name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): डिसेंबर 2024

शेतीची पुस्तकं (Agricultural books)

 शेतीची पुस्तकं
Agricultural Books

Agricultural Books

शेतकरीदादा आता जावा शेती पुस्तकांच्या गावा, 

शेतात नगदी पिकांबरोबर आता ज्ञानज्योत लावा... 


पुस्तकात असते नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, 

प्रगतीशील शेतकरी हा मार्ग जरूर अनुसरती... 


पुस्तकांमुळे कळतात पिकांच्या संकरित जाती, 

त्यावरूनच शेतकरी प्रमाणफवारणीचे डोस देती... 


पुस्तकं शिकवतात विकासाच्या प्रगतीचा मार्ग, 

करू नका वाचण्याचा कंटाळा,भरभरून देईल निसर्ग... 

Agricultural Books
                                  

दुसरं काही वाचण्यापेक्षा वाचा पुस्तकं शेतीची,

याच्या माहितीमुळे खुलतील दारे तुमच्या प्रगतीची... 


आपल्या व्यवसायासाठी पुस्तकं करतात मार्गदर्शन, 

जाणून घ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथेचे नंदनवन... 


पुस्तकांच्या वाचण्याने व्हाल अनुभवी ज्ञानसंपन्न,

कुठच्या कुठे निघून जाईल तुमची अवस्था विपन्न... 


तुम्ही म्हणाल पुस्तकानं होणार नाही शेती,

सर्व शेतकरी याच्या ज्ञानाचे गोडवे गाती...


आधी वाचा मग करा, शिकवतात पुस्तकं,

अनुभवाच्या कसोटीवर पळतील तुमची चाकं... 


दीपू म्हणे करू नका आळस पुस्तकं घेण्या-देण्याचा,

शेतकरीदादा हाच एक मार्ग सुखाने जगण्याचा...


© दीपक केदू अहिरे, नासिक 

Agricultural Books

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube
https://youtube.com/@digitalkrushiyog?si=pHXfk5BaweSWXoSx



Koo :

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :





कापुस कोंड्याची गोष्ट (Kapus kondyachi goshta)

कापुस कोंड्याची गोष्ट
Kapus kondyachi goshta 


Kapus kondyachi goshta


बळीराजाने काढला कापुस कोंड्याची गोष्ट चित्रपट, 

चार बहिणींच्या संघर्षाच्या कथेतून साकारतो हा बोधपट...

 

पदार्पणातच चित्रपटाने केली ऑस्करवारी, 

खडतर शेतकरी कुटुंबाची झाली वाताहात सारी... 

Kapus kondyachi goshta

आत्महत्या हा उपाय नसून जगा त्या चार बहिणींप्रमाणे, 

खऱ्या अर्थाने त्या जगल्या, लढायला शिकल्यामुळे... 


अभिनयात सरस, मातीची चित्तरकथा आहे कसदार, 

आपल्या विचारातून उद्याचं स्वप्न पेरा दाणेदार...


सकारात्मक दृष्टीने आयुष्याला सामोरे जाऊन व्हा यशस्वी, 

चित्रपटाने हा बोध दिला प्रत्येकाला मनस्वी... 


नसेल पहायला वेळ मिळाला चित्रपटगृहात, 

झी टॉकिज या लोकप्रिय चॅनेलवरती पहा घराघरात...


न संपणाऱ्या या कथेचा गाभा आहे समाजप्रबोधनाचा, 

आत्महत्या नको आता, संघर्ष करून विचार करा जगण्याचा... 


दीपू म्हणे पहा चित्रपट, घ्या बोध काहितरी, 

शेतकऱ्याच्या जीवनाला आता खऱ्याअर्थाने कोण तारी...


© दीपक केदू अहिरे, नासिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube
https://youtube.com/@digitalkrushiyog?si=pHXfk5BaweSWXoSx



Koo :

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :





निर्यातीची सुवर्णसंधी (Golden opportunity of export)

निर्यातीची सुवर्णसंधी
Golden opportunity of export


Golden opportunity of export


जगाच्या बाजारपेठेत 

भारतीय उत्पादनांना मागणी,  

निर्यात करून उत्पादने 

पोहचवा जागतिक स्थानी... 


२०४७ पर्यंत आत्मनिर्भर 

भारताची संकल्पना, 

निर्यातीची मोठी सुवर्णसंधी 

जाणून घ्या सरकारी योजना...  


निर्यात उद्योगामध्ये 

मिळते विदेशी चलन, 

तुमच्या उत्पादनांना मिळते 

जागतिक बाजारपेठेत स्थान... 


Golden opportunity of export

बाजारातील ट्रेंड्स 

लक्षात घ्या ग्राहकाची आवड, 

मग करा तुम्ही सुयोग्य 

निर्यातदार देशाची निवड...  


निर्यातीसाठी आपल्याला 

करावी निर्यातदार नोंदणी,  

निर्यातीचे विविध टप्पे समजून 

प्रशिक्षणाने व्हा तुम्ही ज्ञानी...  


विविध सरकारी योजनेतून 

अर्थसहाय्य तुम्ही मिळवा, 

मार्गदर्शन आणि संसाधनाने 

निर्यातीचा मागोवा घ्यावा...  


जागतिक प्रदर्शनांमध्ये 

आपले उत्पादन करावे सादर, 

संभाव्य ग्राहकांच्या संवादामुळे 

ज्ञान मिळते निर्यात प्रक्रियेवर...  


Golden opportunity of export

योजना व सततच्या प्रयत्नामुळे 

यशस्वी व्हा लक्ष्य निर्यातदार, 

आपल्या उत्पादनांना न्यावे 

आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे हॉस्‍पिटल 'किम्‍स मानवता' रुग्‍ण सेवेत दाखल (North Maharashtra's largest hospital 'Kims Humanity' admitted to patient service)


उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे हॉस्‍पिटल
'
किम्‍स मानवता'  रुग्‍ण सेवेत दाखल
North Maharashtra's largest hospital 'Kims Humanity' admitted to patient service

North Maharashtra's largest hospital 'Kims Humanity' admitted to patient service

अत्‍याधुनिक आरोग्‍य सुविधा, सर्वांसाठी उपचाराचा संकल्‍प

नाशिक- सध्याच्‍या स्‍थितीत वैद्यकीय क्षेत्रात उपलब्‍ध अत्‍याधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध करुन देतांना भविष्यात प्रभावी ठरणार्या तंत्रज्ञानाची उपलब्‍धता किम्‍स मानवता मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पिटलमध्ये केली जाणार आहे. सर्वांसाठी उपचाराचा संकल्‍प घेतल्‍याने हॉस्‍पिटलमध्ये दाखल कुठल्‍याही आर्थिक स्‍तरावरील रुग्‍णाला हमखास उपचाराची हमी उपलब्‍ध असेल. ३५० बेड्‌सचे सुसज्‍ज असे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे खासगी हॉस्‍पिटल रुग्‍णांच्‍या सेवेत दाखल झाले आहे, अशी घोषणा किम्‍स मानवता हॉस्‍पिटलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) डॉ.राज नगरकर यांनी केली.

  मुंबई नाका परीसरातील किम्‍स मानवता हॉस्‍पिटलमध्ये मंगळवारी (१७ डिसेंबर) झालेल्‍या पत्रकार परीषदेतून त्‍यांनी ही माहिती दिली आहे. अधिक माहिती देतांना डॉ.राज नगरकर म्‍हणाले, नाशिककरांना सर्वसमावेशक आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करुन देण्याच्‍या उद्देशाने कृष्णा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेस अर्थात 'किम्‍स'  आणि 'मानवता' यांनी भागिदारीतून किम्‍स मानवता मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पिटलची मुहूर्तमेढ रोवली आहे. मेडिकल टुरीझमच्‍या क्षेत्रात प्रगती साधत असलेल्‍या नाशिकला या हॉस्‍पिटलचा मोठा हातभार लागणार आहे. हॉस्‍पिटलची उभारणी करतांना १० वर्षांनी कुठल्‍या स्‍वरुपाचे तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असेल, याचा विचार करुन सर्वात अत्‍याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवितांना हॉस्‍पिटल 'फ्युचर रेडी' झाले आहे. 

 हॉस्‍पिटलमध्ये दाखल झालेल्‍या रुग्‍णाला कुठल्‍याही चाचणी किंवा उपचारासाठी हॉस्‍पिटलबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. प्रदीर्घ अनुभव असलेली डॉक्‍टरांची व पॅरामेडिकल टीम रुग्‍ण सेवेसाठी सदैव तत्‍पर असणार आहे. 'ट्रिटमेंट फॉर ऑल' या संकल्‍पनेवर काम करतांना हॉस्‍पिटलमध्ये दाखल झालेला कुठलाही रुग्‍ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहाणार नाही, याची खातरजमा टीम करणार आहे. त्‍यामुळे मेडिक्लेम, शासकीय योजनांचे लाभार्थी, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सेवेतील कर्मचारी यांना किम्‍स मानवताच्‍या अत्‍याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

 या पत्रकार परीषदेप्रसंगी किम्‍स मानवता मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पिटलचे एमडी डॉ.राज नगरकर, किम्‍स मानवता हॉस्‍पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ.नीलेश सिंग, हृदयविकार तज्‍ज्ञ डॉ.नितीन कोचर, डॉ.प्रतिक्षित महाजन, डॉ.यतिंद्र दुबे, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.ललित लवणकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

सर्वात मोठा आपत्‍कालीन विभाग

  आगामी सिंहस्‍थ कुंभमेळा येऊ घातला असून, लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. तसेच विविध कारणांनी नाशिकला पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पार्श्वभुमीवर हॉस्‍पिटलमध्ये सर्वात मोठा आपत्‍कालीन विभाग (इमर्जन्‍सी वॉर्ड) उपलब्‍ध आहे. यातून मास कॅज्‍युअल्‍टी हाताळण्याची क्षमता असणार आहे.

मदर-चाईल्‍ड केअरला प्राधान्‍य

 हॉस्‍पिटलमध्ये मदर-चाईल्‍ड केअर विभाग कार्यान्‍वित असणार आहे. यामध्ये महिलांना प्रसुतीपूर्व मार्गदर्शनापासून, प्रसुती व त्‍यापश्‍चात आवश्‍यक समुपदेशन व मार्गदर्शन सेवा प्रदान केली जाईल. तसेच 'एलडीआरपी'च्‍या माध्यमातून एकाच रुममध्ये महिला रुग्‍णांची प्रसुती व त्‍या पश्‍चातच्‍या सर्व सेवा पुरविल्‍या जाणार असल्‍याने त्‍यांना दर्जेदार आरोग्‍यसेवेची अनुभूती घेता येणार आहे.

किम्‍स मानवता हॉस्‍पिटलचे वैशिष्ट्ये :

  • ३५० बेड्‌सचे सुसज्‍ज हॉस्‍पिटल, १०० आयसीयु बेड्‌सचा समावेश
  • १५ एनआयसीयु, व १५ बीआयसीयुद्वारे शिशूंना उपचार उपलब्‍ध
  • उत्तर महाराष्ट्रातील अत्‍याधुनिक कॅथलॅब असेल रुग्‍णसेवेत
  • रोबोटिक सर्जरी, ऑर्थो, न्‍युरो नव्‍हिगेशन सर्जरी उपलब्‍ध
  • १५ सर्जिकल ऑपरेशन थिएटर व ५ अत्‍याधुनिक एंडोस्‍कोपी युनीट
  • २० डायलेसिस युनीटद्वारे रुग्‍णांना प्रदान केली जाईल सेवा
  • सर्वात मोठी व अनुभवी कन्‍सल्‍टंटची टीम बजावणार कर्तव्‍य
  • कुशल पॅरामेडिकल टीम घेणार रुग्‍णाची काळजी.

किम्‍स-मानवता विषयी...

 कृष्णा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेस (किम्‍स)  आणि मानवता यांच्‍यामध्ये मे २०२२ मध्ये सांमजस्‍य करार झाला होता. त्‍यानुसार किम्‍स मानवता मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पिटलची उभारणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्‍या किम्‍सच्‍या माध्यमातून नाशिककरांना अत्‍याधुनिक आरोग्‍य सुविधा पुरविण्याच्‍या उद्देशाने व डॉ.राज नगरकर यांच्‍या दुरदृष्टीकोनातून हे हॉस्‍पिटल नावारुपाला आले आहे. सर्वप्रकारच्‍या वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्‍ध करुन देतांना किम्‍स मानवता हॉस्‍पिटल रुग्‍णसेवेत दाखल झाले आहे.

बागलाणचे शेतकरी मधुकर मोरे यांना राष्ट्रीय सन्मान (National honor to Baglan farmer Madhukar More)

बागलाणचे शेतकरी मधुकर मोरे यांना राष्ट्रीय सन्मान
National honor to Baglan farmer Madhukar More

Baglans farmer

 बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील प्रयोगशील शेतकरी मधुकर दादाजी मोरे यांना नवी दिल्ली येथे कृषीजागरण आणि आय.सी.ए.आर.तर्फे दिला जाणारा 'डिस्ट्रिक्ट मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया' या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

 श्री. मोरे हे मागील अनेक वर्षांपासून प्रयोगशील शेती करत आहेत. शेतीत नवनवीन गोष्टींचा अवलंब करत शेती फायद्याची कशी करता येईल यावर त्यांचा भर असतो. बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अॅग्री इनपुट ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. 

   त्यांच्या या सगळ्या प्रवासात बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी मार्गदर्शन केले. देशभरातून अनेक शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल केले होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी पुसा कॅम्पसमध्ये उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

  शेतातील पिकांमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती साठी प्रेरणादायी ठरत आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारासह संपूर्ण महाराष्ट्रात विना केमिकल नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग सुरू असुन त्या साठी बायोमीचे प्रफुल्ल घाडगे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभत आहे. 

 सोमवारी (२ डिसेंबर) झालेल्या नवी दिल्ली येथील इंडियन अग्रीकल्चर रिसर्च (आय.सी.ए.आर) पुसा ग्राउंडवर शानदार कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी तथा कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी "कृषी जागरण आणि अॅग्रीकल्चर वर्ल्ड" चे संस्थापक एम.सी. डोमिनिक, मुख्य व्यवस्थापक संजय डोमिनिक, सहायक व्यवस्थापक राजश्री रॉय बुमन उपस्थित होते.

   भारतातून एकूण २२ हजार शेतकऱ्यांनी या पुरस्कारारासाठी अर्ज केले होते. त्यातून श्री. मोरे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भविष्यात तरणारे जोडव्यवसाय मॉडेल तयार करणारे श्री. हृषिकेश औताडे (Creating the next business model that floats in the future Mr. Hrishikesh Autade)

भविष्यात तरणारे जोडव्यवसाय मॉडेल तयार करणारे श्री. हृषिकेश औताडे
Creating the next business model that floats in the future Mr. Hrishikesh Autade

 
        अहिल्यानगर जिल्हा, श्रीरामपूर तालुक्यातील ऋषिकेश हरिभाऊ औताडे हे एम. एस्सी. जैवतंत्रज्ञान शिक्षित असून त्यांनी  बायो-टेक्नॉलॉजी सारख्या आव्हानात्मक विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, २०१० साली त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता नाविन्यपूर्ण प्रयोग करणे व राबवणे या त्यांच्या स्वभावामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. २०१५ साली ते अग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड, नवी दिल्ली यांचेतर्फे घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत उतीर्ण झाले. फक्त महाविद्यालयाच्या चार भिंतींमध्ये न अडकता त्यांनी विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष प्रशिक्षणे घेतली व शासकीय प्रकल्प राबविले. 

गोदागिरी फार्म्सची स्थापना

       शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीनही पातळीवर काम केल्याने संस्थेने प्रभारी उप-प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांना २०१८ साली व नंतर २०१९ साली प्राचार्य पदाची जबाबदारी दिली. परंतु, प्रशासन व नियोजन जबाबदारीतून विद्यार्थी व शेतकरी यांच्याशी संवाद कमी झाल्याने त्यांनी मार्च २०२२ साली दोन्ही पदाचा राजीनामा दिला व गोदागिरी फार्म्स या फर्मची स्थापना केली.

अँग्री क्लिनिक कोर्स

     शिक्षकी पेशातून व्यवसायपेशा मध्ये जाण्यासाठीचा लागणारा दृष्टीकोन मिळावा यासाठी त्यांनी एप्रिल-मे, २०२२ काळात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज) यांच्या संलग्न नाशिक येथील प्रशिक्षण संस्था एशिअन येथे ४५ दिवसाचा अँग्री क्लिनिक व अॅग्री बिझनेस सेंटर कोर्स पूर्ण केला.


मधमाशी निगडित उद्योग

    कृषी क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाची 'जैविक निविष्ठा' मानल्या गेलेल्या मधमाशीशी निगडित उद्योगाचा मार्ग निवडावा अशी धारणा होण्यामागे; जैव तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतल्याची पार्श्वभूमी असावी हा एक 'मधुर योग'च म्हणायला हवा! त्यांच्या या उद्योगाचा शुभारंभ २०२१ च्या डिसेंबरपासून प्रशिक्षण घेतल्यापासून झाला. 

गांडूळ खत, मशरूम बीज उत्पादन

 गोदागिरी फार्म्स अंतर्गत प्रामुख्याने मधमाशीपालन, गांडूळ खत उत्पादन, ऑयस्टर मशरूम बीज उत्पादन या बरोबरच शेतकरी, शाळा आणि महाविद्यालये इत्यादींपर्यंत या तीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. "वेस्ट, टू व्हॅल्यू, टू सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, टू एंटरप्रेन्योरशिप" या थीमला अनुसरून ते ऑफलाइन/ऑनलाइन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाद्वारे जागरूकता पसरवत आहोत. 

प्रशिक्षण व व्यवसायासाठी प्रोत्साहन

   आजपर्यंत श्री. औताडे यांनी १००० हून जास्त शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण, बेरोजगार तरुण यांना प्रशिक्षण व व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले आहे. व्यवसायाची सुरुवात करण्याची संकल्पना तशी खरी कोविडच्या लॉकडाऊन मध्ये त्यांना सुचली. त्यादरम्यान ३० नोव्हेंबर २०२० रोजी घरघुती धिंगरी अळींबी उत्पादन प्रकल्प सुरु केला व ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरु केले. त्यातून आलेल्या उत्पन्नातून पुढे त्यांनी २ टन गांडूळ खत प्रकल्प सुरु केला. सध्या १० टन प्रती ३ महिने क्षमतेचा प्रकल्प सुरु असून, नर्सरी व शेतकरी यांना पुरवठा चालू आहे. सद्यस्थितीमध्ये व्यावसायीक धिंगरी अळींबी उत्पादन व बीज उत्पादन प्रकल्पासाठी प्रयोगशाळेचे बांधकाम चालू आहे.


मधू उद्योजक होण्यामागची प्रेरणा
  
  श्री. औताडे यांनी व्यवसाय म्हणून मधमाशीपालनाची निवड केल्यानंतर पुण्याच्या मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेतून एक महिन्याचे मधमाशीपालनाचे (डिसेंबर २०२१) व तसेच ऑगस्ट २०२२ एकदिवसीय मध तपासणीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे महाबळेश्वरस्थित खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयातून दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षणही जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण केले. 'पूर्वा कृषिदूत' मासिकाचे संपादक तथा ज्येष्ठ कृषिवैज्ञानिक डॉ. श्री. भास्कर गायकवाड यांचे मधुपालनाच्या संदर्भातील वृत्तपत्रांतील काही लेख त्यांच्या वाचनात आले. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषणामुळे या विषयी उत्सुकता वाढली. तीच मधु-उद्योजक होण्यामागची प्रेरणा ठरली. तसेच 'सीबीआरडीटी' येथील माजी सहसंचालक डेझी थॉमस यांनीही ट्रायगोना मधमाशीविषयी त्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पहिली मधमाशी पेटी खरेदी करून त्यांनी मधमाशीपालन व्यवसाय सुरू केला. पुढे एपिस मेलिफेरा, एपिस सेरेना व ट्रायगोना जातींच्या मधुपेट्यांचा परागीभवनासाठी पुरवठा अहमदनगर येथील टरबूज, डाळिंब, कांदा बियाणे व आंबा पिकासाठी व बागांसाठी श्री. ऋषिकेश हरिभाऊ औताडे यांनी केला. 

भाडेतत्त्वावर पेट्या

 श्री. औताडे यांनी रायगडमध्येही आंबा बागेसाठी भाडेतत्त्वावर पेट्या दिल्या. भाडेतत्त्वावर मधमाशी पेट्या देण्यापूर्वी संबंधित शेतकरी, व्यावसायिक यांना मधमाशीपालनाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांनी पेटीची काळजी तर घेतलीच, त्याचबरोबर शेतामध्ये नैसर्गिक मधमाश्या संगोपन देखील सुरू केले. मराठी भाषेमध्ये सोशल मीडियावर मधमाशीपालना- विषयी खूपच कमी माहिती टाकली जाते. म्हणूनच श्री. हृषिकेश औताडे यांनी मधमाशीपालन करतानाचे दैनंदिन अनुभव व माहिती  यूट्यूब, फेसबुक, लिंक्डइन, इन्स्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट व ब्लॉगद्वारे प्रदर्शित केले.
    सद्यःस्थितीत त्यांच्याकडे २७ एपिस मेलिफेरा, २० ट्रायगोना व ३२ एपिस सेरेना वसाहती आहेत. याद्वारे त्यांनी २०२२-२३ व २०२३-२४  हंगामामध्ये नेवासा, श्रीरामपूर , राहाता, राहुरी, रायगड- म्हसाळा, पैठण, कोपरगाव, अहमदनगर, संगमनेर अशा विविध गावांमध्ये परागीभवन सेवा दिली आहे. या प्रवासात कृषि विभाग श्रीरामपूर येथील आत्मा व कृषि विभाग यांचे सहकार्य लाभले. आत्मा कृषि विभाग पुरस्कृत तेलबिया उत्पादन प्रोत्साहन योजनेमध्ये मधमाशीपालन व सूर्यफूल पेरणी केली. सूर्यफूल काढणी करून त्यांनी त्याचे तेल काढून विक्री केली व सूर्यफूलपासून मध काढून त्याची विक्री केली.

विविध पुरस्कार प्राप्त 
   
 मधमाशीपालक शेतकऱ्याना परागीभवन सेवा, प्रशिक्षण, मध विक्री आणि या माध्यमातून कृषिविकास तसेच पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या समर्पित कार्यासाठी त्यांना बसवंत मधुक्रांती पुरस्कार २०२२ मधमाशी उद्योजक (उत्तर महाराष्ट्र) मिळाला. मधुमक्षिकापालन या कृषि क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण विषयात प्राविण्य मिळवून कृषि क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना मा. आ. जयंतराव ससाणे साहेब स्मृति कृषिरत्न पुरस्कार २०२४ पुरस्कार मिळाला.

मोबाईल ॲप व वेबसाईटचे नियोजन 
   
  मधमाशीपालन, गांडूळखत व धिंगरी अळींबी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची भावी योजना पुढीलप्रमाणे आहे ती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची परागीभवन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पेटीमध्ये फसवणूक होते किंवा जास्तीचे पैसे घेतले जातात. ओला-उबर या ट्रॅव्हल कंपन्या जशी 'रिअल टाईम लोकेशन बेसिस' वर रिक्षा, कार बुक करण्याची सोय करून देतात, त्या धर्तीवर ऑनलाईन पेटी बुकिंग सुविधा, मोबाईल अॅप व वेबसाईट उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. याद्वारे इतरही मधमाशीपालक त्या अॅपमध्ये नोंदणी करून आपली सेवा देऊ शकतील व चांगली सेवा देणारे मधमाशीपालकच पुढील काळात शेतकऱ्यांच्याद्वारे पुढे आणले जातील.

विपणनासाठी साखळी
 
     गांडूळखत निर्माण करण्यासाठी ज्या थोड्याफार सुविधा शेतकऱ्यांना लागतात, त्या त्यांच्याकडे मुबलक आहेत, फक्त विपणनासाठी साखळी पद्धत निर्माण केली तर शेतकऱ्यांना एक जोडव्यवसाय करता येईल. शहरामध्ये प्रत्येकाच्या घरात, सोसायटीमध्ये, कॉर्पोरेट कंपनी मध्ये शोभेची झाडे लावली जातात, परंतु तिथे झाडे लावण्यासाठी माती व खत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्वक गांडूळखत निर्मित करून शहराकडे पाठवले तर त्याला त्यातून चांगले उत्पन्न मिळेल. तसेच गांडूळखत निर्यात करण्यास खूप वाव आहे. या दोन प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी भरपूर संधी आहे. धिंगरी अळींबीचे उत्पादन खूप घेता येते परंतु आठवडे बाजारात जश्या भाज्या कायम ग्राहकाच्या डोळ्यासमोर कायम दिसतात तसे धिंगरी अळींबीबाबत झाले पाहिजे. तरच धिंगरी अळींबी खाणे हे ग्राहकाच्या अंगवळणी पडेल व तयार माल विकला जाईल. त्यादृष्टीने श्री. औताडे यांना संकल्पना राबवायची आहे.
    
    अशा प्रकारे श्री. औताडे यांनी मधमाशीपालन, गांडूळखत व ऑयस्टर मशरूम या तिन्ही व्यवसाय अनुरूप नैसर्गिक शेतीची पीक पद्धती अवलंबत आहे. फक्त शेती व्यवसायावर अवलंबून न राहत त्यास जोड व्यवसायाची साथ दिल्यास नफा तोटयातील अंतर कमी होते, व प्रत्येक शेतकरी एक ब्रँड म्हणून समाजापुढे येण्यासाठी त्याची मदत होते. ब्रँड तयार व्हावा या दृष्टीने गोदागिरी फार्म नामक फर्म नोंदणी करून त्याअंतर्गत सेवा पुरवल्या जात आहे. शेतीला पूरक व कमी भांडवलात सुरू होणार जोडव्यवसाय निवडून त्याबाबत प्रशिक्षण व जनजागृतीचे काम श्री. औताडे यांनी हाती घेतले व २०२२ पासून ते आजपर्यन्त १००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थ्यांना ऑनलाइन/ऑफलाईन प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रात्यक्षिके यासाठी जोडले.


विविध उत्पादनांची निर्मिती 
    
      मध व गांडूळखत आकर्षक पॅकिंग करून ग्राहकांना पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर कोकोपिट, निंबोळी पावडर (गांडूळखत विक्रीपूरक), सूर्यफूल तेल (मधमाशीपूरक), चीया सिड्स (मधमाशीपूरक), खपली गहू (मशरूमपूरक), सोयाबीन (मशरूमपूरक) पिकांची शेती श्री. औताडे यांनी केली व विक्री व्यवस्था त्याप्रमाणे उभी केली. या जोडव्यवसाय साखळीमध्ये अनुभव आल्याने त्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी शासकीय, निमशासकीय, नवउद्योजक व कॉर्पोरेट सीएसआर प्रकल्प हाताळणी या माध्यमाद्वारे ते मार्गदर्शन करत आहे.
   
    शेती उत्पादित मालविक्री हा मोठा प्रश्न आहे, किमान आधारभूत किंमत मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात. त्याला उपाय म्हणून निवडलेल्या जोड व्यवसायास अनुरूप नैसर्गिक शेतीची पीक पद्धतीद्वारे शेती करून व उत्पादित माल ब्रॅण्डिंग करून विक्री करत आहे.
    
    मधमाशीपालनातून मध तयार होतो, काढलेले पीक विक्री करून राहिलेला जो शेतातील काडी कचरा आहे त्याचा उपयोग आधी ऑयस्टर मशरूम उत्पादन करून उर्वरित भुसा गांडूळ खत तयार करण्यामध्ये अंतर्भूत केला जातो. अशाप्रकारे सौम्य गतीने परंतु भविष्यात तरणारे जोड व्यवसाय मॉडेल तयार करून श्री. हृषिकेश औताडे मार्गक्रमण करत आहे.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

(लेखन सेवा पुरस्कार विजेते) 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

उद्योगस्वामिनी : ४ प्रेरणादायी महिला उद्योजिकांच्या यशकथा (Businesswomen: 4 inspiring success stories of women entrepreneurs)

उद्योगस्वामिनी : ४ प्रेरणादायी महिला उद्योजिकांच्या यशकथा 

Businesswomen: 4 inspiring success stories of women entrepreneurs

(Master Blog – Combined Edition)

    भारतातील ग्रामीण आणि अर्धशहरी भागात महिलांची उद्योजकता झपाट्याने वाढत आहे. नव्या संधी, साहसी विचार आणि सातत्याच्या जोरावर या महिला केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाहीत, तर संपूर्ण समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत आहेत.
त्यातीलच चार अद्भुत, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक महिला म्हणजे:

  • सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले (ढवण) – दुग्ध व्यवसाय व झिरो वेस्ट विशेषज्ञ

  • सौ. कविता ढोबळे – अॅग्री कंटेंट क्रिएटर आणि विषमुक्त शेती मार्गदर्शक

  • सौ. सुनिता निमसे – गोदा फार्म्सची महिला कृषी उद्योजिका

  • कमल कुंभार – एकाच वेळी १० व्यवसाय हाकणारी उद्योजिका

    या चारही कथांची एकत्रित शक्ती म्हणजे “उद्योगस्वामिनी” आंदोलन – महिलांना स्वावलंबी बनवण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची प्रबळ प्रेरणा...


🌟 1) सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले (ढवण)– दुग्ध व्यवसाय, Zero Waste व चरकक्रांतीची वाटचाल

   श्रद्धाताईंचा प्रवास “साधी सुरुवात – मोठं यश” याचं उत्तम उदाहरण आहे.
  दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय खतनिर्मिती, जैविक शेती आणि Zero Waste या चारही क्षेत्रांचा सुंदर संगम त्यांनी साधला आहे.

त्यांचे तीन मुख्य स्तंभ:

  • शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन

  • शेण, गोमूत्र, जैविक कचऱ्याचा 100% पुनर्वापर

  • महिलांना"चरकक्रांती"द्वारे रोजगार

Zero Waste System चं उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. आजमितीला श्रद्धा वार्षिक २५० टन क्षमतेचा विक्रमी गांडूळ खत प्रकल्प चालवतात. 

  “नुकताच त्यांना राष्ट्रीय दुग्ध दिवस – २०२५ या निमित्ताने नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार २०२५’ ने गौरविण्यात आले.”


🌿 2) सौ. कविता ढोबळे – अॅग्री कंटेंट क्रिएटर & विषमुक्त शेतीची ब्रँड अँबेसिडर  


    कविताताई शेती क्षेत्रातील कंटेंट क्रिएशनला एक नवं रूप देत आहेत.
    त्या स्वतःच्या अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि विषमुक्त शेती, गांडूळ खत व सेंद्रिय पद्धती याबाबत शेकडो मार्गदर्शक व्हिडिओ प्रसारित करतात.

त्यांची वैशिष्ट्ये:

  • नव्या पिढीला उपयुक्त Digital Agriculture Content

  • शेतीवरील प्रत्येक प्रयोग “प्रात्यक्षिक + रीअल रिझल्ट”

  • महिलांसाठी शेतात करण्याजोग्या व्यवसाय कल्पना

  • खर्च–उत्पन्न विश्लेषणाची अचूक माहिती

  उद्योगस्वामिनी (Udyogswamini)
  • आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेत आहेत.

🌾 3) सौ. सुनिता निमसे – गोदा फार्म्सची आधुनिक शेतकरी उद्योजिका

    दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय खतनिर्मिती आणि द्राक्ष शेती यांचा त्रिकोणी मॉडेल म्हणजे गोदा फार्म्स – ज्यामध्ये सुनिताताईंची नेतृत्व भूमिका अतिशय प्रभावी आहे.

उद्योगस्वामिनी (Udyogswamini)

त्यांचा व्यवसाय मॉडेल:

  • दर्जेदार दुध उत्पादन

  • नैसर्गिक शेती पद्धती

  • कुटुंबाचा सहभाग + तंत्रज्ञान वापर

  • बाजारपेठेतील थेट ग्राहक मॉडेल (Farm to Home)

सुनिताताईंच्या नेतृत्वामुळे आज गोदा फार्म्स हा ग्रामीण उद्योजकतेतील एक मजबूत आणि यशस्वी ब्रँड बनला आहे.


🚀 4) कमल कुंभार – एकाच वेळी १० व्यवसाय चालवणारी उद्योगसम्राज्ञी

    कमल कुंभार या महाराष्ट्रातील सर्वात प्रेरणादायी उद्योजिकांपैकी एक.
    शून्य भांडवलातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज १० विविध क्षेत्रांत विस्तारलेला आहे — दुध डेअरी, शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय खत, महिलांचे प्रशिक्षण, शिवणकाम, खाद्यपदार्थ निर्मिती आणि बरेच काही!

त्यांचे माइलस्टोनः

  • 700+ महिला स्वयंसहाय्यता गट सक्रिय

  • 10,000+ महिलांना प्रशिक्षण

  • कमी खर्चात मोठे उद्योग जपण्याची शैली

  • ग्रामीण उद्योजकतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल

त्यांचा प्रवास म्हणजे “महिला स्वावलंबनाचे सुपर मॉडेल.”


💎 या चारही उद्योगस्वामिनींकडून मिळणाऱ्या 10 शिकवणी

  1. व्यवसाय लहान असो वा मोठा – निष्ठा सर्वात महत्त्वाची

  2. महिलांमध्ये नेतृत्व क्षमता प्रचंड असते

  3. शाश्वत शेती हीच भविष्यातील खरी अर्थव्यवस्था

  4. कंटेंट + अनुभव = कृषी क्षेत्रातील नवीन क्रांती

  5. Zero Waste शेती ही नफा वाढवण्याची सर्वात सोपी पद्धत

  6. घरगुती उद्योगातून मोठे साम्राज्य उभे राहू शकते

  7. महिलांचे एकजूट झालं की परिवर्तन वेगाने होते

  8. बाजारपेठ थेट ग्राहकांपर्यंत नेल्यास ब्रँड मजबूत बनतो

  9. व्यवसायांचे विविधीकरण (Diversification) आवश्यक

  10. सातत्य + जिद्द + प्रामाणिकपणा = खात्रीशीर यश


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

जागतिक जल दिन विशेष 💧 पाणी समस्येचे समाधान = संधींचा पाऊस | Water Problem Solutions & Opportunities

पाणी समस्या सोडविण्याची गरज  Need to solve water problem