
 चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या इष्टतम प्रक्रिया आणि खतांची मात्रा निर्धारित करण्यासाठी या डेटाचा वापर केला जाऊ शकतो.केवळ कृषी क्षेत्रातच नाही तर आज विविध उद्योगांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे. 
 फवारणीसाठी ड्रोनचा वापर
     कीटकनाशके आणि खते सुरक्षितपणे आणि सहज फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. 
 काही देश कीटकनाशके आणि खतांच्या  प्रमाणाची चाचणी करतात आणि त्यांच्या कडक गुणवत्ता तपासणीत शेतमाल निर्यात होत नाही  हे नाकारण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वेळा खते आणि कीटकनाशकांची एकसमान नसलेली फवारणी होय.       
    विविध आवश्यक उत्पादन वाढवणाऱ्या नैसर्गिक आणि रासायनिक द्रव्यांची हाताने फवारणी करणे खूप कठीण आहे.  शिवाय, फवारणी करताना शेतकऱ्यांना हानिकारक रसायनांचा प्रादुर्भाव होतो. 
 ड्रोन मानवरहित असतात आणि ते रिमोट किंवा मोबाईल फोनवरील अॅप वापरून सहजपणे हाताळले जाऊ शकतात.  ड्रोनच्या सहाय्याने, शेतकरी खते, बुरशीनाशके आणि कीटकनाशके सुरक्षितपणे, समान प्रमाणात, योग्य प्रमाणात, कमी वेळात आणि कमी श्रमात फवारून उत्पादन आणि पीक गुणवत्ता वाढवू शकतात.  
  ड्रोनमुळे ही प्रक्रिया अधिक जलद होते. सुमारे चार एकर शेतजमिन केवळ एका तासात शिफारशीत फवारण्यांनी फवारली जाऊ शकते.

    शेतातील मातीचे विश्लेषण, पिकाच्या पाण्याच्या गरजांचा अंदाज घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.  त्यानुसार ते एकसमान आणि नियमितपणे पाणी देण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकतात.  

   ड्रोनला सेन्सरसह एम्बेड केले जाऊ शकते जेणेकरुन पाण्याचे तलाव आणि सिंचन प्रणालीतील गळती शोधता येईल.  एकदा गळती आढळून आल्यावर, ड्रोन संबंधित व्यक्तींना सूचित करू शकतात त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांचे नुकसान टाळता येते.  हवामान आणि मातीच्या परिस्थितीनुसार पाण्याच्या गरजेतील बदलांचा अंदाज लावण्यात ड्रोन देखील मदत करतात.  

डिजिटल बॉक्स एरोस्पेसचा ड्रोन
         नाशिकस्थित असलेल्या डिजिटल बॉक्स एरोस्पेस या फर्मतर्फे शेतीसाठी औषध फवारणी ड्रोन विकसित करण्यात आला आहे. 
   या स्पेशल ड्रोन पॅकेजमध्ये ५ लि., १० लिटर, १६ लिटर या तीन प्रकारात फवारणी टाकी उपलब्ध करून दिली आहे. या ड्रोनची किंमत ३ लाखापासून तर २५ लाखापर्यंत आहे. यासाठी आपल्याला हवा तसा कस्टमायझेबल ई. एम. आय. पद्धतीनेही ड्रोन उपलब्ध आहे. 
  ड्रोनसाठी शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था, (एफ.पी.ओ.), कृषी विद्यार्थी, सर्वसाधारण इच्छुक शेतकरी यांसाठी अनुदान उपलब्ध आहे. ड्रोनवर इन्शुरन्स (विमा) मिळेल. 

        एक वर्षापर्यंत मोफत सर्विसेस मिळणार आहे. पारंपारिक फवारणीपेक्षा ड्रोन फवारणीचे अनेक फायदे मिळतात. ड्रोनचा फ्री डेमोही उपलब्ध आहे.  डीलरशिप, फ्रंचायशी व डेमो बुक करण्यासाठी, अधिक माहितीसाठी contact@digitalboxaerospace.com यावर संपर्क करावा.

स्मार्ट शेतीसाठी ड्रोन

शेतीच्या डिजिटल परिवर्तनासाठी

ड्रोन घटक महत्त्वाचा,

शेतीसाठी ड्रोन वापरणे

हा मार्ग स्मार्ट शेतीचा...

पिकांवर लक्ष, फवारणीसाठी

ड्रोन सर्वदूर वापरावा,

सिंचन व्यवस्था, उत्पादनाचा अंदाज

याचा घेता येतो मागोवा...

शेतीत क्रांती घडवण्यासाठी

करा ड्रोनचा वापर,

याला मिळते अनुदान

अनेक फायदे याचे सुपर...

आज विविध उद्योगात

वापर महत्वाचा ड्रोनचा,

डिजिटल बॉक्स एरोस्पेसचा

ड्रोन घ्यावा औषध फवारणीचा...

 © दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


#smart farming solution #drone Technology#DigitalboxAerospace #smart farming #drone poem #agriculture #farmer #agro #farmers #agri #agriculturelife #nature #food #farmerlife #harvest #global #agribusiness #rural #rurallife #hydroponics #aeroponics #instagram #horticulture #green #tractor #agricultureworld #agriculturereview #agriculturegk #garden #homegarden #cattle #livestock #instagood #agronomy #fish#fisheries #farmlife #instafarmer #instaram #agriproducts #environment #kisan #kheti #silage #cow #buffalo #dairy #amul #milk #gdp #village #garden #plants #leaves #wheat #rice #mango #agronomia #country #agriculturebio #botany #agriculturevideo #vedicagriculture #agriculturereview#organicfarming#agriculturereview #plants #rose #flower #petunia #hibiscus #potato #tomato #follow #instafarmer #composting #vermicompost #icar #agripedia #gardenup #leaf #fruit #cutting #gardenblog #tree #crop #kharif #rabi #beekeeping #bellpepper #pumpkins #myfarm #seeds #hormones #npk#शेतकरी


कृषीप्रदर्शनाची गरज (Need for agricultural exhibition)

कृषीप्रदर्शनाची गरज 
(Need for agricultural exhibition)

       कृषीप्रदर्शनाची गरज काय असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कृषी प्रदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. कारण ज्या कृषीप्रधान देशात ८० टक्के लोक शेती व शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करताना आढळतात. अशा देशात कृषी प्रदर्शन नियमितपणे वारंवार होणे गरजेचे ठरते.


     कृषीप्रदर्शनांचा प्रसार 

       भारतात कृषी प्रदर्शन  केव्हापासून भरवायला सुरुवात झाली याचा निश्चितपणे इतिहास माहीत नसला तरी परंतु गेल्या २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कृषीप्रदर्शनाची सुरुवात झाली. पूर्वी छोट-छोट्या प्रमाणात कृषी परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र व्हायची परंतु मोठे आणि जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन भरत नव्हती परंतु वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात खाजगी प्रदर्शन आयोजकांकडून तसेच शासनाकडून कृषीप्रदर्शन घेणे चालू झाले. खाजगी आयोजक शासनाच्या सहकार्याने कृषी प्रदर्शने भरवू लागले. त्याला मिळाला प्रतिसाद बघता अशा आयोजकांनी दरवर्षीं न चुकता कृषी प्रदर्शन घेऊ लागले. त्यांनी व्यापारी पद्धतीने स्टॉल बुक करून परंतु शेतकरी विकास केंद्रीभूत मानून कृषी प्रदर्शने घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत होता परंतु ग्रामीण भागात प्रसिद्धी व प्रचार यंत्रणा राबवल्याने मोठ्या प्रमाणात कृषीप्रदर्शनांचा प्रसार झाला. आज तर कृषी प्रदर्शने कृषी विकासाचा अविभाज्य अंग बनले आहे. त्याची गरज प्रकर्षाने जाणवते. कृषी प्रदर्शन न चुकता भरवली गेली पाहिजे अशी आवश्यकता आज बनली आहे.

कृषीप्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू
 
 कृषी प्रदर्शन यशस्वी होण्याचा सध्याचा काळ खूप पोषक असल्याने आशादायी चित्र आहे. कारण कृषीप्रदर्शन हेतूचा चांगला प्रचार आणि प्रसार शेतकरी वर्गात झाला आहे. आज रोजी महाराष्ट्रात विविध जिल्हा, तालुक्यात ५० ते ५५ कृषी प्रदर्शने आयोजित केली जातात. त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता कृषीप्रदर्शन दिवसेंदिवस यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.  कृषीप्रदर्शनाचे यश हे प्रसिद्धी व प्रसार योजनेत आहे. कृषीप्रदर्शन ज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू ठरल्याने शेतकरी आवर्जून अशा कृषीप्रदर्शनाला भेट देतात यावरून कृषीप्रदर्शनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे असे मला वाटते.


माहिती प्रसारणाचे साधन
  
 कृषीप्रदर्शन हे माहिती प्रसारणाचे प्रमुख साधन आहे. कृषीप्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार म्हणजे स्वतःला असलेले ज्ञान किंवा माहिती दुसऱ्याला देणे म्हणजेच विस्तार होय. विस्तार म्हणजे लोकांच्या जीवनाच्या दर्जात शाश्वत सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांच्या क्षमतांचा विकास घडवून आणणारे शास्त्र आहे. विस्तार हे एक शिक्षण आहे. आणि त्याचा उद्देश लोकांबरोबर काम केले जात आहे. त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवणे हेच आहे. कृषीप्रदर्शनातून या बाबी साध्य होतात. म्हणून कृषी प्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार होण्याची गरज आहे. प्रदर्शनामध्ये ग्राहकांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. त्याचबरोबर कधीकधी प्रात्यक्षिकदेखील बघता येते. त्यामुळे ग्राहकाला त्या वस्तूच्या खरेदीबाबत त्वरित निर्णय घेता येतो. डोळ्यांनी बघितलेल्या घटनांवर चटकन विश्वास ठेवण्याची सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता असते. त्यामुळे प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या वस्तूबद्दल विश्वासाहर्ता वाटते. यादृष्टीने माहितीचे प्रसारण होण्याचे प्रदर्शन हे एक महत्त्वाचे साधन समजले जाते.

 
        
 उत्पादनाची यथायोग्य माहिती
   
   कृषी प्रदर्शनात वस्तू व सेवा यांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येते. ही उत्पादने हाताळताही येत असल्याने ग्राहकाला तो वापरत असलेल्या उत्पादनाची यथायोग्य माहिती या माध्यमातून प्राप्त होते. शेत,घर व सामुदायिक संस्था सुधारण्याच्या पद्धती शिकून त्याद्वारे जास्त चांगल्या तऱ्हेने जगायचे कसे हे ग्रामीण लोकांना, शेतकऱ्यांना शिकविणारी प्रक्रिया कृषीप्रदर्शनात पार पाडली जाते. लोकांना पटतील अशा पद्धतीने त्यांना सुधारित पद्धतीचे ज्ञान देणारी व त्यांच्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यायला मदत करणारी शैक्षणिक प्रक्रिया कृषीप्रदर्शनात होते. जास्त चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी लोकांना त्यांचा व्यवसाय, उपक्रम व संस्था सुधारण्याच्या पद्धती शिकवून त्याद्वारे लोकांच्या वर्तणुकीत नियोजित बद्दल घडवून आणणाऱ्या ज्ञानाची निर्मिती कृषीप्रदर्शनामुळे होते. कृषीज्ञानाचे विस्तार शिक्षण हे एक उपयोजित वर्तणूकशास्त्र आहे. ज्याच्या ज्ञानाचा वापर मनुष्याच्या स्वभावमध्ये केला जातो. कृषी प्रदर्शनाद्वारे शेतकरी ग्रामीण लोकांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणे शक्य होते.

 
वस्तू व सेवांचे प्रदर्शन
       
   कृषीप्रदर्शनात कमी जागेत अनेक वस्तू व सेवांचे प्रदर्शन असते. ज्याची गरज शेतकऱ्याला खूप असते. उपलब्ध वस्तू, सेवांची रचना योग्य प्रकारे करून प्रदर्शनामध्ये मांडल्यास प्रदर्शन काळामध्ये अनेक व्यक्ती त्यांचे निरीक्षण करू शकतात. हाताळू शकतात व प्रात्यक्षिक पाहू शकतात. योग्य प्रकारे रचना केल्याने थोड्या जागेत अनेक महत्त्वांच्या गोष्टींची प्रभावीपणे मांडणी करता येते. ते वापरत असलेले उत्पादन कंपनी कशाप्रकारे तयार करते याची जाणीव त्यांना या कृषीप्रदर्शनातून होते. तसेच हे उत्पादन कोणत्या पिकावर कशा रीतीने वापरायचे याचे तांत्रिक ज्ञान कंपनीकडून त्यांना प्राप्त होऊ शकते. प्रदर्शन हे माध्यम प्रामुख्याने उत्पादन व सेवांच्या प्रसिद्धी व जाहिरातीसाठी वापरले जाते. उत्पादक आणि विक्रेते यांना ग्राहकांच्या संपर्कात नेहमीच असावे लागते. जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रदर्शन हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. उत्पादक तसेच विक्रेते प्रदर्शनाच्या माध्यमातून नेहमीच्या ग्राहकांना तसेच नवीन ग्राहकांनादेखील आकर्षित करू शकतात. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढत जातो. आपल्या उत्पादनासाठी त्यांना नवनवीन ग्राहक मिळत असतात. त्यासाठी कृषी प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे ग्राहक व कंपनी यांचा जनसंपर्क वाढून महत्त्वाचे हितसंबंध प्रस्थापित होतात.

 
विस्तार कार्य

      कृषीप्रदर्शनाच्या विस्तार कार्यात अनेक कंपन्या माहितीपत्रके वाटतात. हे एकाच विषयाची माहिती विस्ताराने माहितीपत्रकामध्ये येते. औषध कंपन्याची माहिती, नवीन अवजाराची माहिती, रोपवाटिकेसंबंधी माहिती, पीक उत्पादन विषयक माहिती या कृषीप्रदर्शनातून शेतकऱ्याला मिळते. माहितीपत्रकात अचूक,नेमकी व कसे काय करावे याची माहिती असते. या कृषीज्ञानाचा उपयोग शेतकरी करू शकतो. यामध्ये एकच कल्पना स्पष्ट केलेली असते. उदा. हिरवळीचे खते, बीजप्रक्रिया इ. यामध्ये जी माहिती असते ती लोकांच्या गरजेची असते. माहितीपत्रकाची माहिती शेतकऱ्यांना समजेल अशी असते यात चित्रासहित माहिती दिलेली असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास ती समजते. आजकाल अशा कृषी ज्ञानामुळे शेतकरी सज्ञान होऊ लागला आहे. कृषी प्रदर्शन असे माध्यम आहे की निरीक्षर शेतकऱ्यालाही चांगल्या पद्धतीने ते समजू शकते. तो त्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो.

वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषीप्रदर्शने 

   कृषीप्रदर्शनमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या गरजा अनेक प्रकारच्या असतात. त्यांच्याशी चर्चा करून अनेकांना पूरक व्यवसाय व सेवा सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये प्रामुख्याने कृषीसल्ला सेवा, कृषी प्रकल्प आखणी/ व्यवस्थापन, विशिष्ट निविष्ठांचा आयात- निर्यातविषयक व्यापार अशा काही पूरक सेवांचा समावेश होतो. त्याचबरोबर प्रदर्शनाची पूर्वतयारी, प्रदर्शन काळातील सेवा सुविधा पुरविण्याची कामे अशा प्रकारच्या लहान आणि अल्पकालीन व्यवसायाच्या संधी होतकरू तरुण-तरुणींना उपलब्ध होऊ शकतात. अशा तऱ्हेने संधीचा योग्य वापर केल्यास त्याचे रूपांतर कायमस्वरूपी व्यवसायामध्येदेखील करता येणे शक्य होते. अनेक पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषीप्रदर्शने आयोजित करणे हाच एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. त्याद्वारेदेखील अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध होतो. नासिक येथे आयोजित कृषीथॉन या प्रदर्शनात स्वयंसेवक म्हणून कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा दिवसाचा रोजगार प्राप्त झाला होता.

 
शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण
 कृषीप्रदर्शनामुळे शेतीविषयक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. आज टेक्नोसेव्ही युगामुळे शेती तंत्रज्ञानही अपडेट करण्याची गरज पडते. म्हणून कृषीप्रदर्शन महत्त्वाची गरज आहे. कृषी प्रदर्शनामुळे कोणत्या जिल्ह्यात नवीन तंत्रज्ञान आले आहे किंवा त्याचा वापर शेतकरी कसा करतात हे कळते. यानिमित्ताने शेतीविषयक विचारांची देवाणघेवाण होते. कृषी प्रदर्शनात होणाऱ्या परिसंवादातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा माहिती होतात. यामुळे कोणत्या भागात कोणते पीक तो शेतकरी यशस्वी करू शकतो याचे ज्ञान शेतकऱ्याला येते. त्यानुसार तो तंत्रज्ञान अवगत करतो. पिकांच्या नवीन जाती, आधुनिक अवजारे, कृषी विभागाच्या योजना, अनुदान आदी विषयाची माहिती शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनात एका छताखाली माहिती होते. त्यांची माहिती जाणून घेऊन त्याविषयी असणारे परिपत्रके तो घेऊन घरी जाऊन त्यावर निवांतपणे अभ्यास करू शकतो किंवा दुसऱ्याकडून जाणून घेऊ शकतो. 

  शेतीतंत्रज्ञानाचे स्टॉल

  कृषी प्रदर्शनातून 'ना नफा ना तोटा, शेतकरी राजा हे मोठा' या उक्तीप्रमाणे प्रदर्शनात विविध क्षेत्रातील शेतीतंत्रज्ञानाचे स्टॉल असल्याने कृषी प्रदर्शन व्यापारी न होता अनुभवसिद्ध होते व ते शेतकरी राजासाठी महत्त्वपूर्ण ठरते. शेतीकामाच्या सर्व गरजांसाठी उच्च गुणवत्तेच्या श्रेणीची उपकरणे कृषी प्रदर्शनात हाताळता येतात. या प्रदर्शनात आपण प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरालाही त्याचे प्रात्यक्षिक देऊ शकतो. यामुळे तो कुशल होईल. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याने व कानाने ऐकल्याने फरक पडतो तोच जिवंत अनुभव प्रदर्शनाद्वारे दिला जातो. 
 कृषी प्रदर्शनात घडीपत्रिकाही दिली जाते. ती साधारणतः माहितीपत्रका- सारखीच असते यामध्ये जो कागद वापरला जातो त्याच्या दोन ते तीन घड्या करून ती आटोपशीर आकाराची असते व यात विस्तृत माहिती, आकृती,शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती अशा विषयासंबंधी आटोपशीर  माहिती असते. ती शेतकऱ्याच्या कामाची असते. कृषी प्रदर्शनातून घडीपत्रिका बरेचसे स्टॉलधारक देत असतात. या निमित्ताने कृषी ज्ञानाचा विस्तार घडतो. 

  माहितीपत्रकांचे वाटप 

  बऱ्याच कृषी प्रदर्शनातून कृषीविषयक माहिती पत्रिकाही दिली जाते. यामध्ये शेतीविषयाशी निगडित माहिती दिलेली असते. एकापेक्षा जास्त विषय हाताळलेले असतात. साहजिकपणे यांची पृष्ठसंख्या जास्त असते. शिक्षित शेतकरी व तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी विशेषतः ही माहितीपत्रके काढली जातात. कृषीप्रदर्शनातून अशा प्रकारची माहितीपत्रके वाटली जातात. शासनाच्या कृषी विभागाकडून तसेच काही कृषी प्रकाशन संस्थेकडूनही पुस्तिका वाटल्या जातात. कृषी प्रदर्शन कालावधीत स्थानिक वर्तमानपत्रेही कृषी विषयावरची विशेष पुरवणी काढून मोफत प्रदर्शनात वाटप करते.

 

अभिनव व्यासपीठ

 कृषी प्रदर्शनानिमित्त आयोजक संस्था भाज्या, द्राक्ष, फळे व फुले यांच्या स्पर्धा आयोजित करते. यावरून शेतकऱ्यांना चालना मिळून तो अधिकाधिक उत्पादन घेण्यास उद्युक्त होतो. कृषी प्रदर्शनात पशू प्रदर्शन व डॉग शोही आयोजित होतात. यामुळे शेतकऱ्यांना गाई,म्हशी व शेळीच्या जाती व इतर पाळीव प्राण्यांच्या जाती पाहता येतात. त्यांच्या उत्पादनाची खात्री करून घेता येते. कृषी प्रदर्शनात पिकावर पडणारे रोग व कीडी, प्राण्यांना होणारे आजार यासंबंधी सविस्तर उपायोजना चर्चासत्राद्वारे सांगितल्या जातात त्यामुळे कृषीप्रदर्शने माहितीपूर्ण ठरते. तरुण पिढीने शेतीवर लक्ष केंद्रित करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्या तंत्रज्ञानाचे दर्शन कृषीप्रदर्शनातून त्यांना मिळत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. यावरून कृषी प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते.

अभिनव व्यासपीठ

      कृषी प्रदर्शनात थेट भाजीपाला,धान्य विक्रीचा पर्याय उपलब्ध होत असल्याने  प्रदर्शनात दलालविरहित शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकाला उपलब्ध होत असल्याने कृषीप्रदर्शनाची गरज अधोरेखीत झाली आहे.  निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन व काढणीपश्चात तंत्रज्ञान,वाहतूक, प्रक्रिया, मार्केटिंगवर आधारीत भव्य कृषी प्रदर्शनामुळे कृषीक्षेत्राला चालना मिळते. कृषी प्रदर्शनात डेअरी तसेच जोडधंदेविषयी स्वतंत्र दालन असते. यात गुणवत्तापूर्वक दुग्ध उत्पादनापासून ते यशस्वी दुग्धव्यवसाय वाढीचे तंत्रज्ञान देण्यात येते. भारतीय कृषी उद्योगातील युवकांचे स्थान, युवकांना कृषीक्षेत्रातील संधी व प्रेरित करणारे अभिनव व्यासपीठ कृषी प्रदर्शनामुळे प्राप्त होते.

नेटवर्किंग मिटिंग्ज  

  चर्चासत्र, परिसंवाद व इतरही तांत्रिक ज्ञानाची माहिती उपलब्ध होते. कृषी क्षेत्रातील रोजगाराची संधी व कृषी क्षेत्रात शिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता होण्यासाठीचा विशेष उपक्रम कृषीप्रदर्शनात घेतला जातो. यात कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार तथा ज्या कृषी संस्थेकडे रोजगार उपलब्ध आहे अशा कंपनी, संस्था यासाठीचे व्यासपीठ कृषी प्रदर्शनात असल्याने रोजगाराची चांगली संधी यानिमित्ताने कळते. कृषीप्रदर्शनात फळ व भाजीपाला उत्पादक तथा निर्यातदार यांच्याकरिता नेटवर्किंग मिटिंग्ज आयोजित केल्या जातात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आयातदार, निर्यातदार, शेतकरी व या क्षेत्रातील व्यावसायिक यांना यथायोग्य मार्गदर्शन लाभते.
कृषी ज्ञानाचा विस्तार
   कृषी क्षेत्रात जे काही नवनवीन पुस्तके येतात त्यांचे दर्शन शेतकऱ्याला घडते यातून कोणते प्रकाशन त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे व उपयोगी पडेल अशा सर्व पुस्तकांची मासिकांची खरेदी या निमित्ताने शेतकरी बंधू करतो या दृष्टीनेही कृषीप्रदर्शन गरजेचे ठरते. कृषी प्रदर्शनात मुख्य म्हणजे शेती व उद्योगविषयक पुस्तके,मासिके, दैनिके यांचा स्टॉल असतो. अशावेळी शेतीयोजना, कायदा, लागवड, शेती जोडधंदे, सेंद्रिय शेती, फळबाग, भाजीपाला, सहकार, शेती संबंधित अवजारे आदी विषयावरील पुस्तकांना भरपूर प्रमाणात मागणी असते. अशावेळी सवलतीत पुस्तके दिली जातात. त्यामुळे शेतकरी भरपूर खरेदी करतो. एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती देणारी अनेक पुस्तके, मासिके एका छताखाली उपलब्ध झाल्याने शेतकरी ती खरेदी करतो. अशा पद्धतीने कृषी प्रदर्शनातून कृषी ज्ञानाचा विस्तार करण्याची पर्वणी कृषीप्रदर्शनातून मिळते. दरवर्षी कृषीप्रदर्शन भरत असल्यामुळे लोक याची वाट पाहत असतात. अनेक लोक यातून ज्ञान घेण्याची पर्वणी म्हणून बघतात.हाच कृषी प्रदर्शनाचा मुख्य हेतू सफल झाल्यासारखे वाटते. 
शंका समाधानाची सोय
      कृषी प्रदर्शनामुळे रोपवाटिका तंत्रज्ञान विकसित झाले. कारण रोपांचे प्रदर्शन या प्रदर्शनात भरते. बियांपासून रोपे कसे करावे, रोपे सतेज ठेवून वाढ कशी करावी याचे ज्ञान कृषीप्रदर्शनामुळे होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायही जोमदारपणे त्या त्या परिसरात होऊ लागला आहे. याला कृषीप्रदर्शन गरजेचे ठरत असल्याचे दिसून आले. शासनाचा शेततळी कार्यक्रम कृषी प्रदर्शनामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झाला यातून त्यांनी अनुदान घेवून मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण केली. या प्रदर्शनात शेततळी निर्मितीसाठी असलेला कागद, जेसीबी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका समाधानाची सोय येथे झाली. त्यामुळे शेततळी कार्यक्रम प्रभावीपणे राबवता आला आहे.
कृषीप्रदर्शनामुळे 
कृषीविकास
       कृषीप्रदर्शनामुळे फलोत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. फळझाडांच्या लागवडीमुळे जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन तयार होते व पावसाच्या माऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते हा संदेश आपण कृषी प्रदर्शनातून देऊन फलोत्पादनाचे महत्त्व ठसवू शकतो यासाठी कृषीप्रदर्शनाचे माध्यम महत्त्वाचे ठरत असल्याचे लक्षात येते. गरीबी निर्मूलनाचा एकमेव मार्ग म्हणजे कृषीविकास आणि हाच कृषीविकास कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्शवला गेला तर तळागाळातल्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येणे सहज सोपे होईल यासाठी कृषी प्रदर्शन भरवण्याची गरज आहे. 



 कृषीमाल निर्यातीस चालना
 
 भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मुक्तअर्थव्यवस्थेत निर्यातीस मोठे महत्त्व आहे. त्यादृष्टीने आपल्या देशातील कृषीमाल निर्यातीस चालना कृषी प्रदर्शनातून मिळते. यावेळी आयातदार, निर्यातदार यांचे स्टॉल्स असतात. त्यांच्याशी थेट भेट घेऊन आपण आपला शेतमाल निर्यात करून परकीय चलन मिळवू शकतो. अशा पद्धतीने कृषीप्रदर्शनाची गरज असल्याचे जाणवते. कृषीप्रदर्शन नुसते बघण्याचे माध्यम नसून समजावून अनुभव घेण्याचे एक सशक्त माध्यम म्हणून पुढे येत आहे. तंत्रज्ञानातून कृषीविकास व कृषीविकासातून देशाचा विकास ही संकल्पना घेऊन कृषीप्रदर्शन ठिकठिकाणी आयोजित होत आहे. अशा आधुनिक शेतीज्ञानाची गरज आताही आहे आणि पुढेही राहणार.  शेती व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी कृषीप्रदर्शनाची  नितांत गरज आहे.



कृषी प्रदर्शन

कृषीप्रधान देशात
गरज कृषी प्रदर्शनाची,
परिसंवाद,कार्यशाळा, चर्चासत्र
भूमिका निभवावी सहभागाची....

कृषिविकास केंद्रीभूत मानून
व्हावे नियमित कृषिप्रदर्शन,
यानिमित्ताने मिळते ज्ञानाची पर्वणी
अनुभवाची होते देवाणघेवाण...

कृषीप्रदर्शनात स्टॉलमध्ये
भरते अनेक वस्तू, सेवांचे प्रदर्शन,
प्रत्यक्ष पाहिलेले तंत्रज्ञान
अनुभवाच्या वृध्दीने होते मूल्यवर्धन...

कृषी प्रदर्शन असते ज्ञानाचे
अभिनव असे व्यासपीठ,
कृषिप्रदर्शनातून मिळते ज्ञान
असे ते चालते बोलते विद्यापीठ...

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

#कृषिप्रदर्शन#Agriexhibition#कृषिप्रदर्शनाचीगरज#विस्तारकार्य#krishithon#अभिनवव्यासपीठ#agriculture #farmer #agro #farmers #agri #agriculturelife #nature #food #farmerlife #harvest #global #agribusiness #rural #rurallife #hydroponics #aeroponics #instagram #horticulture #green #tractor #agricultureworld #agriculturereview #agriculturegk #garden #homegarden #cattle #livestock #instagood #agronomy #fish#fisheries #farmlife #instafarmer #instaram #agriproducts #environment #kisan #kheti #silage #cow #buffalo #dairy #amul #milk #gdp #village #garden #plants #leaves #wheat #rice #mango #agronomia #country #agriculturebio #botany #agriculturevideo #vedicagriculture #agriculturereview#organicfarming#agriculturereview #plants #rose #flower #petunia #hibiscus #potato #tomato #follow #instafarmer #composting #vermicompost #icar #agripedia #gardenup #leaf #fruit #cutting #gardenblog #tree #crop #kharif #rabi #beekeeping #bellpepper #pumpkins #myfarm #seeds #hormones #npk#शेतकरी

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...