name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): January 2023

बहुआयामी उद्योग : मधमाशीपालन (Beekeeping)

 बहुआयामी उद्योग : मधमाशीपालन Beekeeping


Bahuayami udyog : madhmashipalan


          मधमाशी हे मानव आणि संपूर्ण सजीवसृष्टीला एक सर्वोत्तम वरदान आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अन्य कीटक किंवा प्राण्यांमध्ये मधमाश्या एकट्या दुकट्या राहत नाहीत तर त्या समूहात राहतात म्हणूनच मधमाश्यांच्या वसाहती असतात. मधमाश्या त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद व पराग गोळा करतात तेही इतक्या पद्धतशीरपणे की त्या फुलांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकणांचे स्थलांतरण करतात त्यामुळे फुलांची फलधारणा व बीजधारणा होत असते. यालाच परागीभवन असे म्हणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या झाडांची वा वनस्पतींची वाढ होते व प्रसार होतो. अशा रीतीने फुलांचे काहीही नुकसान तर होत नाहीच. उलट चांगला उपयोग होतो. अजूनही शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकांच्या गैरसमजामुळे मधमाशीपालन करण्यास शेतकरी उत्सुक नसतात. 

Beekeeping

लाकडी पेट्यात मधमाशीपालन 


  • मधमाशापालन म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर उंच झाडाला लटकणारी आग्या मोहोळ येतात. त्याचबरोबरच शेत बांधावरच्या झाडाझुडपात फांद्यावर बांधली जाणारी फुलोरी या छोट्या मधमाशांची मोहोळ दिसतात 

  • पण खरी पाळता येणारी सातेरी जातीची भारतीय मधमाशांची सहा सात समांतर पोळी बांधणारी झाडांच्या वा खडकांच्या अंधाऱ्या जागी वस्ती करून राहतात. 

  • वनवासी लोक ती शोधून त्या अंधाऱ्या पोकळीतून मोहोळ बाहेर काढतात आणि मधाची पोळी पिळून मध मिळवतात. 

  • आग्या आणि फुलोरीचाही मध असाच अशास्त्रीय व विघातक पद्धतीने मिळवला जातो. 

  • पण शुद्ध मध मोठ्या प्रमाणात मोहळाचा नाश न करता मिळविण्यासाठी ही मोहळ विशिष्ट रचनेच्या लाकडी पेट्यात पाळावी लागतात. त्याचाच शेतात ठेवून परागीकरणाद्वारे पीकवाढीसाठीही उपयोग होतो. असं मधमाशापालन करायचं आधुनिक तंत्र ग्रामीण भागातील लोकांनी शिकले पाहिजे.


Beekeeping


लहानांपासून वृद्धांपर्यंत करता येण्यासारखा व्यवसाय


  • शेतात फुलोरा असताना तिथे व फुलोऱ्याचा हंगाम संपल्यानंतर जवळपासच्या जंगलक्षेत्रात अथवा जेथे फळबागांचा फुलोरा असेल अशा ठिकाणी पाळीव मोहोळाचे स्थलांतर करून सतत उत्पन्न मिळवता येते. 

  • हा एक कमी वेळाचा व कुटुंबातल्या लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या सर्व घटकांना करण्यासारखा व्यवसाय आहे. तो सुरू करण्यासाठी मधमाशापालन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे जरुरीच असतं. 

  • त्याचा सराव वर्षभर सर्व हंगामात केला तर मोठे यश मिळू शकते. या उद्योगाला लागणाऱ्या विशिष्ट रचनेच्या लाकडीपेटींची आणि धूम्रयंत्र, मध काढण्याचं मध निष्कासन यंत्र, षटकोनी ठसे असलेल्या पोळी बांधण्यासाठी आवश्यक त्या मेणपत्र्यांची निर्मिती करणारी उसाच्या चरकासारखी यंत्र तयार करण्याचे दुय्यम उद्योगही हाती घेता येतात. 

  • आपली मोहोळ मेंढ्या बसवण्याच्या उद्योगासारखी शेतकऱ्यांच्या शेतात भाड्याने ठेवण्याचाही उद्योग करता येतो. असा हा बहुगुणी मधमाशापालन व्यवसाय आपल्याला राहत्या घरी सुरू करता येईल. 


Beekeeping


मोहळाची विक्री


  • मोहोळ इतर मधमाश्यापालकांकडून किंवा स्वतःच झाडांच्या ढोलीतून मिळवता येतात. 

  • त्यांचं काही वर्षांनी विभाजन करून मोहळाची संख्या वाढविता येते. वा अतिरिक्त मोहळाची विक्रीही करता येते. 

  • मोहळ शासकीय योजनेतूनही खरेदी करता येतात. एका मोहळात मेणाची ५ ते ७ पोळी, त्यामध्ये षटकोनी मेणघरात असलेली अंडी, आळ्या, कोषस्थ माशा (पुप्या) म्हणजेच पिलावा आणि ८ ते १० हजार प्रौढ माशा असाव्या लागतात. 

  • प्रामुख्याने मोहळाची तरुण आई म्हणजे राणीमाशी तर असलीच पाहिजे. असेच मोहोळ टिकते. 

  • पुढे येणाऱ्या फुलांच्या हंगामात नरमाशांची पैदास होते. हंगाम चांगला असेल तर नव्या राण्या जन्माला घालण्याचं काम सुरू होतं. 

  • खास रचनेच्या खारकेसारख्या आकाराच्या पोळ्यांच्या खालच्या कडेला असणाऱ्या राणीघरात नव्या राण्याचं पालनपोषण होतं. 

  • प्रौढ राण्या जन्मून कुंदार राण्यांशी नर माशांचं मिलन होऊन नव्या मोहळाची पैदास होते. वंश पुढे चालू राहतो. 


आपलं मधुबन 


  • तेव्हा हा निसर्गक्रम लक्षात घेऊन मोहोळ केव्हा खरेदी करायची आणि आपलं मधुबन किती पेट्या ठेवून सुरू करायचं. हे तज्ञांचा सल्ला घेऊन ठरवावं लागतं. 

  • मधुबनासाठी फुलोरा देणारी झाड व पीक एक किलोमीटर परिसरात पुरेशा संख्येत असावी लागतात. त्याची माहिती घेऊन ठेवावी लागते. 

  • याशिवाय मोहोळ ठेवण्यासाठी सुरक्षित जागा, पाण्याचा स्रोत व छाया असणं गरजेचं असतं. 

  • मोहळांची हाताळणी व पाहणी करण्यासाठी लागणारी पटाशी, सुरी, डंख बसू नये म्हणून चेहरा झाकणारी संरक्षक जाळी, धुम्र यंत्र अशा साहित्याची गरज असते. 

  • त्याचबरोबरच जमावाच्या काळात मोहळाना साखरेचा पाक द्यावा लागतो. मधाच्या हंगामात मध काढणी (मध निष्काषन) यंत्र असावं लागतं. 

  • हंगामात नवी पोळी बांधून घेण्यासाठी षटकोनी ठसे असलेल्या मेणपत्र्यांची गरज असते. ते विकत मिळतात. या पूर्वतयारीने मधुबन सुरू करता येते. 

  • उपलब्ध पिके व मधु वनस्पतीच्या संख्येनुसार मोहोळ यांची संख्या ठरवता येते. एकरी ५ ते ७ पाळीव मोहोळ पीक वाढीसाठी पुरेशी ठरतात. 

  • मधोत्पादनासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांची संख्या ठरवता येते. तज्ञांचा सल्ला आणि आपला अनुभव यासाठी उपयोगी ठरतो 

  • महाराष्ट्रात मधमाशापालनासाठी जंगलभाग आणि शेतीबागायाती क्षेत्र अनुकूल आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा मधु वनस्पतीनी समृद्ध आहे. 

  • विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण भाग अशा ठिकाणीही मधमाशापालन तेथील हंगामानुसार यशस्वी होऊ शकतं. 

  • मधमाशांना उपयुक्त वनस्पती, पिकं, फळझाडं, फुलबागा,चारा पिकं यांची विचारपूर्वक योजना केली तर मधमाशापालन फायदेशीर होऊ शकते. 


Beekeeping


मधमाशापालनाला अनुकूल परिस्थिती 


  • आवश्यकतेनुसार एकट्याने अथवा इतर मधमाशापालकाच्या सहकार्याने योग्य हंगामात, योग्य ठिकाणी देशभरही स्थलांतर करता येतं. आणि फायदा वाढवता येतो. 

  • महाराष्ट्र व्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, आसाम, अरुणाचल, मेघालय, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, आंध्र, केरळ म्हणजे सर्वच प्रांतामध्ये मधमाशापालनाला अनुकूल परिस्थिती आहे. 

  • अनेक ठिकाणी मधमाशापालक संघ आहेत. मात्र त्यांना मार्गदर्शन खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ करतात. याशिवाय केंद्रीय मधमाशा मंडळ (सेंट्रल बी बोर्ड), कृषी विद्यापीठे वनविभाग व काही खाजगी संस्थाही संशोधन व मधोत्पादन करतात. 


मधमाशीपालन : एकमेव अद्भुत उद्योग


Beekeeping


प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की, जर काही कारणांमुळे मधमाशा नाश पावल्या तर संबंध मानवजात फार तर चार वर्षेच जगू शकेल. कारण पुष्पधारी झाडे, वेली, वनस्पतीचे परागीभवन होणार नाही त्यामुळे अन्न मिळणार नाही. त्यामुळे मधमाश्या मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने किती निकडीच्या आहेत हे लक्षात येऊ शकेल. 

  • मधमाशीपालन हा एकमेव अद्भुत उद्योग असा आहे की जो पूर्णपणे मकरंद व पराग फुलांवर अवलंबून आहे. 

  • भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे. जंगल भागातील आदिवासी लोक वनसंपत्ती, वनौषधी आदींवर अवलंबून आहेत. मधमाश्यांच्या वसाहतीपासून मध गोळा करण्याचे काम तर आपल्या पूर्वजांपासून अजूनही जंगल भागात चालू आहे. 

  • मधाचे महत्त्व आपल्या वेद पुराणात सापडते तसेच पारंपारिक आयुर्वेदाप्रमाणे मधाचा आपण बहुगुणी औषधी म्हणून उपयोग करतो.


मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय


Beekeeping


  • मध उत्पादनाशिवाय मधमाशीपासून मेण,पराग, राजान्न, प्रोपोलीस व दंश विष अशी अत्यंत औषधी उपयोगी उत्पादने मिळतात. या सर्व घटकांना जागतिक बाजारपेठेत अत्यंत चांगली मागणी आहे. 

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधमाशांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादन व त्याचा दर्जा अनेक पटींनी वाढतो. 

  • अशा रीतीने वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा व सुरक्षा देण्यासाठी मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. 

  • मधमाशीपालन म्हटले की सर्वसामान्य लोक आधी भुवया वर करून आ वासून प्रश्नार्थक मुद्रेने बघतात. कारण मधमाशांच्या मधापेक्षा लोकांना मधमाशांच्या डंखाची, त्यांच्या चावण्याची खूप भीती मनात बसलेली आहे. मुळात हाच सगळ्यात मोठा गुण म्हणा किंवा वरदान म्हणा. की मधमाशांना चांगली समज असते. 

  • आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे मधमाशा चांगले ओळखू शकतात. 

  • मधमाशांचे मित्र म्हणजे मधपाळ.अगदी सहजपणे ते मधमाशांच्या पोळ्यात हात घालतात. तरीही त्यांना मधमाशा चावत नाहीत. त्यांच्या अंगावर अंगाखांद्यावर मधमाशा वावरतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे भरपूर मध देतात. 


मधमाशांच्या पोळ्याला त्रास


  • याउलट एखाद्याने मधमाशांच्या पोळ्याला त्रास देण्याचा विचार जरी मनात आणला तरी मधमाशांना ते अचूक समजते. कारण विशिष्ट फेरोमोनद्वारे संदेश किंवा संवेदना मधमाशांना लगेच कळतात. 

  • अशा व्यक्तीला, प्राण्याला किंवा कोणालाही शत्रू ठरवून सगळ्या मधमाश्या त्याच्यावर हल्ला करतात. आणि डंख मारतात याचे साधे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्याने जर सहज झाडावरील किंवा इमारतीवरील मोहोळावर जर दगड भिरकावला तर दहा-बारा माणसांच्या गर्दीतूनही त्या व्यक्तीला ओळखून मधमाशा त्यालाच डंख मारतात. कारण दगड भिरकावून मारलेल्या व्यक्तीच्या हाताला किंवा बोटांना विशिष्ट संप्रेरक (फेरोमोन)चा गंध असतो. तो मधमाशा ओळखतात. आणि सर्व मधमाशा त्याचाच पाठलाग करतात. 

  • साधारण १५ ते २० हजार वर्षांपूर्वीपासून मधमाशांपासून मध मिळवण्याचे तंत्र आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. याचे दाखले भीमबेटेकाच्या (पंचमढी, मध्यप्रदेश) जंगलातील डोंगर कोपऱ्यावरील भीत्तीचित्रांवरून स्पष्ट मिळतात. 

  • त्या काळीदेखील मध गोळा करून त्याचे अन्न म्हणूनच सेवन केले जायचे. 

  • मधाची औषध म्हणून उपयोगिता आयुर्वेदातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या साहित्यात लिहून ठेवली आहे. 

  • त्याचाच आता सर्रास संदर्भ घेऊन औषधे तयार केली जातात. यापैकी प्रमुख उपचार म्हणून अंगावरील जखम, कापल्यावर किंवा भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप दिल्यास ती जखम लवकर बरी होते. 

  • मधातील एंटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीमुळे मधाचे औषधी गुणधर्म वाढतात. 


मधमाशीपालनाचे फायदे 


  • मधमाशीपालनाचे अनेक फायदे आहेत. जगातील बहुतेक देशात एकाच जातीच्या मधमाश्या आहेत. मात्र भारत हा एकमेव देश असा आहे की, ज्याच्या वातावरणात चार ते पाच जातींच्या मधमाशांच्या वसाहती नैसर्गिकरित्या आढळतात. त्यांचे संवर्धन व संगोपन करून व्यावसायिक उत्पादन करता येऊ शकते. 

  • आपल्याकडे मधमाशांना आवश्यक फुले, झाडे, वनस्पती व वातावरण अत्यंत पोषक आहे. त्यामुळे मध, मेण व इतर उत्पादन पण भरपूर मिळू शकते. 

  • सर्वात प्रमुख म्हणजे मधमाशीपालनाद्वारे शेतीपीक व फळपिकांचे उत्पादन व प्रजनन अनेक पटीनी वाढते. त्यामुळे शेती व शेतकरी कुटुंबाचेही सामाजिक व आर्थिक सबलीकरण होते. 

  • परागीभवनामुळे शेतीप्रमाणेच औषधी वनस्पती, जंगली वृक्षवेलींचे संवर्धन होते. पर्यायाने जंगली भागातील आदिवासींचे उत्पन्न वाढून त्यांचे शहरी भागात स्थलांतर थांबू शकते. 


Beekeeping


मधमाशीपालनातून रोजगार


  • मधमाशीपालन हा बहुआयामी उद्योग असल्यामुळे त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व मजुरांची गरज आहे. 

  • उदा. मधमाशांसाठी लागणाऱ्या वसाहती. त्यासाठी विशिष्ट पेट्यांचे उत्पादन व पुरवठा, वसाहतींचे संगोपन व वाढ करण्यासाठी प्रशिक्षित मधपाळ, वसाहतींचे स्थानांतरण व वाहतूक व्यवस्था, मधोत्पादन, साठवण तसेच मधाचा दर्जा, परीक्षण, वेस्टनीकरण व विपणनव्यवस्था आदि व्यवस्थेत रोजगार उपलब्ध होतो. 

  • मधमाशीपालन हे मध व अन्य उत्पादन निर्मितीसाठी स्त्री पुरुष, लहान-मोठे असा भेद नाही. कोणीही हा व्यवसाय सहज करू शकतात. 

  • लहान, मध्यम तसेच मोठ्या प्रमाणावरही मधमाशीपालनास सुरुवात करता येते. मधमाशीपालनाकरीता आवश्यक असलेले मकरंद व पराग जवळपास विनामूल्य मिळतात. 

  • मधमाशीपालनाकरीता कमीत कमी जागा, भाग भांडवल, वेळ, कष्ट घ्यावे लागतात. अशा पद्धतीने मधमाशीपालन फायदेशीर आहे.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)

 रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)



          







भारत वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश आहे. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली त्यामुळेच आज आपल्यासमोर शेतकरी आत्महत्येसारखी महाभयान समस्या उभी ठाकली आहे. 

वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव यातील दरीही तेवढीच वाढली असल्यामुळे गाव, गावाकडची संस्कृती, शेती, शेतकऱ्यांची जीवनपद्धत अशा अनेक विषयापासून शहरी लोक कोसो दूर राहिलेत. आज पुन्हा एकदा गावाकडे चला असं म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरी माणसाला या गावाकडच्या मातीची ओढ आहे तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालून कृषीपर्यटन ही संकल्पना आजमितीस आपल्या मातीत रुजू लागली आहे. आता आपण दरवर्षी जागतिक कृषी पर्यटन दिन हा १६ मे रोजी साजरा करतो. 














मोठ्या प्रमाणात वाढणारा व्यवसाय

 

  • सध्या महाराष्ट्रात कृषीपर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना शहरी पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

  • वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गापुढे ओढा वाढत आहे. निसर्गाचे हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषी पर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकऱ्याना मिळाला आहे.आजमितीस महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत. 

  • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी व कृषी पर्यटन संस्थांनी एकत्र येऊन एक महासंघ स्थापन केला आहे.  त्याचे नाव महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम को-ऑपरेशन लि. (मार्ट) आहे.  

  • मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात मार्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ४२ टक्के लोकांना ग्रामीण भागात एकही नातेवाईक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे.












पूरक व्यवसाय

 

  • उपलब्ध साधनसामुग्रीत अगदी कमी भांडवली खर्चात केला जाणारा हा पूरक व्यवसाय आहे. शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे व त्यायोगे शहरी पैसा ग्रामीण भागाकडे वळविणे हा उद्देश साध्य होतो. रोजगार निर्मिती, शेतीमालाला शेतातच ग्राहक हे मुख्य व अत्यंत महत्त्वाचे हेतू साध्य होतात. 

  • ही कृषी पर्यटन केंद्रे प्रत्येक गावात रोजगार निर्मितीचे नवीन साधन म्हणून उदयास येत आहे. 

  • आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचे जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? तर मुलं सहज उत्तर देतात. बिग बाजार किँवा सुपर मार्केट इ. यात त्यांचा दोष नाही कारण त्यांनी या सर्व गोष्टी कधी पाहिलेल्याच नाहीत. आणि जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे? 

  • जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते. याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? 

  • शेतकऱ्यांची दुःख समजण्याची, त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? म्हणूनच कांदा जमिनीवर उगवतो की जमिनीखाली? शेतकरी आत्महत्या का करतात? या अशा प्रश्नाची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटनाचा मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय. त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. 

  • अत्यंत उज्वल असे भवितव्य असणारा असा हा कृषि पर्यटनाचा पूरक व्यवसाय करून तो मुख्य व्यवसाय कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे. 

 













शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन


  • आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्च सुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषीपर्यटन व्यवसायात पर्यटकांचे दर निश्चिती पॅकेज ठरविणे शेतकऱ्यांच्या हातात आहे म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. 

  • त्याचबरोबर कृषी पर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. हे राज्यातील अनेक कृषि पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. 

  • कृषी पर्यटनाची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर शेतकऱ्यांच्या फळत्या फुलत्या शेतीत पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारीची उत्तम व्यवस्था करून देणे. शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन करता येते. 














महत्त्वाच्या टिप्स

कृषी पर्यटन करू इच्छिणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत.

  • अतिथी देवो भव! ही आपल्या देशाची संस्कृती आहे. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आदरातिथ्य...! येणाऱ्या पर्यटकांचे घरच्याच सदस्य असल्याप्रमाणे आदरातिथ्य केले की आपण अर्धी लढाई तेथेच जिंकतो. 

  • कृषीपर्यटनाचा व्यवसाय सुरू करताना सर्व बाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे मार्केटिंग करणेही महत्त्वाचे ठरते. 

  • आपल्या व्यवसायाची जाहिरात वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटनविषयक मासिके यातून सतत करावी. 

  • आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नाविन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. 

  • आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोताचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी. पर्यटकांसोबत स्वतः जातीने उपस्थित राहावे. विश्वासाचं नातं नवीन पर्यटक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. 













दुर्गम भागातही कृषीपर्यटन

  • दुर्गम भागातही कृषीपर्यटन करता येते. कारण आजच्या धावपळीच्या जगात लोकांना निरव शांततेची आवश्यकता असते. त्यामुळे लोक कितीही अडचणी आल्या तरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास तयार असतात. 

  • शेतीसोबतच निसर्गाशी संबंधित इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे,फुलपाखरे इ. पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. 

  • राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे भेट नक्की देणार याची खात्री असते. 

  • आठवड्याची सुट्टी (विकेंड) ही वाढती संकल्पना पाहता पर्यटकांना आपल्या केंद्राकडे वळविता येऊ शकते. शेतीचे मूल्यवर्धन म्हणून कृषीपर्यटन करावे. 











वास्तवदर्शी प्रकल्प अहवाल 

  • कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण सादर करतांना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती दिली पाहिजे. 

  • प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. अहवाल बनवून देणाऱ्यास त्याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 

  • अहवालात मार्जिन, स्वनिधी बँक साहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील, आर्थिक जमा आदी बाबींचा समावेश हवा. 

  • कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्र पुढीलप्रमाणे आवश्यक असतात. त्यात राहण्याच्या दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, इस्टिमेट (अंदाजपत्रक),आर्किटेक्चर दाखला. ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एन.ए. दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला, जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे त्याचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती लागते. 

  • कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती, जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदाराची कागदपत्रे, जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो. 

  • कृषीपर्यटन व्यवसाय असल्याने व्याजदर 13 ते 15 टक्यापर्यंत अपेक्षित असतो. कर्ज कालावधी कर्जानुसार 5 ते 10 वर्षापर्यंत असू शकतो. कर्जाचा हप्ता मासिक, त्रैमासिक किँवा वार्षिक असतो. 

  • कर्ज परतफेडीबाबत ड्रायपिरियड मंजूर होऊ शकतो. या कालावधीत फक्त दरमहा व्याज भरावे लागते. कर्ज विनीयोगाचे स्वतंत्र तपशीलवार पत्र देणे गरजेचे आहे. 

  • कृषी पर्यटन विकसनसाठी जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळे उभारणी, पाणी टाकी, पाईपलाईन कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे, खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरवण्यासाठी वाहन खरेदी, सौर ऊर्जा, गोबर गॅस, दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज इ. घेता येते














ताणतणाव कमी करण्यासाठी कृषी पर्यटन 

  • एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. 

  • धकाधकीच्या जीवनात परस्परांतील संवाद कमी होतोच त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. 

  • पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदीत होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत. 

  • कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषीपर्यटन या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हे केंद्र चालवणाऱ्याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. 

  • शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. यात शेतीला प्रथम प्राधान्यच मिळाले पाहिजे. 

    

















महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरीत्या राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला हवी. खरं तर कृषी पर्यटन ही परदेशी संकल्पना आहे. ब्राझील, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात ती खूप लोकप्रिय आहे. आपल्या देशातही आता ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली आहे. परंतु योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषि पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.


© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com


www.DigitalKrushiyog.com


#कृषी पर्यटन  #Agro tourism #रोजगार 

#शेतीपूरक व्यवसाय 



सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...